Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 1 मामू Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

11th Marathi Digest Chapter 1 मामू Textbook Questions and Answers

1. अ. कोण ते लिहा.

प्रश्न 1.
चैतन्याचे छोटे कोंब :
उत्तर :
शाळेतील लहान मुले

प्रश्न 2.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
उत्तर :
मामू

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 3.
शाळेबाहेरचा बहुरूपी :
उत्तर :
मामू

प्रश्न 4.
अनघड, कोवळे कंठ :
उत्तर :
शाळेतील लहान मुले.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 3

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 4

इ. खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

प्रश्न 1.

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ……………..
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ………………
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.” ………………….
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” ……………..
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. ………………….

उत्तर :

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. – देशभक्ती
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. – मातृप्रेम/भावणाशीलता
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ – वात्सल्य
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” – हुशारी
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. – अभ्यासू वृत्ती

ई. खलील शब्द समूहाचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
थोराड घंटा
उत्तर :
थोराड घंटा- दणकट, मोठी व वजनदार घंटा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
अभिमानाची झालर
उत्तर :
अभिमानाची झालर – झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.

2. व्याकरण.

अ. खलील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

प्रश्न 1.
इशारतीबरहुकूम
उत्तर :
हुकूम, तीर, रती, हुशार, रतीब

प्रश्न 2.
आमदारसाहेब
उत्तर :
आम, आब, आहे, आरसा, आमदार, दार, दाम, दाब, बसा, साम, सार, साहेब, बदाम, रसा(पृथ्वी), हेर, हेम (सोने), मदार.

प्रश्न 3.
समाधान
उत्तर :
नस, मान, मास, समान, मानस

आ. खलील वाक्प्रचाराचा अर्थ लिहन वाक्यात उपयोग करा :

प्रश्न 1.
चौवाटा पांगणे
उत्तर :
चौवाटा पांगणे – चहूबांजूना (चारी वाटांवर) विखुरणे, सर्वत्र पांगणे.
वाक्य : गावात दुष्काळ पडला नि गावकरी चौवाटा पांगले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
कंठ दाटून येणे
उत्तर :
कंठ दाटून येणे – गहिवरणे.
वाक्य : मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला.

प्रश्न 3.
हरवलेला काळ मुठीत पकडणे.
उत्तर :
हरवलेला काळ मुठीत पकडणे – भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
वाक्य : कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.

इ. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.

प्रश्न 1.
अनुमती, घटकाभर, नानातन्हा, अभिवाचन, जुनापुराणा, भरदिवसा, गुणवान, साथीदार, ओबडधोबड, अगणित
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 5
उत्तरः

उपसर्गघटितप्रत्ययघटितअभ्यस्त
भरदिवसासाथीदारओबडधोबड
अभिवाचनगुणवानजुनापुराणा
अनुमतीघटकाभर
नानातन्हा
अगणित

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

3. स्वमत:

प्रश्न अ.
‘शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे’, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
‘मामू’ हा शिवाजी सावंत यांच्या ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून घेतलेला पाठ आहे. या पाठात ‘मामू’ या व्यक्तीची व्यक्तिरेखा रेखाटताना त्याचे विविध पैलू दाखवले आहेत. प्रामाणिक, देशाभिमानी असलेला मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. कोल्हापूर संस्थान आणि लोकशाही अशा दोन्ही राज्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

असा हा मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो विविध भूमिका बजावताना दिसतो. शाळेत शिपायाचे काम करणारा मामू अतिशय प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतो. तो विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. जसा एखादा बहुरूपी विविध रूपं घेऊन आपल्यासमोर येतो तसाच शाळेच्या बाहेर मामू आपल्याला विविध रूपांमध्ये भेटतो. कधी तो फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर घटकाभर का होईना पण तेथे बसणारा दुकानदार होतो. ज्याप्रमाणे बहुरूपी सोंग चांगल्या रितीने वठवल्यावर मिळेल तेवढ्या पैशांवर समाधानी राहतो तसेच दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे देवाचा प्रसाद मानणारा समाधानी मामू भेटतो.

कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देणारा शिक्षक तर कधी मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी विविध रूपे घेतो. कधी कुणाच्या पायाला लागलं तर कुठला पाला वाटून लावावा, पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा घ्यावा, शरीरयष्टी कशी कमवावी हे सांगणारा वैदय बनतो. वक्ता कसा बोलला हे सांगणारा परीक्षक बनतो, तर कधी चक्कर आलेल्या मुलाला डॉक्टरकडे नेताना आईच्या मायेने जपणारा, धीर देणारा, संवेदनशीलवृत्तीच्या व्यक्तीची भूमिका निभावतो. अशाप्रकारे मामू केवळ शाळेत काम करणारा शिपाई राहत नाही तर शाळेबाहेच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात. शाळेबाहेर वावरणारा तो बहुरूपीच आहे.

प्रश्न आ.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
शिवाजी सावंत यांच्या ‘मामू’ या कथेत मामूच्या स्वभावाचे, प्रामाणिकपणाचे, कष्टाळूपणाचे, संवदेनशील वृत्तीचे वर्णन आले आहे. ‘मामू’ गेल्या चाळीस वर्षापासून शाळेत शिपाई म्हणून काम करतो. तो अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आहे. त्याच बरोबर सहदयी आहे. मामूची म्हातारी आई गेल्यानंतर तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळतं.

‘दुनियेत सारं मिळेल सर; पण आईची माया कुणाकडनं न्हाई मिळायची’ हे बोलताना नातवंड असलेला मामू स्वतः लहान मुलासारखा भासतो तेव्हा त्याच्या संवेदनशीलवृत्तीचा परिचय येतो. शाळेतील एखादा मुलगा खेळताना किंवा प्रार्थनेच्या वेळी चक्कर येऊन पडला तर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेताना त्या लहान मुलाला मायेने धीर देताना “घाबरू नकोस’ म्हणतो. यातून त्याची संवेदनशीलता व सहदयता दिसून येते.

मामूच्या संवेदनशीलतेची अनेक उदाहरणे मामूचे व्यक्तिचित्रण करताना शिवाजी सावंत यांनी दिली आहेत. (इ) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा. उत्तरः ‘मामू’ या व्यक्तिचित्रणात्मक पाठात लेखक शिवाजी सावंत यांनी ‘मामू’ या व्यक्तिरेखेचे लक्षणीय शब्दचित्र रेखाटले आहे.

मामू हा शाळेचा शिपाई आहे. परंतु तो शाळेचा अविभाज्य भाग आहे. मामू डोक्याला अबोली रंगाचा फेटा बांधतो, अंगात नेहरू शर्ट आणि त्यावर गर्द निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच असतं. खाली घेराची व घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान आणि पायात जुना पुराणा पंपशू असे अत्यंत साधे राहणीमान मामूचे आहे. मामूच्या चेहऱ्यावर सफेद दाढी आहे. परंतु चेहऱ्यावर कायम समाधान आणि नम्रतेचा भाव, चांगल्या व वाईट अनुभवाने समृद्ध मामू साधारणतः साठीचा आहे. परंतु म्हाताऱ्या शरीरातील मान मात्र उमदं आहे. अतिशय चित्रदर्शी लेखन शैलीत रंगवलेले मामूचे व्यक्तिचित्र त्याच्या राहणीमानामुळे व गुणांमुळे आपल्या चांगलेच लक्षात राहते व मामू डोळ्यासमोर उभा असल्यासारखे भासते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

4. अभिव्यक्ती

प्रश्न अ.
‘मामू’ या पाठाची भाषिक वैशिष्टये स्पष्ट करा.
उत्तर :
‘मामू’ हा पाठ शिवाजी सांवत यांनी लिहिलेला आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे शिवाजी सावंत हे त्यांच्या ‘मृत्युजंय’ आणि ‘छावा’ या दोन कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुस्तकाबरोबरच अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना गौरवान्वित केले आहे… मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठात केले आहे.

समर्पक शब्दरचना आणि चित्रदर्शी लेखनशैली हे शिवाजी सावंत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य पाठामध्ये अनेक वेळेला अनुभवायला येते. त्यांची शैली ही मध्ये मध्ये आलंकारिक होते, म्हणूनच प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी असा सरळ उल्लेख न करता ते लिहितात ‘रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात.

त्यांच्या या वर्णनामुळे निरागस भावनेने पटांगणावर प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात आणि गद्यलेखनाला काव्यात्मकतेचे रूप येते. विदयार्थ्याचा उल्लेख ते ‘चैतन्याचे छोटे कोंब’ असा करतात तर शाळेतील मोठ्या घंटेचा उल्लेख ‘थोराड घंटा’ असा करतात. इथे शब्दांची अनपेक्षित वेगळी रचना करून भाषेचे सौंदर्य ते वाढवितात. उदा. ‘कोंब’ हा शब्द झाडांच्या बाबतीत वापरला जातो तर ‘थोराड’ हा शब्द प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात वापरला जातो.

पण अर्थाचे रूढ संकेत लेखक झुगारून देतो आणि शब्दांबरोबरच अर्थाला नवीन सौंदर्य बहाल मामू हे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर शब्दशः ते उभे करतात, मामूची पांढरी दाडी, भुवया, डोक्याचा फेटा, अंगावरील नेहरू शर्ट, त्यावरील जाकीट पकिट वाँच, चुणीदार तुमान, पंपशू यांचे ते तंतोतत वर्णन करतात. त्यामुळे मामू या व्यक्तिमत्त्वाची छबी हुबेहुब डोळा हा उर्दू जाणणारा मुस्लिम माणूस असल्याने त्यांच्या तोंडची भाषा तशीच वापरून ते उर्द, हिंदी आणि बोलीभाषेचा समर्पक वापर करतात आणि लिहितात, ‘परवा परवा मामुची बुली आई अल्लाला प्यारी झाली.’

किंवा ‘लग्न ठरलं’ या शब्दाऐवजी मुस्लिम संस्कारातील ‘शादी मुबारक’, ‘अल्लाची खैर’ असे शब्द वापरतात. ‘अभिमानाची झालर त्यांच्या मुखड्यावर उतरते’ अशा शब्दांमुळे अर्थाचा आंतरिक गोडवा जाणवतो. त्यांच्या बऱ्याच शब्दरचनांमध्ये आशयाची आणि विचारांची संपन्नता जाणवत राहते. उदा. ‘धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी.’ परीक्षा केंद्रावर परीक्षेआधी जी तयारी करावी लागते त्याचे वर्णन ते अत्यंत बारकाईने करतात आणि या परीक्षेच्या जोरावर आयुष्यात यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्या विदयार्थ्याच्या मागे शाळेतील शिपाई वर्ग किती जबाबदारीचे काम पार पाडतात हे दाखवून देतात. त्यामुळे ते नुसते पूर्वपरीक्षा वर्णन राहत नाही तर चतुर्थ श्रेणी वर्गाच्या श्रमाची दखल यानिमित्ताने ते घेतात. लेखकाची लेखणी जेव्हा सर्वसंपन्न असते तेव्हा सामान्य व्यक्तिमत्त्वाचे असामान्य पैलूही दमदारपणे साकार होतात याचा प्रत्यय हे लेखन वाचताना येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न आ.
‘मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
उत्तर :
लेखक शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रण संग्रहातून ‘मामू’ हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ घेतला आहे. या पाठात मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण केलेले आहे. मामू हा शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. गेली चाळीस वर्षे शाळेत शिपाई म्हणून काम करणारा मामू शाळेबाहेरही विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर बसतो. दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे अल्लाची देन मानतो, त्याविषयी कोणतीही तक्रार करत नाही. यातून त्याची नि:स्वार्थी वृत्ती, नम्रता, सेवाभाव जाणवतो. तर कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देतो. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मामू’ आहे.

कर्तबगार, समाधानी आयुष्य जगणारा मामू मुलाच्या लग्नाला आलेल्या अधिकारी वर्गाचे आभार मानायला विसरत नाही. इतका तो कृतज्ञशील आहे. तो मुलांनाही आपल्यासारखे केवळ गुणवान बनवत नाही तर आज्ञाधारकही बनवतो. त्यांच्यासाठी कर्तव्यतत्पर असतो. बदलत्या काळानुसार मुलाला शिक्षणाची संधी देतो. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळेच त्याच्या मुलांच्या लग्नाला आमदार, खासदारपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वच उपस्थित राहातात.

हीच त्याच्या आयुष्यभराची कमाई आहे, आईविषयीच्या आठवणी सांगताना भावूक झालेल्या मामूचे मातृप्रेमही जाणवते. कोणत्याही वर्षीचं रजिस्टर अचूक शोधून मामू माजी विदयार्थ्याला मदत करतो तर सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांची तयारी करताना त्याची कार्यतत्परता दिसून येते. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेस एखादा विदयार्थी चक्कर येऊन पडला तर त्याला दवाखान्यात नेणारा मामू माणुसकीचे दर्शन घडवतो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजवंदन करताना देशाविषयी नितांत प्रेम, आदर व कर्तव्यनिष्ठा दिसून येते.

वैदयकक्षेत्रातील ज्ञानही त्याला आहे आणि सहज जाता जाता तो त्याची माहिती देतो, यात कुठेही सल्ले देण्याचा आव नसतो. शाळेतील एखादया कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो यासंबंधी निरीक्षणक्षमतादेखील त्याच्याकडे आहे. अशाप्रकारे मामू ही फार साधी, सरळ, प्रामाणिक, नम, कर्तव्यपरायण, देशाबद्दल प्रेम असणारी, सेवाभवी, सहृदयी, नि:स्वार्थी, हुशार अशी व्यक्ती आहे.

प्रश्न इ.
‘माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!’ या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
माणूस कोणत्याही जाती, धर्माचा असो त्याच्यामध्ये माणुसकी नसेल तर त्याला माणूस कसं बरं म्हणावं? आज समाज फारच बदलतोय, प्रत्येक गोष्टीसाठी माणसं फार आग्रही होत चालली आहेत. जात, धर्म यांच्या नावावर माणसं स्वतःचे स्वार्थ साधून संधीसाधू होऊ पाहत आहेत. अशावेळी माणसाचा माणसावरचा विश्वास संपत चालला आहे असं वाटतं खरं पण गंमत अशी की जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा एकमेकांच्या विरोधात भांडणारी, सूड उगवणारी माणसं मदत करण्यासाठी पुढे सरसावतात.

मग त्यांच्यातील वैर संपून जातं. एखादं पोर गाडीखाली येत असेल तर चटकन कुणीतरी पुढं होऊन त्याला वाचवतं, कणी हॉस्पिटलमध्ये असेल त्याला रक्ताची गरज असेल तर कित्येक लोक मदतीला धावून जातात, आताच्या काळात कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं जातं खरं पण तरीही एनजीओ चालवणाऱ्या संस्था वाढत आहेत, त्यामुळे माणूस कितीही स्वार्थी असला तरी तो त्याचं सामाजिक भान विसरलेला नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रकल्प :

प्रश्न 1.
‘तुमच्या परिसरातील अशी सामान्य व्यक्ती की जी तिच्या स्वभावामुळे असामान्य झाली आहे त्या व्यक्तीचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
उत्तर :
रजनी ही आमच्या घरी काम करायला येणारी ताई. प्रचंड हुशार आणि तल्लख बुद्धीची तितकीच विनम्रही. आमच्याकडे ती कामाला यायला लागली तेव्हा ती आईला म्हणाली, ‘ताई, मी लहानपणापासून घरकाम करतेय पण प्रत्येक घराची पद्धत वेगळी. तुम्ही तुमच्या घरातील कामं शिकवाल ना? हे ऐकून आई खूप आनंदित झाली. असं तिला मायेने बोलणारी बाई पहिल्यांदाच भेटली होती. आईने जे शिकवलं तसं तसं ती अजून नीट काम करू लागली. माझ्या धाकट्या भावालाही जीव लावला.

घरातल्या पैपाहुण्यांची उठबस करावी ती रजनीताईनेच. हळूहळू तिनं आमच्या कॉलनीत सर्वच घरकाम करणाऱ्या बायकांना एकत्र आणलं. प्रत्येकीला मदत करण्याच्या स्वभावामुळे बायका तिच्याजवळ मन मोकळं करू लागल्या. त्या सर्वांच्या मनात ताईबद्दल केवळ स्नेह आहे. आता काही महिन्यांपूर्वी ताईने या बायकांसाठी एक भिशी सुरू केली. त्यातील पैसे घरकामवाल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असा निर्धार तिने केला.

आश्चर्य म्हणजे आमच्या आईने, शेजाऱ्यांनी पुढाकार घेऊन घरकामवाल्या मावशांच्या मुलांसाठी शाळेची फी भरण्यासाठी वर्गणी जमा केली आणि बँकेत ती रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली. जवळजवळ एक लाख रुपये जमा झाले. या सर्वांचे क्रेडिट केवळ रजनीताईला दिलं जातंय. असं म्हटलं जातं की ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास’ हे रजनीताईकडे बघून यथार्थ वाटतं.

11th Marathi Book Answers Chapter 1 मामू Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – [ ]
उत्तरः
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – गृहप्रवेश

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 6
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 7

प्रश्न 3.
मामूने माईक हातात घेतला कारण –
उत्तरः
लग्नासाठी जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी मामूने माईक हातात घेतला.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

उपयोजित कृती :

खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न 1.
त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली.
पैसा कमावतात म्हणून माज नाही.
उत्तर :
पांढरी – विशेषण, राहिली- क्रियापद
म्हणून – उभयान्वयी अव्यय.

प्रश्न 2.
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं,
उत्तर:
संयुक्त क्रियापद

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
अ. पाखरागत : ………
आ. मजल्यावर : ………..
उत्तर :
अ. पाग, पारा, राग, रात, गत, खत, खग, खरा, तग, गरा
आ. मज, वर, जर, रज, जम, जमव

खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
अ. सर्टिफिकेट (certificate) –
उत्तर :
अ. प्रमाणपत्र, कॉमर्स (commerce) वाणिज्य / व्यापार

आकलन कृती

प्रश्न 1.
मामूची शाळा या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचे केंद्र आहे.
उत्तरः
ड्रॉईंगच्या
कॉमर्सच्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
परीक्षेच्या काळात मामू करत असलेली कामं
उत्तरः
नंबर टाकणं
बैठक व्यवस्था करणं
पाण्याची व्यवस्था करणं

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 8
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 9

खालील ओघतक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 10
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 11

प्रश्न 2.
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहण्याची पद्धत –
उत्तर :
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उचावून बघत राहण्याची पद्धत – फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवणे

स्वमत:

प्रश्न 1.
मामूच्या जनसंपकाविषयी तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर :
मामू हा पडेल ती काम करणारी व्यक्ती, शिपाई असूनही त्याची शाळा, समाज यांविषयीची आस्था त्याच्या कामातून, वागण्यातून दिसून येते. मामू ज्या शाळेत काम करतो ती शाळा सरकारी आहे. तिथं पडेल ती कामे तो करतो. शाळेतल्या मुलांच्या, भावनांची, शरीराची, अभ्यासाचीही काळजी घेतो. तिथल्या शिक्षकांची, इमारतीची त्याला काळजी असते. त्याच्या अशा काळजीवाहू स्वभावामुळे लोक त्याच्यावरही जीव टाकतात. त्यामुळे राष्ट्रीय सणांना त्याच्या हस्ते ध्वनही फडकवला जातो.

शाळेत कुणी पाहुणे आले तर त्याला त्यांच्या पाहुणचाराविषयी फार सांगावे लागत नाही. तो त्यांच्या पदाला साजेसे आदरातिथ्य करतो. या त्याच्या लाघवी स्वभावामुळे तो सर्वानाच हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्याच्या मुलाच्या लग्नातही बडी बडी मंडळी आलेली होती. शाळेतल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कधीच तो मागे पाहत नाही. प्रेमळ, नम्र, लाघवी बोलण्यामुळे त्याचा चाहता वर्ग त्याने निर्माण केला आहे. तो सर्वांच्या मदतीला गेल्यामुळे त्याच्याही मदतीला लोक धावून जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

मामू Summary in Marathi

प्रस्तावनाः

लेखक शिवाजी सावंत यांचे चरित्रात्मक कादंबरीलेखन हे आवडते लेखनक्षेत्र, ‘छावा’, ‘युगंधर’, ‘लढत’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. ‘मृत्युंजय’ ही त्यांची लोकप्रिय कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनकर्तृत्वाचे शिखर आहे. ‘अशी मने असे नमुने’, ‘मोरावळा’ ‘लाल माती रंगीत मने’ हे ‘व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध’ भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ तसेच सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा त्यांचा गौरव केला असून पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे नामांकन झालेले होते.

सर्वोत्कृष्ट वाङ्मयकार म्हणून परिचित असलेले शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहृदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

पाठाचा परिचय :

सर्वोत्कृष्ट वाङमयकार म्हणून परिचित असलेले ‘शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

शाळेची घंटा वाजवल्यानंतर मुलांनी प्रार्थनेसाठी रांगा केल्या व हात जोडून, डोळे मिटून भावपूर्ण सुरात प्रार्थना म्हटली. ‘मामू’ मात्र दगडी खांबाला टेकून विचारमग्न झालेला होता. ‘जनगणमन’ सुरू होताच पाय जोडून सावधान स्थितीत उभा होता.

कोल्हापूर संस्थानातील राजाराम महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत मामू चाळीस वर्षे या शाळेत काम करतो आहे. त्यानं दोन राज्य बंधितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं, कोल्हापूरच्या कैक पिढ्या त्याने बघितल्या आहेत, संस्थानाच्या काळात महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर असताना मामूची चौदा मैलांची पायपीट व त्याच्या साथीदारांसह आलेला अनुभव तो अभिमानाने सांगतो. संस्थाने विलीन झाली, मामूसारखा चाकर वर्ग (कामगार वर्ग) पांगला गेला आणि मामू या शाळेत शिपाई म्हणून हजर झाला.

डोक्यावर अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्ट व त्यावर निळे जाकिट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं जुनं घड्याळ, घोट्यापर्यंत पायजम्यासारखी तुमान, पायात जुना बूट (पंपशू) अशी मामूची साधी राहणी आहे.

शाळेच्या बाहेरही माम् अनेक कामे करतो. फळांच्या दुकानावर काही वेळा फळे विकणे आणि तो मालक जो मोबदला देईल तो घेणे. एखादया मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दू शिकवणे, त्याचप्रमाणे मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी अनेक रूपे त्यांची दिसतात.

लेखक मामूला दहा वर्षांपासून अनुभवतो आहे. मामू गरीब असला तरी हुशार आहे. त्याची मुलं गुणवान आहेत, पैसे कमवतात, मामूचा शब्द पाळतात, मामूच्या निमंत्रणानुसार त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाला लेखक गेले. तेथे खासदार, आमदार, शिक्षक, व्यापारी, प्राध्यापक, उपस्थित होते. त्याचं समाधान सर्वांचे आभार मानताना त्याच्या सफेद दाढीवर दिसत होतं.

धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. या विचारांची रुजवणूक ‘मामू’ कडे बघून होते. मामूचा शेवटचा मुलगा एस.एस.सी पास झाल्यावर लेखकाच्या सांगण्यावरून त्यानं त्याला कॉलेजात दाखल केलं.

मामूची आई देवाघरी गेल्यानंतर आईची आठवण सांगताना नातवंडं असलेला मामू लहान मुलासारखा वाटतो आणि आईची माया जगात कुठेच मिळत नाही, असे सांगताना त्याचे डोळे पाणावतात.

शंभर वर्षे जुना असलेल्या शाळेतला रेकॉर्ड मामू अचूक शोधून आणतो. माजी विद्यार्थी 1920-22 सालचा दाखला मागतो. त्यावेळी मामू अचूक ते रजिस्टर शोधून काढतो व वेळेत दाखला मिळाल्यावर त्या विदयाथ्याने मामूला चहासाठी आग्रह केल्यावर, चहा पिताना मामूच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षा शाळेत असल्या की, म्हाताऱ्या मामूच्या पाखरासारख्या हालचाली सुरू होतात.

कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळी एखादा मुलगा चक्कर येऊन कोसळला तर मामू रिक्षा आणून त्या मुलाला मायेने धीर देकन डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याला वैदयकाचंही ज्ञान आहे. तो एखादया शिक्षकाला तब्येत सुधारण्यासाठी खारका खाण्याची पद्धत सांगतो. कुणाच्या पायाला लागलं तर कोणता पाला वाटून त्यावर लावावा याचा सल्ला मामू द्यायला विसरत नाही.

सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मामूच्या हाताने राष्ट्रध्वज दंडावर चढतो व राष्ट्रगीत संपेपर्यंत मामू मान उंचावून झेंड्याकडे अभिमानाने बघत राहतो.

लेखकाकडे कुणी पाहुणा आला आणि नुसती मान डोलवली की, तोच इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. मामू एखादया कार्यक्रमाच्या वेळी मुलांसमोर दहा-वीस मिनिटे बोलू शकतो.

शाळेतील कार्यक्रमाचे नेहमीप्रमाणे मामू नियोजन करत असतो. त्या कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो ते एका कोपऱ्यात उभे राहून ऐकतो. कार्यक्रम संपल्यानंतर मामूला कार्यक्रमाबद्दल विचारणा झाली तर तो म्हणतो. बोलला चांगला तो, पण म्हणावी तशी रंगत आली नाही.

सरकारी नियमाप्रमाणे आणखी वर्षभरानंतर मामू आमच्यात नसेल पण असेच मामूच्या हातांनी शाळेत घंटेचे घण घण घण टोल पडत राहावे आणि हात जोडून व मिटल्या डोळ्यांनी प्रार्थना ऐकत बूला मामू दगडी खांबाला रेलून विचारात कायम हरवलेला बघायला मिळावा अशीच लेखकाची इच्छा आहे.

शाळेत शिपाई म्हणून काम करत असताना कर्तव्यनिष्ठ, नम्र, तत्पर, संवेदनशील वृत्तीमुळे मामू स्वतःचे वेगळे स्थान शाळेत निर्माण करतोच पण त्याची ग्रामीण भाषाही मनाला भिडणारी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. चर्या – भाव/छटा – (feeling, emotion)
  2. अंतर्भाव – समाविष्ट – (inclusion)
  3. अनघड – अपरिपक्व, न घडलेला – (immature)
  4. मासला – उदाहरण – (example)
  5. कंठ – स्वर निघतो तो अवयव – (throat)
  6. अज्ञात – अपरिचित, माहिती नसलेला – (unknown)
  7. आळवणे – सुस्वराने गाणे
  8. कोंब – अंकुर – (a sprout)
  9. मुखडा – चेहरा – (face)
  10. विलीन – समाविष्ट – (absorbed in. mereed)
  11. अवाढव्य – खुप मोठे – (hure)
  12. इमानी – प्रामाणिक – (an honest)
  13. तुमान – पॅन्ट – (loose trousers)
  14. पंपश् – पायातील बूटाचा प्रकार
  15. चण – शरीरयष्टी – (figure)
  16. उमदा – उदार, मोकळ्या मनाचा – (noble, generous)
  17. उय – पद्धत (manner of action)
  18. अगणित – असंख्य, मोजता न येणारे – (countless, innumerable)
  19. वैदयक – वैदयशास्त्र – (the science of medicine).

वाक्प्रचार व त्याचे अर्थ :

  1. गुंतून पडणे – विचारमग्न होणे.
  2. इशारत मिळणे – आदेश मिळणे, खुणावणे, ऑर्डर मिळणे.
  3. चौबाटा पांगणे – चहुकडे पांगणे.
  4. पारख करणे – ओळखता येणे.
  5. चाकरी करणे – नोकरी करणे.
  6. चीज होणे – योग्य फळ मिळणे, यश प्राप्त होणे, कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.
  7. निधार बांधणे – ठाम निश्चय करणे.
  8. आब असणे – नाव असणे / नावलौकिक असणे / भूषण असणे.
  9. रुजू होणे – दाखल होणे.
  10. लकडा लावणे – एखादया गोष्टीसाठी खूप मागे लागणे.
  11. नेट धरणे – धीर धरणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 2 प्राणसई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

11th Marathi Digest Chapter 2 प्राणसई Textbook Questions and Answers

कृती

1. अ. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – [ ]
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – [ ]
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – [ ]
  4. शेतात रमणारी व्यक्ती – [ ]

उत्तर :

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – प्राणसई
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – राक्षसी
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – पाखरे.
  4. शेतात रमणारी व्यक्ती – सखा.

आ. कारणे लिहा :

प्रश्न 1.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत;
उत्तर :
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
बाळांची तोंडे कोमेजली;
उत्तर :
बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 2

2. अ. खालील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
विहिरीच्या तळीं खोल दिसू लागलें ग भिंग :
उत्तर :
कडाक्याच्या उन्हामुळे भूमी करपून गेली, नदया, विहिरीदेखील आटून गेल्या. विहिरीच्या तळाला अगदी कमी पाणी राहिल्यामुळे ते अगदी भिंगासारखे दिसू लागले आहे. भिंगाचा वापर केल्यावर कोणतीही छोटी गोष्ट मोठी दिसू लागते. इथे पाणी विहिरीच्या तळाशी गेले यावरून पाण्याची समस्या किती मोठं रूप धारण करणार आहे याची जाणीव कवयित्री व्यक्त करते.

प्रश्न 2.
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
उत्तर :
पाऊस न आल्यामुळे सगळं वातावरण बिघडून गेले आहे. वातावरण तप्त झालेले आहे, म्हणून कवयित्री आपल्या प्राणसईला मैत्रीखातर बोलावत आहे. या प्राणसईने दौडत धावत आपल्या शेतावर यावं असं वाटतं. शेतात धान्याची बीज पेरलेली आहेत त्यांना वेळेवर पाणी मिळालं नाही तर ती सुकून जातील, शेतातील पिकावरच अवघं जग जगत असते. म्हणून कवयित्री आपल्या शेतावर येण्याचं निमंत्रण पावसाच्या सरींना देते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं:
उत्तर:
प्राणसई असलेल्या पावसाच्या सरींनी भूमीवरच्या सर्वांना भेटायला यावे असे कवयित्रीला वाटते. ती यावी याकरता ती पाखरांसवे प्राणसई पावसाला निरोप पाठवत आहे. त्या पावसाच्या सरींनी गार वाऱ्यासवे झुलत झुलत आपल्या समवेत यावे असे कवयित्रीला वाटते. त्या पावसाच्या सरींनी आपले घरही चिंब भिजावे असं मनोमन तिला वाटते.

आ. खालील तक्त्यात सुचवल्याप्रमाणे कवितेच्या ओळी लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 3
उत्तर :

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळीप्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळीप्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळीमालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी
ये गये ग घनावळी मैत्रपणा आठवून ……प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून ?मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग ?शेला हिरवा पांघरमालकांच्या स्वप्नांवर

3. काव्यसौंदर्य

अ. खालील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कांग अशी पाठमोरी?
वाऱ्यावरून भरारी.
ये ग ये ग प्राणसई’
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत या पावसाच्या सरींना घनावळींना आपली मैत्रीण मानतात. या मैत्रिणीने आता फार विसावा घेतला. तिच्या भेटीची आतुरता कवयित्रीला लागून राहिली आहे. पण ही हट्टी घनावळी मात्र पाखरांसवे निरोप पाठवून, विनवणी करूनही येत नाही, त्यामुळे कवयित्रीचा जीव कासावीस होतो. शेतात बैल काम करेनासे झाले आहेत, तान्हुल्या बाळांचे चेहरे उन्हाच्या झळांमुळे सुकून गेले आहेत.

नदीचे, विहिरीचे पाणी आटू लागले आहे. अशी जीवघेणी परिस्थिती पाऊस वेळेवर न आल्यामुळे झाली आहे. जर हा पाऊस आपला सखा आहे असं आपण म्हणतो, जर ती सखी आहे असं कवयित्रीला वाटतं तर तिनं फार आढेवेढे न घेता आपल्या सख्यांना भेटायला यायला हवे. तिच्यावर अवधी सृष्टी अवलंबून आहे. त्यांचे प्राण कंठाशी येईपर्यंत तिने वाट पाहू नये. त्यामुळे कवयित्रीला वाटतेय की या प्राणसईने वाकडेपणा सोडावा, राग, रुसवा सोडावा. पाठमोरी होकन राग रुसवा धरून मनं व्याकूळ करण्यापेक्षा वायसवे धावत ये. सगळ्यांना चिंब कर. इतरांना सुख देण्यातच आनंद असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
‘शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नावर’.
उत्तर :
प्राणसईने या वर्षी भेटीसाठी विलंब केल्यामुळे सगळेचजण हवालदिल झाले आहेत. जमीनही तप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली कर्तव्ये पूर्ण केली आहेत. कवयित्रीचा सखाही शेतकरी आहे. प्राणसई धावून आली की संपर्ण शेत हिरवेपणाने भरून जाईल. हिरवेपणाचा शेला (शाल) धरतीवर पांघरला जाईल. अवधी सृष्टी चैतन्यमय होईल. तिचं सोबत असणं गरजेचं आहे. मालकाची स्वप्नंही तिच्यावर अवलंबन आहेत. ही घनावळी आली की पिके जोमानं वाढतील. घरीदारी आनंद निर्माण होईल. आपल्या घरात, देशात आपल्या कष्टामुळे आनंद मिळावा हे मालकाचं स्वप्नं पूर्ण होईल.

आ. कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पीठ कांडते राक्षसी –
उत्तर :
उन्हामुळे सगळीकडे तप्त झालेले वातावरण (राक्षसी) प्रतीक

प्रश्न 2.
बैल झाले ठाणबंदी
उत्तर:
उन्हाची तीव्रता अधिक झाल्यामुळे बैलही काम करेनासे झाले. (ठाणबंदी) प्रतीक

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तोंडे कोमेली बाळांची
उत्तर:
उन्हाच्या झळांमुळे बाळांची तोंडे कोमेजली आहेत. (कोमेली) प्रतीक,

इ. कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.

प्रश्न 1.
कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत यांची प्राणसई घनावळी आहे म्हणजे पावसाच्या सरी आहेत. ही घनावळी कवयित्रीची प्राणसखीच आहे. तिच्या भेटीसाठी कवयित्री आतुर झालेली आहे. कवयित्रीने अगदी हक्काने तिला भेटण्यासाठी आमंत्रणं पाठवली आहेत. प्राणसई कुठे तरी गुंतून राहिली याबाबत कवयित्री काळजी व्यक्त करते.

पाखरांच्या हाती तिने या घनावळीला निरोप पाठवला आहे. आपला मैत्रपणा आठवून तिनं दौडत यावं असं कवयित्रीला वाटत आहे. ती आल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही असंही ती म्हणते. आपल्या या सखीने येऊन शेत, घरं, दारं यांना चिंब भिजवावं असं हक्काने सांगते असा हक्क मैत्रीतच दाखवता येतो. ही सखी आल्यानंतर तिने कितीही आढेवेढे घेतले तरी कवयित्री तिला समजावून सांगणार आहे की तिचे येणे या भूतलावर किती महत्त्वाचे आहे ते. तिच्याशी गप्पा मारून आपल्या सख्याचे कौतुक ती सांगणार आहे.

4. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
उत्तर :
मी मुंबईतील एका चाळीत राहतो. मार्च ते मे महिन्याचा कालावधी मुंबईकरांच्या दृष्टीने त्रासदायक असतो. मार्चपासून जो तीव्र उन्हाळा सुरू होतो तो जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुभवतो. उन्हामुळे जीवाची काहिली होते त्यात वीजपुरवठा मधून मधून जात असतो. काही विभागात तर पाणीपुरवठाही कमी असतो. दोन दिवसाआड पाणी आले की ते पाणी भरण्यासाठी माणसांची झुंबड उडते. घामाच्या धारा इतक्या वाहू लागतात की घरात ए.सी., पंखा लावून शांत बसावं असं वाटतं. याच काळात परीक्षा असतात. विदयाथ्यांचे वीज नसल्यामुळे हाल होतात. इथल्या वातावरणाला कंटाळून गावालाही जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न आ.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
उत्तर :
उन्हाळ्यामुळे वैतागून गेलेला जीव पावसाची आतुरतेने वाट पहात असतो. पावसाच्या आधी महानगरपालिकेने साफसफाईची धोरणं आखून काम केलेलं असत, आमच्या विभागात आम्ही नागरिक चाळीची कौलं, घरांची छप्परं यांची दुरुस्ती करून घेतो. पाऊस आल्यानंतर सुखद गारवा सगळीकडे पसरतो, ओलीचिंब झालेली धरणी, त्यावर चढू लागलेली हिरवळ मनाला आनंद देते. जोरजोरात पाऊस पडताना कौलांतून गळणारे पाणी अडवण्यासाठी आमची जाम धावपळ होते. कधीकधी आमच्या विभागात पाणीदेखील साठतं, मग त्यांना मदत करण्यासाठी अख्खी वस्ती पुते येते, गटार, नाले यांचा दुर्गध सर्वत्र पसरतो आणि नंतरचे काही दिवस रोगराईला सामोरं जावं लागतं. मैदाने, रस्ते यांच्यावर फेकलेला कचरा त्यातून निघणारा कुबट वास जीव नकोसा करतो. आधी हवाहवा वाटणारा पाऊस अशावेळी मात्र नकोसा वाटू लागतो.

प्रश्न इ.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो ते लिहा.
उत्तर:
पाऊस म्हणजे आनंद, तृप्ती, मलाही पाऊस आवडतो. पावसानंतर सर्वात जास्त आनंद होत असेल तर कोणाला ? धरित्रीला. हो. पृथ्वीला. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पृथ्वीलाही त्याला भेटण्याची ओढ लागलेली असते. पावसानंतर सष्टीला चैतन्य प्राप्त है भरभरून वाहू लागतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी संपलेला असतो. मुंबईतील तलाव भरले गेले की मुंबईकर आपल्याला वर्षभर पाणी मिळेल- या आशेने आनंदीत होतात. बळीराजा जो सातत्याने कष्ट करत असतो त्याच्या शेतात आता धनधान्य पिकणार असतं. पाऊस हा अशी आनंदाची पर्वणी घेऊन आलेला असतो.

5. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत या मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री आहेत. प्राणसई ही त्यांची कविता पावसाला उद्देशून आहे. उन्हाळ्यामुळे वातावरण तापलेले आहे. राक्षसासारखे ऊन कडाडले आहे. ते अक्षरशः वातावरणाचे पीठच काढते आहे. तीव्र उन्हाळ्याचे चटके कोणालाही सहन होईनासे झाले आहेत हे एका प्रतीकातून इंदिराबाई स्पष्ट करतात ‘पीठ कांडते राक्षसी पीठ कांडते’ हे कष्टमय काम पण ते भरपूर प्रमाणात केले जाते तेव्हा त्याला राक्षसी म्हटले जाते. अशावेळी प्राणसई म्हणजे पाऊस कुठे बरी गुंतून राहिली? असा प्रश्न कवयित्रीला पडतो.

सई म्हणजे सखी हा शब्द योजताना कवयित्रीच्या मनात पाऊस हा सगळ्यांचाच प्राण आहे त्यामुळे कवयित्रीने प्राणसई ही उपमा पावसासाठी उपयोजिली आहे. प्राणसईने भेट दयायला फारच दिरंगाई केली त्यामुळे कवयित्रीने आपल्या सखीला भेटण्याकरता पाखरांसवे बोलावणे पाठवले आहे, या पावसांच्या सरींना ती घनावळी म्हणतेय, व्याकूळ मनाला घनावळीच साद देऊ शकतात. आपल्यातील सख्य, मैत्रपणा आठवून आता या पृथ्वीवर धावत ये, दौडत ये अशी विनवणी कवयित्री करत आहे.

प्राणसखी धनावळी भेटायला येण्याचा काळ ओसरून गेला परंतु ती आली नाही.पाऊस आला की सगळे वातावरण ओले चिंब होते. भाज्या, धान्य यांच्या बी-बियाण्यांच्या आळी जमिनी भाजून करून ठेवल्या आहेत. ती आली की या बियाण्यांमधून रोपे तयार होतील आणि त्याच्या वेली सर्वत्र पसरतील, पावसाळ्यात डासांचा, कीटकांचा त्रास होतो. अशावेळी शेणकुळी जाळल्या जातात.

त्यासाठी घरातील कोपरा रिकामा करून तिथे शेणी ठेवल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे बैलही ठाणबंदी झाले आहेत. कामासाठी ते तयार नसल्यामुळे मालकालाही काहीच सुचेनासे झाले आहे. तप्त झालेल्या धरणीतून गरम वाफा येतात त्यामुळे वाराही तप्त झालेला आहे. वरून उन्हें आग ओकत आहेत. याचा परिणाम कोवळ्या जीवावरही होऊ लागला आहे. लहान बाळांचे कोवळे जीव कासावीस झाले आहेत. त्यांचे चेहरे कोमेजून गेले आहेत हे स्पष्ट करताना कवयित्री ‘तोंडे कोमेली बाळांची’ अशी रचना करते.

उन्हाळ्याचे चार महिने संपले की आपसूकच ओढ लागते पावसाची. पण पावसाचे दिवस सुरू झाले असताना पावसाची’ एकही सर आली नाही त्यामुळे व्याकुळलेली कवयित्री आपल्या पाऊस सखीला पृथ्वीवर येण्यासाठी विनवणी करते आहे. ती प्राणसई न आल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील अगदी तळाशी गेले आहे. ते भिंगासारखे दिसू लागले आहे.

असं कवयित्री म्हणते. भिंग ज्याप्रमाणे सूक्ष्म असलेली गोष्ट मोठी करून दाखवते त्याप्रमाणे हे पाण्याचे भिंगदेखील येणाऱ्या सूक्ष्म संकटाची चाहूल देत आहे असे कवयित्रीला वाटत आहे. हे संकट भीषण रूप धारण करायच्या आगोदर माझ्या घरी, शेतावर तू दौडत ये असं कवयित्री पाऊस धारेला विनवणी करते, तू आलीस की आमच्या या शेतावर हिरवळ येईल, मातीत ओलावा येईल आणि मातीतील बी-बियाण्यांना अंकुर फुटेल. मालकांच्या मनातीलही स्वप्नं पूर्ण होतील.

पावसाच्या सरी वायसवे झुलत-सुलत येतात म्हणून कवयित्री म्हणते की तू वाऱ्यासोबत झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझ्या घराजवळ आलीस की माझी पोरं तुझ्या पावसाच्या सरींना झोंबतील. इथे कवयित्री पावसाच्या धारा-सरी यांना जरीची उपमा देते. सोनेरी जरीमध्ये स्वतःची ताकद असते, ती सहसा तुटत नाही. ती मौल्यवान असते. तसंच ही पावसाची सरही मौल्यवान आहे. तिच्या जरीचा घोळ म्हणजे पावसाचे साठलेले पाणी या पाण्यात कवयित्रीची पोरं खेळतील.

भोपळ्याची, पडवळाची आळी, मालकाने कधीपासून तयार करून ठेवली आहेत. प्राणसईच्या येण्याने ती भिजतील, त्यांना कोंब फुटेल. तू आलीस की तुझ्या जलसाठ्याने त्या विहिरींना पण तुडुंब भर. घरदार संपूर्ण सृष्टी चिंब भिजायला हवी आहे कारण पाण्याविना काहीच चैतन्य नाही. अशी धावत धावत ही प्राणसई आली की कवयित्री तिच्यासोबत खप गप्पा मारणार आहे. तिच्याशी आपल्या सख्याच्या गजगोष्टी सांगणार आहे. त्याचं कौतुक आपल्या मैत्रिणीला सांगताना तिला अभिमान वाटणार आहे.

पावसाच्या या धनावळीने आता वाकडेपणा सोडावा आणि भूतलावर अगदी तीव्रतेने धावत यावं असं कवयित्रीला वाटतं. आमच्या सगळ्यांकडे अशी पाठ करून तू काय साधशील बरं? असा त्रास देण्यापेक्षा प्रेमानं तुझ्या धारांमध्ये भिजवलंस तर सगळेजण आनंदी होतील. च मिळेल, त्यामुळे वाऱ्यावर भरारी मारून अगदी लवकर भेटीयला ये अशा आत्यंतिक जिव्हाळयाने कवयित्री आपल्या सखीला बोलावते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

शब्दसंपत्ती.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्दमनोरा पूर्ण करा.
उदा.,
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 4
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 5

11th Marathi Book Answers Chapter 2 प्राणसई Additional Important Questions and Answers

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. विहिरीच्या तळी दिसू लागले ते – [ ]
  2. घनावळीने हिचा मैत्रपणा आठवावा – [ ]
  3. प्राणसईने वाऱ्यासोबत असे यावे – [ ]

उत्तर:

  1. भिंग
  2. मैत्रिणीचा
  3. भरारी मारून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

कारणे लिहा.

प्रश्न 1.
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण – ……….
उत्तर:
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण पावसाने यायला उशीर केला म्हणून लवकर यावे.

प्रश्न 2.
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण – ………
उत्तर:
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण या भाज्यांची लागवड करावयाची आहे.

कृती करा.

प्रश्न 1.
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – …………..
उत्तर :
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – दारात उभी राहून तिच्याशी आपल्या सख्याबददलच्या गप्पा सांगेल.

प्रश्न 2.
सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन:
उत्तर :
पावसाची वाट पाहणं हे शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलं असत. कवयित्रीचा सखा शेतकरी आहे, त्याने काबाडकष्ट करून पेरणी केलेली आहे.
पाऊस न आल्यामुळे तो सुद्धा चिंतेत पडला आहे. शेत, अन्नधान्य, घर हेच त्याचं विश्व आहे. त्यामुळे तो त्यात रमतो, कष्ट करतो. याचं
कौतुक कवयित्रीला आहे. त्यामुळे कवयित्रीला आपल्या सख्याचे कौतुक आपल्या प्राणसईला सांगावेसे वाटत आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

आकलन कृती :

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
मालक बेचैन झाले कारण – [ ]
उत्तर:
मालक बेचैन झाले कारण – तीव्र उन्हाळ्यामुळे बैल कामासाठी तयार नाहीत म्हणून

प्रश्न 2.
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – [ ]
उत्तर:
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – पाऊस न आल्याने विहिरीचे पाणीदेखील तळाशी गेले आहे.

जोड्या लावा.

प्रश्न 1.

आळी ठेविलीसजवून
शेणी ठेविल्याभाजून
रचून

उत्तर:
आळी ठेविली – भाजून
शेणी ठेविल्या – रचून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

उपयोजित कृती :

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 8
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 9

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 6
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 7

प्रश्न 2.
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द –
उत्तर :
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द – ठाणबंदी

क्रमवारी लावा.

प्रश्न 1.

  1. झाले मालक बेचैन
  2. झळा उन्हाच्या लागून
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. बैल झाले ठाणबंदी

उत्तर:

  1. बैल झाले ठाणबंदी
  2. झाले मालक बेचैन
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. झळा उन्हाच्या लागून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

काव्यसौंदर्य:

प्रश्न 1.
‘तोंडे कोमेली बाळांची
झळा उन्हाच्या लागून
या पक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत यांच्या प्राणसई कवितेत पावसाच्या आगमनापूर्वीच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. उन्हाने तप्त झालेल्या वातावरणाचे परिणाम लहान तान्हुल्या बाळांनाही सोसावे लागत आहे. त्यांच्याही जीवाची काहिली झाली आहे. त्यांची कोवळी तोंडे, कोमेजून गेली आहेत. त्या कोवळ्या चेहऱ्यांचा कोमेजून जाळ्याची उल्लेख करताना कवयित्री कोमेली ही नवीन सौंदर्य प्रतिमा वापरतात त्यामुळे त्या तान्हुल्या बाळांच्या चेहऱ्यावरील कोमल भाव प्रकट होतात.

स्वमतः

प्रश्न 1.
पावसाच्या आगमनासाठी तुम्ही कसे आतुर असता?
उत्तर :
पावसाळा हा ऋतू माझा सर्वात आवडीचा ऋतू. पाऊस कधीही यावा आणि त्यात चिंब भिजावे अशी माझी मनस्थिती असते. उन्हाळ्याचे चार महिने सोसल्यावर, त्याची दाहकता अनुभवल्यावर साहजिकच मनाला ओढ लागते ती पावसाची. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीच्या सुगंधालाही मी आसुसलेला असतो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भरपूर पाऊस पडावा असं खूप वाटत असतं. पावसाळ्यात ट्रेकिंगला जायला मला प्रचंड आवडतं. निसर्गाच्या सानिध्यातील भटकंती मला माझ्यातील खुजेपण शोधायला भाग पडते. निसर्ग भरभरून देतो. आपण केवळ त्याचा आनंद घेतो त्याला काही देत नाही. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पावसाळ्यात मी आणि माझे काही मित्र बागांमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम करत असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्राणसई Summary in Marathi

प्रस्तावनाः

कवयित्री इंदिरा संत यांची मराठी साहित्यात विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री अशी ओळख आहे. इंदिराबाई मूळच्या शिक्षिका. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या होत्या. प्रा. ना, मा. संत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवू लागल्या. १९७१ मध्ये त्यांचा शेला हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सोप पण गहिरं असं लेखनाचे स्वरूप इंदिरा संतांचे होते.

‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘चित्कळा’, ‘बाहुच्या वंशकुसुम’ ‘गभरेशमी’, ‘निराकार’ असे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ, प्रेम आर्तता व्यक्त करण्यासाठी निसर्गातील विविध प्रतिमांचा वापर त्या सहजगत्या करताना दिसतात.

‘फुलवेल’ हा त्यांचा ललितलेख संग्रह. मृदगंध यात त्यांनी तरुण भारतसाठी लिहिलेला स्तंभलेख ‘मृदगंध’ या ग्रंथात संग्रहित आहे. लेखांमधून, कवितांमधून इंदिराबाईनी निसर्गाची अनेकविध रूप रेखाटली. सुखद, सुंदर असा निसर्ग इंति

कवितेचा आशय :

उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले असताना सर्वांच्याच मनाला पावसाची ओढ लागलेली असते. पाऊस येणार या कल्पनेने सर्वच जण आनंदित होत असतात. पाऊस बेभरवशाचा असतो, त्याच्या आगमनाकरता शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया यांनी तयारी करून ठेवलेली असते. पेरणी झालेली असते. पण भूमीत पेरलेले बियाणे उगवण्यासाठी पावसाचे येणे महत्त्वाचे असते.

या पावसाची वाट पाहताना कवयित्री तिला पृथ्वीवरील परिस्थिती आपल्या कवितेतून कथन करते, तसेच या घनावळीने आपल्या मैत्रीला जपत पृथ्वीवर बरसावे अशी विनंती या कवितेतून व्यक्त करते. पृथ्वीवर उन्हाची दाहकता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. एखादी राक्षसी पीठ कांडत राहते आणि त्याचा धुराळा सर्वत्र पसरतो.

तसंच उन्हाची दाहकता तप्तता सर्वत्र पसरली आहे. अशा वेळी कवयित्रीला चिंता वाटत राहते की आपली प्राणसखी प्राणसई आपल्याला भेटायला का बरं येत नाही आहे? ती कुठं वरं गुंतून राहिली आहे ? या घनावळीला आपली चिंता नाही का ? आपल्या जवळ तिनं आता असायला हवं असं कवयित्रीला वाटत राहतं. घनावळी पृथ्वीतलावर यावी याकरता कवयित्री पाखरांच्या हाती सांगावा पाठवून देत आहे की आपला मैत्रपणा आठवून तू धावत ये.

ठीचा काळ असतो. आपल्या घरातल्यांच्या सोयीकरता कवयित्रीनेही आपल्या मालकाप्रमाणे भाज्यांची लागवड केली आहे, भोपळा-पडवळ यांची लागवड करण्यासाठी जमिनीमध्ये आळी तयार करून ठेवली आहेत. त्यात भाज्यांची बियाणे पेरली आहेत. घरात शेणीचा थर रचून ठेवला आहे. पावसाळ्यात त्यांचा धूर करून डास, चिलटे यांना दूर करता येतं म्हणून त्यांचीही रास एका कोनाड्यात ठेवली आहे.

बैलही उन्हाच्या झळांमुळे काम करेनासे झाले आहेत, त्यांनाही उष्माघात सहन होत नाही त्यामुळे मालकही बैचेन झाले आहेत. बाळांची कोमल, नाजूक तोंडेही पार वाळून गेली आहेत.

विहिरीच्या तळी पाण्याचे भिंग दिसत आहे. तळाला गेलेले पाणी भिंगासारखे दिसते आहे. विहिर ही दुर्बिणीसारखी आणि तळाला गेलेले पाणी भिंग असं कवयित्रीला सुचवायचे आहे. भिंगातून जशी एखादी लहान वस्तू मोठी दिसते तसंच पाण्याचे दुर्भिक्ष्य आता मोठ्या स्वरूपात सोसायला लागणार असं वाटू लागतं. कवयित्रीचं मन या सगळ्या ताणतणावात लागत नाही आहे. आपली प्राणसखी कधी येईल याची ती तीव्रतेने वाट पाहत आहे.

ही घनावळी आली की तिनं धावत आपल्या शेतावर हजेरी लावावी असं कवयित्रीला वाटतं. ती आली की तिच्यामुळे शेतावर हिरवा शेला पांघरला जाईल म्हणजे हिरवळ दाटेल. मालकाच्या स्वप्नांनाही अंकुर फुटतील, त्यांनाही जिवंतपणा लाभेल.

ही प्राणसई वाऱ्यासोबत येईल तेव्हा त्याच्या साथीनं तिन झुलत-झुलत यावं आपल्या घराशी थांबावं. तिच्या जररूपी धारांचे तळे होईल त्यात कवियत्रीची पोरं-बाळं नाचतील, खेळतील, वागडतील ही मुलं या प्राणसईची भाचे मंडळीच आहेत. त्यांच्या निरागसपणाचे या प्राणसईलाही कौतुक वाटेल.

कवयित्रीच्या दारात लावलेले पडवळ, भोपळे यांच्या वेलीचे आळे भिजून चिंब होऊ दे, विहिरी पाण्याने तुडुंब भरून वाहू दे, घर, दार, अंगण या सर्वच ठिकाणी पावसाच्या पाण्याने थंडगार वारा अनुभवायला मिळू दे.

असं संपूर्ण सुंदर, चैतन्यमय वातावरण अनुभवताना तुझ्याशी मी दारात उभी राहून बोलेन. माझा सखा शेतात कसा दमतो, रमतो. त्याचे कौतुक ती या प्राणसईला सांगणार आहे.

ही प्राणसई वेळेवर येत नाही म्हणून कवयित्री तिला पुन्हा विनवणी करतेय की ए, प्राणसखी तू आता वाकडेपणा बाजूला ठेव, तू रागावली असलीस तरी तो राग आता सोड, अशी पाठमोरी तू होऊ नकोस. वाऱ्यावरून भरारी मारून तू वेगावे धावत, दौडत ये, तू माझी प्राणसई आहेस, माझ्यासाठी पृथ्वीसाठी, लेकरांसाठी, शेतासाठी तुला यायलाच हवं.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. घनावळ – मेघमाला.
  2. सांगावा – निरोप – ( message).
  3. हुडा – गोवांचा ढीग.
  4. शेणी – गोवऱ्या – (dried cakes of cowdung)
  5. ठाणबंदी – पशुंना गोठ्यात बांधून ठेवणे.
  6. कोमेली – कोमेजला.
  7. भिंग – आरसा – (a piece of glass).
  8. शेला – पांघरण्याचे, उंची वस्त्र – (a silken garment, a rich scraft).
    तुडुंब – भरपूर, काठोकाठ – (upto the brim, quite full).
  9. भरारी – उड्डाण – (a quick flight ).
  10. भाचा – बहिणीचा किंवा भावाचा मुलगा – (a nephew).
  11. जर – विणलेले वस्त्र – (brocade)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण अलंकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

12th Marathi Guide व्याकरण अलंकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

(१) वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
(२) सागरासारखा गंभीर सागरच!
(३) या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान
(४) न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे की हिरे।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

(५) अनंत मरणे अधी मरावी,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.

(६) मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!

(७) फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलात तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
उत्तर :
(१) अतिशयोक्ती अलंकार
(२) अनन्वय अलंकार
(३) अपन्हुती अलंकार
(४) अपन्हुती अलंकार
(५) अर्थान्तरन्यास अलंकार
(६) अतिशयोक्ती अलंकार
(७) अर्थान्तरन्यास अलंकार

2. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 3

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

3. खालील कृती करा.

(१) कर्णासारखा दानशूर कर्णच.
वरील वाक्यातील-
उपमेय ………………………….
उपमान ………………………….

(२) न हे नभोमंडल वारिराशी आकाश
न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ………………………….
उपमान ………………………….

दुसऱ्या ओळीतील
उपमेय ………………………….
उपमान ………………………….
उत्तर :
(१) उपमेय : कर्ण (दानशूरत्व)
उपमान : कर्ण

(२) पहिल्या ओळीतील – उपमेय : नभोमंडल (आकाश)
उपमान : आकाश
दुसऱ्या ओळीतील – उपमेय : तारका
उपमान : तारका

4. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार 4

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अलंकार म्हणजे काय?

अलंकार म्हणजे आभूषणे किंवा दागिने. अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात, त्याप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व अधिक परिणामकारक करण्यासाठी कवी (साहित्यिक) भाषेला अलंकाराने सुशोभित करतात.

एखादया माणसाचे शूरत्व सांगताना → तो शूर आहे → सामान्य वाक्य तो वाघासारखा शूर आहे → आलंकारिक वाक्य. ← असा वाक्यप्रयोग केला जातो.

अशा प्रकारे ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात.

भाषेच्या अलंकारांचे दोन मुख्य प्रकार आहेत :

  • शब्दालंकार
  • अर्थालंकार.

आपल्याला या इयत्तेत

  • अनन्वय
  • अपन्हुती
  • अतिशयोक्ती
  • अर्थान्तरन्यास हे चार अर्थालंकार शिकायचे आहेत.

उपमेय आणि उपमान म्हणजे काय?
पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया : भीमा वाघासारखा शूर आहे.
‘भीमा’ हे उपमेय आहे; कारण भीमाबद्दल विशेष सांगितले आहे. भीमाला वाघाची उपमा दिली आहे.
‘वाघ’ हे उपमान आहे; कारण भीमा हा कसा शूर आहे, ते सांगितले आहे.

म्हणून,

  • ज्याला उपमा देतात, त्यास उपमेय म्हणतात.
  • ज्याची उपमा देतात, त्यास उपमान म्हणतात.

म्हणून,

  • भीमा → उपमेय
  • वाघ → उपमान
  • साधर्म्य गुणधर्म → शूरत्व.

अनन्वय अलंकार
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा :

  • आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
  • या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
  • वरील दोन्ही उदाहरणांतील उपमेये – ताजमहाल, आंबा
  • वरील दोन्ही उदाहरणांतील उपमाने – ताजमहाल, आंबा

निरीक्षण केल्यानंतर वरील उदाहरणांत उपमेय व उपमान एकच आहेत, असे लक्षात येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही व जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. [अन् + अन्वय (संबंध) = अनन्वय (अतुलनीय)]

अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • उपमेय हे अद्वितीय असते. त्यास कोणतीच उपमा लागू पडत नाही.
  • उपमेयाला योग्य उपमान सापडतच नाही; म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दयावी लागते.

अनन्वय अलंकाराची काही उदाहरणे :

  • ‘झाले बहु, होतिल बहू, आहेतहि बहू, परंतु या सम हा।’
  • या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
  • आईसारखे दैवत आईच!

अपन्हुती अलंकार

पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा :
उदा., न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतिल।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।।

वरील उदाहरणातील –

वरील उदाहरणांत उपमेयांचा निषेध केला आहे व उपमेय, उपमान हे उपमानेच आहे, अशी मांडणी केली आहे.

जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे, असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा अपन्हुती अलंकार होतो.

अपन्हुती अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • उपमेयाला लपवले जाते व निषेध केला जातो.
  • उपमेय हे उपमेय नसून उपमानच असे ठसवले जाते.
  • निषेध दर्शवण्यासाठी ‘न, नव्हे, नसे, नाहे, कशाचे’ असे शब्द येतात.

अपन्हुती अलंकाराची काही उदाहरणे :

  1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे।
  2. हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले।
  3. मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो।
    नाही ग बाई, फणा काढुनि नाग हा डोलतो।।
  4. हे नव्हे चांदणे, ही तर मीरा गाते
  5. आई म्हणोनि कोणी। आईस हाक मारी
    ती हाक येई कानी। मज होय शोकारी
    नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अतिशयोक्ती अलंकार
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व त्यातील अतिरेकी (असंभाव्य) वर्णन समजून घ्या :
दमडिचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत.

जसे की, एका दमडीच्या (पैशाच्या) विकत आणलेल्या तेलात काय काय घडले? →

  • सासूबाईचे न्हाणे
  • मामंजीची दाढी
  • भावोजीची शेंडी
  • कलंडलेले तेल वेशीपर्यंत ओघळले
  • त्यात उंट वाहून गेला.

या सर्व अशक्यप्राय गोष्टी घडल्या. म्हणजेच अतिशयोक्ती केली आहे.
जेव्हा एक कल्पना फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता (अशक्यप्रायता) अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.

अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, घटनेचे, कल्पनेचे अतिव्यापक फुगवून अशक्यप्राय केलेले वर्णन.
  • त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट केलेली असते.

अतिशयोक्ती अलंकाराची काही उदाहरणे :

  1. ‘जो अंबरी उफाळतां खुर लागलाहे।
    तो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे।।’
  2. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर।
    रामायण आधी मग झाला राम जानकीवर।।
  3. सचिनने आभाळी चेंडू टोलवला।
    तो गगनावरी जाऊन ठसला।।
    तोच दिवसा जैसा दिसतो चंद्रमा हसला।।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार

अर्थान्तरन्यास
पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा व समजून घ्या :
‘बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल।
श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरल।।
[खल = दुष्ट, अहि = साप, गरल = विष, श्वान = कुत्रा, पुच्छ = शेपटी]
दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी तो आवडत नाही, हे स्पष्ट करताना सापाला पाजलेल्या दुधाचे रूपांतर विषातच होते, हे उदाहरण देऊन ‘कुत्र्याची शेपटी नळीत घातली, तरी वाकडीच राहणार’, हा सर्वसामान्य सिद्धांत मांडला आहे.
एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ ठेवणे, हा या अलंकाराचा उद्देश असतो.

एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजेच ५ एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे, यास अर्थान्तरन्यास अलंकार म्हणतात.

अर्थान्तरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत मांडणे.
  • सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे.
  • अर्थान्तर – म्हणजे दुसरा अर्थ. न्यास – म्हणजे शेजारी ठेवणे.

अर्थान्तरन्यास अलंकाराची काही उदाहरणे :

  1. तदितर खग भेणे वेगळाले पळाले।
    उपवन-जल-केली जे कराया मिळाले।।
    स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो।
    कठिण समय येता कोण कामास येतो?
  2. होई जरी सतत दुष्टसंग
    न पावती सज्जन सत्त्वभंग
    असोनिया सर्प सदाशरीरी Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण अलंकार
    झाला नसे चंदन तो विषारी
  3. अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा
  4. जातीच्या सुंदरा काहीही शोभते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण प्रयोग Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

12th Marathi Guide व्याकरण प्रयोग Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

प्रश्न 1.
(a) मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विदयार्थ्यांना बोलावले.
(b) कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.
(c) मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.
(d) तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.
(e) मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.
(f) राजाला नवीन कंठहार शोभतो.
(g) शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.
(h) आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.
(i) युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले..
(j) आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात.
उत्तर :
(a) भावे प्रयोग
(b) कर्मणी प्रयोग
(c) कर्तरी प्रयोग
(d) कर्तरी प्रयोग
(e) भावे प्रयोग
(f) कर्तरी प्रयोग
(g) कर्मणी प्रयोग
(h) भावे प्रयोग
(i) कर्मणी प्रयोग
(j) कर्तरी प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

2. सूचनेनुसार सोडवा

प्रश्न अ.
कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले.
(b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓]
(c) विदयार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले.
उत्तर :
(b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓]

प्रश्न आ.
कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
(b) शिक्षकाने विदयार्थ्यास शिकवले.
(c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓]
उत्तर :
(c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓]

प्रश्न इ.
भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा.
(a) आज लवकर सांजावले.
(b) त्याने कपाटात पुस्तक ठेवले. [✓]
(c) आम्ही अनेक किल्ले पाहिले.
उत्तर :
(a) आज लवकर सांजावले. [✓]

Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण प्रयोग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
उदाहरण वाचा. कृती करा : विदयार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो.
(१) वाक्यातील क्रियापद. → [ ]
(२) पाठ्यपुस्तक आवडीने वाचणारा तो कोण? → [ ]
(३) वाचले जाणारे ते काय? → [ ]
(४) वरील वाक्यातील क्रिया कोणती? → [ ]
उत्तर :
(१) वाचणे
(२) विदयार्थी
(३) पाठ्यपुस्तक
(४) वाचण्याची

पुढील वाक्य नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष दया :

  • समीर पुस्तक वाचतो.
  • वरील वाक्यात ‘वाचतो‘ हे क्रियापद आहे. त्यात वाचण्याची क्रिया दाखवलेली आहे.
  • वाचण्याची क्रिया समीर करतो.
  • वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडते आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

जो क्रिया करतो, त्याला कर्ता म्हणतात. म्हणून समीर हा कर्ता आहे. ज्यावर क्रिया घडते, त्याला कर्म म्हणतात. म्हणून पुस्तक हे कर्म आहे.

म्हणून,
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 1

वाक्यात क्रियापदाचा काशी व कर्माशी लिंग-वचन-पुरुष याबाबतीत जो संबंध असतो, त्या संबंधाला प्रयोग म्हणतात.

मराठीत प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत :

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग.

कर्तरी प्रयोग

प्रश्न  1.
पुढील उदाहरणे वाचून कृती करा :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 3
उत्तर :
(१) कर्त्याचे लिंग बदलले.
(२) कर्त्याचे वचन बदलले.
(३) कर्त्याचा पुरुष बदलला.

पुढील वाक्य नीट वाचा :
समीर पुस्तक वाचतो. (समीर कर्ता आहे.)
कर्त्याचे अनुक्रमे लिंग-वचन-पुरुष बदलू या.

  • सायली पुस्तक वाचते. (लिंगबदल केला.)
  • ते पुस्तक वाचतात. (वचनबदल केला.)
  • तू पुस्तक वाचतोस. (पुरुषबदल केला.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

म्हणजे,
कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष बदलामुळे अनुक्रमे वाचतो हे क्रियापद → वाचते, वाचतात, वाचतोस असे बदलले. म्हणजेच कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलले.

जेव्हा कर्त्याच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.

कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. (प्रत्यय नसतो.)
  • कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.
  • कर्तरी प्रयोगातील क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते.
  • क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते.

कर्मणी प्रयोग

प्रश्न  1.
पुढील उदाहरणे वाचून कृती करा :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 4
उत्तर :
(१) कर्माचे लिंग बदलले.
(२) कर्माचे वचन बदलले.

पुढील वाक्य नीट वाचा :
समीरने पुस्तक वाचले. (पुस्तक कर्म आहे.)
कर्माचे लिंग व वचन बदलू या.

  • समीरने गोष्ट वाचली. (लिंगबदल केला.)
  • समीरने पुस्तके वाचली. (वचनबदल केला.)

म्हणजे,
कर्माच्या लिंग-वचन बदलामुळे अनुक्रमे वाचले हे क्रियापद → वाचली, असे बदलले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

म्हणजेच कर्माप्रमाणे क्रियापद बदलले.

जेव्हा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापद बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होतो.

कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • (१) कर्ता बहुधा तृतीयेत असतो. (प्रत्यय असतो.)
  • (२) कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. (प्रत्यय नसतो.)
  • (३) कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते.
  • (४) क्रियापद कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते.

भावे प्रयोग

प्रश्न  1.
पुढील वाक्यात रोखणे क्रियापदाचे योग्य रूप लिहा :

(a) सैनिकाने शत्रूला सीमेवर ………………………………..
(b) सैनिकांनी शत्रूला सीमेवर ………………………………..
(c) सैनिकांनी शत्रूना सीमेवर ………………………………..
उत्तर :
(a) रोखले
(b) रोखले
(c) रोखले.

प्रश्न  2.
पुढील वाक्यात बांधणे या क्रियापदाचे योग्य रूप लिहा :
(a) श्रीधरपंतांनी बैलांना ………………………………..
(b) सुमित्राबाईंनी गाईला ………………………………..
(c) त्याने घोह्याला ………………………………..
(d) आम्ही शेळ्यांना ………………………………..
उत्तर :
(a) बांधले
(b) बांधले
(c) बांधले
(d) बांधले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग

पुढील वाक्य नीट पाहा :
समीरने पुस्तकास वाचले.
प्रथम कर्त्याचे लिंग-वचन बदलू या.

  • सायलीने पुस्तकास वाचले. (लिंगबदल केला.)
  • त्यांनी पुस्तकास वाचले. (वचनबदल केला.)

आता कर्माचे लिंग-वचन बदलूया.

  • समीरने गोष्टीला वाचले. (लिंगबदल केला.)
  • समीरने पुस्तकांना वाचले. (वचनबदल केला.)

म्हणजे,
कर्त्याच्या व कर्माच्या लिंग-वचन बदलाने क्रियापदाचे रूप बदलले नाही. ‘वाचले’ हेच क्रियापद कायम राहिले.

जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, तेव्हा भावे प्रयोग होतो.

भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये (लक्षणे) :

  • कर्त्याला बहुधा तृतीया विभक्ती असते. (प्रत्यय असतो.)
  • कर्म असल्यास द्वितीया विभक्तीत असते. (प्रत्यय असतो.)
  • क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असते. बहुधा ते एकारान्त असते.
  • क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलत नाही.

लक्षात ठेवा :

  • समीर पुस्तक वाचतो. → कर्तरी प्रयोग
  • समीरने पुस्तक वाचले. → कर्मणी प्रयोग Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग
  • समीर पुस्तकास वाचतो. → भावे प्रयोग

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

11th Marathi Digest Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
(a) नाटक, कथा
(b) नाटक, एकांकिका
(c) नाटक, काव्य
(d) नाटक, ललित
उत्तरः
(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न आ.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .
(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.
(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
(c) नाटकाची जाहिरात होते.
(d) नाटकाची संहिता वाचता येते.
उत्तरः
(b) नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

प्रश्न इ.
नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण
(a) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(b) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(c) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(d) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
उत्तरः
(b) नाटक ही दृक-श्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

2. चुकीचे विधान शोधा.

प्रश्न अ.
(a) अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
(b) विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
(d) संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
उत्तरः
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

प्रश्न आ.
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
(b) नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
(c) नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
(d) नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
उत्तरः
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
(a) परस्परविरोधी स्वभावांतून संघर्ष निर्माण होतो.
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
(c) भूमिकांच्या नात्यात परस्पर संघर्ष दाखवता येतो.
(d) भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
उत्तरः
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

प्रश्न ई.
(a) नाटकात संहिता महत्त्वाची असते.
(b) नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
(c) नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
उत्तरः
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.

3. प्रश्न अ.
फरक स्पष्ट करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 1
उत्तर :

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
1. या नाटकातील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात.व्यावसायिक नाटकात विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांवर आधारित संवाद असतात.
2. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले असते.प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते.
3. प्रायोगिक नाटकांच्या आकृतिबंधात, विषयांत नाविन्यता असते.व्यावसायिक नाटकांचे विषय कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक यांवर आधारित असतात.
4. प्रायोगिक नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.व्यावसायिक नाटकांचे स्वरूप प्रामुख्याने करमणूकप्रधान असते.
5. प्रायोगिक नाटकांमध्ये नेपथ्य, अभिनय, तंत्र यामध्ये जाणीवपूर्वक बदल केलेला असून व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळेपणा जाणवतो.व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांना महत्त्वाचे स्थान आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 2
उत्तर :

नाटकइतर साहित्य प्रकार
1. नाटक हा समूहाचा आविष्कार असून त्यात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश असतो.कथा, कादंबरी व कविता हे इतर साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत.
2. नाटकामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून असंख्य प्रेक्षक एकाच वेळी त्याचा दृश्य स्वरूपात अनुभव घेऊ शकतात.कथा व कादंबरी या साहित्यप्रकारात फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात.
3. नाटक सामूहिकरित्या रंगमंचावर, कलाकारांना सादर करता येते.कथा, कवितांचे वाचन रंगमंचावर करता आले तरी त्याचे सादरीकरण करता येत नाही.

प्रश्न आ.
खालील कृती करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 10

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 4
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 11

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(c)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 5
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 12

(d)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 6
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 13

(e)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 14
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 15

(f)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 16
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 17

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 7
उत्तर :

घटना/कृतीपरिणाम
1. एखादया प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो.नाट्य निर्माण होते.
2. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखननाटकाचे यश खात्रीलायक.
3. नाटकात संघर्ष असला तरकथानकातील आशयातरंगत येते किंवा नाटक परिणामकारक वठते.
4. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख सांगावेसे वाटते.साहित्याची निर्मिती होते.

4. स्वमत.

प्रश्न अ.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ते लिहिणारे, अभिनय करणारे कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्या सहकार्यावर नाटकाची यशस्विता अवलंबून असते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. नाटकाचा प्रयोग आशय व प्रयोग या दोन्ही दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेक जणांचा समन्वय व प्रयत्न महत्त्वाचे असतात. कलावंत, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, दिग्दर्शक यांचा समावेश त्यांत असतो. पडदयामागील कलाकारांचे श्रेयही यात तेवढेच आहे.

दिग्दर्शक : लेखकाच्या संहितेएवढेच दिग्दर्शकाचे महत्त्वही नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक बाजू या दोन्ही दृष्टीने दिग्दर्शक एकात्मिक विचार करतो. नृत्य, अभिनय, संगीत या कलांचीही जाण त्याला असणे महत्त्वाचे असते. संहितेवर नोंदी करून त्या कलाकार व तंत्रज्ञाला त्याची कल्पना त्याला दयावी लागते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नेपथ्यकार : नाटकातील स्थळ, काळ व कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दृश्यांना योग्य पडदे, वस्तू यांची मांडणी नेपथ्यकार करतो. कलाकारांचे कपडे, विग्ज, झालरी व त्याला अनुरूप संगीत, प्रकाशयोजना या सर्व घटकांचा अंतर्भाव नेपथ्यामध्ये असतो. कथानकाला साहाय्य होईल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती म्हणजे नेपथ्य.

प्रकाशयोजना : प्रकाशयोजनेसाठी रंगमंचावर विविध साधनांचा उपयोग केला जाते. फ्लडलाइट्स, स्पॉटलाइट्स, डीमर इ. रात्रीच्या प्रसंगात रंगभूमीवर अंधार दाखवण्यासाठी डीमरचा उपयोग करतात. एखादया मुख्य कलाकाराचा प्रवेश (एण्ट्री) स्पॉटलाइटच्या मदतीने तसेच प्रवेशबदलाची सूचनादेखील प्रकाशयोजनेतून दिली जाते. पार्श्वसंगीतः कथानकातील प्रसंगांना अनुकूल, पात्रांची मनस्थिती अधोरेखित करण्यासाठी, नाटक गतिमान करण्यासाठी आणि वातावरणनिर्मितीसाठी नाटकातील पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. यादृष्टीने ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांचा उल्लेख करावा लागेल.

रंगभूषा : नाटकात रंगभूषेला फार महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन कलावंतांचा चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. लांबच्या प्रेक्षकांनासुद्धा नटांचा चेहरा व्यवस्थित दिसावा या दृष्टीने रंगभूषाकार काम करत असतो. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात मेकअप, (रंगभूषा), वेशभूषा व केशभूषा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. नाटकात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा कलावंत आपल्या संवादफेकीतून, आवाजातील चढ-उतारांतून, हावभावातून आपल्या अभिनयाद्वारे सशक्तपणे लोकांसमोर जिवंत करतात.

प्रेक्षक : या नाटकाचे सादरीकरण पाहण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रेक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानेच हा खेळ रंगत असतो. म्हणूनच नाटक हे एकाचे काम नसून तो एक सांघिक आविष्कारच म्हणता येईल. त्या सर्वांवर नाटकाची सफलता असते.

प्रश्न आ.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
1. नाटकाचे नेपथ्य
2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
3. नाटकातील संवाद
4. नाटक अनेक कलांचा संगम
5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
उत्तरः
1. नाटकाचे नेपथ्य : नेपथ्य म्हणजे नाटकाच्या कथानकाला साहाय्यकारी ठरेल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती होय. हे नेपथ्य जो करतो तो नेपथ्यकार. कथानकातील स्थळ, काळ यांना सुसंगत ठरतील अशा वस्तू, नाटकातील नटांचे कपडे, त्यांना भूमिकेनुरूप लागणारे विग्ज, रंगमंचावर (स्टेजला) लागल्या जाणाऱ्या झालरी, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये असतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी मांडणी नेपथ्यकार करतो.

2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : प्रकाशयोजनेसाठी रंगभूमीवर विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रकाशयोजना हा नेपथ्याचाच भाग असतो. स्पॉट्स, फ्लडलाइट्स, फूटलाइट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विदयुत उपकरणाला ‘डीमर’ असे म्हटले जाते. नाटकात एखादा रात्रीचा प्रसंग दाखवायचा असेल तर या डीमरच्या साहाय्याने रंगभूमीवर संपूर्ण अंधार केला जातो. या प्रकाशयोजनेच्या माध्यमातून एखादया प्रवेशबदलाची सूचनादेखील देता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

3. नाटकातील संवाद : मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांमधील विविध भाव-भावनांचे, अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक. या चित्रणासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होत. लेखकाने लिहिलेले संवाद नाटकांतील पात्रांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येतो. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्याही घेतात. नाटकाच्या विषयाला साजेसे उत्तम संवाद नाट्यातील आशय अचूक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्रांच्या संवादफेकीच्या शैलीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना समजतो.

4. नाटक अनेक कलांचा संगम : महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. पूर्वी लळित, दशावतार, वगनाट्य, तमाशे असे मनोरंजनाचे प्रकार होते. यातूनच नंतर नाटक हा प्रकार उदयास आला जो समूहाचा आविष्कार असतो. नाटकाशी संगीत, नृत्य, वक्तृत्व, कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला, रंगभूषा अशा बहुतेक सर्व कला संबंधित आहेत. नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने कथेनुरूप आलेल्या संगीत, नृत्य, काव्यात्म व अर्थपूर्ण संवाद यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो आणि त्यामुळे कथेचा आशय उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

अशा तहेने अनेक कलांचा संगम नाटकामध्ये झाला असल्याने त्यामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. रंगमंचावरील सादरीकरणामुळे प्रेक्षकांना या कलांचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या अनुभूतीने प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांचे रोजचे धकाधकीचे जीवन आनंदी व अर्थपूर्ण, समृद्ध करण्यात या कलांचे फार मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा : नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धा, अनेक रूढी परंपरा, चालीरीती यांसारखे अनेक अडथळे होते. स्त्रीजीवन धर्मबंधनांमुळे जखडले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामाजिक वातावरणही पोषक नव्हते. स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेदेखील स्वातंत्र्य नव्हते. फक्त ‘चूल व मूल’ हेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे नाटकात काम करणे ही तर फारच चौकटीबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे स्त्रिया तयारही होत नसत. त्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणे तर फारच कठीण. त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रेच साकारत असत. त्याकाळी नाटकातील कलावंतांना आजच्यासारखी प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्व यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारल्या आणि आजही त्यांच्या नाटकांतील पदे लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या भूमिका त्यामुळेच अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. लेखकाला जो विषय सांगायचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. नाटकांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण विविध विषयांतून झालेले दिसते आणि ही परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळातील वास्तव चित्रण नाटकातून होते. सामाजिक समस्या मांडल्या जातात. मानवी भाव-भावना, स्वभाव यांमधील विविध छटांचे दर्शन नाटकांतून होते. माणसाच्या आयुष्यातील अवतीभवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेऊन नाटक साकार होते. पूर्वी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, हुंडा पद्धती, केशवपन इत्यादी सामाजिक ज्वलंत प्रश्न नाटकांच्या प्रयोगातून सादर केले जात. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकात जरठकुमारी विवाह या अनिष्ट प्रथेवर मार्मिक टीका केली आहे तर अनेक नाटकांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसारखे विषय निवडून चांगले विचार लोकांमध्ये रुजवून त्यांचा प्रसार करून जनजागृतीचे काम केले आहे. नाटक या दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनाच्या साथीने समाज जागृती घडवण्याचे काम खूप वर्षांपासून आजपर्यंत केले गेले आहे म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.

प्रश्न ई.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते.
  • संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन केलेली असते.
  • संगीत नाटकांत संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो.
  • संगीत नाटकातील संगीत व अभिनय यांमधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते.
  • शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो.
  • संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी.
  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग/गती देणारी असतात.
  • लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय.
  • संगीत नाटकामध्ये गायकाला साथ-संगत करणाऱ्या सर्व कलावंतांचाही मोठा सहभाग असतो.
  • आजदेखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे.

प्रश्न उ.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
नाटकात संहितेला महत्त्वाचे स्थान आहे. नाट्यसंहिता परिपूर्ण व दर्जेदार असेल तर नाटकाला हमखास यश मिळते. सशक्त कथानक नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो आणि कथानकात वैशिष्ट्यपूर्ण रचनेद्वारे नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक उत्तम असणे आवश्यक आहे. नाटककार आपल्या नाटकातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडतो. नाटकाचे ध्येय सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणे असून ते घडवताना माणसांच्या मनातील भाव-भावना, स्वभाव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

पात्रांच्या मनातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन होण्यासाठी स्वगताचा परिणामकारकरित्या वापर केलेला असतो. त्यासाठी नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकाचा तोल सांभाळला जाईल अशा पद्धतीने नाटकातील पात्रांच्या शाब्दिक चित्रणाची जबाबदारीसुद्धा नाटककाराला पार पाडणे आवश्यक असते. परस्परविरुद्ध स्वभाव, कृती व भाव-भावनांमधील तणाव यांमधून संघर्ष निर्माण होऊ शकतो.

कथानकातील आशयात संघर्ष येणे महत्त्वाचे. भूमिकांच्या परस्पर नात्यांमधील संघर्ष तसेच भूमिका व परिस्थिती यांमधील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक होऊन त्याची रंगत वाढते. त्यासाठी खटकेबाज, चुरचुरीत नर्मविनोदी संवादांची आवश्यकता असते. नाट्यातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातील संवाद करतात. कथानकामधील प्रसंग, दृश्य, काळ यांमधील बदलांसंबंधित सूचना कंसातील रंगसूचनांमधून नाटककार देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्यातील संदर्भ स्पष्ट झाल्यामुळे कथानकाचा प्रवाह सहजरित्या पुढे जातो.

आशयाला अनुरूप अशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देण्याचे काम करते. त्यातील भाषिक सौंदर्य संपूर्ण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तरः व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यावसायिक नाटकाच्या माध्यमाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात.
  • व्यावसायिक नाटकांचे स्वरूप हे प्रामुख्याने बोधपर व मनोरंजनात्मक असते.
  • एखादे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
  • नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचे नाते तयार होते. व्यावसायिक नाटके ही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर अधिक प्रमाणात असतात.
  • व्यावसायिक नाटकाची मांडणी प्रेक्षकांच्या आवडीनुसार केलेली असते.
  • व्यावसायिक नाटकातील संवाद हे विनोद, उपहास, श्लेष व शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होईल असे असतात.
  • व्यावसायिक नाटकाची निर्मिती बोध, मनोरंजन प्रेक्षकांना आवडणारी असून व्यावसायिक हेतूनेच झालेली असते.

प्रश्न ऊ.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमणे :

  • प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.
  • प्रायोगिक नाटकाच्या आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असते.
  • या नाटकांमध्ये आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.
  • स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात.
  • नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना त्याबरोबरच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा या नाटकात दिसून येतो.
  • प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता आणि परिचित नसलेली सूचकता यांचा कौशल्याने वापर केलेला दिसतो.
  • भाषिक प्रयोग केले जातात तसेच घटना सहज व नैसर्गिक करण्याकडे कल असतो.
  • या नाटकांमधील संवाद बरेचदा बोलीभाषेप्रमाणे असतात.
  • प्रायोगिक नाटकात आशयाला अनुरूप असणाऱ्या घटना, प्रसंगांवर भर दिलेला असतो.
  • या नाटकामध्ये आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हा कथा, कादंबरी, कविता यांप्रमाणे एक वाङ्मय / साहित्य प्रकार आहे. परंतु तो इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत परंतु नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा अंतर्भाव होतो. कथा कादंबऱ्यांमध्ये लेखक व वाचक हे दोनच घटक असतात पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून लेखकाचे शब्द नट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटक हे दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाटक रंगमंचावर दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते.

प्रश्न आ.
विदयार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विदयार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
उत्तरः
शिक्षक-पालक : कुणाल, शालांत परीक्षेत तू ९७.२०% मिळवून घवघवीत यश आज मिळवले आहेस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन! खूप आनंद झाला आहे ना.

11th Marathi Book Answers Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Additional Important Questions and Answers

कृती : १

स्वमत:

प्रश्न 1.
‘लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
नाटक ही आपल्या संस्कृतीमधील अगदी प्राचीन कला आहे. ज्याचे स्वतःचे शास्त्र आहे, अभ्यास आहे. एकाच वेळी अनेक विषयांना बांधून ठेवणारा हा साहित्य प्रकार आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद घडतो. यातन लोकांशी संवाद साधता साधता त्यांचे मनोरंजन करता येते. जेव्हा जेव्हा समाजात काही बदल, घडामोडी होत असतात तर त्याचे प्रतिसाद मनुष्य स्वभावावर, मानवी जीवनांवर होत असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

त्यातून भावनिक, मानसिक, सामाजिक राजकीय संघर्ष होतात. त्याची दखल नाटकाचा नाटककार घेत असतो. त्या नाटकातून समाजात बदल टिपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते प्रेक्षकांसमोर पोहोचवताना तो सुखात्मिका वा शोकात्मिकेच्या आधारे ते पोहोचवेल. त्याकरता नट रंगमंचावर सादरीकरण करताना अभिनय करतो. कृती, संवाद, स्वगत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांच्या आधारे नाटकातून लोकांशी संवाद साधल्याने केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनदेखील होते.

कृती : २.

प्रश्न 1.
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → [ ]
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे

कृती : ३.

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली → [ ]
उत्तर :
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली. → १९६०

उपयोजित कती

स्वमत:

प्रश्न 1.
‘आजच्या काळात करमणुकींचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आजच्या काळात करमणुकीची विविध माध्यमे लोकप्रिय आहेत. दृकश्राव्य माध्यमात चित्रपट, डी.व्ही.डी., दूरचित्रवाणी, नाटक यांचा समावेश होतो. परंतु नाटक पाहणाऱ्या लोकांची संख्या आजदेखील लक्षणीय असण्याचे कारण म्हणजे समाजातील चालीरीती काळानुसार बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या कायम राहिल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वाभावांतील विविध छटांचे दर्शन प्रेक्षकाला नाटकातून घडते. नाटकांची निर्मिती ही मुख्यत: मनोरंजनाच्या हेतूने केली जात असली तरी प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो.

त्यामुळे नाटक हे त्याला आपले वाटते. मानवी जीवनातील नाट्य प्रेक्षकांना नाटकातून पहायला मिळते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर होत असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रेक्षकांना आत्मिक समाधान मिळते. जे इतर करमणुकीच्या माध्यमांतून मिळत नाही. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न नाटकातून केला जातो. त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे आणि करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक हा कलाप्रकार जिवंत राहिला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नाटक- साहित्यप्रकार-परिचय प्रास्ताविक :

ललित साहित्यप्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेल्या सुख–दु:खाचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. त्यातूनच साहित्यनिर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मानवी भाव–भावना स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकांतून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृक–श्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असते. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

नाट्यसंहितेचे स्वरूप :

नाट्यसंहिता परिपूर्ण, दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेने तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यांतील संघर्ष, परिस्थिती व भूमिका यांमधील संघर्षामुळे नाटक परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते.

नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण :

कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार वेगळा आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे तर इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोन घटक असतात. विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील पहिले नाटक तर महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी लळित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरल्या.

संगीत नाटक :

अण्णसाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांनी भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतील एक मापदंड तयार केला. संगीताचा वापर हा त्यांतील महत्त्वाचा घटक होता.

संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. यात संवाद तुलनेने कमी असून अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवले जाते. या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप व कथानकाला पुढे नेणारी यातील पदे असतात. विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यांतील संगीतात असतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. १९०० सालच्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते.

यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’ व ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ यांनी संगीत नाटकाला समृद्धता प्राप्त करून दिली. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार नसत त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारत. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजदेखील अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रायोगिक नाटक :

नाटकाचा विषय व सादरीकरण यांत प्रयोग करणे हा या नाटकांचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, प्रसारमाध्यमांमध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झाले. तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली.

प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकाचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकांतील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगांचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे, आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते.

व्यावसायिक नाटक :

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोग केला जातो. समाजातील समस्या घेऊन अनेक व्यावसायिक नाटके निर्मिली गेली.

व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद या नाटकात असतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे.

नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषाकार आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकांचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्विता अवलंबून असते. पडदयामागच्या कलाकारांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्यप्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

प्रवृत्ती – स्वभाव (nature), परिचय – ओळख (introduction), संहिता – कथानक (script), आधुनिक – सध्याचे (modern), आस्वाद – चव, रुची (flavour, taste), खर्चिक – महागडा (expensive), प्राचीन – जुने (ancient, primitive).

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यरूपांतर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

12th Marathi Guide व्याकरण वाक्यरूपांतर Textbook Questions and Answers

कृती

1. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर 1
उत्तर :
(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

  • वाक्यप्रकार → आज्ञार्थी वाक्य
  • विधानार्थी वाक्य → दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

  • वाक्यप्रकार → उद्गारार्थी वाक्य
  • विधानार्थी – नकारार्थी वाक्य → तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

  • वाक्यप्रकार → प्रश्नार्थी वाक्य
  • विधानार्थी – होकारार्थी वाक्य → स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे.

(४) मोबाइलचा अतिवापर योग्य नाही.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → मोबाइलचा अतिवापर टाळा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • प्रश्नार्थी वाक्य → खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?

(६) विदयार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → विदयार्थ्यांनो, संदर्भग्रंथांचे वाचन करा.

2. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

(a) सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
(b) तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
(c) किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)
(d) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
(e) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
(f) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
(g) अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
(h) तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
(i) निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही ? (विधानार्थी करा.)
(j) दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :
(a) सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही.
(b) तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे.
(c) ही पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे.
(d) पांढरा रंग कुणाला आवडत नाही?
(e) चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात.
(f) किती आनंद झाला तुझ्या भेटीने!
(g) हा अजब चमत्कार आहे.
(h) तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला.
(i) निरोगी राहावे असे सर्वांना वाटते.
(j) दवाखान्यात हळू आवाजात बोलावे.

  • लेखन करताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करण्याची गरज भासते, अशा बदलाला ‘वाक्यरूपांतर किंवा वाक्यपरिवर्तन’ असे म्हणतात.
  • वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो, पण वाक्यार्थाला बाध येत नाही.

विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकांत रूपांतर होते.

उदाहरणार्थ,
पुढील वाक्ये नीट अभ्यासा :

  • मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. (विधानार्थी वाक्य.)
  • किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे! (उद्गारार्थी वाक्य.)
  • मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? (प्रश्नार्थी वाक्य.)
  • मुलांनो, शिस्त अवश्य पाळा. (आज्ञार्थी वाक्य.)

म्हणून :

वाक्यार्थ्याला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपांतर होय.

होकारार्थी – नकारार्थी (वाक्यरूपांतर)

पुढील वाक्ये नीट अभ्यासा.

  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी झाला. (होकारार्थी वाक्य.)
  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला नाही. (नकारार्थी वाक्य.)

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण काय केले?

  • विजयी x पराभूत
  • झाला x झाला नाही.

दोन विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलले. पण वाक्याचा अर्थ बदलला नाही.

म्हणून,

वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल झाला, तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यप्रकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

12th Marathi Guide व्याकरण वाक्यप्रकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 1.
(a) गोठ्यातील गाय हंबरते.
(b) श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
(c) किती सुंदर देखावा आहे हा!
(d) यावर्षी पाऊस खूप पडला.
(e) तुझा आवडता विषय कोणता?
उत्तर :
(a) विधानार्थी वाक्य
(b) विधानार्थी – नकारार्थी वाक्य
(c) उद्गारार्थी वाक्य
(d) विधानार्थी वाक्य
(e) प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

2. खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 2.
(a) प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
(b) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
(c) विदयार्थी कवायत करत आहेत.
(d) विदयार्थ्यांनी सभागृहात गोंगाट करू नका.
(e) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
उत्तर :
(a) आज्ञार्थी वाक्य
(b) संकेतार्थी वाक्य
(c) स्वार्थी वाक्य
(d) आज्ञार्थी वाक्य
(e) स्वार्थी वाक्य

  1. मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात.
  2. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात.
  3. अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य म्हणतात.
  4. आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अनेक प्रकारची ‘वाक्ये’ एकापुढे एक मांडतो.
  5. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो.
    • उदा., पाऊस धो धो पडला.
    • किती जोरात पडला पाऊस!
    • पाऊस तर पडायलाच हवा.
  6. पाऊस न पडून कसे चालेल?
  7. वाक्यांच्या अशा अनेकविध वापरातून ‘वाक्यांचे प्रकार’ निर्माण झाले आहेत.
  8. वाक्यांच्या प्रकारांचे मुख्य दोन विभाग आहेत. –
    • आशयावरून व भावार्थावरून.
    • क्रियापदाच्या रूपावरून
    • आशय व भावार्थ असलेला वाक्यप्रकार.
  9. वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे तीन प्रकार आहेत.
    • विधानार्थी वाक्य
    • प्रश्नार्थी वाक्य
    • उद्गारार्थी वाक्य.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

1. विधानार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल खूप सुंदर आहे.
    • माझी शाळा मला खूप आवडते.
  2. वरील दोन्ही वाक्यांत ‘विधान’ केले आहे.
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल खूप सुंदर आहे. → विधानार्थी वाक्य
  • माझी शाळा मला खूप आवडते. → विधानार्थी वाक्य

2. प्रश्नार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल सुंदर आहे का?
    • तुझी शाळा कुठे आहे?
  2. वरील वाक्यांत ‘प्रश्न’ विचारले आहेत.
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल सुंदर आहे का? → प्रश्नार्थी वाक्य
  • तुझी शाळा कुठे आहे? → प्रश्नार्थी वाक्य

3. उद्गारार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • किती सुंदर आहे हे फूल!
    • किती आवडते मला माझी शाळा!
  2. वरील दोन्ही वाक्यांत बोलणाऱ्याच्या मनातील भाव उत्कटपणे उत्स्फूर्तपणे व्यक्त झाला आहे.
ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

3. विध्यर्थी वाक्य

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • मी दररोज शाळेत जातो.
    • मी पहाटे व्यायाम केला.
  2. वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • मी दररोज शाळेत जातो. → स्वार्थी वाक्य
  • मी पहाटे व्यायाम केला. → स्वार्थी वाक्य

4. आज्ञार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • दररोज शाळेत जा.
    • नेहमी पहाटे व्यायाम कर.
  2. वरील दोन्ही वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून आज्ञा केली आहे.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • दररोज शाळेत जा. (आज्ञा)
  • देवा, मला चांगली बुद्धी दे. (प्रार्थना)
  • कृपया, मला पुस्तक दे. (विनंती)
  • मुलांनो, खूप अभ्यास करा. (उपदेश)
  • तुम्हांला नक्की यश मिळेल. (आशीर्वाद)
  • येथे धुंकू नये. (सूचना) → आज्ञार्थी वाक्ये

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

5. विध्यर्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा/अपेक्षा)
  • वर्ग स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्यदक्षता)
  • बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. (शक्यता)
  • आत्मविश्वास असणाराच विदयार्थी यशस्वी होतो. (योग्यता)
  • वरील वाक्यांमधील क्रियापदावरून विधी (म्हणजे वरच्या कंसातील गोष्टी) व्यक्त होतात.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता वगैरे गोष्टी (विधी) व्यक्त होतात, अशा वाक्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात.
म्हणून, वरील सर्व वाक्ये ‘विध्यर्थी वाक्ये’ आहेत.

6. संकेतार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील.
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल.

वरील दोन्ही वाक्यांत पहिली अट पूर्ण केली, तर पुढचा परिणाम होईल, असा संकेत दिला आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून अट किंवा संकेत दिसून येतो, त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील. → संकेतार्थी वाक्य
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल. → संकेतार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

12th Marathi Guide Chapter 11 आरशातली स्त्री Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 2

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 4

आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्रश्न 1.
घनगर्द संसार – ……………..
उत्तर :
घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
प्रेयस चांदणे – ……………..
उत्तर :
प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

प्रश्न 3.
प्राण हरवलेली पुतळी – ……………..
उत्तर :
प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

प्रश्न 4.
फाटलेले हृदय – ……………..
उत्तर :
फाटलेले हृदय – विस्कटलेले वेदनामय मन.

2. अ. वर्णन करा.

प्रश्न 1.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल –
उत्तर :
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

प्रश्न 2.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
उत्तर :
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

प्रश्न 1.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर :
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
उत्तर :
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

इ. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
2. आभाळ झुल्यावर झुलणारीआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
3. देह तोडलेले फूलइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
4. पारंपरिकतेचे वरदानई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाउ. मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगउ. मनातले सुंदर भाव
2. आभाळ झुल्यावर झुलणारीइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
3. देह तोडलेले फूलई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
4. पारंपरिकतेचे वरदानआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न अ.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

प्रश्न आ.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली –
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते – तू रडू नकोस.

ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

6. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले.

तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

उपक्रम :

‘स्त्री’विषयक पाच कवितांचे संकलन करा. त्यांचे वर्गात लयीत वाचन करा.

तोंडी परीक्षा.

‘आरशातली स्त्री’ या कवितेचे प्रकट वाचन करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Additional Important Questions and Answers

(काव्यसौंदर्य / अभिव्यक्ती)

पुढील ओळींचा अर्थ लिहा :

प्रश्न 1.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य…!
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते -त् नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते – पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येये उराशी बाळगलीस. तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाहय बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा
स्वतःशी केलेला सार्थ संवाद आहे,’ हे विधान स्पष्ट करा. –
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला, परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली.

म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वत: केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

व्याकरण

वाक्यप्रकार :

आशयावरून पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती बदललीस तू अंतर्बाय! → [ ]
  2. आरशात पाहून डोळे भरून आले. → [ ]
  3. तू बोलत का नाहीस? → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. → [ ]
  2. तू रडू नकोस. → [ ]
  3. जर आत्मविश्वास असेल, तर जीवन समृद्ध होईल. → [ ]
  4. डोळ्यांतले आसू तळ्यात सोडून दे. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आशार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. तू रडू नकोस. (होकारार्थी करा.)
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घे, (विधानार्थी करा.)
  3. अंगणात दिवे लावावेत. (आज्ञार्थी करा.)
  4. शुभ्र कमळाची फुले आण. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. तू हसत राहा.
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घेतले पाहिजेत.
  3. अंगणात दिवे लाव.
  4. शुभ्र कमळाची फुले आणशील का?

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा व समास ओळखा :

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवना
2. ध्येयगंगा
3. पूर्वरंग
4. अस्तित्वहीन

उत्तर:

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवनानवीन अशी तरुणीकर्मधारय समास
2. ध्येयगंगाध्येयाची गंगाविभक्ती तत्पुरुष समास
3. पूर्वरंगपूर्वीचा रंगविभक्ती तत्पुरुष समास
4. अस्तित्वहीनअस्तित्वाने हीनविभक्ती तत्पुरुष समास

प्रयोग :

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. → [ ]
  2. तळ्यात कमळे फुलली. → [ ]
  3. स्त्रीने आरसा पाहिला. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात.
2. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते.
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

आरशातली स्त्री Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्या वेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे.

संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अब्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले – ‘तूच तीच आहेस, जिला माझेच रूप लाभले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून-बाहेरून पूर्णत: बदलली आहेत. तू पूर्वीची ‘ती’ राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक. मी तुला सांगते तू कशी होतीस ते, तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते.

तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस, स्वप्नांचे पंख . लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आजमितीला, या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे.

आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासनू फूल तोडून घ्यावे, तसे तुझे ओठ म्लान, निपचित, पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुढत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवसरात्र तू आतल्याआत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे, अशी तू स्वत:ची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस.

तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहे. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवले आहे.

असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्त्व पाहून माझे काळीज वेदनेने आक्रंदते. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस, तनामनाला सहन न होणाऱ्या वेदना तु पदराने झाकतेस. नि बळेबळेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस.’

आरशातल्या स्त्रीचे (बाईच्या दुसऱ्या मनाचे) बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले. स्वत:च्या अस्तित्वाचे भान येऊ लागले; तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत, मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली – ‘अशी उन्मळून रडू नकोस. सावर स्वत:ला. ऊठ. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडू दे. दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीसत्वाने जग. जा त्या तळयात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम, ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड झुगारून टाक.’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

शब्दार्थ :

  1. ल्यालेली – अंगिकारलेली, घेतलेली.
  2. अंतर्बाहय – आतूनबाहेरून.
  3. अंतर – मन.
  4. पूर्वरंग – गतस्मृती.
  5. तरंग – लाटा.
  6. बहर – फुलोरा.
  7. नवयौवना – नवतरुणी.
  8. ध्येयगंधा – ध्येयाने प्रेरित व गंधित झालेली.
  9. नखशिखान्त – पावलांपासून डोक्याच्या केसापर्यंत.
  10. स्थितप्रज्ञा – स्थिर बुद्धीची.
  11. देह – अंग, शरीर.
  12. घनगर्द – घनदाट.
  13. अहोरात्र – रात्रंदिवस.
  14. पारंपरिकता – पूर्वीपासून आचरणात आलेली जीवनमूल्ये.
  15. वरदान – कृपा, आशीर्वाद
  16. प्रेयस – अतिशय प्रिय.
  17. भान – जाणीव.
  18. अल्लड – खेळकर.
  19. पेंगुळणे – झोपेची झापड असणे.
  20. अस्तित्वहीन – अस्तित्व नसलेली.
  21. पुतळी – स्थिर, शिल्प.
  22. हंबरणे – गहिवरणे.
  23. कंठ – गळा.
  24. हुंदका – रडण्याचा आवाज.
  25. असहय – सहन न होणाऱ्या (कळा).
  26. हिंदकळणे – पाणी हलणे.
  27. अधिकारवाणी – हक्काने बोलणे.
  28. खुळे – वेडे.
  29. आसू – अश्रू.
  30. शुभ्र – पांढरीस्वच्छ.
  31. प्रसन्न – टवटवीत.
  32. गोंजारणे – कुरवाळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. डोळे भरून येणे – गलबलून डोळयांत अश्रू येणे.
  2. मन उलगडणे – मनातील भावना मोकळ्या करणे.
  3. भान नसणे – जाणीव नसणे, गुंग होणे.
  4. काळीज हंबरणे – मन गलबलणे.
  5. फाटलेले हृदय शिवणे – विखुरलेल्या भावना एकत्र करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

12th Marathi Guide Chapter 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Textbook Questions and Answers

कृती

1. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमीचे आस्वादनीय रूप असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत ‘मी’ असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखादया घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.

वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख (२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख (३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख (४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख (५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखादया क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते.

या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्तिसंबंधाने झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

4. ‘वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर :
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.

वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.

वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

5. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
वृत्तलेखाची गरज
उत्तर :
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

प्रश्न आ.
वृत्तलेखाचे स्रोत
उत्तर :
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.

प्रश्न इ.
वृत्तलेखाची भाषा
उत्तर :
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमीपेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन ५ विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.

प्रश्न ई.
वृत्तलेखाची वैशिष्ट्ये
उत्तर :
अनेकदा एखादया बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीच्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वाचकांना बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने ‘मुक्ता’ या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवतांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे.

१९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या ‘विदयेच्या वाटेवर’ या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे.

सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील ‘मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार’ संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखादया घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्दयांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) प्रस्तावना

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार माणूस जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे हे मानवी स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येते. जे ‘सांगणे’ केवळ स्व-रक्षणासाठी होते, त्याचा प्रवास हळूहळू व्यक्त होण्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. मानवी जीवन बातम्यांनी व्यापले गेले. वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांसोबत नव्याने स्थिर झालेल्या समाजमाध्यमांत आपण बातम्या ऐकत आणि पाहत असतो.

बातमी औत्सुक्य निर्माण करते. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात बातमीतल्या घटनेबद्दल अधिकाधिक जिज्ञासा निर्माण होत असते. बातमीत वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याने जे घडले तसेच बातमीत सांगितले जाते. बातमीत न सांगितली गेलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती आणि सूक्ष्म धागेदोरे वाचण्यासाठी वाचकांना वृत्तलेखाचा (फिचर रायटिंगचा) उपयोग होतो.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) वृत्तपत्र अर्थ आणि स्वरूप :

  • बातमीपत्रात जसे घडले तसे सांगितले जाते. बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे आवश्यक असते.
  • इंग्रजीत याला ‘फिचर’ असे म्हणतात. बातमी ज्या घटनेशी निगडित आहे तिचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते.
  • या गरजेतूनच वृत्तलेख या लेखनप्रकाराचा जन्म झाला आहे.
  • फिचर म्हणजे नॉन न्यूज असे रूढ असले, तरी वृत्तलेखाचा संबंध बातमीशी असतो.
  • घडून गेलेल्या घटनेशी अथवा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा घनिष्ठ संबंध असतो.
  • वृत्तलेखाला बातमीचा आधार असावा लागतो. निमित्त असावे लागते.
  • वृत्तलेखाला ‘धावपळीचे साहित्य’ असेही म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असतो.
  • वृत्तलेख बातमीमागची बातमी सांगत असतो. वृत्तलेखात रंजकता असली, तरी कल्पकतेला फारसा वाव नसतो.
  • अचूकता वृत्तलेखात महत्त्वाची असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी लेखनकृतीत स्वतंत्र असतो. मजकूर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असणे हे वृत्तलेखाचे वैशिष्ट्य असते.
  • बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाचा उपयोग होतो. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांचा विचार करून लेखन केलेले असते.
  • वृत्तलेखात वाचकांचे समाधान हा घटकही महत्त्वाचा मानला जातो.
  • वृत्तलेखाची भाषा सोपी, ओघवती असावी.
  • वाचकांना सहज समजणारी, आपलीशी वाटणारी, वाचकांना खिळवून ठेवणारी, परिणाम साधणारी भाषाशैली असावी.
  • वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांना आकृष्ट करणारी असते.
  • वाचकांच्या विचारांना धक्का देणारी ताकद वृत्तलेखात असते.
  • वृत्तलेखातील माहिती विश्वसनीय असते. मुद्द्यांच्या समर्थनार्थ वृत्तलेखात नकाशे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो.
  • वृत्तपत्रलेखन हे कौशल्यपूर्ण काम आहे. वृत्तलेखन करणास लेखक आपले अनुभव आणि विषयाच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.
  • वृत्तलेखक वाचकांना आनंद देणारा, माहिती, ज्ञान देणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बातमीपलीकडची बातमी जिवंत करणारा असतो.
वर्तमानपत्रांचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतात देखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ‘फिचर’चा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. म्हणजे ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

वृत्तलेखांचे प्रकार :

बातम्यांचा विषय आणि लेखनप्रकारानुसार वृत्तपत्र लेखनाचे पुढील प्रकार –
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 1
1. बातमीवर आधारित वृत्तलेख :

  • या वृत्तलेखाच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येते. एखादया बातमीच्या संदर्भाने हा वृत्तलेख लिहिलेला असतो.
  • वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा या प्रकारात नव्याने विचार करणे प्रस्तुत ठरते.
  • वर्तमानपत्रातील घटनेत असणारी सर्व माहिती वृत्तलेखात नसते; परंतु बातमीमागची बातमी वाचकांना या प्रकारच्या वृत्तलेखात वाचायला मिळते.
  • बातमीवर आधारित वृत्तलेखन करताना बातमीतील घटनेचा सविस्तर आढावा घेणे अपेक्षित असते.
  • वर्तमानपत्रातील बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा नोंदींवर प्रकाश टाकण्याचे काम या प्रकारच्या वृत्तलेखनात होणे आवश्यक असते. या
  • प्रकारच्या वृत्तलेखात बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • कधी कधी वृत्तलेखकाला बातमी संदर्भातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून घटनेचा तळ गाठावा लागतो.
  • वृत्तलेखकाकडे लेखनासाठी असणारी माहिती स्वतंत्र आणि विश्वसनीय असणे आवश्यक असते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात.
  • स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कोणत्याही बातमीवर या प्रकारचे वृत्तलेखन करता येऊ शकते.
  • बातमीपेक्षा अधिक काही मिळाल्याचा आनंद वृत्तलेख वाचकांना मिळणे हेही वृत्तलेखकाला ध्यानात घेणे आवश्यक असते.
  • उदा., पेट्रोल-डीझेलचा वाढत जाणारा तुटवडा – स्वरूप आणि कारणे, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी – कारणे आणि उपाय, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम इत्यादी.

2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात एखादया क्षेत्रात देदीप्यमान कार्य केलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला जातो.
  • सामान्य असो की असामान्य कुठल्याही व्यक्तीच्या संघर्षाची दखल या वृत्तलेखात घेतली जाते.
  • एखादया क्षेत्रातील यश, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, अडचणींचा केलेला सामना, महत्त्वपूर्ण कृती, उपक्रम, विक्रम या संदर्भातील लेखन या वृत्तलेखात करणे आवश्यक असते.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख बहुतकरून औचित्य साधून लिहिलेले असतात.
  • पुरस्कार, गौरव, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, अमृत महोत्सव इत्यादी प्रसंगी या प्रकारचे वृत्तलेख लिहिले जातात.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात वाचकांपुढे विशिष्ट व्यक्तीचा केवळ जीवनपट उभा करणे अपेक्षित नसते.
  • व्यक्तीच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणे आवश्यक असते.
  • अशा वेळी त्या व्यक्तीसंबंधी पूर्वी झालेले लेखन, चरित्र, आत्मचरित्र, सोबत काम केलेल्या व्यक्ती, स्नेहीजन यांच्या मुलाखती अशी विस्तृत माहिती मिळवणे उपयुक्त ठरते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या लेखनात व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखा, सनावळ्या, आकडेवारी एवढ्याचीच नोंद करून, परिचयात्मक माहिती लिहून चालत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे विचार, भूमिका, दृष्टिकोन, खास शैली, सवयी इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
  • माहितीतील तांत्रिक बाबींत अधिक न अडकता व्यक्ती जीवनातील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेखाचे वैशिष्ट्य म्हणता येते. उदा., सिंधुताई सकपाळ, बीजमाता राहीबाई पोपरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.

3. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख :

  1. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या प्रसार माध्यमांवर होणाऱ्या मुलाखती लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. त्याला मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असे संबोधले जाते.
  2. या प्रकारच्या वृत्तलेखातून विशिष्ट क्षेत्रात कार्याने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या व्यक्ती, त्यांचा कार्यप्रवास, महत्त्वपूर्ण संशोधन, मतप्रणाली, त्यांचे कार्यक्षेत्र, यश, अडचणी, अनुभव यांसारख्या ५ मुद्दयांची गुंफण करणे आवश्यक असते.
  3. कार्यसिध्द व्यक्तींची स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या वृत्तलेखात करणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य लोक व्यक्तिजीवनातील ज्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत, अशा गोष्टींचा परिचय करून देणे वृत्तलेखाचे प्रधान कार्य असते.
  4. विशिष्ट व्यक्तीच्या कर्तृत्वाची उंची आणि संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वृत्तलेखात करणे गरजेचे ठरते. उदा., नामवंत लेखक, गिर्यारोहक, संशोधक इत्यादींच्या मुलाखतीवर आधारित लेख.

4. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात संशोधनात्मक लेखन असते. प्राचीन मंदिरे, लेण्या, स्थळे, गावे इत्यादी संदर्भातील उपलब्ध माहितीच्या आधारे नव्याने माहिती देणारा ऐतिहासिक स्वरूपाचा वृत्तलेख लिहिणे अपेक्षित असते.
  • गावे, स्थळे, प्राचीन मंदिरे, वस्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात.
  • या वृत्तलेखात अशा ऐतिहासिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणे आवश्यक असते.
  • शिलालेख, नाणी, भूर्जपत्रे, ताम्रपट यांच्या इतिहासकालीन रूपाचा बदलत्या काळात नव्याने अर्थ शोधला जात आहे. नवनवीन माहिती समोर येत आहे.
  • संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखादया वस्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. या नव्या माहितीच्या संदर्भात वृत्तलेख करणे महत्त्वाचे ठरते.
  • लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती यासंदर्भात वृत्तलेखक विविध क्षेत्रभेटीतून जे जे अनुभवास आले, त्याला अनुलक्षून वृत्तलेखन करू शकतो. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख लिहित असताना इतिहास तज्ज्ञ, त्यांच्याशी विषयानुरूप केलेल्या चर्चा, व्याख्यान, मुलाखती इत्यादीचे साहाय्य घेणे उपयुक्त ठरते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखात आवश्यकतेनुसार नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा वापर करता येऊ शकतो. उदा., शनिवारवाडा, हेमाडपंथीय मंदिराचे शिल्पकाम, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर इत्यादी.

5. नवल, गूढ इत्यादींवर आधारित वृत्तलेख :

  • एखादी विस्मयकारक घटना, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित लेखन या प्रकारच्या वृत्तलेखात केले जाते.
  • एखादया परिसरातील निसर्गाच्या आश्चर्यजनक किमया, गूढ, अनाकलनीय गोष्ट, निसर्गातील एखादी लक्षवेधी परंतु चमत्कारिक गोष्टदेखील वृत्तलेखाचा विषय होऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या वृत्तलेखात माहितीची विश्वासार्हता तपासणे फार महत्त्वाचे असते. उपलब्ध माहितीची शहानिशा करणे, माहितीची पारख करणे, चिकित्सा करणे यांसारख्या बाबी प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे असते.
  • निसर्गातील अनाकलनीय गोष्टी सत्यतेच्या चाचणीतून लेखात मांडणे अतिशय कौशल्यपूर्ण काम असते. वृत्तलेखकाला जबाबदारीने या प्रकारच्या वृत्तलेखाचे लेखन करणे आवश्यक असते.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा अफवा पसरवणारी माहिती, नोंदी, नकारात्मकता वृत्तलेखातून प्रकट होणार नाही याची काळजी कटाक्षाने या प्रकारच्या वृत्तलेखात घ्यावी लागते.
  • उदा., सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी ५८ फूट, रांजणखळगे, गरम पाण्याचे कुंड इत्यादी. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरुचीचे कार्यक्रम, खादयसंस्कृती इत्यादी विषयांवरही वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात.

वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत :

प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सध्या घटनेतही बातमी दिसत असते. वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव, प्रवास, भेटणाऱ्या व्यक्ती विविध वर्तमानपत्रातील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळ यांसारख्या विविध साधनांच्या आधारे वृत्तलेखाचे विविध विषय मिळत असतात. वृत्तलेखाच्या विषयांचे काही महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे –

1 बातमी :

  •  वृत्तलेखात बातमीपलीकडची बातमी चित्रित केलेली असते. वर्तमानपत्रात, नियतकालिकात छापील स्वरूपात आलेल्या बातम्या वृत्तलेखाला विषय पुरवत असतात.
  • दूरचित्रवाणीवर दाखवली जाणारी एखादी घटना लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज रुजवत असते.
  • बातमीपेक्षा अधिक काही जे बातमीत दडलेले असते, त्याचा शोध वृत्तलेखात घेणे आवश्यक असते.
  • बातमीसोबत जोडले असलेले संदर्भ, दुवे, महत्त्वाच्या गोष्टी, मुलाखती यांच्या साहाय्याने बातमीच्या आधारावर वृत्तलेखनाचा मजकूर फुलवता येऊ शकतो.
  • कुठल्याही बातमीकडे सूक्ष्मपणे पाहिले, त्यातील बारकावे लक्षात घेतले, तर वृत्तलेखासाठी भूमी तयार होऊ शकते.
  • बातमी, बातमीभोवती असणारे विविध कंगोरे, बातमीचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला, तर वृत्तलेखासाठी अनेक विषय मिळू शकतात.
  • उदा., ‘अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त’ या बातमीच्या आधारे, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महत्त्व, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ५ अभिनयाचा प्रवास, महत्त्वाचे चित्रपट, कौटुंबिक पार्श्वभूमी, अमिताभ बच्चन यांचा जीवनप्रवास इत्यादी मुद्द्यांच्या आधारे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. व्यक्तिगत अनुभव :

  • पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे नित्यनवा जिवंत अनुभव असणारे क्षेत्र मानले जाते.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना रोज नव्या आव्हानात्मक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते.
  • बातमी बघताना अनेक अनुभव मिळत असतात. या अनुभवांपैकी काही मूळ बातमीस पूरक ठरतात, तर काही अनुभव लेखकाच्या मनात साठवले जातात. या अनुभवांची शिदोरी लेखकाला वृत्तलेखात उपयोगी पडते.
  • या अनुभवांचा पुनरुच्चार एखादया वृत्तलेखात करता येऊ शकतो. गतकाळातील अनुभवात भविष्यातील एखादया वृत्तलेखाची बीजे रुजलेली असतात.
  • उदा., ‘आश्रमातील मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप’ अशा बातमीच्या भोवताली लहान मुलांचे भावविश्व, मुलांचे आश्रमातील जीवन, कुटुंबापासून दूर असल्याची भावना, लहान मुलांची शैक्षणिक, वैचारिक जडणघडण असे कितीतरी बातमीमागचे पैलू लेखकाला दिसू शकतात.
  • यासंदर्भाच्या आधारे ‘एकटेपणात अडकलेले बालविश्व’ अशा प्रकारचा वृत्तलेख निश्चितच आकाराला येऊ शकतो.

3. भेटीगाठी/संभाषण :

  • पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना नेहमी लोकसंपर्कात राहणे गरजेचे असते. यासाठी व्यवसायाची गरज म्हणून संवादकौशल्य हवे असते. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. लेखनकौशल्यावर प्रभुत्व असावे लागते.
  • पत्रकारितेत अनेकदा विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी ते सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक घटकातील व्यक्तींशी संवाद साधावा लागतो.
  • प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, खेळाडू यांच्याशी संभाषण करीत असताना कितीतरी स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कितीतरी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करावी लागते.
  • कधी कधी व्यक्ती बोलत नाहीत; अशा वेळी बातमी जाणून घेण्यासाठी व्यक्तींना बोलते करण्याचे काम पत्रकारांना करावे लागते.
  • या गप्पांमधून वृत्तलेखासाठी आवश्यक बरेच विषय मिळू शकतात. व्यक्ती ते घटना/प्रसंग यामागील अनेक पैलूंचा वेध घेण्याचे काम वृत्तलेखक करीत असतो. या सर्वांतून वृत्तलेखाचा विषय सहज मिळू शकतो.

4 निरीक्षण :

  • पत्रकारिता क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला सदैव चौकस राहावे लागते. बातमीचे धागेदोरे शोधावे लागतात.
  • अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्यातून बातमी शोधता येणे पत्रकारितेत आवश्यक असते.
  • अशा सजगतेतून वृत्तलेखाचे विषय मिळत असतात. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात.
  • उदा., ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणसांचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी भोवती घडत असतात.
  • यातूनच वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात.

वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि पडदयामागे घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. तर्कबुद्धी या लेखनात गरजेची असते.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल, याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्रांच्या विक्रीची आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यादृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो.

वृत्तलेखात पुढील बाबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात –

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 2

(१) वाचकांची अभिरुची : वर्तमानपत्राला बातमीसोबत वाचक वर्ग कोणता आहे, याचा विचारही प्राधान्याने करावा लागतो. वाचकांची अभिरुची वर्तमानपत्रीय गणितात महत्त्वाची मानली जाते. वाचकांची गरज आणि आवड बघून वृत्तलेखाच्या विषय, आशय, भाषा यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी केली तर लोकांच्या पसंतीस पडू शकतात. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून लिहिलेले वृत्तलेख वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकतात. वृत्तलेखात वाचकांच्या अभिरुचीचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक असते.

(२) तात्कालिकता : वृत्तलेख नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तर वाचक तो लेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(३) वेगळेपण : वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा, समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात येण्याची गरज असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

(४) वाचकांचे लक्ष वेधणे : वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. वृत्तलेखाचा आराखडा ठरवणे आवश्यक असते. वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, तक्ता, नकाशा, छायाचित्र इत्यादी बाबींचा विचारही वृत्तलेखाच्या मांडणीत करणे गरजेचे असते. मजकुराला समर्पक चित्र/छायाचित्र कुठे उपलब्ध होईल, तसेच त्याचा नेमकेपणाने उपयोग मजकुराच्या कोणत्या भागात करता येईल, याचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार लेखकाला करावा लागतो. यासंबंधीचे नियोजन केले, टिपण काढले, चित्रांची मांडणी ठरवली, तर वृत्तलेख लिहिणे सोपे होते.

(५) वृत्तलेखाची शैली : वृत्तलेखात बातमीच्या पलीकडे असणारे कंगोरे शोधावे लागतात. साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीत तीन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात वृत्तलेखातील बातमीचा उलगडा केला जातो. बातमीतील ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागात होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. वृत्तलेखाच्या समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार मांडणे गरजेचे असते.

वृत्तलेख सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणे आवश्यक असेल, तर त्याची साधी, सोपी सहज आकलन करता येण्याजोगी असावी. बोजड शब्द, गुंतागुंतीची वाक्यरचना, शब्दबंबाळपणा वृत्तलेखात टाळावा. वृत्तलेखातील वाक्यरचना लहान वाक्यांची असल्यास वाचकांना विषय समजून घेणे सुलभ होते. मनावर पकड घेण्यास परिणामकारक भाषा असावी. ज्या विषयासंबंधी वृत्तलेखाचे औचित्य आहे, तो विषय लोकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्यात सफल झाला आहे, याचा विचार करणे आवश्यक असते.

वृत्तलेखातील व्यावसायिक संधी :

  • आज वेगवान माध्यमांच्या काळात लोकांपर्यंत बातमी पोहोचण्याचा वेग प्रचंड आहे. ब्रेकिंग न्यूजचा हा काळ आहे, असे म्हणता येते.
  • बातमीच्या मुळापर्यंत जाऊन समग्र घटना लोकांना वाचनास उपलब्ध करून देणे हे आव्हानात्मक आणि कौशल्याचे काम आहे.
  • अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी आवश्यक असतात.
  • चौकस दृष्टी, लेखनकौशल्य बातमीचा शोध घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
  • वृत्तपत्रांसाठी वृत्तलेखन करणाऱ्या लेखकांना विशिष्ट रकमेचे मानधनदेखील दिले जाते.
  • वृत्तलेखन बदलत्या माध्यमांच्या काळात युवावर्गाला आकर्षित करणारे क्षेत्र बनत आहे.

नोंद : वृत्तलेख समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.११० व १११ वर दिलेला वृत्तलेख नमुना अभ्यासा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

12th Marathi Guide Chapter 10 दंतकथा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ………
उत्तर :
लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही; कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 2.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण ………
उत्तर :
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये, असे लेखकांना वाटते; कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 7

इ. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 9
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 11

2. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. [ ]
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. [ ]
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. [ ]
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. [ ]
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. [ ]
उत्तर :
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. दात
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. राक्षस
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. वनराज
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कमनशिबी
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. कुंदकळ्यांची

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
उत्तर :
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो – कर्तरी प्रयोग

प्रश्न 2.
सगळे खूष होतात-
उत्तर :
सगळे खूष होतात – कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
उत्तर :
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले – कर्मणी प्रयोग

प्रश्न 4.
डॉक्टरांनी लीलया दात उपटला-
उत्तर :
डॉक्टरांनी लीलया दात उपटला – कर्मणी प्रयोग

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 12
उत्तर :

सामासिक शब्दसमासाचा विग्रहसमासाचे नाव
1. पंचमहाभूतेपाच महाभुतांचा समूहद्विगू
2. परमेश्वरपरम असा ईश्वरकर्मधारय
3. शब्दप्रयोगशब्दाचा प्रयोगविभक्ती तत्पुरुष
4. शेजारीपाजारीशेजारी, पाजारी वगैरेसमाहार द्वंद्व
5. विजयोन्मादविजयाचा उन्मादविभक्ती तत्पुरुष

इ. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

प्रश्न 1.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
उत्तर :
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

ई. खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

प्रश्न 1.

  1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
  2. शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
  3. तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

उत्तर :

  1. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.
  2. शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.
  3. किती हाडं हैत तुझ्या अंगात!

4. स्वमत.

प्रश्न अ.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
उत्तर :
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.

मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.

डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.

दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, “एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो.” हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न आ.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.

दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.

दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल.

प्रश्न इ.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
उत्तर :
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.

प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.

माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत. आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

5. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर :
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी ‘दंतकथा’ हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.

वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे.

प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.

भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. ‘दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर’ अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

उपक्रम :

डोळे व नाक या अवयवांशी संबंधित वाक्प्रचारांची यादी करा.

तोंडी परीक्षा.

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. नक्षा उतरणे
  2. शंख करणे
  3. दात घशात घालणे
  4. खल करणे
  5. चारीमुंड्या चीत होणे
  6. सिंहाचा बकरा होणे
  7. मेख मारणे

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Additional Important Questions and Answers

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण –
लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण –
आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण –
परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण –
उत्तर :
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण माणसाला जन्मत:च सर्व अवयव फुटतात; पण फक्त दातच जन्मानंतर सहा-सात महिन्यांनी येतात.

लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार आढळत नाही.

आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण परशा स्वतःला लेखकांपेक्षा प्रचंड ताकदवान समजायचा आणि येताजाता लेखकांची मानहानी करायचा.

परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण परशाला दात घासायचा कंटाळा यायचा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 13
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 14

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा [ ]
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा [ ]
  3. परशाची सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी अवस्था करणारा [ ]

उत्तर :

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा – दगडाची
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा – शिव्ह (सिंह)
  3. लेखकांच्या मते, जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो – कमनशिबी

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण –
उत्तर :
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण त्यांचे सर्व दात दुखत असल्याचा त्यांना भास होत होता.

प्रश्न 2.
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण –
उत्तर :
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण हजर असलेले सगळेच जण इतके मोठमोठ्याने बोलत की लेखकांचे विव्हळणे ऐकूही येत नसे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण –
उत्तर :
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण लेखक कोणालाही दुखवू इच्छित नव्हते.

वैशिष्ट्ये लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 16

पुढील कोष्टक पूर्ण करा :

प्रश्न 1.

दिवसा सभ्य दिसणारा माणूसदुखरा दात
दिवसा
रात्री

उत्तर :

दिवसा सभ्य दिसणारा माणूसदुखरा दात
दिवसासभ्यपणे वागतो.सभ्यपणे हळूहळू दुखत राहतो.
रात्रीरात्री खरा (म्हणजे वाईट) वागतो.रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते [ ]
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे [ ]
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे [ ]

उत्तर :

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते – ब्रह्मांड
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे – चोर आणि दुखरा दात
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे – दाते व दातार

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयावरून वाक्याचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात हे एखादया सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत? → [ ]
  2. बापरे! दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चात्ताप! → [ ]
  3. मानवी देह पंचमहाभूतांचा बनला आहे. → [ ]

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य

क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात दुखणे सरळ असावे → [ ]
  2. जेव्हा माझा दात दुखायला लागला, तेव्हा माझी खात्री झाली. → [ ]
  3. सहाव्या महाभूताला ‘दात’ म्हणतात. → [ ]
  4. दाताचे दुखणे तू सहन कर. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. संकेतार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

अलंकार :
पुढील ओळीतील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजाताचे। → ………
2. होई जरी सतत दुष्टसंग
न पावती सज्जन सत्त्वभंग
असोनिया सर्प सदा शरीरी
झाला नसे चंदन तो विषारी → ………
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अर्थातरन्यास अलंकार.

दंतकथा Summary in Marathi

पाठ परिचय :

‘दंतकथा’ हा एक विनोदी लेख आहे. दातदुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर, गमतीदार नजरेने पाहतात. त्या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे हा लेख होय. हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडेही बोट दाखवले आहे.

दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव. या अनुभवाच्या वेदनामय भागाकडे लेखकांचे लक्ष नाही, त्यांचा रोख मानवी स्वभावातील विसंग:कडे आहे.

सुरुवातीला लेखक दातांचे महत्त्व सांगण्याचा पवित्रा घेतात. दात हा अवयव पंचमहाभूतासारखेच एक सहावे महाभूत आहे असे सांगतात, पंचमहाभूते म्हणजे विश्वरचनेची पाच मूलतत्त्वे होत. दात तसेच एक मूलतत्त्व असूनही लेखक त्याला महत्त्व देत नाहीत. मराठी भाषेतही दाताला महत्त्व नाही. कारण दाताविषयी मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, गालावरची खळी यात त्याचा जीव अडकतो. पण प्रेयसीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर आढळत नाही.

मात्र, दात त्रासदायक ठरू शकतो. शक्तिमान अशा परशा पहिलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरम केले. मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही, हे नवीन भान लेखकांना आले.

एके दिवशी लेखकांचा एक दात दुखू लागला. प्रचंड वेदना होऊ लागल्या, एखादा लाकूडतोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा, तसा लेखकांना अनुभव आला.

दातदुखीने लेखकांना हैराण केले. त्यांना रात्रभर विव्हळत राहावे लागले, पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरड करणे लेखकांच्या पत्नीला पसंत नव्हते.

दातदुखीच्या बातमीने लेखकांचे शेजारी एकएक करून सगळे तब्येतीच्या चौकशीसाठी जमले. दातदुखीबद्दल चर्चा झाली.’ प्रत्येकाने आपापला उपाय सुचवला. लेखकांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:चे उपाय करून पाहिले.

अखेरीस लेखकांनी दंतवैदयाकडून दुखरा दात काढून घेतला. त्या वेळी लेखकांची दातदुखीपासून मुक्तता झाली.

शब्दार्थ :

  1. मेख – खोच, रहस्य, गूढ गोष्ट.
  2. नकटे (नाक) – कापलेले, आखूड, चपटे, बसके (असे नाक).
  3. प्रेमविव्हल – प्रेमासाठी व्याकूळ झालेला.
  4. कुंदकळ्या – कुंदा नावाच्या फुलझाडाच्या कळया.
  5. (त्या. शुभ्र व सुंदर असतात. सुंदर दातांना त्यांची उपमा देतात.)
  6. विकट – भयानक, हिडीस, कुरूप.
  7. अल्याड – अलीकडे.
  8. ब्रह्मांड – अवकाशातील संपूर्ण विश्व.
  9. असार – निःसत्त्व, खोटे, निकामी.
  10. मिथ्या – खोटे, नश्वर, भ्रामक.
  11. लोकापवाद – अकारण पसरवलेले गैरसमज, आळ.
  12. आळी – गल्ली, गल्लीच्या आधाराने उभा राहिलेला घरांचा समूह.
  13. थैमान – रडण्या-ओरडण्याचा प्रचंड कल्लोळ, आदळआपट.
  14. मतैक्य – एकमत.
  15. खलदंत – दुष्ट दात.
  16. नतद्रष्ट – दुष्ट, वाईट (अत्यंत कंजूष.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. मेख मारणे – एखादया कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे.
  2. दाती तृण धरणे – शरण येणे.
  3. स्वत:चीच मनगटे चावणे – शत्रूविरुद्ध काहीही करता येत नसल्याने चडफडत बसणे.
  4. दातांत धरता येणे – सामान्य, क्षुल्लक, किरकोळ वस्तू बाळगणे.
  5. बोलणी खाणे – दोषारोप, निंदा, ठपका ऐकून घ्यावा लागणे.
  6. चारीमुंड्या चीत होणे – पुरता पराभव होणे.
  7. मागमूस नसणे – ठावठिकाणा न आवळणे, चिन्हहीन आढळणे.
  8. नक्षा उतरणे – ताठा, घमेंड, अभिमान उतरणे.
  9. साक्षात्कार होणे – ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडणे, (यावरून एखादया गोष्टीचे मर्म अचानक कळणे.)
  10. थैमान घालणे – आदळआपट, प्रचंड गोंधळ करणे.
  11. दात उपटून हातात देणे – घमेंड घालवणारा पराभव करणे.
  12. दात घशात घालणे – पुरता पराभव करणे.
  13. शक्तीचे प्रदर्शन करणे – शक्तिमान असल्याचा देखावा करणे.
  14. हसे करणे – हास्यास्पद करणे.
  15. दातओठ खाणे – मनात मोठा राग, त्वेष असणे.
  16. शंख करणे – बोंबाबोंब करणे, आरडाओरड करणे.
  17. खल करणे – (बहुतेकदा गुप्तपणे) चर्चा करणे.
  18. सिंहाचा बकरा होणे – सर्व अवसान गळून पडणे.