Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.5 रेडिओजॉकी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

11th Marathi Digest Chapter 4.5 रेडिओजॉकी Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला प्राप्त करावी लागणारी भाषिक कौशल्ये लिहा.
उत्तरः
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मूलभूत भाषिक कौशल्ये म्हणजे लेखन, वाचन, भाषण-संभाषण, श्रवण कौशल्ये आत्मसात करणे अपेक्षित आहे. रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वाचन चौफेर हवे तसेच रेडिओजॉकी व्यासंगी हवा.

भाषा, साहित्य व संस्कृती यांची त्याला चांगली जाण असावी. त्याची भाषा साधी, सोपी व ओघवती असावी. शब्दफेक, बोलण्यातील सहजता, माधुर्य त्याच्या निवेदनात असावे. उच्चार सुस्पष्ट व निसंदिग्ध असावेत. भाव-भावना यांची जाणीव असावी. मिंग्शिल (मराठी-इंग्लिश), हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) तसेच स्थानिक भाषांची सरमिसळ करून आरजे निवेदन करत असतो. भाषा सकारात्मक. श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी. मिस्किल अशी असावी.

रेडिओजॉकीला भाषेचे उत्तम ज्ञान असावे. बोलताना शब्दातील भाव भावना यांचे प्रकटीकरण व्हावे. त्याचा अर्थ भाषेतून श्रोत्यांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात भाषेची उत्तम जाण व सरावातून, चांगल्या प्रकारे रेडिओजाकीला निवेदन करता येऊ शकते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
‘आरजे-एक संवादी व्यक्तिमत्त्व’ हे स्पष्ट करा.
उत्तरः
आरजे ए.एम, एफ.एम. व विविध कार्यक्रमांतून श्रोत्यांशी संवाद साधत असतो. त्याला बोलण्याची व गप्पा मारण्याची आवड असते. उत्कृष्ट संवाद कौशल्य व विनोदाची जाण असणारे व्यक्तिमत्त्व असते. स्टुडिओत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीतून त्यांना बोलते करण्याचे कौशल्य आरजेकडे असते.

वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधत असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना तो अनेकदा अनौपचारिक असतो. ‘डायल इन’ या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात आटोपशीर आणि अधिकाधिक श्रोत्यांना सामावून घेणारा असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना मार्दवपणा व हजरजबाबीपणा असतो. आरजे समोरच्याला अधिकाधिक बोलण्याची संधी देत असतो. आरजेचे बोलणे संवादी, गतिमान व सहजस्फूर्त असते.

सलग दोन-तीन तासांच्या निवेदनात आरजे विविध गाणी, किस्से सादर करता-करता श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत असतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फोनवरून श्रोत्यांशी संभाषण व चर्चा करत असतो. विविध स्पर्धांचे आयोजन, कोड्यांची रचना व त्यांची उत्तरे, विशेष दिनाची चर्चा यातून आरजेचे संवादी व्यक्तिमत्त्व समोर येते. अनेकदा थेट प्रक्षेपित कार्यक्रमांतून प्रवाही संवाद होत असतो. थोडक्यात आरजे हे संवादी व्यक्तिमत्त्व आहे. श्रोते व मान्यवरांशी होणाऱ्या विविधांगी संवादातून त्याचे व्यक्तिमत्त्व आकारास येते.

प्रश्न 3.
रेडिओजॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढण्याची तुम्हाला जाणवणारी कारणे लिहा.
उत्तरः
आज प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडिओ स्टेशन्सच्या स्थापनेमुळे रेडिओ चॅनल हा उदयोग वाढत आहे. ऑल इंडिया रेडिओ, ए.एम., एफ.एम., जाहिरात एजन्सी, विशिष्ट प्रसंग, विशिष्ट कार्यक्रम, विविध मनोरंजन कंपन्या अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या अनेक संधी रेडिओजॉकीला उपलब्ध होत आहेत. रेडिओ स्टेशन्सच्या वाढलेल्या संख्येमुळे या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढत आहेत.

त्याचबरोबर विविध मनोरंजन कंपन्यांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वेगवेगळ्या जाहिरात एजन्सीत रेडिओजॉकीला नोकरीची संधी मिळते. आजकाल विविध प्रकारची उत्पादने, सेवा यांच्या जाहिरातीचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात जाहिरात होत असते. यातून रेडिओजॉकीला संधी मिळते.

विशिष्ट प्रसंगांत, आयोजित कार्यक्रमात तसेच ऑल इंडिया रेडिओत अनेक कार्यक्रमांतून रेडिओजॉकीला संधी उपलब्ध होत आहे. थोडक्यात आजच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे रेडिओजॉकीला अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 4.
रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तरः
रेडिओजॉकी अर्थात आरजेचे विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात. ए.एम., एफ.एम. या खाजगी रेडिओवरून श्रोत्यांची आवड, छंद ओळखून विविध स्वरूपाचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. विविध वयोगट, महिला, विविध क्षेत्र यांनुसार कार्यक्रमाचे स्वरूप व संहिता बदलत असते. एकाच प्रकारचे कार्यक्रम प्रसारीत झाले तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे व निरस वाटू लागतात. म्हणून त्यात वैविध्य आणून रंजकता वाढवली जाते.

रेडिओजॉकीचे कार्यक्रम महिलांची आवड-निवड, छंद यांचा विचार करून महिलांसाठी, तसेच युवकांची आवड, ध्येये, स्वप्न डोळ्यांसमोर ठेवन कार्यक्रम तयार केले जातात. शालेय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शेती व त्याच्याशी निगडित मलाखती. मार्गदर्शन. सल्ला यांचा कार्यक्रमात अंतर्भाव असतो.

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवाला खूप महत्त्व आहे. या सण-उत्सवाच्या निमित्ताने त्यांची माहिती, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आरजे सादर करत असतो. श्रोत्यांच्या आवडीचा आणि रंजनाचा विषय म्हणजे संगीत. त्याचे अनेक कार्यक्रम तो सादर करतो. विशेषतः सलग दोन-तीन तास बॉलीवुड हिट गाणी वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो. वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले जाते. त्यातून उद्बोधन होत असते.

श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे हा एक कार्यक्रम असतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात तसेच, श्रोत्यांची विविध कार्यक्रमांच्या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पत्राद्वारे व्यक्त होत असते. कधी कधी अचानक घडलेल्या घटनांवर कार्यक्रम असतो. उदा.

नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना इत्यादी. विज्ञानविषयक घडामोडी, त्यावर भाष्य करणाऱ्या बातम्या प्रसारित होतात. प्रासंगिक घडामोडी, चालू घडामोडी यांवर तसेच विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधणारे कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखतींद्वारे विविध विषयांवर प्रकाश टाकला जातो. थोडक्यात आरजेचे कार्यक्रम हे एकसूरी नसून त्यात विविधता असते.

प्रश्न 5.
‘उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
लेखन, वाचन, श्रवण, भाषण-संभाषण ही भाषेची कौशल्ये आहेत. कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. रेडिओजोंकी हा संवादी निवेदक, सत्रसंचालक असतो. उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावीच लागतात. भाषेची जाण असणे.

भाषाशैली, अरोह-अवरोह, उच्चारातील स्पष्टता, निसंदिग्धता असावी लागते. उत्तम भाषिक कौशल्य वाचन आणि व्यासंगाने प्राप्त होत असते. रेडिओजॉकीचे वाचन खूप असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजन अशा विविध विषयांची जाण व अभ्यास असावा. रेडिओजॉकीची भाषा साधी, सोपी, सरळ, ओघवती असावी तसेच त्यात मार्दव व माधुर्य असावे.

शब्दफेक, वाक्यांची रचना, सलगता, बोलण्याचा वेग, आत्मविश्वास, आवाजातील भारदस्तपणा या सर्व गोष्टी भाषेची कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच येऊ शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा अभ्यास, त्यातील बारकावे, भाव-भावना यांच्या अभ्यासाने भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत असते व त्यातूनच भाषिक कौशल्यांचा विकास होताना दिसतो. हे सर्व गुण रेडिओजॉकीत असावेत. त्यातूनच तो उत्तम रेडिओजॉकी होऊ शकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

रेडिओजॉकीला सलग दोन-तीन तास कार्यक्रमाचे सादरीकरण करावे लागते. वेगवेगळ्या विषयांची, प्रसंगांची, घडामोडींची माहिती देणे, श्रोत्यांशी अनौपचारिक-औपचारिक संवाद साधणे, मुलाखती, श्रोत्यांशी खेळ खेळणे या सर्व कार्यक्रमात रेडिओजॉकीची भाषा अतिशय ओघवती, प्रवाही, मिश्किल, सहजस्फूर्त अशी असावी. याचाच अर्थ असा की उत्तम भाषिक कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते या विधानात सत्यता आहे.

प्रश्न 6.
‘उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.’ स्पष्ट करा.
उत्तरः
ए.एम., एफ.एम. रेडिओवरून सलग दोन-तीन तास श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत विविध गाण्यांची मधून-मधून पेरणी करत श्रोत्यांच्या हृदयापर्यंत भिडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रेडिओजॉकी. रेडिओजॉकीकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. तो श्रोत्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतो.

वेगवेगळी कोडी, खेळ इ. माध्यमातून श्रोत्यांना बोलते करत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखतीतून विषय सविस्तरपणे श्रोत्यांसमोर मांडण्याचे कौशल्य रेडिओजॉकीत असते. प्रासंगिक घडामोडी, वाढदिवस, दिनविशेष अशा निमित्ताने मान्यवरांशी संवाद, मुलाखती, अनौपचारिक चर्चा यांतून त्याचे सुसंवादी व्यक्तिमत्त्व श्रोत्यांसमोर येत असते. समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा, विनोदीवृत्तीने कार्यक्रमाची रंजकता तो वाढवत असतो.

रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी असावे. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न, आत्मविश्वासू असते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान त्याला असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सांगीतिक, क्रीडा, अर्थ अशा विविध विषयांची सखोल माहिती रेडिओजॉकीला असावी. चालू घडामोडी, समाजाचा एखादया गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फॅशन, क्रीडा, बॉलीवुड, युवक-युवतींचा कल या सर्व बाबींचा सखोल अभ्यास असावा.

समाजात आजुबाजूला घडणाऱ्या बारीक-सारीक घटना, प्रसंग यांची माहिती असावी. सूक्ष्म निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता ही रेडिओजॉकीची खास वैशिष्ट्ये. थोडक्यात सुसंवाद, प्रवाही भाषा, शब्दफेक, कार्यक्रमाची सलगता टिकवणे, रंजन, सर्जनशीलता या गुणांच्या आधारे रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनत असते. हेच व्यक्तिमत्त्व यशस्वी व उत्तम रेडिओजॉकी म्हणून श्रोत्यांसमोर येते.

प्रकल्प.
रेडिओवरील आरजेचे काही कार्यक्रम ऐका. तुम्ही आरजे आहात, अशी कल्पना करून ‘युवकांसाठी करिअरच्या संधी’ या विषयावरील लाईव्ह कार्यक्रमासाठी संहिता तयार करा.

11th Marathi Book Answers Chapter 4.5 रेडिओजॉकी Additional Important Questions and Answers

कृती : १ आकलन कृती
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
अदययावतता’ हा शब्द उत्तर म्हणून येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
आकाशवाणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?

आधुनिक जीवनात संपर्क …………………………….. आपल्यासमोर आला आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११४)

प्रश्न 3.
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [ ]
उत्तरः
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [आकाशवाणी]

प्रश्न 4.
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [ ]
उत्तरः
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी]

उपयोजित कृती-१.

प्रश्न 1.
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 3
उत्तर :
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 5
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 6

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 7
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 8

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर :
आकाशवाणी हे अगदी सामान्यातल्या सामान्य घरात पोहोचलेले सुलभ माध्यम आहे. अतिशय शीघ्र गतीने घराघरात पोहोचलेले असे माध्यम शिवाय शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले माध्यम आहे. म्हणूनच आकाशवाणीच्या माध्यमातून दिलेली माहिती देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचते. आकाशवाणीचे हे गुण ओळखूनच भारत सरकारने १९२७ साली ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ या खाजगी कंपनीद्वारे भारतात मुंबई व कोलकाता येथे अधिकृत आकाशवाणी केंद्रे स्थापन केली.

अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा दूरदर्शन माध्यम घराघरात पोहचले नव्हते त्या काळात स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात पेटवत ठेवण्याचे मोठे कार्य आकाशवाणीच्या माध्यमातून झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींची भाषणे आकाशवाणीवरून प्रसारित होत असत. आज स्वातंत्र्यानंतरसुद्धा लोकोपयोगी सरकारी सामाजिक उपक्रमांची माहिती सातत्याने या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाते. आकाशवाणीवर विविध विषयांना वाहिलेले कार्यक्रम असतात.

त्यातून फक्त लोकांचे मनोरंजनच होते असे नाही तर अनेक उपयुक्त माहिती श्रोत्यांना पुरवली जाते. आज मोबाईलमध्ये आकाशवाणी व खाजगी रेडिओ वाहिन्या सहजपणे ऐकता येतात. अगदी ट्रेनच्या प्रवासात ते दूर शेतात डोंगरपाड्यावर रेडिओ ऐकता येतो. लोकांना सजग करण्याचे, त्यांना माहितीपूर्ण ज्ञान देण्याचे, सरकारी उपक्रम घराघरात पोचवण्याचे हे अत्यंत प्रभावी साधन आहे. सर्वांच्या हितासाठी व सर्वांच्या सुखासाठी वर्षानुवर्षे या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. म्हणूनच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

कृती : ३

प्रश्न 1.
खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

(अ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 10

(ब) चौकटीत योग्य माहिती भरा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 12

रेडिओजॉकीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू – व्यक्तिमत्त्व प्रसन्न ………………………………….. त्यांना हे क्षेत्र खुणावत आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११६)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 13
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 14

प्रश्न 3.
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी.
१. ……………………………..
२. ……………………………..
३. ……………………………..
उत्तरः
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी
१. भाषा
२. साहित्य
३. सांस्कृतिक घडामोडी

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 15
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 16

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

स्वमत:

प्रश्न 1.
रेडिओजॉकी ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे अतिशय प्रभावी, प्रवाही शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्त्वाला रेडिओजॉकी (आरजे) असे म्हणतात. रेडिओजॉकीला मराठीत ‘उद्घोषक’ असे म्हणतात. रेडिओजॉकी संगीत शैलीचा परिचय करून देत टॉक रेडिओ शोचे आयोजन करत असतो. मुलाखती घेणे, श्रोत्यांशी संवाद साधणे, हवामान, खेळ, बातम्या इ. संबंधीची माहिती देत असतो. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधत असतो. स्थानिक भाषा हिंदी, इंग्लिश या भाषांची सरमिसळ करून तो निवेदन करत असतो. सलग दोन-तीन तास श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो.

प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता साधत कार्यक्रम सुसूत्रपणे मांडण्याचे कसब रेडिओजॉकीकडे असते. सलग दोन-तीन तासांतील कार्यक्रमात वैविध्य आणण्यासाठी व त्यातील एकसुरीपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यात कोडी, स्पर्धा, श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे, संवाद, संगीत, दिनचर्या, वाढदिवस यांद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता रेडिओजॉकीत असते.

बॉलीवुड क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, गाणी ऐकवणे हे रेडिओजॉकीचे काम असते. थोडक्यात भाषेवर प्रचंड प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वास, निवेदनातील सहजता, व्यासंग यातून रेडिओजॉकी बहारदार सादरीकरण करत असतो. आरजे संग्राम, आरजे अपूर्वा, आरजे प्रसन्ना, आरजे काव्या अशी ओळख करून देत खाजगी रेडिओशी श्रोत्यांना जोडण्याचे काम रेडिओजॉकी करतो. अनेक खाजगी रेडिओ आरजेच्या नावावर ओळखल्या जातात.

रेडिओजॉकी प्रास्ताविकः

आजच्या काळात संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. यामध्ये मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य या माध्यमांद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे सुलभ झाले आहे. लिखित माध्यमात वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, हस्तपुस्तिका येतात. श्राव्य माध्यमात आकाशवाणी, दूरध्वनी, ध्वनीफिती इत्यादींचा समावेश होतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

तर दृकश्राव्य माध्यमात दूरचित्रवाणी, चित्रपट, ध्वनिचित्रफिती, संगणक, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे संप्रेषण, समाजप्रबोधन, मार्गदर्शन, ज्ञान, माहिती व मनोरंजन समाजापर्यंत पोहोचवले जाते. १९२७ मध्ये भारतात इंडियन ब्राडकस्टिंग कंपनीने मुंबई व कोलकाता या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू केले. १९३५ मध्ये म्हैसूर संस्थानने स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले.

पुढे भारत सरकारने हेच नाव स्वीकारले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रक्षेपित करत आहे. आकाशवाणी व खाजगी एफ.एम. मध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. खाजगी एफ.एम.मधील रेडिओजॉकी नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे.

रेडिओजॉकीची पार्श्वभूमी आणि संकल्पना :

१९२०-३० ते १९९३ पर्यंत रेडिओचा प्रवास आहे. २००१ पासून भारतात खाजगी एफ.एम.ची सुरुवात झाली. ‘रेडिओ सिटी बेंगलोर’ हे भारतातील पहिले खाजगी एफ.एम. रेडिओ स्टेशन होय. तर ‘द टाईम्स ग्रुपने ‘रेडिओ मिर्ची’ हे स्टेशन इंदौर येथे सुरू केले, महाराष्ट्रात खाजगी एफ.एम. २००२ मध्ये सुरू झाले. एफ.एम. रेडिओत ‘बॉलिवुड हिट’ मधील तरुणाईला आवडतील अशी गाणी वारंवार ऐकवून मध्ये मध्ये सूत्रसंचालन करणारा रेडिओजॉकी तरुणाईला आर्कषित करतो. रेडिओजॉकीची (आर.जे.) निवेदन शैली ओघवती असावी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असावे.

सलग दोन-तीन तास निवेदन करून श्रोत्यांशी संवाद साधून त्यांचे मनोरंजन करण्याची क्षमता आर.जे. कडे असते. यात तो संभाषण, चर्चा, वाढदिवस, दिनविशेष, कोडी, स्पर्धा यांचे आयोजन करून श्रोत्यांचे मनोरंजन करतो. थेट प्रक्षेपणाच्या विविध कार्यक्रमाबरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रेटिंशी संवाद साधून श्रोत्यांना अनोखी मेजवानी देत असतो.

रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप :

आजच्या काळात रेडिओ जॉकीच्या कामाचे स्वरूप प्रचंड आहे. एफ.एम., ए.एम. रेडिओजॉकी सार्वजनिक रेडिओ स्टेशनद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो. उपग्रह रेडिओजॉकीद्वारे एफ.एम.ए.एम. स्पष्ट माहिती व संगीत ऐकवू शकतो. स्पोर्टस टॉकद्वारे क्रीडा, बातम्या, माजी खेळाडू, क्रीडालेखक, निवेदक यांची माहिती देऊन श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. तसेच सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. थोडक्यात वरील सर्व विषयांवर माहिती देणारा व श्रोत्यांशी संवाद साधणारा रेडिओजॉकी आपणास खाजगी एफ.एम.द्वारे श्रोत्यांची मने जिंकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

रेडिओजॉकीचा आवाज, निवेदन, अभ्यास व व्यक्तिमत्त्वः

रेडिओजॉकीचा आवाज सुस्पष्ट व उत्तम असावा. आरोह-अवरोहाचे उत्तम ज्ञान असावे. भाषा सोपी, साधी व प्रवाही असावी. निवडलेली गाणी, किस्से यात सुसंगतता असावी. निवेदनात आनंद उत्साहीपणा असावा. तर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आवाजात कारुण्य असावे. रेडिओ जॉकीला सर्वच क्षेत्राचे उत्तम ज्ञान असावे. व्यासंग व चौफेर वाचनातून ते भान येते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजीचे ज्ञान असावे. भाषेवर प्रभुत्व हवे.

कार्यक्रमाची संहिता लेखन करता येणे अपेक्षित असते. व्यक्तिमत्त्व प्रसन्न, हरहुन्नरी असावे. हजरजबाबीपणा, बोलण्याची आवड असावी. उत्कृष्ट संवादकौशल्य व विनोदाची जाण असावी. सूक्ष्म निरीक्षण कौशल्यातून आजुबाजूच्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याकडे असावी. थोडक्यात रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व, बहुआयामी असावे की जेणेकरून त्यातून उत्तम व प्रभावी सूत्रसंचालन त्याला करता येऊ शकेल.

रेडिओजॉकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप व क्षेत्रे:

रेडिओजॉकीचे कार्यक्रम विविध स्वरूपाचे असतात. समाजातील विविध क्षेत्रांतील सर्व घटकांसाठी ए.एम. व एफ.एम. वरून कार्यक्रम सादर होत असतात. त्यात प्रासंगिक घडामोडी, मुलाखती, वैज्ञानिक, युवक, महिला, शालेय, कृषी, सण-उत्सव, संगीत, परिसंवाद, श्रोत्यांची पत्रे व अचानक घडलेल्या घटना अशा विविध विषयांवर कार्यक्रमाचे प्रसारण होत असते. त्यामुळे रेडिओजॉकींना नोकरी व व्यवसायाची ही उत्तम संधी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

विविध मनोरंजन कंपन्या, जाहिरात एजन्सी, विशेष कार्यक्रम, विशिष्ट प्रसंग, ऑल इंडिया रेडिओ, ए.एम, एफ.एम. चॅनल इत्यादी क्षेत्रांत करिअरची उत्तम संधी मिळू शकते. त्यासाठी त्याच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य, वाचन, व्यासंग, स्पष्ट उच्चार, सर्जनशीलता, बहुश्रुतता, समयसूचकता, निरीक्षणक्षमता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे असावे. आपल्यातील क्षमता आणि कौशल्याचा विकास साधल्यास उत्तम आरजे बनण्याची संधी आहे व त्यातून युवक-युवतींसाठी उत्तम करिअरचा मार्ग मिळू शकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

11th Marathi Digest Chapter 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा.
उत्तरः
अनुदिनी किंवा ब्लॉग हे एक सामाजिक माध्यम आहे. विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले ‘संकेतस्थळ’ म्हणजे ‘ब्लॉग’. आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून अनुदिनी लेखन करता येते. अनुदिनी लेखन हे सामाजिक संपर्कस्थळ असल्याने त्यावर प्रसिद्ध होणारी माहिती अनेक वाचकांना उपयुक्त ठरू शकते. ‘अनुदिनी’चा उदय होण्यापूर्वी ‘डायरी लेखन’ केले जात होते. व्यक्ती त्याच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडींची नोंद त्या डायरीत करून ठेवत असे. ही डायरी त्याची त्याच्यापुरती खाजगी होती.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

एक प्रकारे ती ‘स्व-अभिव्यक्ती’ होती. अशा लिहिलेल्या काही डायऱ्या नंतरच्या काळात सामाजिक-ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. उदा. अॅन फ्रँक हिची डायरी, लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली ‘स्मृतिचित्रे’ ही डायरी. त्यामुळे आज डायरी लेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वी हे लिखाण अनेकांपर्यंत जात नव्हते. परंतु आज ते अनेकांपर्यंत जावे, माहितीची विचारांची देवाण-घेवाण व्हावी, संवादाचे पूल बांधले जावेत, क्रिया-प्रतिक्रियांमधून विचारांचे कंगोरे समोर यावेत अशा अनेक कारणांमळे ‘अनदिनी’ची गरज निर्माण झाली आहे.

स्वविचार-स्वभावना यांना शिस्त आणि स्वातंत्र्याची जोड देऊन अभिव्यक्त होण्यासाठी ‘अनुदिनी’ हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे एखादया कार्यक्रमाची माहिती, एखादे छायाचित्र, चित्रफिती, पाककृती, प्रवासवर्णन, राजकीय मत मतांतरे अशा अनेक गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवता येतात. याचा लाभ ती अनुदिनी वाचणाऱ्यांना होतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विचारांची देवाण-घेवाण होते. म्हणूनच अनुदिनी वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रश्न 2.
अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तरः
अनुदिनी लेखनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक अनुदिनी लेखन आणि वाचन यांचा उपयोग स्वजाणिवा विकसित करण्यासाठी करतात. वैयक्तिक अनभवाच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेल्या ‘अनदिनी’ने आपले कार्यक्षेत्र हळहळ विस्तारले आहे. व्यक्तिगत भावनांपास थेट निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा व्यक्ती-व्यक्तीतील हितगुज सार्वत्रिक करण्यापासून ते वस्तूची जाहिरात व विक्री करण्यापर्यंत ब्लॉगला कोणतेही क्षेत्र वर्ण्य नाही. ब्लॉगची क्षेत्रे ही खालील प्रमाणे आहेत.

  1. वैयक्तिक : यात व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी, आपले आवडते संगीत, नृत्य, एखादी सहल अशा अनेक बाबींवर व्यक्तिगत पातळीवरील विचार व्यक्त करते.
  2. सामाजिक : यात व्यक्ती सभोवताली घडणाऱ्या सामाजिक घटनांबाबत संवेदनशील असते. त्यावर आपले बरे-वाईट, सकारात्मक नकारात्मक विचार तिला व्यक्त करावेसे वाटतात. त्यातून मग साद-प्रतिसादाची वैचारिक साखळी तयार होते. विषयाचे विविध कंगोरे समोर येतात.
  3. व्यावसायिक : व्यवसायवृद्धी हे देखील ‘ब्लॉग’ निर्माण करण्याचे महत्त्वाचे कारण आहे. यात एखादे उत्पादन, त्याची वैशिष्ट्ये, एखादी सेवा, त्याविषयीच्या आर्थिक बाबी इत्यादींची माहिती दिली जाते.
  4. वाङ्मयीन : यामध्ये साहित्य आणि साहित्यातील विविध प्रवाह यांच्यावर लेखन होते. समीक्षात्मक लेखन ते थेट एखादे ललित . वाङ्मय असा हा प्रवास असू शकतो. काही वाङ्मयीन ब्लॉग एखादया लेखकाला वाहिलेला असतो. त्या लेखकाच्या साहित्याची चर्चा, ओळख तिथे नियमित करून दिली जाते. उदा. पु.ल. देशपांडे यांच्या नावाचा उपलब्ध असलेला ब्लॉग.
  5. सामूहिक : यात दोन-तीन व्यक्ती एकत्रितपणे लेखन करतात.
  6. पर्यटन : पर्यटन विषयाला वाहिलेले लेखन-यावर माहिती, पर्यटनस्थळे, चित्र, तिथले अनुभव यांची माहिती दिली जाते.
  7. शैक्षणिक : अनेक शैक्षणिक संस्थांचे स्वत:चे ब्लॉग आहेत. त्यावर शिक्षण विषयक घडामोडींची माहिती दिली जाते.
  8. राजकीय : यात राजकीय व्यक्ती स्वत:चे ब्लॉग निर्माण करून स्वत:च्या राजकीय-सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात.
    उदा. I support Narendra Modi नावाचा ब्लॉग सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची माहिती देत असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 3.
चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
ब्लॉग / अनुदिनी लिहिणाऱ्यांची संख्या मुबलक आहे. त्याद्वारे मनात येणारे विचार मुक्तपणे मांडले जातात. या लेखनाचे क्षेत्र जरी व्यापक असले तरी प्रत्येकाच्या आवडीचे क्षेत्र, प्राविण्याचे क्षेत्र भिन्न असते. ब्लॉग सुरू करताना जे विषय आवडतात, ज्या विषयांवर प्रभुत्व आहे अशा विषयांना प्राधान्य देणे योग्य ठरेल. हे लेखन करताना खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • आकर्षक शीर्षक
  • आकर्षक विषय मांडणी
  • छोटी, सुटसुटीत, सोपी आणि आकलनसुलभ वाक्यरचना
  • परिच्छेदांची समर्पक मांडणी.
  • एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहजशैली
  • रिकाम्या जागेचा योग्य वापर.
  • वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली
  • संवादात्मकता
  • दृक-श्राव्य किंवा श्राव्य फीतींची लिंक
  • शब्द मर्यादेचे पालन, विषयातील अद्ययावतता / आधुनिकता

प्रश्न 4.
तुम्हांला उपलब्ध असलेली अनुदिनी वाचून त्यासंबंधीच्या तुमच्या प्रतिक्रिया स्पष्ट करा.
उत्तरः
सध्याच्या इंटरनेटच्या युगात ब्लॉगचे महत्त्व फारच वाढले आहे. असंख्य लोक आता मराठीतून ब्लॉग लिहू लागले आहेत. त्यातील काही ब्लॉग खरंच दर्जेदार असतात तर काही सुमार दर्जाचे. प्रत्येक वेळेला ब्लॉगचा URL टाकून त्या ब्लॉगवर जाणे, नवीन काही पोस्ट झाले आहे का हे पाहणे फारच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ब्लॉग लिस्ट नावाच्या संकेतस्थळाला भेट हे खूपच सोयीचे आहे. वेगवेगळे ब्लॉग यावर जोडलेले आहेत.

प्रत्येकाची ताजी पोस्ट त्या ब्लॉगच्या नावावरच झळकत राहते त्यामुळे काय वाचावे हे लगेच ठरवता येते. ‘अक्षरगंध मनातले काही तरंग’, ‘लेखन प्रपंच’, ‘आनंदयात्रीचा ब्लॉग’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘सहयाद्री बाणा’, ‘माझी वाङ्मय शेती’, ‘माझे ट्रेक अनुभव’ अशा अनेक ब्लॉगला एकाच ठिकाणी भेट देऊन सगळ्या ब्लॉगच्या ताज्या पोस्ट एकाच ठिकाणी वाचता येतात. यात गंगाधर मुटे हे ‘माझी वाङ्मय शेती’ या ब्लॉगमध्ये अभंगरचनेच्या आधारे शेतकरी जीवनावर काव्य रचना करतात ते वाचनीय असते. पु.ल. प्रेम नावाचा ब्लॉग मला खूप आवडतो.

याचा पत्ता आहे pulaprem.blogspot.com या ब्लॉगवर पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकांतील व्यक्तिरेखा आहेत. शिवाय पु.लं.ची इतर पुस्तके, त्यांची भाषणे, पत्रे हे सगळे वाचायला मिळते. याशिवाय पु.लं.च्या पत्नी सुनीताताई देशपांडे यांचे लेखन वाचण्यास उपलब्ध आहे. शिवाय इतरांनी पुलंवर लिहिलेले लेखन उपलब्ध आहे. पु.लं.च्या काही कविता, विनोदी किस्से वाचायला मिळतात. समग्र पु.लं. अनुभवण्यासाठी हा एक उत्तम ब्लॉग आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 5.
तुमची स्वत:ची अनुदिनी तयार करताना ती परिपूर्ण व आकर्षक होण्यासाठी पाळावयाची पथ्ये लिहा.
उत्तरः
ब्लॉग तयार करणे सोपं आहे. पण दर्जेदार ब्लॉग लेखन करणं ही कठीण बाब आहे. स्वत:ची अनुदिनी तयार करताना या अनुदिनीद्वारे आपण लोकांसमोर काय मांडणार आहोत याचा पक्का विचार प्रथम करणे गरजेचे आहे. अनुदिनीसाठी एखादे आकर्षक शीर्षक तयार करावे लागेल. जो विषय आपण अनुदिनीसाठी निवडला आहे त्या विषयाचे आपल्याला सखोल व्यवस्थित ज्ञान आहे का याची चाचपणी केली पाहिजे. एखादया विषयावर लेखन करताना भाषा आकर्षक-सुटसुटीत हवी. तशीच ती समजण्यास सोपी हवी. योग्य ठिकाणी परिच्छेदांची निर्मिती करणे गरजेचे आहे.

एका परिच्छेदाचा दुसऱ्या परिच्छेदाशी सहज संबंध जुळला जाईल असे लेखन हवे. जिथे रिकामी जागा आहे त्याचा समर्पक वापर करणे आवश्यक आहे. वाचकांना पुढेपुढे वाचत जावेसे वाटेल अशी लेखन शैली हवी. यात जर संवादात्मकता असेल तर अधिक उत्तम. आपण एका समूहाशी बोलतो आहोत असा भाषेचा बाज हवा. विविध चित्रे, दृक-श्राव्य फिती, श्राव्य फीती यांची लिंक दिली तर लेखन अधिक आशयघन होते. नवीन नवीन विषय सतत लोकांसमोर मांडता आले पाहिजेत. शब्दमर्यादेचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे ठरते. त्यामुळे या सगळ्या बाबी विचारात घेऊन ब्लॉग लेखन केले तर ते परिपूर्णतेकडे जाऊ शकते.

प्रश्न 6.
खालील विषयांवर ब्लॉग लिहा.

(अ) महाविद्यालयातील पहिला दिवस
उत्तरः
शाळा संपून महाविदयालयीन जीवनात प्रवेश करणे म्हणजे जणू एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाण्यासारखे असते. कानी कपाळी ‘आता तुम्ही मोठे झालात, जबाबदारीने वागा’ अशा सूचना मिळत असतात. बालपण संपल्याची हूरहूर तर तारुण्याची चाहूल लागण्याची उत्सुकता अशा संमिश्र भावनेने मन भरून गेलेले असते. माझ्याही मनाची अशीच अवस्था असताना मी महाविदयालयात प्रवेश केला.

सुदैवाने दहावीत गुण चांगले मिळाले असल्याने मनासारखे महाविदयालय मिळाले होते. गणवेशाची कटकट नसल्याने छानपैकी मॉर्डन स्टाईलची जीन्स आणि टी-शर्ट घालून महाविदयालयात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकाने अडवले. अजून ओळखपत्र नसल्याने रिसिट दाखवून प्रवेश केला. विस्तीर्ण पसरलेली महाविदयालयाची इमारत बघून मन दडपून गेलं. त्याभोवती छान हिरवळ असलेला बगीचा होता.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

फुलांचे ताटवे डोलत होते. फुलांसारखीच गोड मुले-मुली गप्पा मारत इकडे-तिकडे बागडत होते. मी कोणालाच ओळखत नव्हतो. त्यामुळे ते सर्व रमणीय दृश्य मनात साठवतच इमारतीच्या आत शिरलो. माझी रिसिट पाहून तिथल्या एका शिक्षिकेने मला माझा वर्ग दाखवला. मी मुकाट वर्गात जाऊन बसलो. वर्ग भरलेला होता. मग एकेक शिक्षक येत गेले. प्राचार्य आले. त्यांनी महाविदयालयाची माहिती दिली. नियम समजावून दिले आणि वर्ग सोडून दिला. दोनचार मुला-मुलींशी बोलून मैत्री केली. पण एकूणच पहिला दिवस प्रसन्न गेला. तीच प्रसन्नता घेऊन मी घरी गेलो.

(आ) फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक
उत्तरः
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ‘फेसबुक’चे मुख्यालय आहे. फेसबुकचा संस्थापक आहे मार्क झुकरबर्ग. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळ आहे. संपर्कक्रांती घडवून आणणाऱ्या या सोशल मिडियाने आज जगभरातील बहुतांश नागरिकांचे जीवन व्यापून टाकले आहे.

भारतासारख्या देशात तर या नव समाजमाध्यमांचा पगडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र त्यामुळे व्यक्ती संकुचित बनत चालल्या आहेत का? माणूस माणसापासून दुरावतो आहे का? या आभासी दुनियेतील मैत्री खऱ्या जीवनात कितपत उपयुक्त ठरते या सर्वांचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे.

फेसबुक, वॉट्सअपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे. फेसबुकवर मित्र जमवणे, त्यांची संख्या वाढवत नेणे हे आता व्यसन बनले आहे. एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्याला किती लाईक्स मिळतात यावर बऱ्याच जणांच्या आनंदाचं गणित ठरत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार सोशल मिडीयाचा वापर केल्यामुळे नैराश्य येते असे पाचपैकी एक व्यक्ती सांगते.

३० वर्षांहून कमी वयोगटाच्या लोकांत तर सोशल मिडिया महत्त्वाचा घटक बनला आहे. फेसबुकवर भरमसाठ मित्र मैत्रिणी असणारे अनेकजण प्रत्यक्ष जीवनात एकटेच असतात हे सत्य आहे. इतकेच नव्हे तर इतरांशी संवाद साधण्यासही ते असमर्थ असल्याचे दिसून येते. स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सतत पाहात राहणे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे अपडेट सोशल मिडियावर टाकत राहणे या सवयींनी तरुण वर्ग ग्रासून गेला आहे.

इतके या सगळ्याच्या अधीन जाणे ही भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे चिंता, एकटेपणा, आत्मविश्वासाची कमतरता यांचे वास्तव जीवनात प्रमाण वाढताना दिसत आहे.

ऑनलाईन विश्वात मनुष्य आपल्या आयुष्याचे एक चित्र रंगवतो जे वास्तवात असतेच असे नाही. त्यामुळे स्वत:विषयी उगाच अपेक्षा वाढतात. त्यामुळे मग या दुनियेतील मित्र-मैत्रिणींनी आपल्या पोस्टला कमी लाईक्स दिले तर तरुण पिढीतील न्यूनगंड वाढीस लागताना दिसतो आहे. म्हणूनच खऱ्या जीवनातील जीवाला जीव देणारे सच्चे मित्र असणे हीच खरी श्रीमंती आहे. मग ते एक-दोन का असेनात. म्हणून फेसबुकवरील मैत्री अनावश्यक वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

11th Marathi Book Answers Chapter 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Additional Important Questions and Answers

कृती : १
खालील कृती स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अनुदिनी लेखनासाठी पाळायची पथ्ये लिहा.
उत्तरः
अनुदिनी लेखन हे एक प्रभावी सामाजिक माध्यम आहे. याचे लेखन हे गंमत म्हणून नव्हे तर गांभीर्याने करायचे लेखन आहे. कारण याचे समाजमनात, जीवनात दूरगामी पडसाद उमटत असतात. अनुदिनी लेखन जेव्हा अभ्यासपूर्ण असते तेव्हा त्याला सामाजिक-सांस्कृतिक राजकीय-ऐतिहासिक मोल असते. या लेखनात मर्यादित शब्दांत ‘उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन’ अपेक्षित आहे. या लेखनाला विचार आणि संशोधनाची जोड दिली की हे लेखन उत्कृष्टतेकडे जाते. उत्तम ‘ब्लॉग’ लिहिणाऱ्या ‘ब्लॉगर्स’चे अनेक वाचक असतात. हे वाचक त्यांच्या संपर्क माध्यमातून ब्लॉगर्सशी चर्चा करतात.

मात्र अनुदिनी लेखन करताना काही पथ्ये पाळणे गरजेचे असते. ती पथ्ये खालीलप्रमाणे :

  • अनुदिनी लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे आवश्यक आहे.
  • अनुदिनी लेखन अविवेकी असता कामा नये. लेखनविषयक शिस्त, समाजभान याची जाणीव सतत डोक्यात ठेवणे गरजेचे असते.
  • अनुदिनी लेखन प्रसिद्ध झाल्यावर त्यावरील प्रतिक्रिया उलटसुलट असू शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
  • अनुदिनी लेखनात सामाजिक स्वास्थ्य, शांतता थोडक्यात येईल असे विचार मांडता कामा नयेत.
  • अनुदिनी लेखनात मिळालेले स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कृती : २ आकलन कृती

प्रश्न 1.
खालील परिच्छेद वाचून सुचनेनुसार कृती करा.
(अ) मायक्रोब्लॉगिंगचे फायदे – [ ]
(आ) कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग निर्माण करण्याचा उद्देश – [ ]
(इ) गट ब्लॉगची व्याख्या – [ ]
(ई) विषयानुसार ब्लॉगचे काही विषय – १. ………….. २. ………….. ३. ………….. ४. …………..
उत्तरः
(अ) मायक्रोब्लॉगिंगमुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते.
(आ) आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अदययावत माहिती पोहोचवण्यासाठी कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग निर्माण करतात.
(इ) जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला गट ब्लॉग म्हणतात.
(ई) विषयानुसार ब्लॉगचे विषय
(a) प्रवास
(b) आरोग्य
(c) बागकाम
(d) फोटोग्राफी

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

वैयक्तिक ब्लॉग- एखादी व्यक्ती स्वत:च्या ब्लॉगवर …………………………………. मजकूर प्रसिद्ध केला जातो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११०, १११)

प्रश्न 2.
अनुदिनीचे प्रकार –
a. ………………
b. ………………
c. ……………..
d. ………………
e. ………………
f. ………………
उत्तरः
a. वैयक्तिक ब्लॉग
b. सहयोगी/गट ब्लॉग
c. मायक्रोब्लॉगिंग
d. कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग
e. एकत्रित ब्लॉग
f. विषयानुसार ब्लॉग

प्रश्न 3.
ब्लॉग आकर्षक करण्यासाठी याचा वापर करता येतो.
(a) ……………………………..
(b) ……………………………..
(c) ……………………………..
उत्तरः
(a) चित्र
(b) ध्वनिफित
(c) चित्रफित

स्वाध्याय कृती :

प्रश्न 1.
‘अनुदिनीच्या माध्यमातून स्वतःची नाममुद्रा महाजालावर उमटविण्याची संधी प्रत्येकाला मिळते’ या मताची पुष्टी करा.
उत्तरः
अनुदिनीचा उदय होण्यापूर्वी डायरी लेखन केले जात होते. व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाचा तपशील डायरीत नोंदवून ठेवत असत. पण ही डायरी खाजगी लेखन होते. काही डायऱ्या मात्र इतिहासात-साहित्यात अजरामर झाल्या. उदा. अना फ्रँकची डायरी यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मरणयातना भोगणाऱ्या, नाझी नरसंहाराचा सामना करणाऱ्या ज्यू समाजाचे चित्रण येते. मराठीत लक्ष्मीबाई टिळक यांची डायरी ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्या काळातील समाजजीवन विशेषतः स्त्री-जीवनाचे सविस्तर वर्णन त्यात येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

आज डायरी लेखन ‘अनुदिनी’च्या माध्यमातून केले तर ती खाजगी बाब राहत नाही. महाजालावर आपली अनुदिनी अनेकांकडून वाचली जाते.

पण लिहिलेल्या लेखनावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतात. या सर्वांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या लेखणीत असणे गरजेचे आहे. तुमचे विचार जितके स्वच्छ, अभ्यासपूर्ण, रंजक असतील, तुमची शैली जितकी आकर्षक ओघवती असेल, तुमचे लेखन माहितीपर, ज्ञानवर्धक, समाजउपयोगी असेल तितका ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आपली बुद्धिमत्ता, व्यासंग, वैचारिक क्षमता यांचा कस लागला जातो.

या आव्हानांना जो पुरून उरतो त्याची नाममुद्रा महाजालावर उमटतो. मग ती व्यक्ती कुठल्याही प्रांताची, धर्माची का असेना. त्याच्या लेखनाची सुजाण वाचकांकडून दखल घेतली जाते.

सरावासाठी ब्लॉग लेखनाचे नमुने.

प्रश्न 2.
निसर्गरम्य परिसराला भेट दिल्याचा अनुभव.
उत्तरः
अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुका म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच! प्रत्येक ऋतूत इथला निसर्ग पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. पावसाळ्यापूर्वीचा काजवा महोत्सव, पावसाळ्यातील रानफुलांचे सौंदर्य, खळाळणारे लहान मोठे झरे व उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सारेच काही भुरळ पाडणारे. पर्यटकांना मोहिनी घालणारी गर्द हिरवाई, आसमंतात पसरलेले धुके, थंडगार शहारे आणणारा वारा व बरसणाऱ्या पावसाच्या रिमझिम वा जोरदार धारा याचा वेगळाच आनंद प्रत्येकाला होतो.

या परिसरात खूप काही बघण्यासारखे आहे. रंधा धबधबा, भंडारदरा धरण, कळसूबाईचे शिखर, हरिश्चंद्रगडचा परिसर, रतनगड, अमृतेश्वराचे मंदिर, साम्रद जवळील सांदणदरी व नेकलेस आकाराचा धबधबा सारं काही अपूर्व. रिमझिमणाऱ्या पावसात निसर्गाच्या सहवासातील आनंदी अनुभव देणारा हा परिसर.

इथले प्रत्येक ठिकाण एखादा स्वतंत्र दिवस राखून ठेवून पाहण्यासारखा आहे. मुक्काम व भोजनाची व्यवस्था अनेक ठिकाणी उपलब्ध आहे माहिती जालावर कोठून कसे जावयाचे याबाबतची सर्व माहिती आहे. एकदा येऊन अनुभवण्यासारखा इथला निसर्ग नक्कीच आहे. जवळचे रेल्वे स्टेशन-इगतपुरी, नाशिक आहे. महामंडळाची बससेवा अनेक ठिकाणाहून उपलब्ध आहे.

प्रश्न 3.
माझा आवडता महिना – श्रावण.
उत्तरः
श्रावण हा मराठी कालगणनेनुसार पाचवा महिना. इंग्रजी कॅलेंडर वर्षात साधारणत: जुलै – ऑगस्ट मध्ये हा महिना येतो. ज्येष्ठ – आषाढातील धुवांधार पावसाचा वर्षाव संपून श्रावण सरींना प्रारंभ होतो. बालकवी म्हणतात त्याप्रमाणे ‘श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते, सरसर हिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ चा साक्षात्कार घडविणारा असा हा महिना. श्रावणातील धरणी मातेचे रूप, आकाशातील इंद्रधनूचे सौंदर्य, मराठी संस्कृतीतील महत्त्वाचे सण, व्रतवैकल्यांचे पुण्य अशा अनेक दृष्टीने एक चैतन्य निर्माण होते. घरात व घराबाहेर सारेच काही भान हरपून टाकणारे.

श्रावणात धरणीमाता हिरवा शालू नेसून अन्नब्रम्हाच्या पुजेस बसल्यासारखी भासते. सूर्य व ढगांमधील लपाछपी रंगात येते. ऊन – पावसाचा अनोखा खेळ सुरू होतो. सप्तरंगी इंद्रधनुचे तोरण आकाशाला आगळी शोभा आणते.

श्रावणात मराठी संस्कृतीतले सर्वच महत्त्वाचे सण, व्रते येतात. श्रावणी सोमवार, बैलपोळा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, घराघरात चालणारे धार्मिक ग्रंथांचे पठण यातून भाव-भक्तीचा एक वेगळाच दरवळ सर्वत्र जाणवतो. आबाल-वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात आनंदाची अनुभूती निर्माण करणारा असा हा श्रावण, मला खूपच आवडतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 4.
वसुंधरेचे हिरवेपण जपूया.
उत्तरः
आपली वसुंधरा, तिचे हिरवेपण टिकवणे हे केवळ आपल्याच हातात आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वच्छ, सुंदर पर्यावरण राखणे, पर्यावरणीय बांधिलकीची जाण सदैव मनात ठेवणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वात मोठी भूमिका ही जंगलांची आहे. जंगले, झाडे, झुडपे वाढली पाहिजेत. त्यासाठी वृक्ष / झाडे लावली पाहिजेत. ‘झाडे लावूया, झाडे जगवूया’ ची मोहीम त्यासाठी आवश्यक आहे. झाडांचे योग्यप्रकारे संवर्धन आज आपण केले नाही तर उदयाची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोडीमुळे हवामानात बदल होत आहेत. जागतिक तापमानात वाढ, पर्जन्याचे दिवसेंदिवस घटत चाललेले प्रमाण, दुष्काळाचे संकट, शुद्ध हवेची कमतरता या समस्या निर्माण झाल्या आहेत.

वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी उघड्या डोंगरांवर, ओसाड माळरानांवर देशी झाडांच्या बिया भरपूर उधळल्या पाहिजेत. घनदाट अशा झाडांसाठी कवयित्रीने सुचविलेला उपाय हिरवेपणासाठी खूपच आवश्यक असा आहे. वृक्षारोपणास चालना मिळावी म्हणून वाढदिवस, हळदीकुंकू समारंभ इत्यादींमध्ये रोपे वाटून वृक्षारोपण उपक्रम राबविता येईल.

प्रत्येक शाळेने ‘एक मूल एक झाड’ सारखी दत्तक योजना स्वीकारून त्याची अमंलबजावणी योग्य प्रकारे केल्यास प्रत्येक गाव, परिसरात निश्चितच झाडांची संख्या वाढे वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्वांनी केले पाहिजे. ‘वसुंधरा वाचवा, तगवा आणि टिकवा’ मोहिमेतूनच वसुंधरेचे हिरवेपण अबाधित राहिल.

प्रश्न 5.
संगणकाच्या युगात देखील तुमच्या रोजच्या जीवनात असलेले वृत्तपत्रांचे महत्त्व.
उत्तरः
वत्तपत्र हे जगातल्या. देशातल्या, आजबाजच्या परिसरातील महत्त्वपूर्ण बातम्या, घटना आपल्यापर्यंत पोहचवत असतात. वास्तविक ही जबाबदारी दूरदर्शनवरील इतर वृत्तवाहिन्याही तत्परतेने पार पाडतात. पण बातमीकडे, घटनेकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे याचा अत्यंत संयमित दृष्टिकोन हा वृत्तपत्रांच्या वाचनानेच आपल्याला मिळतो. वाहिन्यांवर फक्त माहिती मिळते. वृत्तपत्र माहितीबरोबर ज्ञानदानाचे कार्यही करतात.

वृत्तपत्र ही माहिती, ज्ञान, मनोरंजन, प्रबोधन अशा विविध विषयांना स्पर्श करतात. प्रत्येकाला आपल्या आवडीचा विषय त्यामुळे समजून घेण्यास मदत होते. वृत्तपत्रात जे संपादकीय लेख असतात ते अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले असतात. त्यासाठी संपादकाने खात्रीपूर्वक ज्ञानस्त्रोत वापरलेले असतात. या लेखांना वाचून आपले वैचारिक अधिष्ठान पक्के होते. सामाजिक घटनांकडे बघण्याची विश्लेषणात्मक दृष्टी विकसित होते. वृत्तपत्रात हलकेफुलके लेख असतात.

व्यक्तिचित्रणात्मक लेख असतात. प्रासंगिक लेख असतात. कधी दुःखद घटनांची माहिती असते. त्यामागची कारणमीमांसा दिलेली असते. हे सर्व वाचून आपली वैचारिकता संपन्न होते. म्हणूनच कितीही बातम्या दूरदर्शनवर बघितल्या तरी लिखित स्वरूपातल्या वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधित आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनी (ब्लॉग) लेखन प्रास्ताविक – संकल्पना व स्वरूप :

ट्विटर, इन्स्टाग्राम सारखेच ‘अनुदिनी’ हे सामाजिक माध्यम आहे. इंग्रजीत त्याला ‘ब्लॉग’ असे म्हणतात. आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले संकेतस्थळ म्हणजे ‘ब्लॉग’ होय.

अनुदिनी सारखाच प्रकार पूर्वी साहित्यात होता. त्याला ‘डायरी लेखन’ या नावाने ओळखले जायचे. आज अनुदिनीच्या माध्यमातून स्वत:चे विचार, एखादया कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र, छायाचित्र, चित्रफीत, श्राव्यफीत यांसारख्या गोष्टी अनुदिनीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतात.

अनुदिनी (ब्लॉग) लेखन अनुदिनीचा इतिहास :

जस्टीन हॉल याने १९९४ मध्ये links.net ही वेबडायरी सुरू केली. आज तिने जनसामान्यांच्या मनाची पकड घेतली आहे.

अनुदिनीची क्षेत्रे :
अनुदिनीचे क्षेत्र व्यापक आहे. वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, वाङ्मयीन, सामूहिक, पर्यटन, शैक्षणिक, राजकीय इ. विविध क्षेत्रांत ‘अनुदिनीचा वापर’ केला जातो.

अनुदिनी लिहिण्यामागची कारणे :
प्रत्येक माणसाला आपले विचार, कल्पना, आपली मानसिक-भावनिक आंदोलने अस्वस्थ करत असतात. हे विचार व्यक्त करण्यासाठी अनुदिनी हे प्रभावी साधन/माध्यम आहे. थोडक्यात स्वत:मधील सर्जनशीलता वाढविणे, अनेकांशी संवाद साधणे, व्यक्तिगत अनुभव सार्वत्रिक करणे, भाषिक कौशल्य सुधारणे, आपले लेखन-विचार-संशोधन यांची सांगड घालणे इत्यादी अनेक कारणांसाठी अनुदिनी लेखन केले जाते.

अनुदिनी विषय निवड :
प्रत्येकाचे आवडीचे विषय भिन्न असतात. ज्या विषयात स्वत:ला गती आहे. त्या विषयाला प्रथम प्राधान्य दयावे. हळूहळू विषयाचा आवाका वाढवत न्यावा. त्यात अधिक सखोलता निर्माण करावी. सरावाने हे हळूहळू जमू लागते.

चांगल्या अनुदिनीची लक्षणे :
आकर्षक विषय, छोटी वाक्ये, सुटसुटीत वाक्यरचना, परिच्छेदांची योग्य रचना, संवादात्मक आणि वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली. विविध दृक-श्राव्य, श्राव्य फिती, चित्रे यांचा वापर. योग्य शब्दमर्यादा, नवीन नवीन विषयांची मांडणी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनीचे प्रकार :

  • वैयक्तिक ब्लॉग : ज्यात व्यक्ती आवडीनुसार लेखन करते.
  • गट ब्लॉग/सहयोगी ब्लॉग : अनेक वेब ब्लॉगर्स एकाच वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात.
  • मायक्रोब्लॉगिंग : वेळ आणि श्रम यांची बचत करण्याकरता याचा वापर केला जातो.
  • कॉर्पोरेट आणि संख्यात्मक ब्लॉग : कर्मचाऱ्यांपर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • एकत्रित ब्लॉग : व्यक्ती किंवा संस्था विशिष्ट हेतूने एकत्र येऊन ब्लॉग निर्माण करतात.
  • विषयानुसार ब्लॉग : यात एखादा विषय धरून मजकूर प्रसिद्ध केला जातो. उदा. आरोग्य, फोटोग्राफी, पर्यटन, बागकाम इ.

अनुदिनी लेखनाचे महत्त्वाचे घटक :

  • ब्लॉग : महाजालावरील नोंद वही.
  • ब्लॉगर : मजकूर लिहिणारी व्यक्ती.
  • ब्लॉगिंग : मजकूर लिहिण्याची प्रक्रिया.
  • ब्लॉगोस्पिअर : ब्लॉग वाचणारा वाचक.
  • ब्लॉग टूल्स : ब्लॉग तयार करण्याची साधने.
  • ब्लॉग पोस्ट : ब्लॉगवरील लिखित नोंद.

अनुदिनी तयार करणे :
www.blogger.com या संकेतस्थळावर ब्लॉग उघडता येतो.

ब्लॉग लेखनाचे महत्त्वाचे घटक :
Post – मजकूर प्रसिद्ध करणे, Status – जगभरातून ब्लॉगला भेट दिलेल्यांची संख्या कळते, Comments – प्रतिक्रिया कळतात, Earning

जाहिराती प्रसिद्ध करून उत्पन्न मिळते, Pages – नवीन पेज जोडून प्रकाशित करण्याची सोय, Layout – रचना ठरवता येते. याशिवाय Theme, Setting, Google drive इ. घटकांचा वापर करून ब्लॉग अधिक आकर्षक करता येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनी लेखन करताना पाळायची पथ्येः

लेखन तारतम्याने लिहावे, भाषा सौम्य असावी, कोणाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक धोरणांवर टीका करणारा मजकूर नसावा. विध्वंसक विचार मांडू नयेत. लिहून झाल्यावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी. लेखनाची शिस्त पाळावी. आपले लेखन स्वैराचाराकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.2 ध्यानीमनी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

11th Marathi Digest Chapter 3.2 ध्यानीमनी Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती करा.

(अ) शालूवहिनीची स्वभाववैशिष्ट्ये

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 6

2. स्पष्ट करा.

प्रश्न अ.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
उत्तर :
शालूवहिनाला स्वत:चे मूल नाही. त्यामुळे सामाजिक उपेक्षांचा तिला सामना करावा लागतो. या सामाजिक अवहेलनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. यावर उपाय म्हणून ती ‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरू पाहते. त्याच्या जन्मापासूनच त्या मुलासाठी खूप त्रास ती सहन करायची. नऊ महिने त्याचे ओझे तिने पोटात वाहिले आहे. त्याची शी-शू पुसायची. त्याला अंघोळ घालायची आहे.

टाळूवर तेल टाकून ती त्याला लहानपणी शांतपणे झोपवायची त्याच्या वस्तूंचा घरभर पसरलेला पसारा पाहून ती आनंदित व्हायची. त्याच्या कपड्यांचा, घामाचा गंध तिला आवडायचा. खेळून घरी आला की त्याचे चिकचिकित अंग बघून तिला त्याच्या खेळण्याचे कौतुक वाटायचे. त्याचे अक्षर चांगले नाही त्याबाबतीत तो बापाच्या वळणावर गेलाय याचेही ती कौतुक करायची. त्याच्यासाठी साजूक तुपाचा शिरा आणि चपातीचे लाडू बनवायची. त्याचे कपडे धुवायची. थोडक्यात वात्सल्य भावना तिच्यात ओतप्रोत भरलेली होती. आपल्या मुलावर त्याच्या बाललीलांवर तिचे अतोनात प्रेम होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उत्तर :
सदा आणि शालन या जोडप्याला स्वत:चे मूल नाही. सामाजिक उपेक्षांना सामना करण्याची ताकद नसलेली शालू कल्पनेच्या विश्वात ‘मोहित’ या मुलाला जन्म देते. तिच्या रंगहीन जीवनात त्यामुळे आनंद फुलतो. हा आनंद तिच्याकडून हिरावून घेतला तर ती मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल हे लक्षात घेऊन सदानंद तिला या आभासी विश्वात तसाच जगू देतो. हळूहळू तोही या विश्वात रमायला लागतो. तो म्हणतो संसारात एकमेकांच्या इच्छेसाठीच तर जगायचं असतं आणि इच्छेला शरीर असायलाच हवं असा काही नियम नाही. काल्पनिक मोहित दोघांच्या रुक्ष जीवनात प्राण ओततो.

त्याचं खेळणं-पडणं, चिखलात लोळणं, त्याचे कपडे-लत्ते, त्याच्या वस्तूंचा पसारा हा त्या दोघांच्या भावविश्वाचा एक भाग बनतो. मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सर्वांपासून दूर त्यांनी स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आहे. या विश्वात चैतन्य निर्माण करणारा जीवनरस म्हणजे मोहित. रडत, भेकत, कण्हत, कुंथत, कोरडं आयुष्य जगण्यापेक्षा जे ‘नाही’ ते ‘आहे’ हे समजून जीवन जगण्याचा सोपा मार्ग त्या दोघांनी निवडला आहे. मोहित त्यांच्या जगण्याचे जीवनसत्त्व आहे. तो नसेल तर त्यांचे अस्तित्व बर्फाच्या ठिसूळ पांढऱ्या गोळ्यांप्रमाणे होईल.

3. उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उत्तर :
अपत्यहीन जोडप्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतेचाच असतो. सदानंद आणि शालन या जोडप्यामध्येसुद्धा मूल नसल्यामुळे नात्यात कोरडेपणा आला होता. यावर उपाय म्हणून शालन मोहित नावाच्या काल्पनिक मुलाला जन्म देते आणि मातृत्वाचे रंग आपल्या जीवनात भरते. वास्तविक तिचा हा प्रवास मनोरुग्ण या दिशेने चाललेला असतो. पण तरीही तिला त्यातून आनंद मिळतोच हे जाणवून सदानंद या मुलाला स्वीकारतो.

त्यांच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टीत तो शालनला साथ देतो. पूर्वी दुःखी असणारी, मनाने उद्ध्वस्त झालेली शालन परत जीवन समरसून जगतेय हे बघून तो तिला या नात्यात साथ देतो. ही नवीन जबाबदारी त्याच्यावर येते. ही जबाबदारी दुहेरी आहे. एक म्हणजे शालनला तिच्यात आभासी विश्वात रमायला देणे. दुसरे आभासी दुनियेतील काल्पनिक मुलाबरोबर स्वत:चे भावविश्व निर्माण करणे. त्यामुळे या दुहेरी जबाबदारीने मी वाकलो आहे असे तो म्हणतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
उत्तर :
मूल नसल्यामुळे सतत सामाजिक अवहेलना-अपमान, तिरस्कार या भावनांना सामोरी जाणारी शालू हळूहळू मनोरुग्ण होत जाते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला दुंभगलेले व्यक्तिमत्त्व असे म्हणतात. आपल्या जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी शालूचे मन काल्पनिक विश्वात रमू लागते. या विश्वात तिचा स्वत:चा मुलगा आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जन्माला आला तेव्हापासून ती वात्सल्य भावनेचा अनुभव घेत आहे. त्याचे मोठे होते जाणे, शाळेत जाणे या सगळ्याच गोष्टी वास्तव जीवनातील मुलांच्या जीवनात ज्या प्रमाणे घडतात. त्याचप्रमाणे त्या मोहितच्या जीवनात घडतात.

इथे शालन वास्तव आणि आभास यांतील सीमारेषा पुसून टाकते. मोहितचं कल्पनेतील विश्व वास्तवात डोकावायला लागते. त्याचे सामान, त्याची खेळणी, कपडे घरभर पसरायला लागतात. त्याच्या घामाचा-शरीराचा गंध तिला वास्तवात जाणवायला लागतो. त्याच्यासाठी खादयपदार्थ घरात तयार व्हायला लागतात. तिचा पती सदानंद तिच्यात होणारे सर्व बदल पाहत असतो. आधी दुःखी, एकाकी असणारी शालन आता खूप आनंदात जीवन जगते.

हाच त्याच्याही जगण्याचा आधार आहे. त्याचा डॉक्टर मित्र समीर करंदीकर जेव्हा त्याला शालनला ‘या जगण्यातून बाहेर काढ, तिला वास्तवाची जाणीव करून दे’ असा सल्ला देतो तेव्हा सदानंद उद्विग्नतेने म्हणतो, “तिचा जीवनरस संपवून तिला मारून टाकण्यात काय अर्थ आहे?” तो समीरला सांगतो की स्वत:चे मूल हवे ही तिची इच्छा होती. ती तिने काल्पनिक विश्वात पूर्ण केली आहे. आता ती आनंदी आहे. मग त्या इच्छेला वास्तव शरीर नसेल तरी चालेल. तिचा आनंद हाच महत्त्वाचा आहे.

4. स्वमत,

प्रश्न अ.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
शालूचे वागणे हे अयोग्य आहे. वात्सल्य भावना ही ‘स्त्री’ ची नैसर्गिक भावना आहे, हे जरी खरे असले तरी स्त्री जीवनाचे सार्थक ‘माता होणे’ एवढेच नाही. आज स्त्रियांनी डॉक्टर, इंजिनिअर ते थेट वैमानिक, अंतराळ संशोधन, अवकाश यात्री इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. शिक्षणाने तिला पारंपरिक जोखडातून मुक्त केलं आहे. ज्ञानाची नवीन कवाडं तिच्यासाठी उघडी झाली आहेत. असे असताना उच्च शिक्षित असणारी शालन कल्पनेच्या दुनियेत आभासी मूल निर्माण करून एक खोटे जीवन जगते हे योग्य वाटत नाही. जीवनातला आनंद अनेक गोष्टीमध्ये शोधता येतो. कोणी झाडांना-फुलांना आपली मूलं मानून निसर्गात रमतात तर सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या स्त्रिया शेकडो मुलांच्या आयुष्यात रंग भरताना दिसतात.

लोकसंख्या वाढ ही भारताची प्रमुख समस्या असताना स्वत:चे मूल नाही म्हणून खंत करत बसण्यापेक्षा गरीब मूल दत्तक घेऊन त्याच्या जीवनाला आकार देणे हे केवढे तरी मोठे समाज कार्य ठरू शकते. त्यात शालन ही उच्चशिक्षित आहे. तिच्या ज्ञानाचा उपयोग इतर मुलांना करून देण्याऐवजी ते ज्ञान ती फुकट घालवते आहे. मातृत्वाचा इतका ध्यास घ्यायला हवा की विश्वातील सगळ्या अनाथ मुलांमध्ये आपले मूल शोधता आले पाहिजे. दुर्दैवाने शालन मात्र पारंपरिक मूल्य, संकल्पनांना बळी पडलेली दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
पुत्रप्रेम हे सजीव प्राण्यांचं फार मोठं स्वभाव-वैशिष्ट्य आहे. पशु-पक्षी-प्राणी हे देखील त्याला अपवाद नाहीत. मानवी समूहात स्त्री-पुरुष आणि त्यांची कर्तव्ये ही परंपरेतून निर्माण झाली आहेत. त्यामुळे संसार करणे, मूल जन्माला घालणे, त्यावर मातृत्वाचा वर्षाव करणे, त्याचे संगोपन करणे, त्याला वाढविणे या सगळ्या गोष्टी स्त्रियांची आदयकर्तव्ये ठरवली गेली आहेत. मुलगा-मुलगी मोठे होत असतानाच त्यांना त्यांच्या कर्तव्याची, भूमिकेची जाणीव करून दिली जाते. पुरुषाने अर्थार्जन करणे आणि ‘स्त्री’ ने ‘चूल-मूल’ सांभाळणे या भूमिका परंपरेने लादल्या आहेत.

‘वात्सल्य-पुत्रप्रेम’ हे पुरुषांतही तितकेच तीव्र असते ही गोष्ट आधुनिक विज्ञानाने स्पष्ट केली आहे. म्हणूनच पाश्चात्य देशात बाल संगोपन रजा ही स्त्रियांबरोबर पुरुषांनाही मिळते. म्हणजेच ही भावना निसर्गनिर्मित आहे. पण त्याचा आविष्कार स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जास्त आढळतो कारण सामाजिक रचना-व्यवस्था तशी आहे. थोडक्यात स्त्रियांच्या बाबतीत पुत्रप्रेम ही भावना नैसर्गिकआणि मानवनिर्मित दोन्ही आहे.

प्रश्न इ.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
उत्तर :
शालन मोहितच्या कपड्यांचे वर्णन करताना म्हणते मोहित आता मोठा होतोय. वाढणाऱ्या वयामुळे तो आता उंच होत आहे. त्यामुळे त्याचे कपडे आखूड होत आहेत. त्याचे बरेचसे कपडे, त्याचे शर्ट,पँट, टॉवेल, बनियन, बूट हे त्याच्या आजोबांनी म्हणजे शालन वहिनीच्या बाबांनी त्याला दिले आहेत. त्याचे मोजे रोज व्यवस्थित धुवावे लागतात. त्याच्या कपड्यांना त्याच्या घामाचा शरीराचा गंध येतो. तो सतत चिखलात-मातीत खेळायला जातो. त्यामुळे त्याचे कपडे खूप खराब होतात. कधी खेळताना पडून एखादी जखम होते. तेव्हा कपड्यांना रक्ताचे डागही लागलेले असतात. थोडक्यात त्याच्या कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा सगळीकडे घरभर पसरलेला असतो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
शालूला सदाने साथ का दिली असावी ते स्पष्ट करा.
उत्तर :
वात्सल्य भावना ही शालीनीमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मूल हवे आहे. तिची बुद्धी तोकडी नाही. ती उच्चशिक्षित आहे. पण प्रत्येक क्षणाला ती खळखळ हसऱ्या बाळाचे स्वप्न पाहतेय. यामुळे स्वप्न हेच सत्य समजून ती जीवन जगू लागते. या स्वप्नात तिचे मूल जन्माला आले आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जसा जसा मोठा होतोय शालन त्याच्या बाललीलांनी हरखून जाते. तिच्या निराशेने भरलेल्या जीवनात नवीन आशेचा किरण निर्माण झालाय. तो किरण खोटा आहे. सदानंदाला कळत आहे. पण बायकोला या स्वप्नातून बाहेर काढणे म्हणजे तिला जिवंतपणी मरणयातना देणे हे त्याला माहीत आहे. इच्छा नसूनही तो आधी या खोट्या जगात तिची साथ देत राहतो. हळूहळू तोही या कल्पनेच्या दुनियेत रमू लागतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

अस्तित्वात नसलेला मोहित त्या दोघांचे जीवनसत्त्व होते. त्यांच्या रुक्ष जीवनात भावनेचा ओलावा निर्माण होतो. शालन यामुळे आनंदी होते. सामाजिक अवहेलनेने, वांझपणाच्या भावनेने आतून तुटलेली शालन परत एकदा नवीन स्वप्नात रममाण होऊन आनंदाने जीवन जगते आहे. तिचा आनंद हिरावून कशाला घ्या? तिला परत दुःखात लोटण्याला काय अर्थ आहे? या विचाराने शालूला सदाने साथ दिली असावी.

प्रश्न आ.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर :
वरील विधान हे अर्धसत्य आहे. कारण हे विधान सत्य मानलं तर ‘शिना वोरा’ सारखे प्रकरण या देशात घडलेच नसते. सख्ख्या आईने पैशासाठी मुलीचा जीव घेतला ही मातृत्वाला काळीमा फासणारी घटना याच देशातील आहे. जिथे ‘श्यामच्या आई’ सारखी कालातीत पुस्तके जन्माला येतात, तिथे पुत्रप्रेम-वात्सल्य या स्त्रियांमधील सार्वत्रिक भावना असल्या तरी स्वत:चे करियर घडविण्यासाठी अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे अविवाहित राहून मूल दत्तक घेऊन आपली मातृत्वाची तहान भागविणाऱ्या स्त्रिया सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत नवा पायंडा निर्माण करताहेत.

म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढणाऱ्या पुत्रांमुळे, “किती आंधळेपणाने मुलांवर प्रेम करायचे?” हा ही प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. आताच्या काळातील स्त्रिया या पुढारलेल्या आहेत. पुत्रप्रेमाच्या पलीकडे जाऊन व्यवहाराचा विचार करून सगळ्याच गोष्टी त्या मुलांवर उधळून टाकत नाहीत हेही सत्य या आधुनिक जगात पाहायला मिळते. म्हणजेच पुत्रप्रेमाची नैसार्गिक भूक जरी प्रत्येक स्त्रीकडे असली तरी आधुनिक काळात त्याला व्यवहार ज्ञानाने मोजण्याची रीतही रूढ झालेली आहे.

प्रश्न इ.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरणारी शालू आणि काल्पनिक जग कोणते व वास्तव कोणते या विचाराने गोंधळलेला सदा या दोघांच्या मनातील घालमेल या नाटकात नाट्यरूपाने प्रकट होते. एका बाजूला मूल नसल्यामुळे नात्यात आलेला कोरडेपणा तर दुसऱ्या बाजूला कल्पनाविश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे मनाची पकड घेत नाटकाचे कथानक गतिमान होते. मूल असल्याशिवाय आयुष्याची परिपूर्ती नाही अशा खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालन मनोरुग्ण होते. काल्पनिक विश्वात जगायला लागते. त्या विश्वात स्वत:चे खोटे मूल आकाराला आणते आणि त्या मुलाच्या संगोपनात गुंतून जाते. त्यात ती आनंद शोधते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

पण हा आभासी फुगा जेव्हा फुटेल तेव्हा शालन ठार वेडी होईल हे सत्य डॉक्टर समीर करंदीकर सदानंदला सांगू पाहतात. पण सदानंद त्यांना निरुत्तर करतो. मला शालनचे सुख हिरावून घ्यायचे नाही. तिला पुन्हा दु:खाच्या गर्तेत मला लोटायचे नाही असे तो निक्षून सांगतो. शेवटी मीही आता या आभासी काल्पनिक दुनियेत रमलो आहे हे कबुल करतो. अस्तित्वात नसलेल्या या दोघांचा मुलगा त्यांचा जीवनरस आहे हे तो समीरला सांगतो. हा रस गेला तर आम्ही दोघे संपून जाऊ अशी भीती तो व्यक्त करतो. या शेवटामध्ये एक प्रकारची हतबलता आहे. परिस्थितीला शरण जाणारी नाउमेद मानसिकता आहे.

सत्याला सामोरे जाण्याऐवजी त्यापासून पयालन करायचा पलायनवाद यात दिसून येतो. त्यापेक्षा अपत्यहीनतेवर मात करून एखादया मानवतावादी ध्येयाला या जोडप्याने वाहून घ्यायला हवे होते. स्वप्नातून बाहेर येऊन नवीन जीवनाची सकारात्मक सुरुवात करायला हवी होती. शिक्षणाने आलेलं शहाणपण वास्तव जीवनात वापरता आले नाही तर त्या शिक्षणाला अर्थ नाही असे वाटत राहते. म्हणून शेवट विषष्ण करणारा आहे असे वाटते.

11th Marathi Book Answers Chapter 3.2 ध्यानीमनी Additional Important Questions and Answers

कृती : १

प्रश्न 1.
वरील परिच्छेदात व्यक्त झालेल्या विषमता.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) [सामाजिक विषमता,]
(b) [नैसर्गिक विषमता,]
(c) [आर्थिक विषमता आर्थिक]

कृती – २.

प्रश्न 2.
प्रत्येक विषमतेचं वैशिष्ट्य
उत्तर :
(a) नैसर्गिक विषमता [ ]
(b) सामाजिक विषमता। [ ]
(c) आर्थिक विषमता [ ]
उत्तर :
(a) सर्वच नैसर्गिक विषमता वैदयकीय मार्गाने दूर होऊ शकत नाही.
(b) सामाजिक विषमतेचं रस्त्यावर प्रदर्शन मांडता येतं.
(c) आर्थिक विषमता सरकारी धोरणांमुळे अस्तित्वात येते.

समीर : एक माणूस म्हणून मला तुमच्या ………………………………………………………………………………………….. निघा तुम्ही आता. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७८-७९)

कृती-३.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न 1.
रडत-थकत किंवा कण्हत-कुंथत या शब्दांच्या जोड्यांमधील दोन्ही शब्दांचे अर्थ जवळजवळ सारखेच आहेत अशा तुम्हाला माहीत असलेल्या शब्दांच्या जोड्या.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) रमत गमत
(b) इमाने इतबारे
(c) धावत पळत

स्वमत :

प्रश्न 1.
विषमतेच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या उल्लेखातून सदानंद याला काय सांगायचे आहे ते स्पष्ट करा.
उत्तर :
या परिच्छेदात तीन प्रकारच्या विषमतेचा सदानंद उल्लेख करतो आहे. या तिन्ही विषमता वेगवेगळ्या आहेत व त्यामागे असणारी कारणेही भिन्न आहेत.

समाजामध्ये श्रीमंत-गरीब ही दरी असणे म्हणजे आर्थिक विषमता होय. प्राचीन भारतात विकासाची संधी सर्वांना समान उपलब्ध नव्हती. शिक्षणाची संधीही काही मूठभर लोकांना उपलब्ध होती. त्यातून एक वर्ग प्रगती करत गेला तर दुसरा वर्ग अज्ञानाच्या अंधकारात लोटला गेला त्यातून समाजात आर्थिक विषमता निर्माण झाली. जाती-व्यवस्थेमुळे उच्च जाती-नीच जाती असे भेदभाव निर्माण झाले. त्यातून मग सामाजिक भेद निर्माण झाले. नैसर्गिक भेद हे निसर्गामधूनच येतात. कोणी प्रचंड बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतो तर कोणी मंदबुद्धी म्हणून जन्माला येतो. तसेच काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते तर काही अपत्यप्राप्तीसाठी तळमळत राहतात. सदानंद म्हणतो सामाजिक-आर्थिक विषमता दूर होऊ शकते पण शालन आणि मला मिळालेली

अपत्यहीनतेची देणगी वैदयकीय मार्गानेही दूर होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील कमतरता तो या वाक्यातून अधोरेखित करतो.

स्वाध्यायासाठी कृती

  • ‘मोहित हे आमचं जीवनसत्त्व आहे’ या वाक्यातून प्रकट होणाऱ्या सदानंदाच्या मनातील भावना स्पष्ट करा.

ध्यानीमनी प्रस्तावनाः

वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर अर्थपूर्ण लेखन करणारे मराठी नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी नाटककार म्हणजे अर्थातच प्रशांत दळवी. केवळ नाटकच नव्हे तर चित्रपट-लेखन या सर्वच प्रांतात आपल्या आगळ्या-वेगळ्या लेखन शैलीने त्यांनी आपला वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. ‘खिडक्या’ हा त्यांचा कथासंग्रह तर ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘गेट वेल सून’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ या सगळ्याच नाटकांमधून त्यांनी मानवी भावभावनांचा, मनातील मानसिक आंदोलनांचा आशयपूर्ण पट चितारला आहे. विशेषतः माणसांच्या जगण्याचा, त्यांच्या कृती-उक्ती मागे असलेल्या कारणांचा त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेत एकूणच मानवी मनाची गुढता उलगडून दाखवलेली आहे. ‘बालगंधर्व पुरस्कार’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार’, ‘जयवंत दळवी पुरस्कार’ इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवांकित करण्यात आले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

ध्यानीमनी पाठाचा/नाटकाचा परिचय :

प्रस्तुत नाटकाचा वेचा हा ‘ध्यानीमनी’ या नाटकातून घेतला आहे. या नाटकात दोन जोडपी आहेत. सदानंद-शालन आणि समीर-अपर्णा. प्रस्तुत वेचामध्ये मात्र तीन पात्रांचे अस्तित्व आपल्या समोर येते. ते म्हणजे डॉक्टर असणारा समीर आणि मूल-बाळ नसलेले जोडपे सदानंद आणि शालन!

आज समाज कितीही पुढे गेला तरी समाज स्त्रीकडे पाहताना पारंपरिक दृष्टिकोनातूनच पाहतो हे सत्य आहे. ‘चूल-मूल’ या चौकटीतच स्त्रीचे कर्तृत्व शोधले जाते. त्यामुळे निपुत्रिक शालूला वेगवेगळ्या सामाजिक उपेक्षांना सामोरे जावे लागते. जणू मूल नसलेली स्त्री म्हणजे अपशकुनी स्त्री या नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. या सर्वांचा शालनच्या मनावर प्रचंड मानसिक आघात होतो. ती आपले मानसिक संतुलन हरवून बसते.

अपत्यहीनतेची ही जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी ती काल्पनिक विश्वाचा आधार घेते. जन्माला न आलेल्या मुलाला तो जन्माला आलाच आहे असे समजून वाढवू लागते. तिचे हे असे कल्पनेत रमणे, वास्तवापासून दूर जाणे तिचा पती हतबल होऊन पाहत राहतो. तिला सत्याची जाणीव करून दिली तर ती कदाचित ठार वेडी होईल आणि तिचे जगणेच संपून जाईल या भीतीने सदानंद तिच्या वागण्याचा स्वीकार करतो.

हळूहळू अस्तित्वात नसलेल्या या दोघांच्या मुलाने म्हणजे मोहितच्या अस्तित्वाने घर भरून जाते. त्याचे कपडे, त्याची शाळा, त्याचे खेळणे, त्याच्या घामाचा वास, त्याचे बूट, त्याचे टॉवेल या सर्व गोष्टींनी घर भरून जाते. जणू एक आभासी मूल त्या घरात जन्म घेते. या मुलाला वाढविताना पती-पत्नी जीवनाचा आनंद शोधू पाहतात.

समीर डॉक्टर आहे. होमसायन्समध्ये बाल मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या शालनचं असं तीळ तीळ तुटत जाणं, वास्तव जीवनापासून भरकटत जाणं हे सगळं त्याला भयानक वाटत राहतं. मनोरुग्ण झालेल्या शालनला तो यातून बाहेर काढू इच्छितो कारण डॉक्टर म्हणून त्याचे ते कर्तव्य आहे. पण शालन समीरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्याच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करते. त्यामुळे समीर सदानंदकडे आशेने बघतो की निदान तो तरी आपल्या पत्नीला वास्तवाची जाणीव करून देईल. पण सदानंद मात्र शांतपणे त्याला स्पष्टीकरण देतो, “सत्य सांगून शालूला अस्तित्वहीन करून तिचं एका हाडामासाच्या जिवंत पुतळ्यात रूपांतर करण्यापेक्षा आभासी दुनियेत आनंदाने रमणारी स्वप्नाळू शालू मला हवी आहे.”

एकीकडे मूल नसल्यामुळे आलेला नात्यातील कोरडेपणा तर दुसरीकडे कल्पना विश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे नाटक मनाची पकड घेते. मानवी मनातील अगम्य गुंते या निमित्ताने नाटककार उलगडून दाखवतो आणि सबोध मन-अबोध मन यातील वंद्व स्पष्ट करतो. सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने केलेली मानवी मनाची उकल या नाटकाच्या निमित्ताने लेखक स्पष्ट करतो आणि नाटक उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

ध्यानीमनी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

सायकॉलॉजी- मनाचा अभ्यास करणारे शास्त्र/मानसशास्त्र (psychology), वस्तुस्थिती – सत्य परिस्थिती (reality), जोजवणे – झोपवणे, भामटा – लबाड मनुष्य (deceitful person), आखूड – लहान, छोटे (short), कणीक – गव्हाचे पीठ (weat flour), तवंग – थर (a thin layer), मेडिकल टेस्ट – वैदयकीय तपासणी, वैदयकीय चिकित्सा, ओशाळणे – लाजणे (to shrink), तोळामासा – साधारण गोष्ट, सामान्य गोष्ट (very delicate, easily affected), पिसाळणे – वेडे होणे. (madden), जावळ – लहान मुलाच्या डोक्यावरील केस (hair of a child), स्वयंभू – स्वत:हून निर्माण झालेले (self born, self existent), तुकतुकीत – चकचकीत (smooth and shining), कण्हणे – रडणे (to groom), कुंथणे – वेदनेने कळवळणे (to moan).

ध्यानीमनी वाक्प्रचार :

चपापून पाहणे – दचकून पाहणे, ध्यास घेणे – एकाच गोष्टीचा सतत विचार करणे, कळा सोसणे – त्रास सहन करणे, पाठीला कळ लागणे – पाठ खूप दुखणे, चेहरा तांबूस पडणे – चेहरा लाल होणे, अस्ताव्यस्त पसरणे – इकडे तिकडे पसरणे, बेचिराख होणे – नष्ट होणे, घोटून घेणे – एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करून त्यात तरबेज होणे, धुगधुगती आशा असणे – थोडीफार आशा असणे, दत्तक घेणे – दुसऱ्याचे मूल आपले मूल म्हणून स्वीकारणे, अंतर न पडू देणे – दुरावा निर्माण न होऊ देणे, घालून पाडून बोलणे – अपमानकारक बोलणे, घुमा होणे – मनातल्या मनात कुढत राहाणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 3 अशी पुस्तकं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

11th Marathi Digest Chapter 3 अशी पुस्तकं Textbook Questions and Answers

कृती

1. अ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 1
उत्तर :

‘पुस्तकरूपी’ मित्र‘मानवी’ मित्र
उत्तेजक, आनंददायीमित्र दुरावतात.
प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणारंमित्रांना कधी कधी प्रेमाची विस्मृती होते.
विशाल अंत:करण, निःस्वार्थीपणावैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात.
उत्कट अनुभूती देणारेविश्वासघातकी असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

आ. कारणे लिहा.

प्रश्न अ.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….
उत्तर :
लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.

प्रश्न आ.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …
उत्तर :
पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.

प्रश्न इ.
रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..
उत्तर :
रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 5

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 6

2. अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे
उत्तर :
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न आ.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे .
उत्तर :
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.

3. व्याकरण :

अ. सूचनेनुसार सोडवा.

प्रश्न 1.
‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..
उत्तर :
धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार

प्रश्न 2.
जसे विफलताचे वैफल्य, तसे –
अ. सफलता → ……….
आ. कुशलता → ……….
इ. निपुणता → ……….
उत्तर :
अ. सफलता → साफल्य
आ. कुशलता → कौशल्य
इ. निपुणता → नैपुण्य

आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’

प्रश्न आ.
शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
……… ……….. ……… ……….. ………..
उत्तर:
प्रोत्साहक, मारक, प्रायोजक, आयोजक, समन्वयक

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

इ. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.

प्रश्न 1.
या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 4
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 7

4. स्वमत :

प्रश्न अ.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
उत्तर:
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे लेखक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असे सांगितले आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना वैचारिक साहित्य हे मानवी मनाला नेहमी प्रेरणा देते असा व्यापक दृष्टिकोन लेखकाने येथे व्यक्त केला आहे. वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. माणसाला जगण्याचे बळ देतात. मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण कसं असावं हे पुस्तकं सांगतात.

वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते.

प्रश्न आ.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
‘अशी पुस्तक’ या पाठातून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले आहे. पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. पुस्तके ही माणसाची जगण्याची हिंमत वाढवतात. प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात.

जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात.

लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न इ.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
क्रूर नियती व दुर्बल परंतु महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यामध्ये कधीही न संपणारे युद्ध वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. जीवन एक संघर्ष आहे. नियती क्रूर आहे असं आपण अनेकवेळा म्हणतो ते अगदी खरं आहे. आज जगण्या-मरण्याचा खेळ अखंड चाललेला आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मरणाच्या, संकटाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळ टाकलं तरी ते आपण तोडून, फेकून दयायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.

परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे.

अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठातून लेखक डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असुन उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. अशी व्यापक भूमिका मांडली आहे. महात्मा गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगो आणि मून्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं ‘संत तुकारामांचे अभंग’, ‘संस्कृत महाकवी’ कालिदासाचे मेघदूत, टॉलस्टॉपची ‘अॅना करनिना,’ जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा, हेमिंग्वेचं ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ अशा विविध प्रकारांच्या रसमय साहित्याशी माणसाचे नाते जोडले जाते. उत्तम साहित्य वाचनाने माणसांचा एकाकीपणा दूर होतो.

पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न आ.
निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी पुस्तकांचे महत्त्व वर्णन करण्याबरोबर पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोनही सांगितला आहे. लेखकाच्या मते जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. पुस्तकांवर उदंड प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तकं देताना चिंतीत होतात.

पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.

 

शब्दसंपत्ती :

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

प्रश्न अ.
पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे : ………..
उत्तर:
पाक्षिक

प्रश्न आ.
ज्याला एकही शत्रू नाही असा : ………
उत्तर:
अजातशत्रु

प्रश्न इ.
मंदिराचा आतील भाग : ……….
उत्तर:
गाभारा

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न ई.
गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा : ………….
उत्तर:
आजानुबाहु

प्रश्न उ.
केलेले उपकार न जाणणारा : ……….
उत्तर:
कृतघ्न

प्रकल्प.

प्रश्न 1.
जी. ए. कुलकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य वाङ्मय कोशातून शोधून लिहा.

11th Marathi Book Answers Chapter 3 अशी पुस्तकं Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 8
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 10
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 11

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 12
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 13

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 14
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 15

परिणाम लिहा.

प्रश्न 1
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 16
उत्तर :
पुस्तकांना स्पर्श केला की आपले अंत:करण विचारांनी आणि भावनांनी ओसंडून जाते.

उपयोजित कृती

खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
‘काळजीपूर्वक’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • काळ
  • पूर्व
  • कळ
  • काक

प्रश्न आ.
‘अंतरंग’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • अंत
  • रंग
  • तरंग
  • गत

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न इ.
‘विश्वासघातकी’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • विश्वास
  • श्वास
  • घात
  • घास

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

प्रश्न 1.
आत्यंतिक प्रेम करणारी माणस मी पाहिली आहेत.
उत्तर :
आत्यंतिक.

खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
वैर – शत्रुत्व, क्रूर, अपमान, विरस
उत्तर :
शत्रुत्व.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

प्रश्न 1.
अंतरंग, मन, चित्त, अर्थ
उत्तर :
अर्थ

प्रश्न 2.
विस्मृती, विसर, विस्मरण, स्मरण
उत्तर :
स्मरण

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

स्वमत :

प्रश्न 1.
माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.
उत्तर :
‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती जुनी असली तरी त्या उक्तीचे महत्त्व आताच्या जमान्यातही तसूभर कमी झालेले नाही. कारण माणसाचा सर्वागीण विकास होण्यासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यांची विचारप्रवृत्ती वाढते. आकलन व स्मरणशक्ती दोन्हीचा विकास होतो.

आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात.

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते.

संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न 2.
‘माझी पुस्तक हीच माझी अपत्यं’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगितले आहे. पुस्तके ही माणसाला जन्मभर सोबत करतात. एका ग्रंथप्रेमी वाचकाने ‘माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं आहेत’ अशी प्रतिक्रिया लेखकाजवळ व्यक्त केली. ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर अतिशय प्रेम होते. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांना त्याने जिवापाड सांभाळले होते. आपण आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यांचा सांभाळ करतो.

त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो.

तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं.

स्वाध्यायासाठी कृती

  • तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकाविषयी तुमचे मत मांडा.
  • ‘वाचाल तर वाचाल’ याविषयी तुमचे विचार व्यक्त करा.
  • ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक’ यातील व्यापक दृष्टिकोन तुमच्या शब्दात व्यक्त करा.
  • तुम्हाला आवडलेल्या एखादया पुस्तकाविषयी 10 ते 12 ओळीत माहिती लिहा.

अशी पुस्तकं Summary in Marathi

प्रस्तावना :

मराठी संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संपादक व वक्ते म्हणून डॉ. निर्मलकुमार फडके प्रसिद्ध आहेत. ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची ‘आस्वाद समीक्षा’ साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ अशी ही विविध साहित्यसंपदा आहे.

‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा संतसाहित्य हा विशेष आस्थेचा विषय होता.

‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकातून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग दिसून येतो. या त्यांच्या साहित्य सेवेबद्दल ‘भैरू रतन दमाणी’ या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गंभीरता, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे त्यांच्या साहित्याचे लेखनविशेष आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

पाठाचा परिचय :

माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका प्रस्तुत पाठात मांडली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवून प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार व्यक्त करताना लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे.

पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात, पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आपल्याला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात ती हृदयाच्या कण्यात जपून ठेवायला हवी. मनाची सुदृढ आणि सशक्त वाढ होण्यासाठी पुस्तके वाचावीत. आपल्या जीवनप्रवासात पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. ग्रंथ हे गुरु आहेत हा विचार या पाठात अधोरेखित झाला आहे.

पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तके कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीही नाही. यावरून लेखकांचे ग्रंथप्रेम दिसून येते.

लेखकांने एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून एक पुस्तक आणले होते. ते पुस्तक देताना या ग्रंथप्रेमीने लेखकाला “अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसयांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, बरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा.” अशा सूचना दिल्या. त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण त्या अटी खरोखरच अत्यंत सयुक्तिक होत्या, कारण ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तकाला स्वत:ची अपत्ये समजतात. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य प्राप्त करून देतात. मनातल्या अंधाराला स्वप्नं दाखवून मनाला ताजे आणि टवटवीत करतात.

उदा. ‘मेघदूत-कालिदास’, ‘टॉलस्टॉयची अॅना कॅरेनिना’ ही कादंबरी, गांधीजींचे आत्मचरित्र, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे अभंग इत्यादी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अण्ड द सी’ कादंबरीतील एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात पोटात अन्नाचा कण नसताना आपली होडी ढकलतो, देवमाशाला जिंकण्याचे धाडस ठेवून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल सागराच्या आत जातो.

त्याच्यात लाटांबरोबर झुजण्याची जिद्द, कणखर आशावाद, आकांक्षा, हटवादी मन, विजयोन्माद असतो. या कादंबरीतून निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजय प्राप्त करणार आहे असे हेमिंग्वेला सुचवायचं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून नव्या प्रेरणा वाचकाला मिळतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. उत्तेजक – हुरूप आणणारे, प्रोत्साहक – (stimulant)
  2. कोळी – मासेमारी करून निर्वाह करणारा – (a fisherman)
  3. वज़ – इंद्राचे आयुध – (thunderbolt)
  4. विमनस्क – उद्विग्न, खिन्न, गोंधळलेला – (depressed)
  5. प्रेरणा – स्फूर्ती – (inspiration)
  6. विजय – यश – ( victory)
  7. मूर्खहस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम् – पुस्तक म्हणते मला मुर्खाच्या हाती देऊ नका
  8. साहित्य – ग्रंथसंपदा – (literature)
  9. तेज – प्रकाश – (light)
  10. प्रारब्ध / नियती – नशीब – (destiny)
  11. होडी – नाव – (boat)
  12. अपत्य – मुले – (an offspring, child)
  13. माणुसकी – मानवता – (huminity)
  14. शिकार – पारध – (hunt)
  15. किमया – जादू – (magic)
  16. बंडखोर – क्रांतिकारी – (rehel)

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. दुधाने तोंड पोळल्यामुळे ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
  2. खिळवून ठेवणे – मन गुंतवून ठेवणे.
  3. आरोळी ठोकणे – मोठ्याने हाक मारणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

टिपा :

  1. शेक्सपिअर – सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार, मॅकवेध, किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध नाटके.
  2. अर्नेस्ट हेमिंग्वे – अमेरिकन साहित्यिक.
  3. व्हिक्टर हयूगो – फ्रेंच कवी, लेखक व नाटककार,
  4. मुन्शी प्रेमचंद – थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार.
  5. लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक.
  6. कवी कालिदास – संस्कृत महाकवी यांची मेघदूत व शाकुंतल नाटके प्रसिद्ध.
  7. जी.ए. कुलकर्णी – एक आधुनिक श्रेष्ठ कथालेखक.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.1 हसवाफसवी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

11th Marathi Digest Chapter 3.1 हसवाफसवी Textbook Questions and Answers

कृती

1.

प्रश्न अ.
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

प्रश्न आ.
कारणे लिहा.

1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण…
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्यकलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश, लाईट यांची सवय असतेच. पण आता त्यांचे वय झाले होते. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री. वाघमारे शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असताना तिथला फोटोग्राफर त्यांना न विचारता, न सांगता आगंतुकासारखे त्यांचे फोटो काढत असतो. तो सारखं त्यांना ‘इथे बघा’, ‘तिथे बघा’ अशा सूचना देत असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचा प्रखर प्रकाश हेरंबकरांच्या डोळ्यांवर पड्न त्यांना त्रास होत असतो. डॉक्टरांनी प्रखर प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केलेली असते. म्हणून ते फोटोग्राफरवर चिडतात आणि परत आलास तर थोबाडीत देईन अशी धमकी त्याला देतात.

2. कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण”
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे स्वत:च्या सत्कार समारंभासाठी कोकणातून थेट मुंबईला येत असतात. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासभत्ता मिळणार असतो. वाटेत ट्रेनमध्ये एक चाहता त्यांना भेटतो. या चाहत्याने अगदी लहानपणापासून हेरंबकर यांची नाटके पाहिलेली आहेत. तो त्यांना त्याच्या कर्जतच्या घरी चलण्यासाठी आग्रह करत असतो. त्याचा आग्रह कृष्णराव हेरंबकर यांना मोडवत नाही. कारण तो त्याच्या डॉज गाडीतून कृष्णरावांना मुंबईपर्यंत सोडेन असे आश्वासन देतो. प्रत्यक्षात गाडी एकदम खटारा असते. रस्त्यात तिचा एकेक टायर पंक्चर होत जातो. शेवटी चारही टायर सपाट झाल्यावर गाडी रस्त्यातच बसते. त्यावेळी कोंबड्यांच्या गाडीत त्यांना लिफ्ट मिळते. मुंबईच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्याने नाईलाजास्तव कृष्णराव हेरंबकर कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार होतात.

2. थोडक्यात वर्णन करा.

प्रश्न अ.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
उत्तरः
कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारभाचे आयोजन मुंबई येथे श्री. वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासखर्च देण्यात येईल अशी बोली झालेली असते. म्हणूनच कृष्णराव या सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीत कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यानंतर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही ते हलवून बघतात. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारून सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कारसमारंभात घडतो.

प्रश्न आ.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर या कोकणात वास्तव्य करणाऱ्या संगीत नाट्य कलाकाराचा मुंबई येथे सत्कार होणार असतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सपत्नीक कोकणातील अंबुर्डी या गावातून टांग्यातून प्रवास करत कुंदनपूरला पोहोचतात. तिथून मग ते एस.टी पकडतात आणि पुण्याला पोहोचतात. मग तिथून ट्रेनेन मुंबईला येत असताना एका चाहत्याच्या आग्रहाला बळी पडून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

3. थोडक्यात लिहा.

प्रश्न अ.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वत:च्या सत्कार समारभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एस.टी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांच्या नाटकाचा निस्सिम चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला आनंदाचे भरते येते. ते इतके की तो थेट ट्रेनमध्येच कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे ही त्याच्या ध्यानात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना, त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही हा चाहता स्वत:च्या आनंदात मश्गूल असतो. “माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबुल करत असाल तरच मी तुमचे पाय सोडेन.” अशी धमकीवजा सूचना तो कृष्णराव यांना करतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांचे पाय गदागदा हालवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार दयायला लावते.

प्रश्न आ.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा-एस.टी., ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकांवर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व “कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.” असा धमकीवजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या २१ जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो.

4. स्वमत.

प्रश्न अ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तरः
‘हसवाफसवी’ ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्यकलावंताचा सत्कार समारभ संयोजक श्री. वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्षे ८७ पण तरीही तल्लख मेंदू, बोलण्यात मिस्किलपणा. तर वागण्यात खट्याळपणा. प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद यांचे उत्कृष्ट बेअरिंग सांभाळत आपल्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडवतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून आता शहाणपण आले आहे.

त्यामुळेच सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ हे कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवासभत्ता व थैली मिळणार होती त्याचे काय झाले हे सारखे विचारून घेतात व स्वत:तील व्यवहार शहाणपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. आपल्यातील कलाकाराचा त्यांना अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात आपण काम केले आहे ही बाब त्यांच्यातील कलाकाराला सुखावते. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे हे ते अत्यंत मार्मिकतेने स्पष्ट करतात. आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो या भावनेने ते सुखावतात.

म्हणूनच ट्रेनमध्ये भेटलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. या चाहत्याने त्यांना घातलेला साष्टांग नमस्कार, त्याचे गुजराती बायकांना लागलेले पाय, त्या बायकांच्या हातातील खाली पडलेले फरसाण याचे ते साग्रसंगीत विनोदी ढंगाने वर्णन करतात आणि स्वत:मधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. ‘उतारवयात काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आत्मचरित्र लिहितो’ असे देतात व कलाकाराला म्हातारपणी असे उदयोग करून पैसा कमवावा लागतो हे सांगून या मायावी दुनियेची दुसरी वास्तव बाजू उघड करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

मुद्दामहून एखादयाच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करणे त्यांना आवडते. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना चाहत्याने दिलेली डॉज गाडी बंद पडल्यामुळे त्यांना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याही गाडीचा अपघात होतो. पण चाहत्यांच्या प्रेमाचे पुण्य पाठीशी असल्याने आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ या पत्रात त्यांना ‘कृष्णराव’ हे नाव दिले याचे त्यांना विशेष कौतुक वाटते. पूर्वी काळी दोन मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी शून्य मध्ये तरी गाऊ शकतील की नाही यविषयी खंत व्यक्त करतात.

असे अत्यंत मार्मिक, विनोदी, व्यवहारदक्ष तरीही आतून हळवे असणारे कृष्णराव रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहेत. वय झाले तरी त्यांचा उत्साह संपलेला नाही. माणसामाणसांतील आपुलकी जपावी. पडदयामागील साथीदारांशी देखील जिव्हाळ्याने बोलावे, त्यांना प्रोत्साहन दयावे हा त्यांचा स्वभावविशेष आहे. कारण शेवटी नाटक हे टीमवर्क आहे याची त्यांना जाण आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी ते दक्ष आहेत. त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य जगाला सांगून सगळ्यांना शहाणे करून सोडावे या प्रवृत्तीचे ते आहेत.

प्रश्न आ.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
उत्तरः
नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितके नाटकाचे यश खात्रीलायक असते. नाटकाचे कथानक, शब्द जितके सशक्त तितके नाटक अधिक उंचीवर जाते. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद! खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद असतील तर आशय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या तीन्ही गोष्टी मिळून नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात. संदर्भ अधिक स्पष्ट होतात. कथानकाचा प्रवाह वेगात पुढे जातो.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
प्रस्तुत उताऱ्यातील दोन शाब्दिक विनोदाच्या उदाहरणांतून दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. पहिला प्रसंग म्हणजे कार्यक्रम संयोजकांची साहाय्यक मोनिका ही आपले नाव सांगते त्यावेळी कृष्णराव ‘मनुका’ असा तिचा उल्लेख करतात. आणि दोन्हीचा अर्थ एकच असे स्पष्टीकरण देतात. मोनिका – मनुका अशी जोडी निर्माण करून त्यातून शब्दनिष्ठ विनादाची पेरणी करतात. मोनिका ही गोड स्त्री आणि मनुका हे गोड फळ. त्यामुळे मोनिका जेव्हा नावाची दुरुस्ती करते तेव्हा दोन्हीचा अर्थ एकच आहे असे सांगून कृष्णराव शब्दकोटी करतात.

दुसऱ्या प्रसंगात मोनिका त्यांना “सध्या काय करता ? असा प्रश्न विचारते तेव्हा ‘आत्मचरित्र लिहतोय’ आणि त्याचे नाव ‘एक झाड – दोन कावळे’ असे आहे हे स्पष्ट करतात. त्यावर मोनिकाचा पुढचा प्रश्न असतो. प्रकृती कशी आहे ? या प्रश्नाचा रोख खरंतर कृष्णरावांची प्रकृती कशी आहे याकडे असतो पण मुद्दाम आपल्याला प्रश्नाचा रोख कळला नाही असे दाखवून कृष्णराव कुणाची, कावळ्यांची? असे विचारून तिला निरुत्तर करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

शाब्दिक विनोदाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोनिका तिच्या भूमिकेनुसार त्यांना त्यांची नाटके, दौरे, गायन यांविषयी प्रश्न विचारत राहते आणि कृष्णराव हेकेखोरपणे त्यांना हवी ती भलत्याच विषयाची उत्तरे देत बसतात. म्हणजे प्रश्न एका विषयाचा तर उत्तर भलत्या विषयाचे अशी रचना लेखकाने केली आहे. त्यातून शाब्दिक विनोद तर कधी प्रासंगिक विनोद घडत राहतात. कोंबड्यांच्या गाडीतून त्यांनी केलेला प्रवास किंवा ट्रेनमध्ये एका चाहत्याने भर गर्दीत घातलेला साष्टांग नमस्कार हे प्रसंग बोलण्याच्या ओघात येतात आणि त्यातून प्रंसगनिष्ठ विनोद घडत जातो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न आ.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
संगीत नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संयोजक वाघमारे यांनी मुंबईला केलेले असते. या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह कोकणातून मुंबईपर्यंतचा प्रवास करत कृष्णराव येतात. कृष्णरावांच्या बऱ्यावाईट काळात पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली आहे याची कृष्णरावांना जाण आहे. आपल्या पत्नीला आपली खूप काळजी आहे याचे त्यांना विशेष कौतुक आहे. ट्रेन प्रवासात एक चाहता त्यांच्या पायात पडून पाय गदागदा हलवतो आणि माझ्या घरी येण्याचे कबुल केल्याशिवाय पाय सोडणार नाही अशी आदेशवजा धमकी देतो.

त्यावेळी गदागदा हलणाऱ्या पायांमुळे कृष्णराव पडतील अशी भीती वाटून पत्नी त्यांना चाहत्याचे आमंत्रण स्वीकारायला लावते. तिला प्रसिद्धीची अजिबात हौस नाही. त्यामुळे संयोजक रंगमंचावर तिने यावे याविषयी आग्रही असतानाही ती सामान्य रसिकांप्रमाणे प्रेक्षकांत बसणे पसंत करते. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने असेल कदाचित पण ती पशु – पक्षी – प्राणी यांच्यावर मनापासून प्रेम करते. म्हणूनच कर्जत ते मुंबई हा प्रवास करताना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो तरी ती कटकट करत नाही. उलट कोंबड्यांशी सवाद साधत तिचा प्रवास मजेत पार पडतो.

कृष्णराव खूप बडबड करतात, अनावश्यक गोष्टी लोकांना सांगत बसतात हे तिला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या संवादाची गाडी स्टेजवर घसरली तर ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांना ‘पुरे पुरे’ चे इशारे करते. तिला प्रखर दिव्यांची तसेच लोकांसमोर येण्याची भीती वाटते कारण गावाकडील घरात ती कंदिलाच्या प्रकाशात वावरते. अशी अत्यंत साधी भोळी, पतीला सर्व ठिकाणी मनापासून साथ देणारी पण पतीच्या प्रसिद्धी वलयापासून दूर राहणारी कृष्णरावांची पत्नी सामान्य प्रेमळ स्त्रीचे प्रतिनिधित्व करते.

प्रश्न इ.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लक्ष्यार्थ म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार समजून घेणे. म्हणजे शब्दश: अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ लक्षात घेणे. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला ‘लक्षणा’ असे म्हणतात आणि त्यातून सूचित झालेल्या दुसऱ्या अर्थाला ‘लक्ष्यार्थ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘लक्ष्यार्थ’ या भाषिक संपत्तीचा यथार्थ वापर केला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

‘पायधूळ झाडणे’ याचा सरळ शब्दश: अर्थ म्हणजे पायाला लागलेली धूळ झाडणे. हे वाक्य कृष्णराव यांच्या चाहत्याच्या तोंडी आहे. ट्रेनमध्ये कृष्णराव भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. अतिउत्साहाने तो भर ट्रेनमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो आणि वरील वाक्य उच्चारतो. त्याचा अर्थ ‘तुमच्या पायाची धूळ जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात झाडणार नाही म्हणजेच जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येणार नाहीत, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. असा इशारा तो देतो. म्हणजेच इथे शब्दांच्या मूळ अर्थापक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार सूचित होतो म्हणून हे ‘लक्ष्यार्थ’ भाषिक शक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

11th Marathi Book Answers Chapter 3.1 हसवाफसवी Additional Important Questions and Answers

कृती : २
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘कृष्णराव’ हे नाव ज्या भूमिकेवरून पडले ती भूमिका व नाटक
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 4

प्रश्न 2.
आगरकरांनी प्रसिद्ध केलेले पत्रक – [ ]
उत्तरः
सुधारक

आम्हांला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही ……………………………….. पुरे, पुरे, किती गातोस. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७२)

प्रश्न 3.
नाटक करण्यामागे कृष्णरावांचा हेतू –
उत्तरः
लोकांचं रंजन करणे.

प्रश्न 4.
आगरकर आणि टिळक यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकणारे परिच्छेदातील वाक्य.
उत्तरः
आगरकर व टिळक या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

प्रश्न 5.
नाटकात उल्लेख झालेले थोर नाटककार
[ ] [ ] [ ]
उत्तरः
[गडकरी] [खाडिलकर] [देवल]

स्वमतः

प्रश्न 1.
कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढवणारा प्रसंग तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे संगीत नाटकांमध्ये काम करणारे हरहुन्नरी कलाकार आहेत. राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर इत्यादी नाटककारांनी निर्माण केलेल्या संगीत नाटकात कृष्णराव काम करत असत. त्यांच्या कामाची दखल साक्षात समाजसुधारक आगरकर यांनीही घेतलेली आहे. असे हे हेरंबकर रंगमंचावर उभे रहात तेव्हा लोकांचं मनोरजन करणे हा एकमेव हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असे. समोरचा प्रेक्षक जर दाद देणारा असेल तर त्यांच्यातील गायकाची कळी अगदी खुलून जायची.

शास्त्रीय संगीताच्या तानावर ताना घेत ते पहाटेपर्यंत गात बसत. लोक वन्समोअर म्हणत की यांचा उत्साह अधिक वाढत असे. सौभद्र नाटकात ते कृष्णाची भूमिका करत तर पांडू शिवलीकर रुक्मिणीची भूमिका करत असे. त्यासाठी त्याला एका पायावर भार देऊन उभे रहावे लागे. उभे राहून त्याचा पाय दुखला की तो दुसऱ्या पायावर उभा राही. पण प्रेक्षकांनी दाद दिली की कृष्णराव हेरंबकर थांबतच नसत.

एकच पद अनेक वेळेला आळवत बसत. पांडू बिचारा थकून जात असे. त्यामुळे तो गाणाऱ्या कृष्णरावांना मागून टोचायचा आणि ‘पुरे पुरे ‘ अशी सूचना दयायचा. जेवढे कृष्णराव फॉर्मात यायचे तेवढा त्याचा उभे राहण्याचा कालावधी वाढत असे. त्यामुळे बिचाऱ्याचे पाय खूप दुखत असत. पण कृष्णरावांना त्याचे काही वाटत नसे. प्रेक्षकांना आनंद देणे हे त्यांचे ध्येय असल्याने पांडूच्या सूचनेकडे ते सरळ दुर्लक्ष करून आपले गाणे पुढे रेटत राहायचे.

प्रश्न 2.
मराठी संगीत रंगभूमीविषयी तुम्हांला असलेली माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे. संगीत नाटक लिहिणारे नाटककार हे काव्य आणि नाट्य यांखेरीज संगीत कलेतही प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य जाण असणारे कलाकारच यात भूमिका करू शकतात कारण नाटकाचा बहुतांश भाग हा पदयात असतो. तो भाग कलाकार गाऊन सादर करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

मराठीमध्ये ‘संगीत स्वयंवर,’ ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत देवबाभळी’, ‘संगीत मृच्छकटिक’ अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्या काळात सादर केली गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर असे थोर नाटककार मराठी नाट्यसृष्टीत होऊन गेले. या नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य पार पाडले गेले.

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रांरभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यांनतर ‘सौभद्र’, ‘रामराज्यवियोग’, ‘द्रौपदी’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, संशयकल्लोळ, ‘एकच प्याला’ अशा संगीत नाटकांची पंरपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा सुवर्ण काळ होता.

हसवाफसवी प्रास्ताविक :

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे दिलीप प्रभावळकर एक ख्यातनाम लेखकही आहेत. ‘झपाटलेला’ ‘एक डाव भुताचा’ ‘चौकट राजा’ इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘बोक्या सातबंडे’ ‘चूकभूल दयावी घ्यावी’. इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. ‘बालसाहित्य पुरस्कार’, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘हसवाफसवी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘वासूची सासू’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘जावई माझा भला’ इ. विविध नाटकांमधून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरून अनेक वर्षे लोकांची त्यांनी करमणूक केली आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारखी त्यांची मालिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

हसवाफसवी पाठाचा परिचय :

‘हसवाफसवी’ ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा निखळ आणि निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक एकीकडे लोकांना हसवते व त्याचबरोबर अंतर्मुखही करते. प्रस्तुत पाठात सुप्रसिद्ध गायक आणि नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. या नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी स्वत: वेगवेगळ्या भूमिका साकारून रंगमंचावर धमाल उडवून दिली.

या प्रसंगात कृष्णराव हेरंबकर यांच्या सरकार दरबारी होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झालेल्या एका घरगुती सत्कार समारंभाचे वर्णन येते. कोकणातून अंबुर्डी गाव, मग तिथून एस.टी. ने पुण्याला आणि पुण्याहून ट्रेनने मुंबईपर्यंतचा त्यांचा सपत्नीक प्रवास सुरू आहे. ‘येणार आहेत – यायला निघाले आहेत – आले आहेत’ असा टप्प्याटप्प्याने त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.

या सत्कार समारंभाचे आयोजक – संयोजक वाघमारे हे धांदरट आहेत. त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका त्यांचा धांदटपणा आणखीनच वाढवते. अफलातून कल्पना, प्रसंगनिष्ठ विनोद, शाब्दिक विनोद, संवादात्मकता यांमुळे या नाटकातील प्रंसग रंगतदार झाले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

येण्याजाण्याचा खर्च आणि मानधन म्हणून पैशाची थेली त्यांना देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितलेले असते. त्यामुळे आल्या आल्या ते पहिले आपल्या प्रवासाचा तपशील संयोजकांना पुरवतात. कधी ते पैसे आपल्या हातात पडतील याची त्यांना घाई झाली आहे. त्यांना सत्कार समारंभात पोहोचायला उशीर का झाला असा प्रश्न मोनिका विचारते. त्यावर एक चाहता गाडीत कसा भेटला. त्याने भर गाडीत लोटांगण कसे घातले. त्या प्रक्रियेत त्याचे पाय गुजराती बायकांना लागून त्यांचे फरसाण, पापडी कसे गाडीतच खाली सांडले याचे साग्रसंगीत वर्णन ते मोनिकापुढे करतात.

त्या चाहत्याबरोबर ते त्याच्या कर्जतच्या बंगल्यावर जातात. तिथे भेट म्हणून त्यांना २१ कोथिंबिरीच्या जुड्या दिल्या जातात. खरंतर तो चाहता त्यांना परतीच्या प्रवासाला स्वत:ची डॉज गाडी देणार असतो. पण ती मध्येच पंक्चर होते. मग पुढचा प्रवास ते आणि त्यांची पत्नी कोंबड्यांच्या गाडीत बसून पूर्ण करतात. कोंबड्यांच्या आवाजाने हेरंबकरांचे डोके उठते तरी पत्नी मात्र मजेत कोंबड्यांबरोबर संवाद साधत असते.

कृष्णराव त्यांनी केलेल्या अजरामर भूमिकांची माहिती मोनिकाला देतात. मध्ये मध्ये शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोद निर्माण करून गंमत उडवून देतात. मोनिका जो प्रश्न विचारते त्याला थेट उत्तर न देता स्वत:ला हवे तेच म्हणणे सतत पुढे दामटत राहतात. बोलण्याच्या ओघात स्वत:च्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगून टाकतात. इतकेच नव्हे तर आपल्या गायकीचे प्रदर्शन करून सर्वांना खुश करतात.

हसवाफसवी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

सत्कार – आतिथ्य, मानपान (honour), सोहळा – उत्सव (festive ceremony), तसदी – त्रास (trouble, pain), पांघरणे – अंगावर घेणे (to cast loosely around the body, to cover), प्रवासभत्ता – प्रवासखर्च (travelling allowance), चाहता – कलाकारावर, कलाकाराच्या कलेवर प्रेम करणारा (fan), कंदिल – दिवा (lantern), फाफलणे – बोलताना भलतेच शब्द मुखावाटे बाहेर येणे. भग्नावशेष – नष्ट झालेला, उरलेला भाग (broken, shattered remaining part) आहार – खाणे, पथ्य (food, diet), आत्मचरित्र – जीवनचरित्र (biography), कलकलाट – गोंधळयुक्त आवाज (a great confused noise), जबरदस्ती – बळजबरी (great force).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

हसवाफसवी वाक्प्रचारः

आत सटकणे – आतल्या बाजूस निघून जाणे, थोतरीत लावून देणे – थोबाडीत देणे, हर्षवायू होणे – आनंद होणे, चमत्कारिक वाटणे – ओशाळवाणे वाटणे, लाजल्यासारखे होणे, पायधूळ झाडणे – प्रवेश करणे, कलकलाट करणे – गोंधळ करणे, डोकं उठणे – डोकं दुखणे, कानपटीत मारणे – थोबाडीत मारणे, पथ्य पाळणे – आहाराच्या संदर्भात विशिष्ट काळजी घेणे किंवा आहाराविषयी विशिष्ट नियम पाळणे, मश्गूल होणे – मग्न होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

11th Marathi Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –
1. शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
2. शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
3. शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
4. शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
उत्तर :
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.

प्रश्न आ.
हिरवे धागे म्हणजे –
1. हिरव्या रंगाचे सूत.
2. हिरव्या रंगाचे कापड.
3. हिरव्या रंगाचे गवत.
4. ताजा प्रेमभाव.
उत्तर :
हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न इ.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे –
1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
2. हातातून निसटणारा पारा.
3. पाऱ्यासारखा चकाकणारा.
4. पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.
उत्तर :
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.

प्रश्न ई.
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे –
1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
2. काळ्या मेघांप्रमाणे.
3. आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे.
4. आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे.
उत्तर :
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.

2. अ. प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.

प्रश्न 1.
1. प्रेयसीचे नाव काय?
2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
4. ती कुठे राहते?
5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
उत्तर :
1. ती वळून पाहणे का विसरली असावी?
2. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
3. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
4. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
5. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

आ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी दयावी?
उत्तर :
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची दयावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

प्रश्न 2.
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्याकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
उत्तर :
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणि गोंदाव्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न 3.
विरल, सुंदर अभे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
उत्तर :
दवांत आलिस भल्या पहार्टी
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा

3. अ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
कवीची प्रेयसी केव्हा आली?

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
उत्तर :
कवीची प्रेयसी भल्या पहाटे आली.

प्रश्न आ.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
उत्तर :
डोळ्यांना कवीने डाळिंबांची उपमा दिली आहे.

प्रश्न इ.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
उत्तर :
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न ई.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
उत्तर :
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत ‘कोमल’ आणि ‘ओल्या’ अशी दोन विशेषणे आली आहेत.

प्रश्न उ.
‘अनोळख्याने’ हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
उत्तर :
‘अनोळख्याने’ हा शब्द प्रियकर / कवीसाठी वापरला आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं 1
उत्तर:

कवितेचा विषयकवितेची मध्यवर्ती कल्पनाकवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूहकवितेतील छंद
प्रेम कविताप्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीशुक्राच्या तोऱ्यांत, हिरवे धागे, शुभ्र चांदण्या, अभ्रांची शोभा, तळहाताच्या नाजूक रेषामुक्त छंद

4. काव्यसौंदर्य :

प्रश्न अ.
‘डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! ‘ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा,
उत्तर :
प्रेयसीच्या मनातील स्नेहाची, प्रेमाची भावना कवीला आपल्या नजरेतून टिपता येतेय. तिच्या मनातील प्रेमसुलभ गुलाबी डाळिवी भावना तिच्या नजरेतूनही स्पष्ट दिसत आहेत. पण त्या भावना व्यक्त होत नाहीत, त्या केवळ डोळ्यातूनच जाणता येत आहेत. डाळिंबाचे दाणे जसे पारदर्शी असतात तसंच तिच्या मनातील भावनाही पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत, त्या प्रियकराला (कवीला) तिच्या डोळ्यांच्या पायाला पकडताही येत नाहीत. पारा जसा अस्थिर असतो तसंच तिच्या डोळ्यातील त्या प्रेमभावना कवीला पकडता येत नाही आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न आ.
‘जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा,’ या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
प्रेयसी पहाटेच्या प्रहराला कवीच्या मनात प्रकट झाली. तिचे लावण्य शुक्राच्या ताऱ्यासारखे होते. ती लावण्यवती असल्यामुळे तिच्याकडे साहजिकच कवीचे लक्ष गेले, तिच्यावर खिळून राहिले. तिच्या सौंदर्याचा वेध घेत घेत तिच्या डोळ्यांमधील भावही कवी जाणून घेतो. त्या डोळ्यांमधील उत्सुकता, अधीर भाव, ओढ कवी मनातच ठेवतो. ती येते ओळख घेऊन आणि जाताना अनोळखी असल्यासारखं भासवते. पण जाताना ती त्या दोघांच्या आत्मीयतेमध्ये एक मंद गंध पेरून जाते. तो गंध प्रेमाचा असावा.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर :
बा.सी, मकर लिखित ‘दवांत आलिस भल्या पहार्टी’ या कवितेत प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे स्वप्नरंजक वर्णन आहे. पहाटेच्या प्रहराला अभ्रांच्या कोषातून जशी शुक्राची चांदणी बाहेर पडते. त्याप्रमाणे कवीच्याही मनी असलेली ती शुक्राची चांदणी आहे. या कवितेतील प्रेयसी प्रत्यक्षात साकार झालेली असेल वा नसेल पण तिची ओढ मात्र कवीला आहे. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? या गीतासारखाच भाव या कवितेत आवळतो. तिची आणि त्याची भेट काल्पनिक असावी. ही काल्पनिक भेटही मात्र कवीच्या मनावर राहण्याजोगी आहे.

तिचे सौंदर्य न्याहाळताना कवी तिच्या नजरेतील भाव शोधतो पण तिने ओळख असूनही अनोळखी असल्यासारखे भासवले आहे. ही मनात साकार केलेल्या प्रेयसीबद्दलची भावना कवी प्रत्यक्षात कवितेतून प्रकट करतो. त्या शुक्राच्या चांदणीचे अस्तित्वच नाही पण ती स्वप्नपातळीवर दिसते. तिचे सौंदर्य लोभसवाणे आहे. तिच्या डोळ्यांमधील छटा पाऱ्यासारख्या आहेत. मुळातच न भेटलेल्या प्रेयसीबद्दलचे कल्पनामय चित्रण अनुभव आल्यासारखे कवीने दृश्य चित्रण उभे केले आहे. हेच या कवितेचे अनोखेपण आहे.

6. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर :
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही बा.सी. मर्डेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. पण हे प्रेम भासआभासाच्या रेषेवर असणारे आहे. बा.सी.मर्डेकर यांनी कवितेत नवीनता आणताना अनेक प्रयोग केले. कवितेचे शीर्षकच पाहता ते समजून येते. ‘पहाटे’ असं न म्हणता ‘पहाटी’ असा शब्द उपयोजून एक नवीन शब्द साहित्यात रूढ केला असे म्हणावे लागेल.

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत. बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल. तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते.

ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदर्याने उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावन गेले. चालता चालता तिच्या पावलांच्या खणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या, त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती.

प्रेयसीच्या चालण्यातच तोरा असं म्हटल्यामुळे ती सौंदर्यवती असल्याचं स्पष्ट होतं, तिच्या मनातील प्रेमभाव कवीच्या मनात पेरताना त्याला जाणवलेली तरलता तो ‘पेरत गेलीस तरल पावलांमधली शोभा’ असे म्हणतो. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. या कडव्यात कवीने दोन ओळी नंतर एकाच शब्दाची एक ओळ घेऊन त्याच्या मनातील ओढ व्यक्त करण्याचा यत्न केला आहे. तसंच हिरवे धागे या शब्दातून नात्यातील हिरवेपणा स्पष्ट केला आहे. हिरवे हे विशेषण वापरून त्या नात्यातील कोवळीकता, ताजेपणा स्पष्ट केला आहे.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर थेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हदयापर्यंत पोहोचत होता. या कडव्यात कवी प्रेयसीच्या डोळ्यातील प्रेमभावना खट्याळपणा दाखवताना त्याला डाळिंबाच्या दाण्यांची उपमा देतो. डाळिंबाचा रंग जसा बी असतो.

हा गुलाबी रंग तिच्या डोळ्यातही दिसतो. तिच्या नजरेतील प्रेमसूचकता पाऱ्यासारखी असल्यामुळे ती त्याला टिपता येत नाही आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं बरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावना याच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

आपल्या मनातील भावभावना स्पष्ट करताना कवी त्या आठवणींना कोमल ओल्या आठवणी म्हणतो. त्यातील ओलाया, जिव्हाळा हा कोमल ओल्या या शब्दातन प्रकट होतो. एथल्याच हा बोलीभाषेचा शब्द वापरून कवी आणखी एक नवा प्रयोग करू पाहतोय…कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे, त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लज्जेमुळे आलेला असावा, प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत, ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

प्रेयसीच्या मनातील नाजूक भाव अधोरेखित करताना तिच्या नखांवरही ते गुलाबी भाव उमटल्याचे स्पष्ट करतो. आकाशात तर चांदण्या असतातच पण तिच्या हातावरही त्या चांदण्यांचा स्पर्श झालेला आहे. असा भाव व्यक्त करताना शुभ्र चांदण्या (स्नेहाच्या) कुणी गोंदाव्या असे म्हणतो. त्यातून प्रियकराची तरल संवेदना प्रकट होते.

पहाटेच्या दांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

जो अनुभव घेता आला नाही पण त्याची अनुभूती अप्रत्यक्ष स्वरूपात मिळाली ते प्रकट करताना कवी ती पहाटे आल्याचं म्हणतो. अभ्रांची शोभा ही सुद्धा नवीन कल्पना कवीने मांडलेली आहे. प्रेमाचा रंग, गंध असतो तो तरल संवेदनांच्या लोकांनाच जाणवतो. कवीला तो जाणवतो.’ ते व्यक्त करण्यासाठी कवी ‘मंद पावलांमधल्या गंधा’ असं म्हणतोय. त्या पावलांनांही गंध प्राप्त झाला, त्या वाटेला आणि मनातील प्रीतीलाही ‘गंध’ या शब्दाचे गंधा हे सामान्य रूप वापरून ‘एकदा’ या शब्दाशी लय साधण्याचा यत्न केलेला आढळतो.

विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

11th Marathi Book Answers Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित पदव पंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवयित्री पेरित गेली. → [ ]
उत्तर :
कवयित्री पेरित गेली. → तरल पावलांमधील शोभा

खाली दिलेल्या शब्दाला कवितेत आलेले विशेषण लिहा.

प्रश्न 1.
धागे : [ ]
उत्तर :
हिरवे

उपयोजित कृती

खालील अर्थांसाठी कवितेते वापरलेले शब्दः

प्रश्न 1.
1. ध्येय –
2. तहान –
उत्तर :
1. लक्ष्य
2. पिपासा

प्रश्न 2.
सुंदरतेचा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
प्रेयसीने कसला इशारा दिला?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
“वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे ?” या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर :
कवी बा.सी मेढेकर यांच्या ‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही कविता प्रेमानुभव व्यक्त करणारी कविता आहे. प्रियकराच्या मनात रेखलेली एखादी सुंदर स्त्री त्याने कवितेच्या माध्यमातून साकार केली आहे. चित्रकार जसं एखादया सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटतो तसं कवीने शब्दांच्या माध्यमातून त्याची प्रेयसी रेखाटली आहे. ती आहे-नाही च्या सीमारेषेवर आहे. शुक्राच्या ताऱ्यासारखं तिचं लखलखीत सौंदर्य आहे. ती जाताना तिच्या तोऱ्यांनी प्रियकराचे काळीज वेधून घेते. जाता जाता ती हसते.

त्या हसण्यातूनच तिलाही प्रियकराला साद दयायचीय असा अर्थ सूचित होतो. पण पुन्हा तिचा नखरा, हावभाव बदलतात, ती त्याला दुर्लक्षून पुढेच जाते. तिच्या या वागणुकीवरून त्याचा गोंधळ होतो. त्यामुळे तो गोंधळून विचारतो की तू मागे वळून पहायचे विसरलीस की काय ? आपले एकमेकांशी जे सुंदर नात्याचे धागे जुळलेले आहेत ते कसे काय विसरून गेलीस. त्या धाग्यांना कवी हिरवे धागे म्हणतो. हिरवा रंग उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, सुंदरता जपणारा आनंद देणारा तसंच तुझ्या माझ्यातील हिरवं नातं आहे. या नात्याला सुंदर करण्यासाठी कवी आतुर आहे.

दवांत आलिस भल्या पहाटीं Summary in Marathi

प्रस्तावना:

विसाव्या शतकातील भारतीय साहित्यविश्वातील एक सिद्धहस्त कवी म्हणून बा.सी. मर्डेकर प्रसिद्ध आहेत. कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, असलेल्या मर्नेकरांची कविता भावोत्कट तरीही चिंतनशील, मानवी जीवनातील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी तसेच प्रयोगशील होती, त्यांचे ‘शिशिरागम’ ‘कांही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे कवितासंग्रह ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’ व ‘पाणी’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, काव्यविषयक त्यांच्या प्रगल्भ जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप पूर्णतः पालटून टाकले, काव्यक्षेत्रात केशवसुतांनंतर मेढेकरांनी महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले.

कवितेचा आशय :

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत.

बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल, तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट ही प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते. ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदयनि उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावून गेले.

खुणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या. त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाचवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर घेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हृदयापर्यंत पोहोचत होता.

तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर | गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं वरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावनाच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे. त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लग्नेमुळे आलेला असावा. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत. ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

पहाटेच्या दवांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली, प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  • पहाट – सकाळ, प्रभात – (morning, dawn).
  • लक्ष्य – ध्येय – (target, aim).
  • पिपासा – तहान – (thirst).
  • तरल – चंचल – (tremulous, quivering).
  • निर्मल – स्वच्छ – (clean, pure).
  • अभ्र – आभाळ, मेघपटल – (cloud, cloudy sky).
  • पारा – एक पातळ खनिज पदार्थ – (mercury).
  • शुभ्र – सफेद – (white, clean).
  • धागा – दोरा – (thread)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.1 सूत्रसंचालन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

11th Marathi Digest Chapter 4.1 सूत्रसंचालन Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
उत्तरः
सूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो बोलताना कुठेही अडखळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची भाषा साधी, सोपी व श्रोत्यांना समजणारी असावी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

अतिशय बोजड किंवा फार आलंकारिक भाषेचा वापर करू नये. सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असावे. त्याचा व्यासपीठावरील वावर आत्माविश्वासपूर्ण असावा. कार्यक्रमात निवेदन करताना व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मानपूर्वक परिचय करून देण्याचे व त्यांचा यथोचित नामोल्लेख व त्यांना अभिवादन करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असणे गरजेचे आहे. कार्यक्रमात समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिस्किलपणा असावा.

कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करताना तो लीलया आणि सहजपणे करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असावे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार असल्याने वक्ते, कलावंत यांना प्रोत्साहित करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. समोरचा वयोगट लक्षात घेऊन भाषाशैली, उदाहरणे, काव्यपंक्ती यांचा सुव्यवस्थित वापर करावा लागतो. आवाजाबरोबरच ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव असणे अपेक्षित आहे.

कार्यक्रम हा बंदिस्त सभागृहात आहे की खुल्या मैदानावर यावर सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून त्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. उत्तम सूत्रसंचालक हा चांगला निवेदक, वक्ता असावा. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालकाला तो-तो विषय समजला पाहिजे. उदा. सांगितिक कार्यक्रमात संगीताची जाण त्याला असणे गरजेचे आहे. सूत्रसंचालकाचे भाषेवर प्रभुत्व असावे.

सूत्रसंचालकाचा उदंड आत्मविश्वास हा त्याच्या सूत्रसंचालनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सूत्रसंचालकाकडे प्रवाही भाषा, आत्मविश्वास, समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यासंग, देहबोली ही गुणवैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे आणि याच कौशल्यांतून तो उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतो.

प्रश्न 2.
‘वसुंधरा दिनानिमित्त’ होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका तयार करा.
उत्तरः

जागतिक वसुंधरादिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम पत्रिका

दि. २२ एप्रिल

  • पूर्वकथन :
  • दीपप्रज्वलन :
  • वसुंधरा गीत :
  • पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत :
  • प्रास्ताविक :
  • ‘चला वसुंधरा वाचवू या’ शपथः
  • मा. उद्घाटक मनोगत :
  • स्पर्धकांचे सादरीकरण :
  • परीक्षकांचे मनोगत :
  • स्पर्धेचा अंतिम निकाल :
  • पारितोषिक वितरण :
  • मा. अतिथी मनोगत :
  • अध्यक्षीय मनोगत :
  • आभारप्रदर्शन :

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

प्रश्न 3.
‘सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
कोणत्याही कार्यक्रमाचा मुख्य आधार ही त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका असते. कार्यक्रम पत्रिका ही संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणारी असते. कार्यक्रम पत्रिका ही कार्यक्रमाची खरी ओळख व त्याचे स्वरूप मांडणारी असते. कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढे-पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेची अस्सल ओळख असणे गरजेचे असते. सूत्रसंचालकाला कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी कार्यक्रम पत्रिका समजून घेणे गरजेचे असते.

प्रत्येक कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका वेगळी असते. त्याची संहिता वेगळी असते. कार्यक्रम पत्रिकेतील घटकांनुसार कार्यक्रम पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेमुळे कार्यक्रमाची मांडणी, गुंफण करणे सोपे जाते.

कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकाला त्याचे निवेदन करताना मार्गदर्शक ठरते. कोणता भाग झाल्यावर पुढे काय करायचे याची दिशा देण्याचे काम सोपे होते. दोन भाग, कार्यक्रम जोडण्याची संधी सूत्रसंचालकाला मिळते. कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार कार्यक्रम पुढे-पुढे नेता येत असल्याने सूत्रसंचालकाला फार मेहनत घ्यावी लागत नाही. थोडक्यात कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असते.

कार्यक्रम पत्रिका नसेल तर सूत्रसंचालकाला सूत्रसंचालन करणे अवघड होईल. कार्यक्रम पत्रिकेशिवाय कार्यक्रम पुढे कसा न्यायचा? कशानंतर काय? अशी संदिग्धता सूत्रसंचालकाच्या मनात निर्माण होऊन ऐनवेळी कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो हे टाळण्यासाठी सूत्रसंचालकाच्या हाती कार्यक्रम पत्रिका असणे गरजेचे आहे. म्हणून कार्यक्रम पत्रिका ही कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते.

विशेष म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या सूत्रसंचालकाने संबंधित कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करणे अभिप्रेत असते. त्यामुळे तो संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालकाला समजणे सापे जोते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

प्रश्न 4.
‘सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते’, या विधानाची सत्यता
पटवून दया.
उत्तरः
कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता ही त्याच्या पूर्वतयारीवर अवलंबून असते. सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तर उत्तम सूत्रसंचालन होऊ शकते. सूत्रसंचालकाला पूर्वतयारी करताना चौफेर वाचन करायला हवे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत सर्वच क्षेत्रांची माहिती असली तर चांगली तयारी करून सूत्रसंचालनात आपली छाप पाडता येते. पूर्वतयारी नसेल, त्या त्या क्षेत्राची माहिती नसेल तर सूत्रसंचालन प्रभावी होणार नाही. पूर्वतयारी करताना कवितेच्या ओळी, अवतरणे, विनोद यांचा संग्रह सूत्रसंचालकाकडे असेल तर कार्यक्रमाच्या वेळी उपयोगी पडतो.

शब्दफेक, भाषेवर प्रचंड प्रभुत्व या सूत्रसंचालकाच्या जमेच्या बाजू आहेत. त्याची तयारी असेल, सराव असेल तर सूत्रसंचालन उत्तम होते. तयारी करताना देहबोली, सभाधीटपणा, आवाजाची लय, श्वासावर नियंत्रण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमातील सूत्रसंचालन बघून सराव करता येतो. आपल्यातील त्रुटी, उणीवा दूर करता येतात. या सर्व गोष्टी एका दिवसात आत्मसात करता येत नाहीत. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सूत्रसंचालनात ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव करावा लागतो. ध्वनिवर्धक किती अंतरावर असावा.

आवाजातील चढ उतार, लय यांचा अभ्यास करून तयारी केली तर एकूण चांगला परिणाम साधता येतो. थोडक्यात कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी कार्यक्रमाचे स्वरूप, विषय, श्रोता, ठिकाण या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून पूर्वतयारी केली तर कार्यक्रमात अतिशय प्रभावी व उठावदार सूत्रसंचालन करता येते.

प्रकल्प.

प्रश्न 1.
कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या कविकट्ट्यासाठी सूत्रसंचालनाची संहिता तयार करून सादरीकरण करा.
उत्तरः
प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करा.

11th Marathi Book Answers Chapter 4.1 सूत्रसंचालन Additional Important Questions and Answers

कृती : २ आकलन कृती

1. खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
पुढील आकृतिबंध तयार करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

सूत्रसंचालन : एक वलयांकित ………………………………….. सामान्यज्ञान अदययावत राहते. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८९)

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 4.

प्रश्न इ.
कारण लिहा.
अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण ….
उत्तरः
अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत.

प्रश्न ई.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 5
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 6

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

स्वमत :

प्रश्न  1.
“सूत्रसंचालन – एक वलयांकित व्यवसाय’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
आज युवक-युवती यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. बदलत्या काळाची पाऊले ओळखून अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मळलेल्या वाटा सोडून नवनवीन क्षेत्रे आज युवक-युवतींना खुणावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रत्येक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. या कार्यक्रमांतून सूत्रसंचालकाला चांगले मानधन तर मिळतेच पण त्याचबरोबर स्वत:ची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होते.

सार्वजनिक कार्यक्रमाबरोबरच आज दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रम सादर होतात. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम, रिअॅलिटी शो, पुरस्कार प्रदान सोहळे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या सादरीकरणात सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. किंबहुना काही कार्यक्रम सूत्रसंचालकाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले आहेत. पूर्वीच्या काळी सूत्रसंचालन केवळ छंद, हौस, आवड म्हणून केले जाई.

पण आज सूत्रसंचालन केवळ छंद न राहता तो एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. पूर्ण वेळ सूत्रसंचालन करणाऱ्या अनेक सूत्रसंचालकांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवित आहेत. थोडक्यात सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. या व्यवसायातून अनेकांना प्रतिष्ठा, सन्मान व उत्तम करिअरचा मार्ग खुला झाला आहे.

स्वाध्यायासाठी कृती खालील कृती करा.

(१) खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण व श्रवण कौशल्ये कशी विकसित करता येतील ते लिहा.

  • व्याख्याने, मुलाखती आस्वाद
  • शक्तीस्थळे, त्रुटी, अभ्यास
  • दूरचित्रवाणी
  • आकाशवाणी कार्यक्रम
  • नामवंत सूत्रसंचालक शैली
  • यु ट्यूब
  • स्वत:ची निवेदन शैली

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

(२) उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक बाबी तुमच्या शब्दात लिहा.
(३) ‘राष्ट्रीय साक्षरता दिन” निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा.
(४) प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाने कोणती पथ्ये पाळावीत स्पष्ट करा.

कृती-१. सरावासाठी काही कार्यक्रम पत्रिका नमुने.

शिक्षकदिन समारंभ

  • पूर्वकथन
  • दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यान
  • मान्यवरांचे मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ

  • पूर्वकथन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • गुणवंत विदयार्थी सत्कार
  • मनोगत
    • गुणवंत विदयार्थी
      १ ……………….., २ ………………..
    • मान्यवर मनोगत
      १ ……………….., २ ………………..
  • प्रमुख अतिथी मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

कृती-२.

प्रश्न 1.
‘गुरुपौर्णिमा’ या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचा नमुना तयार करा.
उत्तरः
महाविदयालयात संपन्न झालेल्या ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालन नमुना पुढीलप्रमाणे –

कार्यक्रमपत्रिकासूत्रसंचालकाचे निवेदन
मान्यवरांचे व्यासपीठावर आगमनसुस्वागतम्! सुस्वागतम् !
………….. एज्युकेशन संस्थेचे, नूतन कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालयात आज गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व आपल्याला शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांचे मी, (स्वतःचे नाव ………………………..) मन:पूर्वक स्वागत करतो/करते.
विदयार्थी मित्र, मैत्रिणींनो आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवसालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
महर्षी वेदव्यास यांना आदयगुरु म्हणून संबोधले जाते. वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे व महाभारत ग्रंथाचे लेखन महर्षी व्यासांनी केले. महान, ज्ञानी व्यासमुनींना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा एक महत्त्वपूर्ण दिवस.
आपले आई-वडील हे आपले आयगुरु. बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. शालेय जीवनापासून आपले शिक्षक आपल्याला ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवतुल्य मानले आहे. ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘आचार्य देवो भव’ चा संस्कार आपल्या मनावर आहे. म्हणूनच कार्यक्रमाच्या प्रारंभी देवरूपातल्या गुरुंची सर्वजण मिळून प्रार्थना करूया.
गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन करून पुन:श्च एकवार उपस्थित सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
अध्यक्षीय सूचनाकार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी (GS) ………………………..
अनुमोदनअध्यक्षीय सूचनेस अनुमोदन देत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाची विदयार्थिनी प्रतिनिधी (LR) कु. ………………………..
गुरुंना मानवंदनाआजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सन्माननीय जगदीश खेबुडकरांच्या लेखणीतून साकारलेले, प्रभाकर जोग यांनी संगीत साज चढविलेले, अनुराधा पौडवाल व सुधीर फडके यांनी गायलेले ‘कैवारी’ चित्रपटातील एक अजरामर गीत.
“गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” आपल्या गुरुजनांना गीतरूपात मानवंदना देत आहेत इ. ११वी विज्ञान वर्गातील विदयार्थीनी, कु. …………., कु. …………., कु. …………., कु.
ज्ञानरूपातला हा वारसा समर्थपणे मला, तुम्हाला नव्हे आपल्या सर्वांना पुढे चालवायचा आहे. ज्ञानसंपन्न होऊन राष्ट्राच्या प्रगतीत आपल्यालाही खारीचा वाटा उचलायचा आहे.
प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलनआजच्या कार्यक्रमाचे तथा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे, कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्मा. संजयजी थोरात सर व व्यासपीठावरील इतर मान्यवर यांना विनंती आहे की, विदयेची देवता सरस्वती व महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून, दीपप्रज्ज्वलन करावे.
धन्यवाद सर! Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. ‘गुरु बिन कौन बताये बाट, बड़ा विकट यमघाट’ अशा परिस्थितीत योग्य रस्ता दाखवण्याचे काम आपले गुरुजन, प्राध्यापक करीत असतात.
स्वागत व प्रास्ताविकव्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्माननीय संजयजी थोरात सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर.
भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा आपण आम्हास ज्ञात करून दिली. एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
मान्यवरांचा व गुरुजनांचा सत्कार….संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांचा सत्कार महाविदयालयाचे प्राचार्य संजयजी थोरात सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय अशोकराव कडलग यांचा सत्कार उपप्राचार्य शिंदे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
महाविदयालयाचे प्राचार्य माननीय संजयजी थोरात सरांचा सत्कार कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी संदीप पाटील याने करावा अशी मी त्यास विनंती करतो.
विदयार्थी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व्यासपीठावर व विदयार्थ्यांमध्ये बसलेल्या गुरुवर्यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन जागेवर जाऊन करावा अशी सर्वांना विनंती आहे.
मनोगतकनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. शिंदे सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर!
पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा प्रकाश. गुरु वा शिक्षक आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश दाखवून परिपूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न करतात हेच खरे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांना विनंती आहे की, त्यांनी आम्हांस मार्गदर्शन करावे. धन्यवाद अध्यक्ष साहेब! Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
जीवनातील गुरुंचे, शिक्षकांचे महत्त्व आपण अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. माऊली ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सद्गुरु सारीखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी’ संसारसागरातून तरून जाण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात तर आपले शिक्षक, प्राध्यापक ज्ञानसागर तरून जाण्याचा, योग्य ज्ञानाचा मार्ग दाखवतात हेच खरे!
आभार प्रदर्शनआभाराचे भार कशाला
सत्काराचे हार कशाला
हृदयामध्ये घर बांधूया
त्या घराला दार कशाला
मनात राहू परस्परांच्या
तिसऱ्याचा आधार कशाला :-
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. वाकचौरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
पसायदानकार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने होत आहे. पसायदानासाठी सर्वांनी हात जोडून बसावे.
सूचना : यानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे कोणतेही तास होणार नाहीत. उदया नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार वर्गांचे तास होतील.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!!!

सूत्रसंचालन प्रास्ताविक:

जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम सादर केला जातो तेथे तेथे सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका असते. आजच्या युगात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांची नेटकेपणाने व सुव्यवस्थितपणे मांडणी करणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची उंची वाढून तो श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. कोणत्याही कार्यक्रमाचा आलेख चढता ठेवण्यासाठी सूत्रसंचालक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. ‘नियोजित कार्यक्रमात प्रेक्षकांपुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी मधूनमधून क्रमश: केलेले निवेदन म्हणजे सूत्रसंचालन होय.’ एखादा नियोजित कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने व कुठेही तुटकपणा न जाणवता सलगपणे शिस्तबद्धतेने पूर्ण करणे हे खरे सूत्रसंचालकाचे कौशल्य असते.

प्रत्येक कार्यक्रमात खर तर सूत्रसंचालक हा दुवा असतो दोन घटकांना जोडणारा. कार्यक्रमाचे स्वरूप, वक्ते, व्याख्याने, कलावंत या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचे काम सूत्रसंचालक करत असतो. पण अनेकदा एखादा कार्यक्रम यशस्वी होतो तो मुख्य कार्यक्रमाबरोबरच सूत्रसंचालकाच्या अप्रतिम निवेदनाने आणि सादरीकरणाने. कधी कधी कार्यक्रमापेक्षा सूत्रसंचालकच त्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरत असतो तो त्याच्या प्रतिभेने.

  • सूत्रसंचालन ही कला आहे तसेच शास्त्रही आहे. कार्यक्रमाचे स्वरूप, क्रम, औपचारिकता, श्रोत्यांचा वयोगट, कार्यक्रमाचे रसग्रहण या दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे.
  • सूत्रसंचालकाच्या शब्दोच्चारात स्पष्टता अधिकाधिक हवी. आवाजातील आरोह – अवरोहाने शब्दांतील भाव – भावनांचा अचूक परिणाम साधला जातो. कार्यक्रमात स्वत: न गुंतता श्रोत्यांना कार्यक्रमात रंगवून कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य सूत्रसंचालकात असावे.
  • केवळ कार्यक्रमाचे स्वरूप, व्यक्तींचा उल्लेख करून कार्यक्रम पुढे न नेता अतिशय प्रभावी, अल्प प्रस्तावनेतून वक्ता, कलावंत यांना सादरीकरणासाठी प्रेरणा देणे. त्यांना प्रोत्साहित करून कार्यक्रम खुलविणे हे सूत्रसंचालकाचे खरे कौशल्य असते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : वेगवेगळ्या क्षेत्रांत श्रोत्यांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. सभा, संमेलनांपुरते मर्यादित असणारे सूत्रसंचालनाचे क्षेत्र आज व्यापक स्वरूपात, विविध कार्यक्रमांत दिसून येते. स्नेहसंमेलने, परिसंवाद, मेळावे, बैठका, पारितोषिक वितरण, नाट्यसंमेलन, ग्रंथप्रकाशन, वाढदिवस इ. कार्यक्रमात सूत्रसंचालन आवश्यक झालेले दिसून येते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, शासकीय, कौटुंबिक, व्यवसाय, धार्मिक, आरोग्य, क्रीडा, कला संगीतविषयक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी. सूत्रसंचालनाचे कार्यक्रम : चर्चासत्रे, संमेलने, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, निरोप समारंभ, वाढदिवस, वर्धापनदिन, विवाह सोहळे, परिसंवाद, कार्यशाळा, उद्घाटन समारंभ, गौरव समारंभ, मेळावे, जयंती, स्मृतिदिन, स्पर्धा, काव्यमैफील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

‘सूत्रसंचालन : एक वलयांकित व्यवसाय’ : छंद किंवा हौस म्हणून सूत्रसंचालन करता करता अनेक निवेदक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. उत्तम सूत्रसंचालन करता करता त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. अनेक कलावंत उत्कृष्ट निवेदन करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अनेकांसाठी उत्तम व्यवसाय व रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झाले आहे.

सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी : उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी श्रवण, वाचन, चिंतनशीलता, सराव यांची आवश्यकता असते.

वाचन : सूत्रसंचालकाचे वाचन चौफेर हवे. वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी, काव्य, नाटक ललित, नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे यांच्या वाचनातून शब्दसंग्रह व वाक्याची जुळणी सहजपणे करता येते. वाचन करताना महत्त्वाचे प्रसंग, सुवचने, किस्से यांची टिपणे काढावीत. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू भाषेतील काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचा संग्रह करून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. त्यांच्या वापराने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुलविता येते.

श्रवण आणि निरीक्षण : सूत्रसंचालन करण्यापूर्वी सूत्रसंचालकाने विविध क्षेत्रांतील सूत्रसंचालनाचे कार्यक्रम पहावेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करावा. आकाशवाणी, दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांतील सूत्रसंचालन मार्गदर्शक ठरत असते, त्यांचा अभ्यास करावा. प्रभावी निवेदक, सूत्रसंचालक यांच्या कार्यक्रमाच्या निरीक्षणातून त्यांची शैली, आत्मविश्वास, सहजता, शब्दफेक, प्रसांगावधान, सभाधीटपणा ही कौशल्ये सूत्रसंचालकाला शिकता येतात.

आवाजाची जोपासना : सूत्रसंचालकाचा आवाज हा भारदस्त असावा. प्रकट वाचन, पठन, अभिवाचन, कविता वाचन यांमधून उच्चारातील स्पष्टता, आवाजातील आरोह-अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची ताकद हीच सूत्रसंचालकाची जमेची बाजू असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम यांचा उपयोग होतो.

ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव : सूत्रसंचालन करताना ध्वनिवर्धकाचा सराव असावा. कार्यक्रम सभागृह किंवा खुले मैदान यांत असेल तर आवाजाचे स्वरूप बदलावे लागते. त्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्यात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यास सूत्रसंचालक म्हणून प्रभुत्व मिळविता येते.

सूत्रसंचालन करण्यापूर्वीची तयारी :

  • कार्यक्रमाचा विषय, वेळ, स्थळ, स्वरूप, अध्यक्ष, अतिथी, श्रोता, कलावंत इत्यादींबाबत सविस्तर माहिती मिळवावी.
  • कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.
  • कार्यक्रमाचा श्रोतृवर्ग, त्यांची आवड, वयोगट यांचा अभ्यास करावा
  • निवेदनाची तयारी करावी. काव्यपंक्ती, संदर्भ, अवतरणे सुभाषिते, चुटके यांचा वापर करावा पण त्यांचा अतिरेक नको.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

सूत्रसंचालन करताना घ्यावयाची काळजी :

  • कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांना अभिवादन करून श्रोत्यांना कार्यक्रमाकडे आकर्षित करावे.
  • व्यासपीठावर सर्व अतिथींचा योग्य पदानुसार आदरपूर्वक नामोल्लेख करावा.
  • निवेदनात सहजता, स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ-उतार, आत्मविश्वास, प्रभावी निवेदन शैली असावी.
  • समयसूचकता, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान असावे.
  • भाषा साधी, सोपी, प्रवाही असावी.
  • निवेदनात पाल्हाळ नसावे तसेच त्यात अनावश्यक हालचाली नसाव्यात.
  • आत्मप्रौढी टाळावी, वाक्ये, शब्दांची पुनरुक्ती नको.
  • एखादया त्रुटीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी.
  • वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये.

उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी वाचन, चिंतन, निरीक्षण, सराव, आत्मविश्वास यांची आवश्यकता असते. चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, आवड यांतून सूत्रसंचालन फुलविता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 5 परिमळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

11th Marathi Digest Chapter 5 परिमळ Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 6

आ. खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 7
उत्तर :

घटनापरिणाम
1. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणेसंगीत वाहू लागणे
2. प्राजक्ताची कळी उमलणेसुगंध दरवळणे
3. जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे.शब्द जीभेवर लीलया येणे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

इ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 8
उत्तर :

मुद्देमाणूसप्राणी
1. वर्तणूककृतघ्नकृतज्ञ
2. इमानिपणास्वार्थीनिःस्वार्थी

ई. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

प्रश्न 1.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे
उत्तर :
1. ‘पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन’

2. ‘आधी हाताला चटके,
तव्हा मियते भाकर’ ‘नही ऊन, वारा थंडी,
आली पंढरीची दिंडी’

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न 2.
बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता
उत्तर :

  • गाय न् म्हैस चारा खाऊन दूध देतात – दूध देणे
  • कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हालवतो – इमानी

2. व्याकरण.

प्रश्न अ.
प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा…
उत्तर :
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या :

  • पीठी – व्होटी
  • जीव – हीव
  • थंडी – दिंडी
  • घाई – पुन्याई
  • नक्कल – अक्कल

प्रश्न आ.
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

  1. बावनकशी सोने
  2. करमाची रेखा
  3. सोन्याची खाण
  4. चतकोर चोपडी

उत्तर :

  1. बावनकशी सोने – अस्सल, खरे
  2. करमाची रेखा – नशीबाचा फेरा, नियतीचा खेळ
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात
  4. चतकोर चोपड़ी – पुस्तक किंवा वहीचा काही भाग

प्रश्न इ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
1. तोंडात बोटे घालणे.
2. तोंडात मूग धरून बसणे.
उत्तर :
1. तोंडात बोटे घालणे – अर्थ : आश्चर्यचकित होणे, विस्मय वाटणे.
वाक्य : अपंग मुलाने धावण्याची शर्यत जिंकल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली.

2. तोंडात मूग धरून बसणे – अर्थ : काहीही न बोलणे, गप्प बसणे.
वाक्य : सरांनी अवघड प्रश्न विचारताच सर्व मुले तोंडात मूग धरून बसली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न ई
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ – ……………
(आ) कृपा – ……………
(इ) धर्म – …………….
(ई) बोध – …………….
(उ) गुण – ……………..
उत्तर :
(अ) अनर्थ, अर्थहीन, अर्थपूर्ण
(आ) अवकृपा, कृपाळू
(इ) अधर्म, स्वधर्म, धार्मिक, धर्मवीर
(ई) अबोध, बोधामृत
(उ) अवगुण, सगुण, निर्गुण, गुणी, गुणवान

3. स्वमत.

प्रश्न अ
‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे’, हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाई या एक अशिक्षित शेतकरी स्त्री असूनही त्यांची रचना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा झिरपते. त्यांचे काव्य सरस व सोज्वळ आहे. बहिणाबाई यांची कविता इंग्रजी वळणाच्या सौंदर्यवादी भावकवितेच्या परंपरेला छेद देणारी अस्सल मराठी वळणाची ग्रामीण कविता आहे.

जुन्यात चमकणारी ही कविता आहे, बहिणाबाई यांनी आपली कविता थेट संत कवितेच्या आणि तत्त्वकवितेच्या परंपरेला जोडली आहे, त्यांच्या कवितेत या परंपरेतला भक्तिभाव, तत्त्वचिंतन आणि हितोपदेश आपल्याला दिसतो. ही लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता आहे. नवकवितेच्या जवळ जाणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग, ग्रामीण जीवन व कृषिसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते. शेतकरी हा कर्मयोगी आहे आणि त्याच्या कामात उदात्तता आहे असे सांगणाऱ्या या कविता आहेत.

क्तिकविता आहे. त्यात पारंपरिक तत्वकवितेच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. ‘उदा. देव अजब गारोडी’ तसेच ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस!’ यांसारख्या आधुनिक कवितेतून मानवतेचा संदेश देणारी त्यांची कविता आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर :
बहिणाबाईंची कविता ही अर्वाचीन मराठीतील पहिली ग्रामीण कविता होय. ती या अर्थाने की, ती ग्रामीण जीवनातूनच मोहोरून आली आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन अंतर्बाहय रसरसलेले आहे. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत पेरणीनंतर धरित्रीच्या कुशीतून जे चैतन्य ओसंडते त्याचे अतिशय प्रभावी दर्शन घडते. ‘येहेरीत दोन मोटा’ यातून कृषिजीवनाचे दर्शन तर घडतेच पण त्यातील दोन्हीमध्ये पाणी एक यातून कणा आणि चाक वेगळे असले तरी त्याची गती एकच आहे हे दिसून येते.

त्यांची कविता निसर्गाशी समरस होणारी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी आहे. तान्या सोपानाला झोपवून बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटू लागत आणि त्यातून ग्रामीण, कृषिजीवनाचे दर्शन घडविणारी कविता जन्माला येई. वाटेत दिसलेल्या वडाच्या झाडावर ‘हिरवे हिरवे पानं’ सारखी रचना सहज आकाराला येते. शेतातील कापणी, मळणी या शेतातील कामांबरोबरच मोठ्या, भाविक व कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबीत होताना दिसते. थोडक्यात बहिणाबाईंची कविता ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी कविता आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कृषिसंस्कृती यांचं अनोखं असणार नातं त्यांच्या कवितेत दिसून येते.

प्रश्न इ.
“मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाईनी कवितेतून माणसाचा मतलबीपणा आणि त्याच्या स्वार्थी वृत्तीचे वास्तव दर्शन घडविले आहे. बहिणाबाई आणि स्वार्थी वृत्तीची सर्वाधिक चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ ‘माणसा तुला नियत नाही रे’, माणसापेक्षा गोठ्यातील जनावर बरे, गाय न म्हैस चारा खाऊन दूध देतात. पण माणसाचे एकदा पोट भरले की माणस उपकार विसरून जातो. कुत्र्यामध्ये इमानीपणा आहे पण माणूस फक्त मतलबासाठी मान डोलावतो.

माणूस केवळ लोभामुळे माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला आहे. त्याची स्वार्थी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. माणस स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. मानवता आज संपुष्टात आली आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बहिणाबाई ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’? अशी आर्त हाक देतात, संत महात्म्यांनीही मानवतेच्या कल्याणासाठी तळमळ व्यक्त केली आहे. आज माणूस पशूसारखे वागतोय. माणसातला माणूस कधी जागा होतोय? हीच खरी आजची समस्या आहे. स्वार्थासाठी माणूस माणूसपण विसरत आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हे त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लेणं आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
एखादया शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. प्र. के. अत्रे यांच्यासारख्या मर्मज्ञ, प्रतिभावंताची बहिणाबाई चौधरी यांच्या गीतकाव्यासंबंधीची ही प्रतिक्रिया होय. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे प्र. के. अत्रे केवळ प्रस्तावनाकारच नव्हते तर ते प्रकाशकही होते.

प्र. के. अत्रे यांची लिहिलेली प्रस्तावना ही बहिणाबाईंच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख करून देणारी आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांची काव्यप्रतिभा आपल्या प्रस्तावनेतून उलगडून दाखवली आहे. बहिणाबाईंची ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेली समरसता, कृषिजीवनाचे संदर्भ हा त्यांच्या काव्याचा विषय. प्र. के. अत्रे यांनी बहिणाबाईंचे हे सूक्ष्म व अचूक निरीक्षण यांतील आत्मियता लीलया वर्णिली आहे. माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे वर्णन करणाऱ्या कवितेवर अत्रे यांनी प्रकाश टाकला आहे. अत्रे यांनी आपल्या प्रस्तावनेतून बहिणाबाईच्या अनेक कवितांचा अर्थ उलगडून दाखविला आहे.

बहिणाबाईंची कविता हे बावनकशी सोने आहे. ते महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी अत्रे यांनी स्वतः त्या कवितांचे प्रकाशन केले. अत्रे यांनी बहिणाबाईची काव्यप्रतिभा जाणून आपल्या प्रस्तावनेत बहिणाबाईंचे निसर्गप्रेम, कृषी, शेतकरी त्यांचे अपार कष्ट यांचे वर्णन केले आहे. बहिणाबाईच्या ‘संसार’, ‘स्त्रियांची दुःखे’, ‘माणसातला स्वार्थ’ या कवितांवर अतिशय मार्मिक असे भाष्य केले आहे. प्राणिमात्रांचा प्रामाणिकपणा आणि माणसांचा कृतघ्नपणा या बहिणाबाईंच्या कवितेतून अत्रे यांनी नेमकेपणाने त्यांतील भाव उलगडून दाखविला आहे.

अत्रे यांची प्रस्तावना ही अतिशय प्रतिभावंत साहित्यिकाची प्रस्तावना आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील तळमळ, माणसाच्या कल्याणाची आस शेतकरी व त्याचे अपार कष्ट या काव्य आशयाचा सुरेल परामर्श अत्रे यांनी घेतला आहे. थोडक्यात अत्रे यांच्या प्रस्तावनेने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला एक आगळी वेगळी झळाळी लाभली आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता ह्या निसर्ग, कृषिसंस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, मानवता, प्राणिमात्रांची कृतज्ञता या विषयांशी संबंधित आहेत, बहिणाबाई या अशिक्षित खेड्यातील स्त्री असूनही त्यांच्या काव्यातला जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. त्यांचे काव्य सरळ आणि सोज्वळ आहे.

बहिणाबाईंनी वहाडी, खानदेशी ग्रामीण, बोली भाषेत लिहिलेल्या कवितांना वेगळाच गोडवा आहे. बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. गावातील मंदिरे याच त्यांच्या शाळा असे असतानाही त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. बोली भाषेच्या जिव्हाळ्याने त्यांची कविता आपलीशी वाटते, वहाडी खानदेशी भाषेचे काव्याभिव्यक्तीचे सामर्थ्य फार उंचीचे आहे.

बहिणाबाईंच्या भाषेत जिव्हाळा आहे, तळमळ आहे. माणसाच्या उत्कर्षाची आस त्यांना लागली आहे. ग्रामीण भाषेमुळे, बोलीमुळे शेतकरी, निसर्ग, मानवता या आशयाशी एकरूप होणारी त्यांची कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते. बहिणाबाई काव्य करताना कुठेही अडखळत असलेल्या, शब्दांसाठी थांबलेल्या अशा दिसत नाहीत. ओघवते असे त्यांचे काव्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे म्हणून जे एक अनुभवविश्व होते. त्या अनुभवाची म्हणून जी भाषा होती ती त्यांना पूर्णत: परिचित होती, नव्हे त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांच्या कवितेच्या हातात भाषा हवी तशी वाकते, आकार घेते व अर्थाभिव्यक्ती साधते. या अर्थाने बहिणाबाई या भाषाप्रभूत्व ठरतात.

प्रश्न इ.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
अलिकडच्या काळात माणसातील माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस आज पशू होऊन एकमेकांशी झगडत आहे. पण पशू मात्र आपला इमानीपणा दाखवत आहे. माणूस हा स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला असताना आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील. पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते.

कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण मी अनुभवलेल्या एका प्रसंगातून आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे याचे दर्शन घडते. आमच्या कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग, एका गरीब विद्यायनि शैक्षणिक फी, वहया, पुस्तकांसाठी आणलेले पैसे त्याच्याकडून हरवले. तो विदयार्थी ढसाढसा रडत होता. कारण ते पैसे त्याच्या आई वडिलांनी मजुरी करून मिळवलेले होते. हे पैसे मिळाले नाहीत तर आपले शिक्षण थांबणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एका सेवकाला हे पैसे सापडले व त्याने ते त्या गरीब मलाला परत केले.

त्या गरीब मुलाला पैसे परत मिळण्याचा खूप आनंद झाला. खरं तर त्या सेवकाला सापडलेल्या पैशाच्या पाकीटाचा मोह झाला नाही. तीन महिन्यांच्या पगाराइतकी ती रक्कम असूनही तो मोह टाळून त्याने ते पैशाचे पाकीट परत केले. ही घटना माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचे दयोतक आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रकल्प.

प्रश्न 1.
‘बहिणाबाईंची गाणी’ मिळवून निवेदनासह काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करा.

प्रश्न 2.
तुमच्या परिसरातील ओव्या/लोकगीते मिळवून संग्रह करा.

11th Marathi Book Answers Chapter 5 परिमळ Additional Important Questions and Answers

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
बहिणाईच्या काव्याचा आविष्कार – [ ]
उत्तर :
बहिणाबाईंच्या काव्याचा आविष्कार – सुभाषितांचा

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 11
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 12

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 9
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 10

प्रश्न 2.
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा
……………………….
उत्तर :
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा एखादया बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

कोष्टक पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. शेतकरी जीवन ……….
  2. …………. तिला रात म्हणू नये
  3. इमानाला जो विसरला …………
  4. ……………. शेवटी रिकामेच होणार

उत्तर:

  1. शेतकरी जीवन → कष्टाचे
  2. भुकेल्या पोटी जी → तिला रात म्हणू नये माणसाला निजवते
  3. इमानाला जो विसरला → त्याला नेक म्हणू नये
  4. पोट कितीही भरले तरी → शेवटी रिकामेच होणार

स्वमत :

प्रश्न 1.
शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :
‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकात बहिणाबाई चौधरी यांनी कृषी, ग्रामीण जीवन, शेती आणि शेतकरी यांचे चित्रण केले आहे. बहिणाबाईंची कविता अस्सल शेती आणि शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारी आहे. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे. ऊन, वारा व पाऊस यांची तमा न बागळता शेतकरी रात्रंदिवस राबत असतो. सर्वसामान्य माणसे शेतकऱ्याच्या जीवावर दोन वेळा पोटभर जेवतात. शेतकरी शेतातच राबतो आणि त्याची माती शेतातच होते. शेतात पेरणी, कापणी व उफणणी या काळात शेतकरी राबराब राबतो.

त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते. पण जगाचा पोशिंदा असणारा हा भोळा, भाविक व कष्टाळू शेतकरी आयुष्यभर काळ्या आईची सेवा करतो. शेतकऱ्यांच्या संसाराची करुण कहाणी अनेक काव्यात दिसून येते. शेतकरी खळं करत असताना त्याला एक आस लागलेली असते ती म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला मोडलेला संसार पुन्हा उभा राहील पण तसे घडतेच असे नाही. निसर्गाचा लहरीपणा, कर्ज, हमीभाव पिकांवर पडणारी कीड या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे आणि त्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही ते आत्महत्या करतात. असे कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
‘कशाला काय म्हणू नाही’ या काव्यातील सुभाषितांचा अर्थ लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकात अनेक विषयांवरील काव्य आहे. मराठी वाड़मयात अमर होतील अशी अनेकात अनेक सुभाषिते आली आहेत. सुभाषितांचे एक शेतच पिकलेले आहे असे वाटते. ज्यातून कापूस येत नाही त्याला बॉड म्हणू नये, बोंडाची मुख्य अशी ओळख म्हणजे त्यातील कापूस नसेल तर त्या बोंडाला काय अर्थ उरणार? भुकेच्या पोटी माणसाला निजवते तिला रात कशी म्हणणार ? माणसाच्या पोटात अन्न नसेल तर त्याला झोप येणारच नाही, माणसाचा हात हा दानधर्मासाठी असतो असे म्हटले जाते.

इतरांना मदत, दान करताना तुमचा हात आखडत असेल, तुमचा स्वार्थ आडवा येत असेल तर त्या हाताचा काय उपयोग? इमानीपणा जर एखादा विसरत असेल तर त्याला नेक, प्रामाणिक कसे म्हणणार? तुम्ही नेक प्रामाणिक असाल तर तुमच्यात इमान असणारच, जन्मदात्या आई वडिलांची सेवा करणे हे मलाचे कर्तव्य आहे.

जर एखादा लेक जन्मदात्या आई वडिलांची सेवा न करता त्यांना त्रास देत असेल तर त्याला लेक म्हणता येणार नाही. भाव असेल तर भक्ती येईल. (मनी नाही भाव देवा मला पाव) या उक्तीप्रमाणे भावहीन भक्ती फळाला येत नाही. तुमच्यात उत्साह नसेल तर तुमची शक्ती निरर्थक आहे. कारण जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अशाप्रकारे वेगवेगळ्या सुभाषितांमधून बहिणाबाईंनी जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून दाखविले आहे. जे आजच्या काळातही लागू आहे.

स्वाध्यायासाठी कृती ‘चालू दे रे रगडनं तुझ्या पायाची पुन्याई’ या बहिणाबाईंच्या काव्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. वृक्षांची कृतज्ञता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बहिणाबाईचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. बहिणाबाईनी सांगितलेले मानवी जीवनाचे रहस्य शब्दबद्ध करा. शेतातील खळ्याचे बहिणाबाईंनी केलेले वर्णन स्पष्ट करा. ‘मन पाखरू पाखरू’ या ओळीतील भावसौंदर्य उलगडून दाखवा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

परिमळ Summary in Marathi

प्रस्तावनाः

नामवंत लेखक, कवी, नाटककार, चित्रपट कथालेखक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असणारे प्र.के.अत्रे यांनी ‘बहिणाबाईची गाणी’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेतून प्र.के.अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख करून देताना त्यांच्या कवितेतील ग्रामीण जीवन, कृषिजीवन यांचे संदर्भ उलगडून दाखविले आहेत. बहिणाबाईच्या कवितेतून माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवनाचे दर्शन घडते. त्यांच्या कवितेत खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवतो.

पाठाचा परिचय :

शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. एखादया शेतात मोहरांचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रा’सारखाच बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. बहिणाबाईंचे काव्य सरस आणि सोज्वळ आहे. असे काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि त्यातील मौज म्हणजे एका निरक्षर स्त्रीने रचलेले हे काव्य तोंडात बोट घालायला लावणारे, ‘जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे’ असे आहे.

सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. माजघरात सोन्याची खाण दडावी तसे यहिणाबाईंचे काव्य, खानदेशी वहाडी भाषेमधील अडाणी आईच्या ओव्यांचे महाराष्ट्र कौतुक करील की नाही म्हणून सोपानदेव चौधरी गप्प होते.

सोपानदेव चौधरी यांनी चतकोर चोपडीतून एक कविता प्र.के.अत्रे यांना वाचून दाखविली. या कवितेतून शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन केले आहे, त्या कविता म्हणजे बावनकशी सोने असून ते महाराष्ट्रासमोर यायला हवे या उद्देशाने प्र. के. अत्रे यांनी हे काव्य प्रसिद्ध करण्याचे ठरविले.

प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे, ते उपजतच असते. कोकिळ पक्ष्याच्या तोंडून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी सुगंध घेऊन येते तसे जातिवंत कवीचे आहे. सृष्टीतील सौंदर्य आणि जीवनातील संगीताशी ती कविता एकरूप होते. डोंगराच्या कपारीतून जसा झरा उचंबळतो तसे काव्य एकसारखे हदयातून उसळ्या घेते. यातूनच जगातील अमरकाव्ये जन्मास येतात.

बहिणाबाईची प्रतिभा वेगळीच, त्यात धरित्रीच्या कुशीत झोपलेले बियाणे कसे प्रकट होते याचे वर्णन येते. तारुण्यात सौभाग्य गमावलेल्या स्त्रीचे हृदयभेदक करुण काव्य हे असामान्य काव्याचे वैशिष्ट्य होय. सकाळी उठून बहिणाबाई जात्यावर बसल्या की ओठातून काव्य सांडू लागते. घरोट्यातून पाठ जसे बाहर पडत तसे बहिणाबाईच गाण पोटातून आठावर यत. स्वयपाकघरात चूल प म्हणत माझा जीव घेवू नकोस. संसाराची रहस्य उलगडताना त्यातील कष्टमय जीवनाचे चित्रण त्यांच्या काव्यात दिसून येते. तान्हुल्या सोपानाला शेतावर घेऊन जाताना वडाच्या झाडाचे आणि त्याच्या लाल फळाचे सुंदर चित्रण काव्यातून येते. वारा आणि थंडीची पर्वा न करणाऱ्या वारकऱ्याचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते.

ठणी व सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याची लगबग, कष्टमय जीवन हा त्यांच्या काव्याचा विषय. पण एवढाच त्यांच्या काव्याचा विषय नसून जीवनाकडे बघण्याचे स्पष्ट तत्त्वज्ञान हे त्यांच्यातील बुद्धिमान, तत्त्वज्ञानी, महाकवीची प्रतिभा असण्याची जाणीव होते.

त्यांच्या काव्यांचा आविष्कार सुभाषितांचा आणि आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. ‘कशाला काय म्हणू नाही’ या सुभाषितातून ‘ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंडू म्हणू नये’, ‘भुकेल्या पोटास निजवणारी रात्र नसते’. ‘दानासाठी आखडणारे ते हात नाहीत’, ‘इमानाला विसरणारा नेक नसतो’. ‘जन्मदात्यास भोवणारा लेक कसा’ ? ‘जिच्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये’. यातून त्यांची भाषा आणि विचारांची श्रीमंती दिसते.

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात ? मन हे पाखरासारखे आहे. एका क्षणात जमिनीवरून आभाळात जाणार असा भाषा आणि विचारांचा सुरेख मेळ त्यांच्या काव्यात दिसून येतो.

जीवनाचे खरे रहस्य शुद्ध प्रेमात आहे. स्वार्थात नाही. माणसाने मतलबी होऊ नये. भुकेल्या पोटाला अन्न मिळावे म्हणून पिके ऊन, वारा, पाऊस सहन करत शेतात उभी असतात. माणूस स्वार्थी असून खोटेनाटे व्यवहार करतो. बोरीबाभळी उपकाराच्या भावनेतून शेताला काटेरी कुंपण करतात. पोट कितीही खाल्ले तरी शेवटी रिकामे राहणार आणि शरीरसुद्धा एक दिवस निघून जाणार, जे शिल्लक राहते ते हदयाचं नातं, शुद्ध आणि निःस्वार्थी प्रेम यापेक्षा वेगळं काय असणार?
बहिणाबाईंना सर्वाधिक चीड कशाची असेल तर ती माणसाच्या कृतघ्नपणाची, माणसांना संतापून त्या म्हणतात, माणसाला नियत नाही.

माणसापेक्षा गोठ्यातील जनावरे बरी, ती चारा खाऊन दूध देतात. माणसे उपकार विसरून जातात. कुत्रा इमानीपणाने वागतो, लोभामुळे माणूस काणूस म्हणजे पशू झाला आहे. स्वार्थाचा वणवा आज सर्वत्र पसरला आहे. माणूसे पशू होऊन एकमेकांशी भांडत आहेत. मानवता नष्ट होत चालली आहे. ‘मानसा, मानसा कधी व्हशीन मानस!’ मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संतमहात्म्याच्या अंत:करणातन हीच सल बाहेर पडत आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हा प्रश्न मानवजातीपुढे आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईना होतो ही त्यांच्या प्रतिभा सामर्थ्याची खरी ओळख आहे.

बहिणाबाईची चुलत सासू ‘भिवराई’ या विनोदी व नकलाकार होत्या. नाव ठेवून नक्कल करता करता सर्वांना हसविण्याची त्यांची पद्धत म्हणजे हसवून शहाणे करणे हा हेतू. यातून बहिणाबाईंच्या विनोदात उपरोध, सहानुभूती आणि मायेचा ओलावा दिसतो, बहिणाबाईंचे काव्य रचना व भाषेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक असून प्रत्येक काव्यात एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. थोडक्यात एखादी भावना जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेले आहे. बहिणाबाईचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व केवळ अद्भुतच आहे.

बहिणाबाईंनी आपल्या काव्यात रस आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस होणार नाही अशा कौशल्याने सोपे व सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वहाडी भाषेने काव्याची लज्जत वाढविली आहे. ‘अशी कशी वेडी ग माये’, अशी कशी येळी माये, किंवा ‘पानी लौकीचं नित्तय त्याले अनीताची गोडी’. या भाषेत लडिवाळपणा भासतो.

मराठी मनास भुरळ घालील आणि स्तब्ध करून टाकील असे भाषेचे, विचारांचे आणि कल्पनेचे विलक्षण माधुर्य त्यांच्या काव्यात शिगोशीग भरलेले आहे. मानवतेला त्यांनी दिलेल्या ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’ ! हया अमर संदेशाने तर मराठी साहित्यामध्ये त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. परिमळ – सुगंध – (fragrance).
  2. प्रतिभा – काव्य निर्माण करण्याची असलेली उपजत क्षमता – (intelligence, imaginative power).
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात, येहेर – विहिर – (well).
  4. चतकोर चोपड़ी – वही किंवा पुस्तकाचा काही भाग – (notebook).
  5. मोट – जुन्या काळी विहिरीतून पाणी काढण्याचे चामड्याचे एक साधन.
  6. अधाशी – हावरटपणा, एखादी गोष्ट आपल्यालाच मिळावी हा हेतू – (greedy).
  7. बावनकशी सोने – अत्युत्तम खरे सोने.
  8. कृतघ्न – उपकाराची जाणीव नसलेला – (ungrateful).
  9. काणूस – पशू – (animal)
  10. लपे – लपणे – (hide).
  11. अहिराणी भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘य’ वापरतात.
  12. खेयता – खेळता.
  13. घरोटा – जातं.
  14. व्होट – ओठ – (lip).
  15. चुल्हया – चूल.
  16. फयं – फळ – (fruits).
  17. आभाय – आभाळ – (sky).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.3 सुंदर मी होणार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

11th Marathi Digest Chapter 3.3 सुंदर मी होणार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 1
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 5

प्रश्न इ.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 3
उत्तर:

पात्रप्रतिक्रिया
1. राजेंद्रपपांच्या निर्णयाला होकार देण्याच्या स्थितीत आणि बेबीवर डाफरणारा
2. बेबीपत्र वाचून संताप येतो आणि महाराजांनी ठरवलेल्या निर्णयाचे पालन न करण्याचा निर्णय घेते.

प्रश्न इ.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

a. पपांचा पांगुळगाडा.
उत्तर :
पपांचा पांगुळगाडा – पपांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा मुकाटपणे स्वीकार करणं, त्यात अयोग्य–योग्य काय याचा विचार न करणं.

b. मुलांचे चिमणे विश्व.
उत्तर :
मुलांचे चिमणे विश्व – मुलांचे विश्व हे निरागस असते, लहानसे असते त्यात त्यांचा भोळा भाव सदैव अनुभवायला मिळतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

c. ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
उत्तर :
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य – अर्धमुर्ध आयुष्य जगणं. ब्रेक तुटलेली गाडी ज्याप्रमाणे पूर्णतः टाकून देता येत नाही. तसंच आयुष्यही जगत असतो आणि नसतोही अशी अवस्था.

2. थोडक्यात स्पष्ट करा.

प्रश्न अ.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
उत्तर :
आतापर्यंत दिदीने अपंगावस्थेत बरंच दुखणं सहन केलं. ती वडिलांवर प्रेमछाया अंथरत असायची. महाराजही तिच्याजवळ मन मोकळं करायचे. तिचा कवितेचा छंद महाराजांना पसंत नव्हता. कविता करणारा संजय तिला आवडू लागला होता. पण पपांच्या आग्रहाखातर तिने त्याला काही कळवलं नव्हतं, पपांकडून जेव्हा तिला समजतं की पपांनी आईवर कधी प्रेमच नाही केलंय. त्यावेळेस ती व्याकूळ झाली. प्रेम नसताना चार मुलं झाली. ती मोठी झाली.

ममीने महाराजांच्या भीतीपायी घर सांभाळलं. ती मुलांना जन्म देऊन गेली. पण डॉक्टरांना मुलांची आई व्हायला सांगितलं. डॉक्टरांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि मुलांना सांभाळलं पण त्या डॉक्टरांनाही महाराजांनी निघून जायला सांगितलं. आपले पपा इतके कसे कठोर वागू शकतात? इतके निष्ठूर कसे होऊ शकतात. या विचारांनी व्याकूळ झालेली दिदी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिलाही जीवन समरसतेने जगायचंय.

ते जगण्यासाठी ती आसुसली आहे. आजवर तिनं घराबाहेरही पाऊल टाकलेलं नाही त्यामुळे तिला आता जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे. त्या प्रकाशात न्हाऊन तिचं जीवन सुंदर करायचं आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
उत्तर:
खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांना आपल्या संस्थानिक असल्याचा प्रचंड अभिमान होता. सत्ताधीश म्हणून वावरल्याने त्यांचा अहंकार पराकोटीला पोहोचला होता. पिता म्हणून वागताना आपल्याला आपल्या मुलांचे सुख पहायला हवं हे कधी त्यांच्या लक्षातच आले नाही.

नेहमी हुकमी एक्का आपल्या हातात असल्यासारखे आपल्या आप्तजन, प्रजाजनांवर आसूड ओढणं अशी वृत्ती असल्यामुळे ही प्रेम, माया, जिव्हाळा या भावनांपासून पार दूर गेलेली असते. बेबीचा नेमका या गोष्टीबद्दलच राग आपल्या पित्यावर होता. तिला मुक्तपणे जगायचं होतं.

जीवनाचा आनंद घेत घेत प्रकाशाकडे जायचं होतं. पित्याची जाचक बंधनं तिची घुसमट करत होती.त्याला हरक्षणी ती विरोध करत होती. तिच्या वडिलांविरुद्ध बंड करण्याचे बळ तिच्यात होते कारण ती त्यांच्या विचारांची गुलाम नव्हती.

प्रश्न इ.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
उत्तर :
डॉक्टर हे एक समंजस मातृहृदयी असं पात्र आहे. आपल्या प्रेमाचा त्याग करून महाराजांनी केलेल्या अनेक अपमानांना सहन करून डॉक्टर महाराजांजवळ राहिले. महाराणींनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी अगदी निष्ठेने सांभाळली. आपल्या या अपत्यांचा सांभाळ करता करता त्यांनी स्वत:च्या अनेक इच्छांचा त्याग केला. त्याबद्दल कोणतीही तक्रारही त्यांच्या मनात नाही. त्यांना महाराजांनी प्रचंड त्रास दिला आहे. पण तरी हसतमुखाने मुलांना प्रेम देण्यात त्यांनी कसूर केली नाही.

मुले मोठी झाली, संस्थान बरखास्तच झालेलं आहे. अशा अवस्थेत महाराज त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करतात. खरं तर त्यांना या वयात मुलांचा आधार हवा असतो त्याच काळात मुलांपासून, राज्यापासून ते त्यांना दूर करतात. सहनशील, प्रेमळ, त्यागी असं हे व्यक्तिमत्त्व आहे.

3. स्वमत.

प्रश्न अ.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ हे नाटक जीवनाचा सुंदरतेने विचार करायला लावणारी कलाकृती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थाने होती. ती काळाच्या ओघात संपुष्टात आली तरी तिथल्या संस्थानिकांच्या मनात असलेली राजेशाही, हुकुमशाही संपुष्टात आली नाही. त्यातील एका सत्ताधीशाची कहाणी ‘सुंदर मी होणार’ मध्ये येते. यातील महाराजही शिस्तीचे भोक्ते असलेले.राणी त्यांच्या प्रेमाला आतुर असलेली. पण राजाचे तिच्यावर प्रेमच नसते.

दिदीचा जन्म झाल्यावर तर ती केवळ त्यांच्या सुखाकरता महालात रहात असते. आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असावं इतकीच माफक मागणी असताना महाराज मात्र तिच्यावर प्रेम करू शकत नाहीत याचं वैषम्य तिला वाटत असतं. याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होतो आणि ती कायमची आजारी पडते. नवऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली स्त्री आणि मुलांना मायेची ऊब देऊ न शकणारी स्त्रीची अगतिकता या नाटकातील ममी या पात्राद्वारे दिसून येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
उत्तर :
नाटकामध्ये रंगसूचनेला संवाद, प्रसंग घटना यांच्याइतकेच महत्त्व आहे. रंगसूचनेमुळे त्या त्या संवादामागील हावभाव वाचणाऱ्याला कळतो.

नाटककाराने या अशा रंगसूचना पात्राने कोणत्या गोष्टी वा कृती त्यावेळेस कराव्यात त्याकरता सांगितलेल्या असतात. उदाहरणार्थ – (पत्र वाच लागते – तिचा चेहरा एकदम उतरतो. थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८०) इथे दिदीने कसे वागावे, भाव दाखवावे हे सांगितले आहे.

या अशा रंगसूचना पात्रांच्या आविर्भावासाठी जशा महत्त्वाच्या तशा कथानकातील दुवे साधण्याकरताही महत्त्वाच्या असतात. त्या त्या वेळेची पात्राच्या मनातील भावना अधोरेखित होते त्यामुळे त्या प्रसंगाचा, घटनांचा भाव आपल्याला वाचून समजतो उदा. (आवेगानं – मागल्या बाजूचा पडदा बाजूला करतात – तिथे महाराज उभे असतात. सर्वांना आश्चर्य वाटतं)(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (मागाहून नोकर फळे घेऊन येतो) – त्याला नुसत्या इशाऱ्याने ती टेबलावर ठेव असे सांगतात, तो ठेवून जातो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (तिला कडकडून भेटते – अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८३) या अशा प्रकारच्या रंगसूचनांमुळे ते पात्र, घटना, कथानक समजायला मदत होते.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
उत्तर :
महाराज हे सत्ताधीशाप्रमाणे वागत होते. त्यामुळे सर्वच जण त्यांच्या पदाचा, प्रतिष्ठेचा मान राखून बोलत असत. राजांना विरोध करण्याची कोणाची तयारी नसायची. पण हे झालं राजवाड्यात. राजाने राजवाड्यात त्यांचा मान–सन्मान याला शोभेल असंच वागावं पण घरी मात्र पित्यासारखं वागायला हवं.

नंदनवाडीचं नावच किती सुंदर आहे. जिथे नंदनवनच असायला हवं. पण महाराजांच्या शिस्तबद्ध, हेकेखोर स्वभावामुळे घर, घरातील माणसं सुंदर असूनही तिथं नंदनवन फुललं नाही. याकरता जर महाराणीने पुढाकार घेऊन राजांना विरोध केला असता तर वातावरण बदलले असते. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यांचा वापर राणींनी केला असता तर राजामध्ये थोडातरी बदल झाला असता.

प्रश्न आ.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ या नाट्यउताऱ्यातून एका राजाच्या शिस्तप्रिय, अहंकारामुळे एक घर कसे तुटते अशा आशयाचे कथानक आले आहे. राजाच्या अशा वर्तनाने त्याची राणी आजारी पडते. ती राजाकडून प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही. राजालाही तिच्याबद्दल फक्त काळजी असते. प्रेम, माया नाही त्यामुळे दोघांचे नाते रुक्ष झालेले आहे. त्या रुक्ष नात्याचे पडसाद मुलांवरही होतात. दिदीच्या पायात अशक्तपणा हा याचाच परिणाम आहे. डॉक्टर ममत्वाने मुलांना वाढवतात पण तरीही त्यांच्यावर महाराजांची बंधने असतात. जीवन हे सुंदर असले पाहिजे. जीवन एकदाच मिळतं.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

ते सार्थकी लावणं, त्यात आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद मिळवणं हे आपल्या हातात आहे. पण या नंदनवाडीतील कोणीतीही व्यक्ती मुक्तपणे, आनंदाने जगत नाही. जगणं सुंदर असू शकतं हे तिथल्या कोणालाही ठाऊक नाही. एका दबावाखाली, ताणाखाली सर्वच जण जगत आहेत. त्यामुळेच या सर्व ताणातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जगण्याचा मार्ग निवडायला लागतो. दिदी आपलं पायाचं दुखणं घेऊन जगत असते.

तर बेबी वडिलांविरुद्ध बंड करायला पुढे सरसावते. घर सोडायचीदेखील तिची तयारी असते. वडिलांच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यात धन्यता मानणारे प्रताप, राजेद्र हे ही नंतरच्या काळात आवाज करतील. वडिलांच्या जाचाला शिस्तीला कंटाळून दिदीसुद्धा घर सोडायचा निर्धार करते. आजवर महालाबाहेर ती पडलेली नाही त्यामुळे ती बाहेरचं जग अनुभवण्याकरता उत्सुक आहे. वडिलांचे आपल्या आईवर प्रेम नसताना त्यांनी संसार केला, मुले झाली हे ऐकल्यावर तिला प्रचंड त्रास होतो. आपल्या आईवडीलांमध्ये प्रेमच नव्हतं तरी ते जगले? याचा विस्मय तिला वाटतो.

जगणं प्रकाशमय असावं, सुंदर असावं असं तिलाही वाटतं. तिच्या काव्यावर, तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे याचा आनंद घेऊन तिचं जगणं सुंदर करायचं आहे.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ या नाटकातील नाट्यउताऱ्याचा अभ्यास करताना पु. ल. देशपांडे यांनी खूप सहजतेने हे नाट्य संवाद लिहिलेत असं जाणवतं.

त्यात माणसाच्या नेहमीच्या वापरातले शब्दही आले आहेत. तसंच या संवादात एक काव्यात्म भावही आढळतो. ‘प्रकाशांच्या लेकरांना या अंधारकोठडीत त्यानं जन्माला घातलं’ अशा प्रकारच्या संवादातून त्यातील काव्य जाणवतं.

11th Marathi Book Answers Chapter 3.3 सुंदर मी होणार Additional Important Questions and Answers

कृती : १ आकलन कती

खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती – १.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
(अ) दिदीला राजवाडा असा वाटतो – [अमंगल]
(आ) दिदीला कलावंत म्हणून आदरणीय असलेली व्यक्ती – [संजय]
(इ) दिदी महाराजांसोबत काय म्हणून राहणार होती – [आई]

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

कृती – २.

प्रश्न अ.

(a) गटात न बसणारा शब्द ओळखा.
उत्तर :
घर सोडून जाणाऱ्या व्यक्ती (बेबी, प्रताप, राजू, दिदी) – [बेबी]

(b) योग्य पर्याय निवडा :
उत्तर :
थेंबभर पाण्यालादेखील याची ओढ असते.

पर्याय :

  • विशाल समुद्राची
  • अथांग नदीची
  • आकाशातील मेघांची [विशाल समुद्राची]
काय ऐकायचं तुमचं ……………………………………….. दिदी : संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८५)

प्रश्न आ.
महाराज संजयकडे या दृष्टीने पाहतात.
पर्यायः
(a) उनाड इसम
(b) कलावंत
(c) दिदीचा प्रियकर
उत्तर :
(a) उनाड इसम

(a) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उत्तर :
अंधारकोठडी – अंधार, अंडी, कोठडी, कोडी, कोर, धार
वातावरण – वर, वण, वाव, वाण, वार, रण, रव, रवा, तार, ताव, ताण, तारण, वरण, वावर

(b) खालील वाक्यातील काळ ओळखा.
मग तुम्ही एकटे एकटे राहाल.
उत्तरः
भविष्यकाळ.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

(c) खालील वाक्यातील अव्यय ओळखा.
माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे.
उत्तरः
कडे – शब्दयोगी अव्यय.

स्वमत:
प्रश्न 1.
‘थेंबभर, पाण्यालादेखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते’ या वाक्याचा तुम्हांला जाणवलेला अर्थ लिहा.
उत्तर :
सुंदर होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनाची तयारी पाहिजे. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळाला की जीवनाचा सागर सुंदररित्या जगता येतो. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनाही समुद्राकडे जाण्याची ओढ असते. ते झरा, नदी, नाले या सर्वांमार्फत समुद्रापर्यंत प्रवास करतात. कोणतीही व्यक्ती आहे त्या ठिकाणी राहिली तर तिचा विकास अशक्य असतो.

म्हणून जे उदात्त आहे उत्तम आहे याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मनानं, शरीरानं कमकुवत असलेल्या दिदीला असलेला कवितेचा छंद तिच्या मनाला उभारी देतो. तिच्या कविता ज्यांना आवडतात तो संजयही कलावंत आहे. तो तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक आहे. पण पपांच्या काळजीखातर दिदीने त्याला उत्तर दिलेलं नाही. पपांचे आपल्या ममीवर प्रेम नव्हते हे ऐकल्यावर दिदीला प्रचंड वाईट वाटते.

आपल्या पपांचा तिला तिरस्कार वाटू लागतो आणि ती संजयला होकार दयायचा निर्णय घेते हा विचार मला फार सकारात्मक वाटतो. यामुळे तिच्या जीवनात उभारी येईल आणि तिचं जीवन सुंदरही होईल.

प्रश्न 2.
महाराजांविषयी दिदीला वाटणाऱ्या घृणेबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
महाराजांची सर्वात जवळची मुलगी दिदी आहे. दिदीजवळ ते आपल्या मनातलं दुःख सांगत असतात. पण एकाक्षणी जेव्हा ते दिदीजवळ कबूल करतात की त्यांचे दिदीशिवाय दुसऱ्या कोणावरच प्रेम नाही. दिदीच्या जन्मदात्या ममीवरही त्यांचं प्रेम नाही हे ऐकताच दिदीला आपल्या आईविषयी प्रचंड वाईट वाटतं. आपली आई भीतीखातर आपल्या पपांसोबत राहिली. पपांचे प्रेम तिच्या वाट्याला, भावाबहिणींच्या वाट्याला आलं नाही हे वास्तव दिदीला पचवणं कठीण होतं. आपल्या पपांनी आपल्या ममीवर प्रेमही करू नये? मुलांची जबाबदारी तिहाईत डॉक्टरवर देण्याइतमत पपा आईपासून दूर गेलेले होते.

मग प्रेमसंबंध नसतानाही पपा–ममी केवळ पती–पत्नी या नात्यात केवळ सोय म्हणून एकत्र बांधले गेले? हा विचार दिदीला त्रासदायक वाटू लागला. त्यामुळे तो राजवाडा, त्यातील मालकी हक्क या सर्वांविषयी दिदीला तिरस्कार वाटला तर ते चुकीचं नाही. कोणतंही नातं प्रेमाने जास्त काळ टिकू शकतं. पण तिथे भीती, दहशत असेल तर ते नातं घृणेकडे वळतं त्यामुळे मनात कोणतीही प्रिती नसेल तर तिरस्कार, अलिप्तता या नकारात्मक गोष्टींची वाढ होते. दिदीच्या मनात नेमकं हेच द्वंद्व चालू होतं. प्रेमाचा अंकुर नसलेल्या व्यक्तीवर ती प्रेम कशी करू शकते?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

सुंदर मी होणार प्रस्तावनाः

लेखक पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याविश्वातील चतु:रस्त्र व्यक्तिमत्त्व होय. विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार म्हणून प्रसिद्ध. मार्मिक आणि निर्मळ विनोद, सूक्ष्म निरीक्षण, भाषेचा कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण वापर करण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची बलस्थाने होत. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘ती फुलराणी’, ‘अंमलदार’ ही नाटके’, ‘सदू आणि दादू’ ‘असा मी असामी’ यांसारख्या एकांकिका, ‘हसवणूक’, ‘बटाट्याची चाळ’, इत्यादी विनोदी लेखसंग्रह तर ‘अपूर्वाई आणि पूर्वरंग’ इत्यादी ‘प्रवासवर्णने’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’ यांसारखी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार, भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित.

सुंदर मी होणार पाठाचा परिचयः

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाल्यानंतरचा काळ. नंदनवाडीच्या संस्थानिकांचा भव्य राजवाडा अजूनही जुन्या काळाची अदब अन् मुजरे सांभाळत बसलाय. महाराजांची थोरली मुलगी दीदीराजे गेली १० वर्षे खुर्चीला खिळून बसलीय. संस्थानाचे खास डॉक्टर तिच्यावर औषधोपचार करत आहेत. राजेंद्र, प्रसाद आणि बेबीराजे ही तिची भावंडं.

१०वर्षांच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाही. २६–२७ वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करील, असं खात्रीनं वाटू लागलंय. कवी गोविंदांच्या ‘मृत्यू म्हणजे वसंत माझा’ यांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ती स्वतः संदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य बेबी स्वत:च्या कल्पनेनं अनुभवू लागते.

दिदी तर अधू; पण त्या वाड्यातल्या कुणालाच त्या चार अवाढव्य भिंतींच्या बाहेर जाता येत नाही. संस्थानाची अमर्याद सत्ता गमावलेल्या महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्या राज्यात घोड्यांचा लगाम धरून अदबीनं उभं राहणाऱ्या मोतदाराचा मुलगा बंडा सांवत निवडणूक लढवून असेम्ब्लीचा सदस्य बनलाय, हे महाराजांना सहन होत नाही. लोकशाहीच्या नावानं सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी, हे त्यांना मंजूर होत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

योगायोग असा, की याच बंडा सावंतवर धाकट्या मुलीचं–बेबीचं प्रेम आहे; पण महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला एक कवी – संजय देशमुख – एकदा तिला भेटायला वाड्यात येतो. तिच्या नकळत तिच्या कविता बेबीनं कवीला पाठवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं, तर उत्कटतेनं करावं. असं कवीचं तत्त्व. खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो; पण तो तिथं आलाय हे कळताच महाराज येतात आणि त्याला हाकलून लावतात. त्यांचा हुकूम ऐकताच एकाएकी अवसान येऊन दिदी खुर्चीतून उठते, उभी राहते. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, सुंदर मी होणार’ असं काव्य तिला स्फुरतं.

दिदी आता चालण्याचा सराव करते; पण बरी होत आहे, हे महाराजांना मान्य होत नाही. दरम्यान, त्यांची पुतणी – एका लक्षाधीशाबरोबर लग्न केलेली – भेटीला येते. तिचा नवरा सुरेश हा सुरांच्या आनंदात डुंबणारा; पण बाथटबमध्ये बसल्यासारखं घराच्या उंच भिंतींच्या आत गीतांचा आनंद घेण्याची त्याला आवड. निरनिराळे राग आळवीत तो ‘आसावरी’ रागाशी दीदीची तुलना करतो.

महाराजांचा कठोरपणा वाढत जातोय. ते मुंबईला गेलेले असतात. तिथून पत्र पाठवून इंग्लंडला जाऊन दीदीवर उपचार करण्याचा बेत प्रकट करतात. त्या वेळी मुलांची आई – संस्थानची राणी मृत्युपंथाला लागलेली असताना तिच्या काळजीपोटी स्वत:चं ठरलेलं लग्न रद्द करून आयुष्यभर मुलांची आई होऊन राहण्याचं व्रत घेतलेले डॉक्टर आत्मकहाणी सांगतात.

इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दीदीला आश्चर्य वाटत असतं; पण एकेक करून भावंडं आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात आणि आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिला ही मुलं झाली, हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची चीड येते.

दिदीला पाहिल्यावर सुरांच्या मागून जाण्यासाठी घराच्या भिंतीबाहेर पडणारा सुरेश पुन्हा एकदा सपत्नीक भेटायला येतो. आता सुरेशरूपी सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं. तो मुक्तपणे गाऊ लागतो. ते स्वर कानी पडल्यानं संतापलेले महाराज येऊन त्याला हाकलून लावतात.

आता मात्र महाराजांच्या या हुकूमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दिदी वाड्याबाहेर पडते. तिच्या पावलांत बळ आलेलं असतं. तिला नवे पंख फुटलेले असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

सुंदर मी होणार समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

पांगुळगाडा – पांगळ्या मुलाला चालायला शिकवण्यासाठी तयार केलेली तीन चाकी गाडी (a young child’s go-cart) आजन्म – जन्मापासून, जन्मभर (throughout the life) विटंबना – अप्रतिष्ठा (ridicule, mockery) आपत्ती – संकट (bad times, distress) तिटकारा – तिरस्कार, कंटाळा (dislike, disgust), गुच्छ – फुलांची एकत्र केलेली जुडी (a cluster, a bouquet of flowers), स्तब्ध – स्थिर, शांत (silent, quiet) प्रयोजन – हेतू, कारण (motive, purpose) पाठिंबा – आधार (support) अपराध – गुन्हा (crime) संगोपन – जोपासना (careful preservation) मातेदार – घोडा सांभाळणारा (groom), उनाड – निरुदयोगी (truant, vagabond).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

11th Marathi Digest Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Textbook Questions and Answers

कृती

1. अ. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न 1.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे –
(अ) पोपटी पानात जाण्यासाठी
(आ) उत्साहाने सळसळण्यासाठी
(इ) पानांचे विचार घेण्यासाठी.
उत्तर :
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे – पानांचे विचार घेण्यासाठी.

प्रश्न 2.
जन्माला अत्तर घालत म्हणजे –
(अ) दुसऱ्याला आनंद देत.
(आ) दुसऱ्याला उत्साही करत.
(इ) स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
उत्तर :
जन्माला अलर घालत म्हणजे – स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

प्रश्न 3.
तो फाया कानी ठेवू ….. म्हणजे
(अ) सुंगधी वृत्ती जोपासू.
(आ) अत्तराचा स्प्रे मारू.
(इ) कानात अत्तर ठेव.
उत्तर :
तो फाया कानी ठेवू …. म्हणजे – सुंगधी वृत्ती जोपासू.

प्रश्न 4.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू …. म्हणजे
(अ) दारांना तोरणाने सजवू..
(आ) दाराला हलतेफुलते तोरण लावू.
(इ) निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
उत्तर :
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू…. म्हणजे – निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू,

प्रश्न 5.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू….. म्हणजे –
(अ) निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.
(आ) झाड होऊन फांदया पसरीन,
(इ) झाड होऊन सावली देईन.
उत्तर:
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले वाहू …. म्हणजे – निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.

आ. खालील कृतींतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 1
उत्तर:

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृतीसूचित होणारा अर्थ
1. कोकिळ होऊनी गाऊसमरसतेने जीवन जगू
2. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहूजीवनाचा आनंद लुटू

2. अ. खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ ……….
उत्तर :
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ ……..
निसर्गाच्या कुशीत जाऊन त्यांचे विचार जाणण्याचा प्रयत्न करू, झाड हे मनुष्यरूपी प्रतिमा घेतली तर माणसांच्या मनात शिरून त्यांचे विचार ऐकू, जाणून घेऊ म्हणजे मतभेद कमी होतील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

प्रश्न 2.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू ……….
उत्तर :
हातात ऊन दुचमळते नि सूर्य लागतो पोहू ………
आपल्या ओंजळीत असणारे दुसऱ्याच्या हातात देताना मन कातर होतं आणि आपलं अंतरंग त्यात दिसू लागतं.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 2
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 3

3. काव्यसौंदर्य

प्रश्न अ.
‘पोपटी स्पंदनासाठी, कोकिळ होऊन गाऊ’ या काव्यपंक्तींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांना झाड व्हायचे आहे. झाडांच्या मनात शिरून, पानांच्या मनातील विचार समजून घ्यायचे आहेत. हे म्हणजेच माणूस म्हणून जगताना दुसऱ्या (झाडाच्या) माणसाच्या मनात पोहोचून त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. हे पोपटी स्पंदनासाठी करायचे आहे. म्हणजे चांगल्या नात्यांसाठी हा हिरवेपणा जपायचा आहे. म्हणजे आयुष्याचे सुरेल गाणे गाता येऊ शकते. इथे पोपटी स्पंदन ही रंगप्रतिमा वापरली आहे.

प्रश्न आ.
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
ऊन आणि सावली हा निसर्गाचा प्रकाशखेळ असतो. वस्तूच्या ज्या बाजूने ऊन असते. त्याच्याविरुद्ध बाजूला त्या वस्तूची सावली पडत असते. झाडांच्या विविध आकाराच्या सावल्या आपल्याला दिसतात त्या त्यांच्यावर पडणाऱ्या ऊनामुळे. झाडांच्या पायापासून त्याची सावली दिसत असते. या कवीतेत कवी माणसाला झाड म्हणून संबोधतो. माणसालाही ऊन-सावली हे खेळ अनुभवायला लागतात. त्याच्या आयुष्यातील प्रखर प्रसंग, घटना उन्हासारखी दाहकता देतात. तर चांगल्या घटना सावलीसारखी माया, आसरा देतात. सावली जरी उन्हामुळे पडत असली तरी उन्हावरच ती स्वत:ची नक्षी कोरत असते. उन्हालाही शीतलता देण्याचा यत्न करते.

प्रश्न इ.
‘डोळ्यातं झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
उत्तर :
जल, वायू, पृथ्वी, आकाश, भूमी ही आपली पंचतत्त्वे आहेत. यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. यातील जलतत्त्व हे 70% ने व्यापलेले आहे. या जलाशिवाय जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आनंदाच्या वा अतीव दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात पाणीच व्यापून राहते. अन्यातील खळाळते पाणी तृष्णा भागवते पण तेच पाण्याचे रूप डोळ्यात दाटून आले की दुःखद भावना प्रकट करते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

4. अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
तुम्ही ‘झाडांच्या मनात शिरला आहात’ अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर :
सर्वांना विसावा, आधार देणाऱ्या झाडांच्या मनात मी शिरलो आणि मी मला मिळालेल्या मनुष्य जन्माची खंत करू लागलो. झाड कसं जन्माला येतं ते तुम्हालाही माहीत आहेच, बीजाला कोंब फुटले की त्याचा जन्म होतो. त्याच्या बाल्यावस्थेची ती अवस्था फार लोभसवाणी असते. अंकुरित झालेल्या बियाण्यांमधून ते नवीन जन्माला सुरुवात करत असते. तेव्हाच ते दोन्ही पाकळ्या मिटून बंदन करून जन्माला येते.

निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्याचा सदैव भाव असतो. माझे ‘मी’ पण त्याचे कधीच तो दाखवत नाही. निसर्गातीलच ऊन, वारा, पाकस यांच्यावर तो वाचत असतो. पाणी मिळवण्यासाठी त्याची मूळे खोलखोलवर जमिनीत शिरतात. पण हे पाणी मिळालं आहे त्या पाण्याचे उपकारही लक्षात ठेवतात, म्हणूनच झाडं जिथे जास्त तिथे पावसाचे प्रमाण जास्त असतं. निसर्गातील सर्वच घटकांबद्दल त्याच्या मनात आत्मीयता असते. विहार करणारे पक्षी, त्यांची घरटी, पिलावळ यांचे ते घर असते.

अनेकांना सामावून घेऊन इतरांना आनंद देत स्वतः आनंदी राहणं हे झाडापेक्षा दुसऱ्या कुणालाच कळलं नाही. आपल्यात जे जे आहे ते ते दुसऱ्याला दयावं ही किमया त्यालाच साधली आहे. वातावरणातील अशुद्धता आपल्यात घेऊन शुद्ध वातावरण ठेवताना त्याचाही कस लागतो पण विनातक्रार काम करताना ते दिसतं, आपला जन्मच इतरांसाठी आहे हे कधीही ते विसरत नाही म्हणून झाडं जे काही देतात त्यामुळे आपण परिपूर्ण होतो. आपल्या मानवाची झोळी मात्र दुबळी आहे.

प्रश्न आ.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर :
निसर्ग ज्या पद्धतीने मानवाला सर्वकाही देत असतो त्याचे मोजमाप कधीच करता येणार नाही. मानवी जीवनच मुळी निसर्गातील पंचतत्त्वांवर आधारलेलं आहे. भूमी, वायू, जल, आकाश, अग्नी या पंचतत्त्वांशिवाय आपण अपूर्ण आहोत. मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर या पंचतत्त्वांचा वापर करून स्वत:चे जीवन सुखकर केलं पण तरीही तो परिपूर्ण होऊ शकला नाही.

कारण मुळातच तो परावलंबी आहे. पण त्याला हे अजून समजलेच नाही आहे. ज्या पृथ्वीवर. भमीवर आपण राहतो त्या भूमीवर जर पृथ्वीच्या पोटातील लाव्हारस बाहेर पडू लागला तर? अथवा सतत भूकंप होऊ लागले तर? मानव या पृथ्वीवर राहूच शकणार नाही. वाऱ्याचा वेग वाढला आणि त्याने वादळ निर्माण झाले तर मानव कुठेच स्थिर राहू शकणार नाही.

अग्नीरूपी, वणवा जर जंगलातून पेट घेऊ लागला, भूमीतून बाहेर ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर पडू लागला तर मानव असहाय्य होईल. पृथ्वीवर असलेले जलसाठे तसंच पाऊस यांनी भयंकर रूप धारण केले तर ….. मानवाचे अस्तित्व नष्ट होईल. आकाशातील सूर्य, चंद्र, तारे यांचे अस्तित्व नसेल तर दिवस-रात्र, ऋतू या सर्वांवरच परिणाम होईल. याच बरोबरीने जलचर, उभयचर, भूचर या चरांवरती प्राणी-पक्षीही महत्त्वाचे आहेत. निसर्गातूनच मानवाची सौंदर्यदृष्टी विकसित झाली. संगीत, रूपरस, गंध, स्पर्श यांचे ज्ञान निसर्गामधूनच मानवाला मिळाले आहे. म्हणून निसर्गातील प्रत्येक घटकांवर मानवी जीवन अवलंबून असलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

5. ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर:
कवी नलेश पाटील हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितेत निसर्ग, त्याच्या रंगरूपासह अवतरतो. निसर्गातील अनेक गोष्टी मानवाला केवळ आनंद देत असतात. त्याची देण्याची अमर्याद शक्ती आहे. निसर्गाच्या या शक्तीला आपण ओळखलं की आपण त्याच्याशी एकरूप होत जातो, कवी निसर्गाकडून अनेक गोष्टींचा आनंद घेत जगत आहे. झाडांच्या मनात जाऊ या कवितेत कवी या निसर्गातील अनेक गोष्टींचे वर्णन करून आपल्याला त्याच्या ताकदीचे दर्शन घडवत आहे.

झाडांच्या मनात जाऊन कवीला त्याच्या फांदयांवर असणारी पाने आहेत. त्यांच्या मनापर्यंत पोहोचवायचे आहे. झाडांचे असलेली पोपटी श्वास त्याला आपलेसे करायचेत आणि त्या झाडावर असलेल्या कोकिळेसारखे सुरेख सुरेल गाणे गायचे आहे. वसंतातील बहरामध्ये तो सावळ्या कोकिळेचा सूर ऐकत ऐकत मनाला रिझबू. वसंत ऋतूमध्ये झाडांना आलेला बहर हा विविध रंगांच्या फुलांचा आहे. त्या फुलांमधील सुगंध सर्वत्र पसरल्यामुळे मन आनंदी झालं आहे. नैसर्गिक फुलांचा गंध जणू काही आपल्या जन्माला अत्तर मिळालं आहे असं कवीला वाटतं. त्या कोकिळेच्या सरासोबत गाणं गात अत्तराचा फाया कानी ठेवन, आपले जगणे आनंदी करावे असं कवीला वाटते.

बागेत, रानात अनेक फुलपाखरे आहेत, त्याच्या पंखांवर विविध त-हेचे रंग आहेत, ते पाहून जणू काही ते निसर्गपंचमी खेळून आले आहेत असे कवीला वाटते. विविध फुलांवर बसलेली ही फुलपाखरे त्याचा रंग आपल्यावर धारण करतात की काय असं वाटू लागतं. त्या फुलपाखरांचा थवा सर्वत्र फिरताना दिसत आहे. हे तोरण रानावनात सर्वत्र भिरभिरत आहे. हे तोरण आपल्या दाराला लावण्याची तीव्र इच्छा कवीला होत आहे, त्या फुलपाखरांच्या पंखांना पताका ही उपमा फार सजगतेने वापरली आहे.

हा तर उत्सव आहे या पाखरांचा, त्या पाखरांच्या थव्याचे तोरण आपल्या दाराला लावावे म्हणजेच आपल्या दारीसुद्धा हा उत्सव साजरा व्हावा असं कवीला वाटत आहे. रानातील झरे निर्मळपणे वाहत आहेत. ते पाणी अश्रू बनूनही एखादयाच्या डोळ्यात उतरते. दोन्ही ठिकाणी पाण्याचीच रूपे आहेत. पण एक आहे ते निर्मळपणाने वाहत आहे. तर दुसरे पाणी कुणाच्या तरी करणीने डोळ्यात उतरले आहे. झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट ऐकून कवीला असं वाटतेय की हे पाणी आनंदाचे गीत गात आहे. अथवा देवाघरची गाणी गात आहे. या गाण्याच्या ऋतूमध्ये आपणही खळाळत वाहत जाऊ, कोणतेही पाश न ठेवता वाहत जाणं, प्रवाही होणं हे कवीला सुंदर वाटत आहे.

कवी हे खळाळते पाणी पाहून खुश होतो आणि अलगद त्याचे मन त्या पाण्यातील एका खडकावर जाऊन बसते. ही कल्पनाच किती संदर आहे. मन पाण्याचा भाग होऊन खडकावर जाऊन बसतं आणि मग जे पाणी खळाळते होते तेच पाणी थई थई नाचताना दिसते. हा कवीच्या तरल मनाचा आणखी एक अविष्कार दिसतो की सुरेल गाण्याची लकेर होऊन त्याचे मन पाण्यात बसते आणि मग ते पाणी नाचतानाही दिसते. त्या मनमुक्त नाचण्याचा आनंद घेत असताना एक तुषाराचे रोप म्हणजेच खडकांवर पडणारे पाणी कवीच्या अंगावर पडून स्वत:च्या मायेची पखरण करत आहे, त्याला न्हाऊ घालत आहे.

आदिमानवाच्या काळापासून आपण पंचमहाभूतांना प्रमाण मानून त्यांची पूजा करत आलो आहोत. हेच तत्त्व कवी कवितेत दाखवून म्हणत आहे आकाशतत्त्व मी ऑजळीत जरासे धरले. ते ही जरासे कारण आकाश विस्तीर्ण आहे ते ऑजळीत मावू शकणार नाही, आपली तेवढी कुवत नाही, पण या आकाशाला ओंजळीत धरून अवघ्या पाण्याला सूजनत्व देण्याकरता त्या पाण्याचीच ओटी आकाशाने भरली. ओटी भरणं हे सृजनशीलता आहे, ती ओटी भरताना आकाशातील ऊन हातात दुचमळते आणि सूर्य त्यात पोहायला लागतो, म्हणजे आकाशासमवेत त्याची ही बिंबसुद्धा त्या पाण्यासोबत विलीन होतात.

हे फांदीवरील पक्षी त्यांना बदलणारा ऋतू कळतो, बदललेली हवा कळते, सृष्टीतले सूक्ष्म बदल कळतात कारण ते हा हंगाम जगतात. ते स्या हंगामात खरे साक्षीदार आहेत. झाडांच्या बुंध्याशी जी सावली हलत असते ती इतकी जिंवत असते की जणू ती सावली आपल्या रूपातून स्वतःला नव्हे तर उन्हाला उजाळा देत असते. सावल्यांमधून दिसणारे ऊन हे सावलीत अभावाने दिसणारे ऊन नव्हे तर सावलीत मुद्दामहून काढलेली नक्षी आहे आणि झाडावर दिसणारे कावळे हे या काळ्या सावलीलाच सावलीचे काळे पंख फुटून तयार झालेले कावळे आहेत. कावळ्यांचा जन्म निर्माणाचा हा वेगळाच काव्यात्मक अनुबंध शोधला गेलाय. अशा रूपकांसाठीच नलेश पाटील लोकप्रिय होते.

निसर्गाच्या अस्तित्वाचे असे वेगळे विभ्रम ही कवी नलेश यांच्या कवितेची ओळख आहे. एका सच्चा चित्रकाराने निसर्गाकडे किती काव्यात्मक नजरेने पाहावे याचा वस्तुपाठ म्हणजे नलेश यांची कविता. कवी शेवटी म्हणतो की मानवी स्पर्श जिथे नसतील, फुलपाखरांची संगत लाभेल अशा रानात ईश्वर मला तू टाक, माझे बाहू पसरून मी झाड होऊन जगेन, माझे जगणे केवळ सृष्टीमय होऊन जाईल. मला स्वतःला बहर येईल, या शब्दांतील एकावेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा, शेवटच्या टप्यापर्यंत कमीत कमी शब्दांत पोहोचा.
उदा. सुंदर-घायाळ
सुंदर – आदर – आदळ – आयाळ – घायाळ

  • डोंगर – …… …… ….. अंबर
  • शारदा – ………………………….. पुराण
  • परात – …………… कानात
  • आदर – ………… पहाट
  • साखर – …………. नगर

उत्तर :

  • डोंगर – आगर – मगर – अंधार – अंबर
  • शारदा – वरदा – वरण – पुरण – पुराण
  • परात – वरात – रानात – नादात – कानात
  • आदर – पदर – पहार – रहाट – पहाट
  • साखर – खजूर – मजूर – मगर – नगर

11th Marathi Book Answers Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Additional Important Questions and Answers

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. फाया ठेवण्याची जागा –
  2. हा पक्षी होऊन गायचे आहे –
  3. रंगपंचमी खेळून हे भिजले –
  4. तोरण लावण्याची जागा –

उत्तर:

  1. कान
  2. कोकिळ
  3. फुलपाखरू
  4. दार

योग्य पर्याय निवडा.

प्रश्न 1.

  1. बहरात वसंतमधल्या तो सूर (सावळा / बावळा / कावळा) ऐकत.
  2. हा थवा असे (रंगीत / संगीत / मनगीत / पताकाच फिरणारी.
  3. हे उधाण (दुःखाचे / भीतीचे / आनंदाचे) ही देवाघरची गाणी.

उत्तर :

  1. सावळा
  2. रंगीत
  3. आनंदाचे

अभिव्यक्ती :

प्रश्न 1.
खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
या ओळीतील आशयसौन्दर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांच्या ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेत कवी निसर्गापासून माणूस कसा आनंद घेऊ शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फुलपाखरे ही निसर्गाचाच भाग, किती विविधतेने नटलेली असतात, अनेक रंग त्यांच्या पंखावर असतात. अल्प आयुष्य जरी असले तरी ते भिरभिरत जगताना दिसतात, कवी त्याच्या सौंदर्याकडे आकृष्ट होतो. त्याला वाटते की निसर्ग किंती वेगळ्या शता भिरभिम लागला की जण पताकाच फिरत आहेत असे वाटते. निसर्गाची विविध रंगरूपे असतात, त्यांना समजून घेऊन आयुष्याची संदर रंगपंचमी खेळता येऊ शकते. त्याकरता माणसाला समजन घेणं महत्त्वाचे आहे.

प्रश्न 2.
निसर्गातील एखादया घटकाकडून तुम्हांला शिकायला मिळाले त्या घटकाबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांच्या कवितेची शिकवण पाहता पाहता मी निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो. मला निसर्ग आवडतो. तो भरभरून आपल्याला देत असतो. त्यातल्या त्यात मी पृथ्वीकडून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे पाहू लागलो. आपल्या अखंड मानव जातीचा भार ती उचलत आहे. मानवाने किती प्रगती केली, आदिमानवापासून ते आतापर्यंत त्याने केलेली प्रगती ही केवळ पृथ्वीच्या सहनशक्तीमुळे झालेली आहे असं मला वाटतं, इतक्या इमारती, इतकी वाहतूक त्याकरता पृथ्वीच्या गर्भाशयावर आपण सतत हल्ले करत असतो. तरी ती आपल्याला माफ करते. झीज सोसत राहते.

अनेकदा तिला आपण अस्वच्छ करत असतो तरी ती मूकपणे सारे सहन करते. तिचे स्वच्छता अभियान सुरू करतो. पण ते सुद्धा नीट पाळत नाही. तीन उन्हामुळे जमिनीची लाही लाही होते. ते आपण सहन करू शकत नाही पण पृथ्वी त्यालाही सामोरी जाते, तिच्या मनात खदखदणारा ज्वालामुखी सहन करत ती संयम ठेवून आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. ती अनेक गोष्टी आपल्या पोटात घेऊ शकते. ती सर्वांचा आधार असते. आपण तिच्यासाठी नेहमी कृतज्ञता बाळगायला हवी असे मला वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

झाडांच्या मनात जाऊ Summary in Marathi

प्रस्तावनाः

पालघर येथे जन्माला आलेले कवी नलेश पाटील हे इंग्रजी माध्यमात शिकूनही त्यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. मुंबईतील जे. जे. । इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये त्यांचे शिक्षण झाले. ‘कवितेच्या गावा जावे’ या कवितेच्या कार्यक्रमात त्यांची विशेष ओळख समाजमानसात तयार झाली. ‘टूरदूर’, ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीत रचना केली. ‘हिरवं भान’ हा त्यांचा कवितासंग्रह, ‘नक्षत्रांचे देणे’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातही त्यांच्या कविता गायल्या गेल्या.

गावात बालपण गेलेले त्यात नंतरच्या काळात रंगांची मिळालेली सोबत यांमुळे निसर्गाच्या विविध रंगप्रतिमा त्यांच्या काव्यात सापडतात. शब्द, लय, नाद, अर्थ यांचा विविधांगी प्रयोग त्यांनी आपल्या काव्यात केला. शब्दांतून चित्रमय मांडणी करणे यात त्यांचा हातखंडा आहे.

कवितेचा आशय:

निसर्ग आणि आपण एकमेकांशी इतके जोडले गेलो आहोत की एकमेकांपासून आपली ताटातूट होऊ शकत नाही. निसर्ग आपल्यावर अवलंबून नाही पण आपण मात्र क्षणाक्षणाला निसर्गावर अवलंबून आहोत. मानवाने स्वत:ची उत्क्रांती केली ती निसर्ग शिक्षणातूनच. हे नैसर्गिक शिक्षण त्याला त्याच्या संवेदनांपर्यंत पोहोचवतं. त्याच्या मनाला, विचारांना चालना देतं. कवीला या निसर्गाची नितांत ओढ आहे. त्याच्या प्रत्येक सोहळ्याशी तादात्म्य होण्याची उत्सुकता आहे. म्हणून निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन कवी या कवितेतून रेखाटतो.

त्याला वाटते झाडांच्या मनात जाऊन त्यांच्यावरील पानांचे विचार व्हावे. झाडांनाही मन असते. ते त्याच्या पानरूपी कृतीतून तो प्रकट करतो असं त्याला वाटतं. या झाडाचा पोपटी रंग आपल्या श्वासात उतरावा याकरता त्याला त्याच्या श्वासात उतरावे असे वाटते. त्यासाठी आपण कोकिळ व्हावं असं त्याला वाटते, वसंतरूपी बहर आला की कोकिळ गाऊ लागतो. तो निसर्गाचेच जणू गीत गातो. आपल्याला सुद्धा निसर्गगीत गायचे असेल तर कोकिळ व्हावे लागेल.

वसंतातील बहर फुलत जातो. सावळ्या रंगाचा कोकिळ त्याचा सूर लावत जातो. वसंतात अनंत फुले फुलून येतात त्या फुलांचा गंध सर्वत्र पसरत जातो. अनेक जन्मांना त्यांचे अत्तर पुनरुज्जीवन देत असते. या पाखरांच्या, रानाच्या सुराबरोबर आपण त्या सुगंधी अत्तराचा फाया कानामध्ये ठेवू. त्यामुळे आपलेही जगणे सुगंधी, सुरेल होईल.

बागेत, रानात फिरणारी भिरभिरणारी फुलपाखरे पाहून कवीला वाटते की ही फुलपाखरे जणू काही रंगपंचमीच खेळून बाहेर पडली आहेत. या फुलपाखरांचे विविध रंग कवीला आकषून घेतात. या फुलपाखरांचा थवा उडत असताना त्यांच्या भिरभिरत्या पंखांमुळे या हलणाऱ्या पताकाच आहेत असे कवीला वाटते. हे छान रंगीबेरंगी तोरण दाराला आणून लावावे असा मोह कवीला फुलपाखरांच्या रंगांकडे पाहून होतो.

रानातील झरे निर्मळपणे वाहत असतात, त्यांच्या वाहण्यातच संगीत असतं. हे झरे जणू काही परमेश्वराचे डोळे आहेत असं कवीला वाटतं. या डोळ्यात झऱ्याचे पाणी भरभरून वाहत आहे. हा आनंद आहे की देवाने आपल्याकरता पाठवलेली गाणी आहेत असा प्रश्न कवीला पडतो. या झयाच्या गाण्याच्या ऋतूत आपणही खळाळत जाऊ, या प्रवाहात एकरूप होऊ आणि पाण्यासारखे निर्मळ राहू असं कवीला वाटतं.

पाण्याशी एकरूप होताना कवीचं मन तिथल्याच एका खडकावर बसून जातं. आजूबाजूला असणारी कारंजी मनसोक्तपणे थुईथुई करत आनंद घेताना दिसतात. यातील हे कारंज्याचे रोप कवीवर आपले तृषार उडवून त्याला न्हाऊ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या निसर्गाशी एकरूप होता होता कवी अलगद आपल्या ओंजळीमध्ये आकाश धरू पाहतो. या आकाशाला ओंजळीत घेऊन कवी अवघ्या पाण्याची ओटी भरतो तर हातात ऊन येऊन बसते, डुचमळते आणि त्या पाणभरल्या ओंजळीत सूर्याचे प्रतिबिंब पोहायला लागते. असा पाणी, प्रकाशाचा खेळ निसर्गात राहूनच अनुभवता येतो.

निसर्गातील विविध रंगांचे पक्षी तरी किती? या पक्ष्यांचासुद्धा हंगाम असतो. त्या हंगामात ते ते पक्षी आपल्याला दर्शन देतात. हे पक्षी झाडांवर रमतात. त्याच्या बुंध्यात, खोडात आपले अस्तित्व दाखवतात. झाडांच्या सावल्या इतरत्र पसरलेल्या पाहन त्या उन्हावर जण नक्षी काढत आहेत. असं कवीला वाटतं. मग या झाडांवर बसलेले काऊ, चिऊ उडू लागले की ते सावलीतुनहीं प्रकट होतात, दिसू लागतात ते पाहून कवीला वाटतं की या सावल्यांनाच जणू पंख फुटले आहेत. या सुंदर निसर्गात रमता रमता कवीला वाटतं की जिथे मानवी स्पर्श होणार नाही, खूप फुलपाखरं जिथं असतील अशा रानात हे परमेश्वरा मला झाड बनून जन्माला घाल, तिथे मी माझे बाहू पसरून बसेन आणि या सृष्टीचा एक भाग होऊन त्यासवे जगण्याचे गीत गाईन.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  • स्पंदन – श्वास – (breathing, breath).
  • फाया – अत्तर लावलेला कापसाचा बोळा, अत्तराचा अंश – (fragrant, essence).
  • पताका – ध्याना – (lag).
  • करणी – कृत्य, कृती, क्रिया – (act).
  • तुषार – पाण्याचे फवारे (spray of water) – कारंजाचे पाणी.
  • डुचमळते – हलते.
  • खडक – दगड – (hard stone / rock).
  • नक्षी – वेलबुट्टी – (design, decoration).