Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता, कारण …………….
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ……………
(अ) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
(ब) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुदंर वाजवत होता.
(क) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर :
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

2. आकृतिबंध पूर्ण करा. 

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 1
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 2

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 3
उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. धीटभित्रा
2. हजर गैरहजरगैरहजर
3. सुंदरकुरूप
4. स्तुती निंदानिंदा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

4. खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.

प्रश्न 1.
खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 4
उत्तर :
i. लेखकाने सुमारे वीसएक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली.
ii. नानांना काहीच ऐकू येत नव्हते.

5. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा. 

प्रश्न 1.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.

  1. वर्गातील विदयार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
  2. आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
  3. उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.

उत्तर :

  1. वर्गातील विद्यार्थ्यांनी जिवाचे कान करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे.
  2. आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विक्ष्यानि काळजी घ्यायला हवी.
  3. उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

6. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 

प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. कोलाहल(अ) प्रवासी
2. त-हेवाईक(आ) विचित्र
3. मुसाफिर(इ) प्रेरित
4. उदयुक्त(ई) गोंधळ

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. कोलाहल(ई) गोंधळ
2. त-हेवाईक(आ) विचित्र
3. मुसाफिर(अ) प्रवासी
4. उदयुक्त(इ) प्रेरित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

7. स्वमत :

प्रश्न अ.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्टचे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जिवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते; परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली, याचे त्यांना दुःख झाले.

त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला, शिरीषची आकलनशक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरुन त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते.

वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. संगीतकलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दु:खी झाला. पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला.

लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास ब धीटपणा दिसून येतो. अशाप्रकारे, या पाठातून शिरीषचा ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात.

प्रश्न आ.
शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
शिरीष हा दहा – बारा वर्षांचा मुलगा, त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण एका जबर अपघातामुळे ते शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे, कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे, ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

8. अभिव्यक्ती: 

प्रश्न अ.
प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.
उत्तर :
(शिरीष व त्याचे वडिल संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात.)

  • शिरीष : नमस्कार ! मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे.
  • संगीत शिक्षक : बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर!
  • शिरीष : माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील. अशी माझी अट आहे.
  • संगीत शिक्षक : मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण तुला त्यासाठी महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!
  • शिरीष : कबूल! मी उद्यापासून शिकवणीला येतो. तीन महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो.)
  • शिरीष : माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी दयावी, ही विनंती.
  • संगीत शिक्षक : शिरीष तुझी मन:स्थिती ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही नाही. त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही.
  • शिरीष : मला परवानगी दिली, तर माझी मन:स्थिती आपोआप सुधारेल, सर.
  • संगीत शिक्षक : ठीक आहे. दिली तुला परवानगी; पण नीट वाजव.
  • शिरीष : होय सर, धन्यवाद. (शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते व शिक्षक सगळेच त्याचे वादन ऐकून प्रभावित होतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात व त्याचे कौतुक करतात.)
  • संगीत शिक्षक : अरे वा ! शिरीष. तू तर आज कमालच केली. अशा मन:स्थितीत तुला कसे शक्य झाले?
  • शिरीष : सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले. त्यांच्या सुखासाठी मी ही धडपड करत होतो; पण ज्या दिवाशी नाना गेले त्या दिवशी मी संगीत बंद केले; पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा वादन ऐकूशकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारा सरशी मी त्याच दिवासापासून व्हायोलिन वाजावाला सुरुवात केली. आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही. चोवीस तास एकच उदयोग, एकच ध्यास! त्याचा हा परिणाम.
  • संगीत शिक्षक : शाब्बास ! शिरीष तू फार मोठी कामगिरी केली. आज तुझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ (शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यावेळी शिरीषच्या डोळ्यांतून अश्रूओघळले.)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 5

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 6
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 7

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

विशेषणबिशेष्य
1. तिसरी(अ) मुसाफिर
2. जाहीर(ब) घंटा
3. नवखा(क) कोलाहल
4. संमिश्र(ड) कार्यक्रम

उत्तर :

विशेषणबिशेष्य
1. तिसरी(ब) घंटा
2. जाहीर(ड) कार्यक्रम
3. नवखा(अ) मुसाफिर
4. संमिश्र(क) कोलाहल

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
  2. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होता.
  3. मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
  4. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.

उत्तर :

  1. मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
  2. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
  3. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
  4. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.

प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाचा कोणता पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे?
उत्तर :
लेखकाच्या वादनविदयालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे.

ii. बाहेरचा संमिश्र कोलाहल केव्हा बंद पडला?
उत्तर :
तिसरी घंटा घणघणली तेव्हा बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा ……….. आहे. (प्रवासी, मुसाफिर, यात्री, सहप्रवासी)
ii. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या ………………. होईल. (तंतुवादनाने, तबलावादनाने, वीणावादवाने, फिड्लवादनाने)
उत्तर :
i. मुसाफिर
ii. फिड्लवादनाने

प्रश्न 7.
सहसंबंध लिहा.
स्त्री : पुरुष :: विद्यार्थिनी : …………
उत्तर :
विदयार्थी

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 8

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 9

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता; कारण
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा होता,
ii. शिरीष हा अनुभवी वादक होता.
उत्तर :
i. चूक
ii. चूक

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 10

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. कलेच्या प्रांतातिल हा नवखा मुसाफीर आहे.
ii. मला या मूलाची अतिशय भिती वाटत होती.
उत्तर:
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
ii. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मी
  2. मला
  3. माझ्या

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. अतिशय
  2. संमिश्र
  3. नवखा

प्रश्न 4.
लिंग बदला
i. स्त्री-
ii. विद्यार्थिनी –
उत्तर:
i. पुरुष
ii. विद्यार्थी

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शेवट × [ ]
  2. निंदा × [ ]
  3. दुःख × [ ]

उत्तर :

  1. सुरुवात
  2. कौतुक
  3. आनंद

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, स्थिर होणे
उत्तर :
स्थिर होणे – शांत होणे
वाक्य: मुख्याध्यापकाचा आवाज ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर स्थिर झाले.

प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.
ii. कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
उत्तर:
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 11

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा.
उत्तर :
स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते. मी अनेकदा स्टेजवर कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. एकदा मी शालेय नाटकस्पर्धेत भाग घेतला होता. त्या नाटकात मी नायकाची भूमिका वठवली होती. तो माझा स्टेजवरील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे संवाद बोलताना व अभिनय करताना सुरुवातीला मला धास्तीच वाटत होती. मनावर एक प्रकारचे दडपण आलेले होते.

मनात अनेक वेळा शंका येत होती की जर एखादा संवाद चुकला तर संपूर्ण नाटकाचा बट्याबोळ होईल. पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्टेजवर अभिनय व संवाद यांचा सुंदर समन्वय साधू लागलो, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मला दाद दिली. मग मला हुरूप आला आणि मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे वठवून सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 12

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. फूटलाईट(अ) प्रतिबिंबित
2. मन(ब) ध्यान
3. डोळे मिटून(क) झगझगीत प्रकाश
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास(ड) चलबिचल

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. फूटलाईट(क) झगझगीत प्रकाश
2. मन(ड) चलबिचल
3. डोळे मिटून(ब) ध्यान
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास(अ) प्रतिबिंबित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. फुटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळयांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
  2. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
  3. चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
  4. हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला.

उत्तर :

  1. चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
  2. फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
  3. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
  4. हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखक शिरीषबाबत काय ओळखून होता?
उत्तर :
शिरीषचे अवसान फार वेळ राहणार नाही, हे लेखक ओळखूनोता.

ii. शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते?
उत्तर :
कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. पडदा ……….. वर गेला. (पटकन, झटकन, झरझर, भरभर)
  2. तो …………. गेला आहे, हे मी ओळखले. (गडबडून, घाबरून, गोंधळून, विधरून)
  3. त्याचा चेहरा पूर्वीच्या ……….. न्हाऊन निघाला. (धीटपणाने, अभिमानाने, गनि, आत्मविश्वासाने)

उत्तर:

  1. झरझर
  2. गडबडून
  3. आत्मविश्वासाने

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
तंबोऱ्याचा आवाज : धीरगंभीर :: मनाची अवस्था : ……
उत्तर :
चलबिचल

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच …………
(अ) शिरीषने डोळे पटकन उघडले.
(ब) शिरीषने डोळे झपकन मिटून घेतले.
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.
(ड) शिरीषने डोळ्यांवर हात ठेवला.
उत्तर :
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 13

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 14

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 15

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाने तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली नाही.
ii. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
उत्तर :
i. चूक
ii. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. शिरीषने डोळे मीटून कुणाचे तरि ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धिरगंभीर आवाज घूमु लागला.
उत्तर :
i. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. चेहरा
  2. प्रकाश
  3. डोळे
  4. पडदा

प्रश्न 3.
वचन बदला.
i. डोळा – [ ]
i. सवयी – [ ]
उत्तर :
i. डोळे
ii. सवय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 16

कृती प्रश्न 4. स्वमत

प्रश्न 1.
कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो. यावर तुमचे मत लिहा.
उत्तर :
कोणतीही कला असो, ती शिकताना वा तिचे सादरीकरण करताना कलावंताजवळ धीटपणा व आत्मविश्वास असणे आवश्यक असते. खरे पाहता हे दोन्ही गुण कलेसाठी पूरक असतात. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते, तर धीटपणा कला सादर करताना अप्रत्यक्षपणे अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे कला शिकताना व ती सादर करताना व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट व्यक्ती खंबीरपणे कला आत्मसात करू लागते, तसेच तिचे सादरीकरण ही तितक्याच तन्मयतेने करते. धीटपणा व आत्मविश्वास अंगी बाळगल्यामुळे व्यक्तीचे चित्त इतर घटकांकडे वळत नाही. कला सादर करते वेळी हजारो प्रेक्षकांपुढे ती सादर करताना व्यक्तीच्या मनाची चलबिचल होत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 17

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. लेखकाच्या शिकवणीची फी – [ ]
ii. सहा महिन्यापूर्वी विदयालयात आलेला विद्यार्थी – [ ]
उत्तर :
i. पन्नास रूपये
ii. शिरीष भागवत

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. टपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन ?’
  2. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
  3. ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!’
  4. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.

उत्तर :

  1. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.
  2. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
  3. धीटपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन?’
  4. ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल.’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने धीमेपणाने कोणत्या रागातील गत वाजवायला सुरुवात केली?
उत्तर :
शिरीषने धीमेपणाने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली.

ii. शिरीषला घरी कोणत्या नावाने बोलावले जायचे?
उत्तर :
शिरीषला घरी ‘श्री’ या नावाने बोलावले जायचे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. सुमारे ………………….. महिन्यांपूर्वी शिरीष विदयालयात आला. (सहा, सात, दहा, चार)
ii. ……………… शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. (पटापट, हळूवारपणे, धीमेपणाने, धीम्यागतीने)
उत्तर :
i. सह्य
ii. धीमेपणाने

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कानांवर : विश्वास :: पंचेंद्रिये : ……………..
उत्तर :
दगा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.
तुझ्या अटी एकदम मान्य; …………….
(अ) पण त्यासाठी तुला महिना साठ रुपये फी दयावी लागेल!
(ब) पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!
(क) पण त्यासाठी तुला शंभर रुपये फी दयावी लागेल!
पण त्यासाठी तुला सत्तर रुपये फी क्यावी लागेल!
उत्तर :
तुझ्या अटी एकदम मान्य; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 18

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 19

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

  1. शिरीषला शिकविण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती.
  2. लेखकाला शिरीषचा राग आला.
  3. शिरीषने मल्हार रागातील गत वाजवायला सुरुवात केली.

उत्तर :

  1. चूक
  2. बरोबर
  3. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 20

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. माझ्यापेक्षा माझ्या वडीलांना, मि शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महीना पन्नास रुपये फि द्यावी लागेल.
उत्तर :
i. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा,
उत्तर :

  1. सुहास्य
  2. चमत्कारिक
  3. थोडासा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
लिंग बदला
i. आई – [ ]
ii. मुलगी – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुलगा

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. उठतील × – [ ]
  2. घेणे × – [ ]
  3. अमान्य × – [ ]
  4. बंद × – [ ]

उत्तर :

  1. बसतील
  2. देणे
  3. मान्य
  4. चालू

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
i. पिता – [ ]
ii. चेहरा – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुद्रा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. धक्का बसणे
ii. नवल वाटणे
iii. शंका वाटणे
उत्तर :
i. अर्थ : आघात होणे
वाक्य : मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईवडिलांना जोरदार धक्का बसला.

ii. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोर बघताना सर्वांना नवल वाटते.

iii. अर्थ : संशय वाटणे
वाक्य : रमेशच्या वागण्याची पोलिसांना शंका वाटू लागली.

प्रश्न 7.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 21

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. गाणे गात असलेल्या व्यक्तीला सूरांचे भान ठेवावेच लागते. जर सूर तंतोतंत जुळले तरच व्यक्तीने गाणे चांगल्या प्रकारे सादर केले असे म्हटले जाते. समजा एखाद्या व्यक्तीने गाणे सादर करताना सुरांचा ताळमेळ राखला नाही म्हणजे सूर भटकले तर गाणे गात असलेल्या व्यक्तीचे गाणे चांगल्या प्रकारे सादर होऊच शकत नाही. असे गाणे मनाला भिडत नाही व हृदयात घर करू शकत नाही. चांगले गाणे म्हणजे सुरांचे ताळतंत्र लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची सर्व प्रेक्षक वर्ग दाद देतात. अशीच व्यक्ती एक उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येते. समाजात कलावंत म्हणून ओळखली जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 22

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. नानांच्या चेहऱ्यावरील भाव – [ ]
ii. लेखकाने वाजवून दाखविलेली गत – [ ]
उत्तर :
i. तृप्तीच्या समाधानाचे
ii. पिलू रागातली

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
  2. हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
  3. आमचे नमस्कार झाले.
  4. ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.

उत्तर :

  1. हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
  2. आमचे नमस्कार झाले.
  3. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
  4. ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही’ शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाला कशाचा राग आला?
उत्तर :
लेखकाला शिरीषच्या आगाऊ स्वभावाचा राग आला होता.

ii. शिरीष बरोबर कोण होते?
उत्तर :
शिरीष बरोबर नाना (वडील) होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

iii. लेखकाने कोणत्या रागातील गत वाजवून दाखवली?
उत्तर :
लेखकाने पिलू रागातील गत वाजवून दाखवली.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. दुसरे दिवशी तो अगदी ………….. आला. (वेळेव्याआधी, वेळेनंतर, वेळेवर, बऱ्याच वेळाने)
ii. एक अक्षर न बोलता नाना ………….. बसले.
(खुर्चीवर, टेबलावर, आरामखुर्चीवर, बिछान्यावर)
उत्तर :
i. वेळेवर
ii. खुर्चीवर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाचा शिरीषबद्दलचा ग्रह चांगला झाला; कारण …………
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.
(ब) शिरीषने व्हायोलिन आणले होते.
(क) शिरीषने ढोलकी आणली होती.
(ङ) शिरीषने स्वत:बरोबर पेन आणला होता.
उत्तर :
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 23

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 24

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 25

प्रश्न 5.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 47

प्रश्न 6.
चूक की बरोबर लिहा.
एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवरून उठले.
उत्तर :
चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 7.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 26

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्य शुद्ध करून लिहा.
शिरीष बरोबर एक वयसकर आणि भारदसत गृहस्थ होते.
उत्तर :
शिरीष बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. वडील
  2. शिरीष
  3. गुरुजी
  4. नाना
  5. खुर्ची
  6. व्हायोलिन
  7. विदयालय
  8. विदयार्थी
  9. पिता
  10. पुत्र

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. शिकवणी – [ ]
  2. नियम – [ ]
  3. शिक्षक – [ ]
  4. संवेदना – [ ]
  5. म्हातारा – [ ]
  6. पद्धत – [ ]
  7. उद्देश – [ ]
  8. उत्तम – [ ]

उत्तर :

  1. अध्यापन
  2. अट
  3. गुरुजी
  4. जाणीव
  5. वयस्कर
  6. प्रथा
  7. हेतू
  8. उत्कृष्ट

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. तरुण × [ ]
  2. नाकबूल × [ ]
  3. आज × [ ]
  4. रात्र × [ ]

उत्तर :

  1. वयस्कर
  2. कबूल
  3. उदया
  4. दिवस

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
विद्यालयातविद्यालया
चेहऱ्याकडेचेह-या
स्वभावाचास्वभावा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. एक अक्षर न बोलणे
ii. प्रथा असणे
उत्तर :
i. एक अक्षर न बोलणे – गप्प बसून राहणे
ii. प्रथा असणे – पद्धत असणे

प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले होते.
ii. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळी-पाळीने बघत आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 27

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
एखाक्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा? हे तुमच्या शब्दात सांगा.
उत्तर :
आगाऊ स्वभाव म्हणजे थोडासा उद्धट असा स्वभाव असलेली व्यक्ती स्वभावाने बिनधास्त असते. कधीही कोणाला न घाबरता प्रश्न विचारणे हा तिचा स्वभाव असतो. अशी व्यक्ती इतरांशी बोलताना स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करते. आपल्या समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने छोटी आहे की मोठी हे सुद्धा ती पाहत नाही व आपले मत त्यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त करते. अशा व्यक्तींशी जर कोणी थोडा फार आवाज चढवून बोलले तर अशा स्वभावाच्या व्यक्तींना फारच राग येतो व मग आपल्याशी आवाज चढवून बोलत असलेल्या व्यक्तीचा पाणउतारा केल्याशिवाय ती गप्प राहूच शकत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 28

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. भोचकपणे उत्तर देणारा .
ii. शिरीष बरोबर रोज यायचे
उत्तर :
i. शिरीष
ii. नाना (वडील)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. त्याचा चेहरा काहीसा उतरला!
  2. ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
  3. शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
  4. ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’

उत्तर :

  1. ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
  2. शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
  3. त्याचा चेहरा काहीसा उतरला!
  4. ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. नाना कोणाला दम भरतील असे लेखकाला वाटत होते?
उत्तर :
नाना शिरीषला दम भरतील असे लेखकाला वाटत होते.

ii. नाना शिरीषकडे कोणत्या नजरेने पाहत होते?
उत्तर :
नाना शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. नियमितपणे रोज ………….” जोडी येऊ लागली. (मातापित्याची, पितापुत्राची, काकापुतण्याची, दादामामाची)
ii. हां हां म्हणता “” “महिने निघून गेले! (चार, पाच, तीन, सहा)
उत्तर :
i. पितापुत्राची
ii. तीन

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
आकलनशक्ती : दांडगी :: ठाशीव स्वरूपाचे : ………………..
उत्तर :
उत्तर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. लेखकाच्या सर्व विदयार्थ्यांत त्याची ……………….
(अ) स्मरणशक्ती फारच दांडगी होती.
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,
(क) विचारशक्ती फारच दांडगी होती.
(ड) चिंतनशक्ती फारच दांडगी होती.
उत्तर :
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. लेखकाने आपल्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण ……..
(अ) अमेयला कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(ब) नानांना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.
(ड) गुरुजींना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
उत्तर :
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 29

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.

  1. गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले.
  2. माझ्यापेक्षा नानांना त्याचे दु:ख जास्त होईल.
  3. लेखक नानांशी बोलत नसत.

उत्तर :

  1. बरोबर
  2. चूक
  3. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 30

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा,
i. भोचकपणे शीरीषच पून: म्हणाला
ii. एक अक्षरहि न बोलता शांत बसुन राहात.
उत्तरः
i. भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला.
ii. एक अक्षरही न बोलता शांत बसून राहात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. अतिशय
  2. सर्व
  3. गंभीर
  4. प्रथम

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. निश्चय, निशचय, नीश्चय, निशय
ii. विदयालय, बीद्यालय, वीदय्यालय, विद्यालय
उत्तर :
i. निश्चय
ii. विद्यालय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. प्रशंसा – [ ]
  2. नवल – [ ]
  3. सुधारणा – [ ]
  4. निर्धार – [ ]

उत्तर :

  1. कौतुक
  2. आश्चर्य
  3. प्रगती
  4. निश्चय

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निंदा × [ ]
  2. अधोगती × [ ]
  3. जड × [ ]
  4. अनियमित × [ ]

उत्तर :

  1. कौतुक
  2. प्रगती
  3. हलका
  4. नियमित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
i. महिने
ii. विदयार्थी

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
स्वरूपाचेस्वरूपा
कौतुकाच्याकौतुका
विद्यार्थ्यातविदयाथ्यो
आनंदाच्याआनंदा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. दम भरणे
  2. अक्षरही न बोलणे
  3. निश्चय करणे
  4. अत्यानंद होणे

उत्तर :

  1. दम भरणे – ओरडणे
  2. अक्षरही न बोलणे – गप्प बसणे
  3. निश्चय करणे – ठरवणे
  4. अत्यानंद होणे – खूप आनंद होणे

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी पण त्यांच्याशी बोलत नसे.
ii. तुझा कार्यक्रम आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 31

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते मला शंभर टक्के पटते. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात त्यांना शिक्षण देतात. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या लाडक्याने मोठे होऊन आपल्या घराचे, समाजाचे व देशाचे नाव मोठे करावे. जेव्हा मुले परीक्षेत प्रथम येतात.

डॉक्टर किंवा अभियंता होतात, तेव्हा त्यांच्या आई-बाबांना ब्रह्मानंद झाल्याशिवाय राहत नाही. मुलांपेक्षा त्यांनाच अधिक कौतुक वाटते. त्यांच्या मुलांनी आयुष्यात मिळविलेले यश हे त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या तपाचे फळ असते. म्हणून मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते, असे जे म्हटले जाते ते अगदी योग्यच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 32

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष न येण्याचे कारण – [ ]
ii. लेखक बेचैन झाला होता – [ ]
उत्तर :
i. नाना आजारी होते.
ii. शिरीषच्या आठवणीने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
  2. समारंभाचा दिवस उगवला.
  3. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!
  4. दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.

उत्तर :

  1. दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.
  2. ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
  3. समारंभाचा दिवस उगवला.
  4. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाच्या मनात वरचेवर कोणती शंका येत असे?
उत्तर :
नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा अशी शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. शिरीषच्या आठवणीने कोण बेचैन झाले होते?
उत्तर :
शिरीषच्या आठवणीने लेखक बेचैन झाला होता.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात ………………… उभा! (शिरीष, नाना, शिक्षक, गिरीष)
ii. ……….. गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या त-हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो.
(मातापिता, काकापुतण्या, पितापुत्र, काकाकाकी)
उत्तर :
i. शिरीष
ii. पितापुत्र

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
या शिवाय आणखीन एक शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे …………..
(अ) लेखक असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(क) नाना जवळ असताना शिरीष मोकळया मनाने गिटार वाजवत नाही.
(ड) नाना असताना शिरीष मोकळ्या मनाने पेटी वाजवत नाही.
उत्तर :
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
कोण ते लिहा, – [ ]
i. आजारी होते – [ ]
ii. आठवणीने बेचैन होता
उत्तर :
i. नाना
ii. लेखक

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 33

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. त्याचा हा पहिला खाडा, नसेल एखादवेळेस जमले.’
ii. ‘नाना ठणठणीत असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
उत्तर :
i. बरोबर
ii. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमानुसार शुद्ध करून लिहा.
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवुन मि बाकीचे विद्यार्थी तयार केले.
उत्तर :
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. पिता
  2. पुत्र
  3. शिरीष
  4. नाना
  5. मनुष्य
  6. फी
  7. पैसे
  8. कार्यक्रम
  9. सकाळ
  10. दार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषण शोधून लिहा.
उत्तर :

  1. 0त-हेवाईक
  2. मोकळ्या
  3. पहिला

प्रश्न 4.
अचूक शब्द लिहा.
i. बेचैन, बैचन, बैचेन, बेचन
ii. व्हायोलिन, व्हायलिन, व्ायलीन, व्होयालीन
उत्तर :
i. बेचैन
ii. व्हायोलिन

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पिता – [ ]
  2. पुत्र – [ ]
  3. खाडा – [ ]
  4. रहस्य – [ ]
  5. शंका – [ ]
  6. दिवस – [ ]

उत्तर :

  1. वडील
  2. मुलगा
  3. गैरहजेरी
  4. गुपित
  5. संशय
  6. दिन

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. रात्र × [ ]
  2. चूक × [ ]
  3. अवेळी × [ ]
  4. प्रश्न × [ ]
  5. जवळ × [ ]
  6. मावळला × [ ]
  7. अस्वस्थ × [ ]

उत्तर :

  1. दिवस
  2. बरोबर
  3. वेळी
  4. उत्तर
  5. दूर
  6. उगवला
  7. स्वस्थ

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
प्रश्नाचेप्रश्ना
थोड्याशाथोड्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. आश्चर्यचकित होणे
ii. बेचैन होणे
उत्तर :
i. अर्थ : नवल वाटणे
वाक्य : सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ पाहून मुले आश्चर्यचकित झाली.

ii. अर्थ : अस्वस्थ होणे
वाक्य : आई घरात न दिसल्याने भूषण बेचैन झाला होता.

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. त्याचा ा पहिला खाडा होता.
ii. मी उगाचच बेचैन झालो आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 34

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
ऐन कार्यक्रमाच्या दिवशी तुमच्याबरोबर कार्यक्रमात भाग घेतलेला तुमचा मित्र गैरहजर राहिल्यास तुमची मन:स्थिती कशी होईल?
उत्तर :
समजा मी एखादया संगीत नाटकात भाग घेतलेला आहे व माझ्याबरोबर माझ्या मित्रानेही त्यात भाग घेतलेला आहे. गेल्या महिनाभर आम्ही त्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. ऐन नाटकाच्या दिवशी कही कारणास्तव तो नाटकाला हजर राहू शकणार नाही हे समजताच माझी तारांबळ उडेल. नाटक सादर कसे करायचे तसेच गैरहजर राहिलेल्या मित्राचे संवाद अगदी ऐन वेळी कोण पाठ करणार? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतील. कार्यक्रम सूचीतून नाटक रद्द करण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही. गेल्या महिनाभर वेळ काढून केलेल्या तयारीला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे मन खिन्न व उदास होईल.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 35

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष जन्मात हात लावणार नव्हता.
ii. लेखकांनी कार्यक्रमाची परवानगी दिली.
उत्तर :
i. व्हायोलिनला
ii. शिरीषला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
  2. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
  3. सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
  4. ‘तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’

उत्तर :

  1. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
  2. ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
  3. सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
  4. ‘तर माझी मन:स्थिती आपोआपच सुधारेल!’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाने कोणाचे सांत्वन केले?
उत्तर :
लेखकाने शिरीषचे सांत्वन केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. अगितक होऊन शिरीष कोणाला विनंती करत होता?
उत्तर :
अगतिक होऊन शिरीष लेखकाला विनंती करत होता,

iii. शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार का देत होता?
उत्तर :
शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार देत होता कारण; तो दोन महिने गैरहजर होता.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. अरे, तुझा ………. तरी काय? (नाव, गाव, पत्ता, धंदा)
ii. नंतर जन्मात हात लावणार नाही ……….! (व्हायोलिनला, गिटारला, विण्याला, तबल्याला)
उत्तर :
i. पत्ता
ii. व्हायोलिनला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
विनंती : लेखकाला :: आगतिक ……………….
उत्तर :
शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ………………..
i. ‘इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर.
(अ) यापुढे मी दिसणार नाही!
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !
(क) यापुढे मी आणि नाना येईन!
(ड) यापुढे मी कधीच बोलणार नाही!
उत्तर :
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या ……………..
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.
(ब) विद्यालयाची शान अवलंबून आहे.
(क) विद्यालयाची पत अवलंबून आहे.
(ड) विदयालयाचे नाव अवलंबून आहे.
उत्तर :
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 36

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. ‘मला परवानगी दिलीत, तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’
  2. गिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो’
  3. ‘आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?’

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 37

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ‘इकडची दुनीया तीकडे होईल ना?’
ii. ‘तू पूढे जन्मभर वाजव पण आज वाजवु नको.’
उत्तर :
i. ‘इकडची दुनिया तिकडे होईल ना?’
ii. ‘तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको.’

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. इभरत, इभत, इभ्रत, इर्भत
ii. दुःखित, दुखित, दूःखित दुःखीत
उत्तर :
i. इभ्रत
i. दुःखित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
i. निर्धार – [ ]
ii. सौम्य – [ ]
उत्तर :
i. निश्चय
ii. शांत

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दूर × [ ]
  2. इकडे × [ ]
  3. हजर × [ ]
  4. चूक × [ ]
  5. सुरुवात × [ ]
  6. आनंदी × [ ]

उत्तर :

  1. जवळ
  2. तिकडे
  3. गैरहजर
  4. बरोबर
  5. शेवट
  6. दु:खी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दप्रत्ययविभक्ती
विदयालयाचाचाषष्ठी
आवाजातसप्तमी
व्हायोलिनलालाद्वितीया

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
सांत्वनानंतरसांत्वना
विद्यालयाचाविदयालया
आवाजातआवाजा
कार्यक्रमावरकार्यक्रमा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. इभ्रत राखणे
ii. आगतिक होणे
उत्तर :
i. इभ्रत राखणे – इज्जत राखणे / प्रतिष्ठा राखणे
ii. अगतिक होणे – अधीर होणे

प्रश्न 8.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा,
i. तुझी मन:स्थिती पण आज बरोबर नाही.
आज आपला नाईलाज आहे.
उत्तर :
i. वर्तमानकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 38

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही शिरीषच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ते थोडक्यात सांगा.
उत्तर :
मी जर शिरीषच्या जागी असतो तर कार्यक्रमाला गेलो असतो. शिक्षकांना विनंती करून कार्यक्रमात वाजविण्याची परवानगी मिळवली असती. स्वत:चे दुःख विसरून संगीतक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले असतेवदिवस-रात्र मेहनतकरूनआपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले असते. एकाग्रता व जिद्द यांची सांगड घालून यशाची उंचच उंच भरारी मारली असती. संगीत शिकत असताना येत असलेल्या सर्व संघर्षांचा सामना केला असता; पण काहीही झाले असते तरी संगीत शिकण्याचे थांबविले नसते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 39

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. संगीतसेवा अंतरली याचाच धक्का बसला – [ ]
ii. एकेकाळी उत्कृष्ट गवई होते – [ ]
उत्तर :
i. नानांना
ii. शिरीषचे नाना

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. माझे नाना एकेकाळी ………………. गवई होते. (उत्कृष्ट, चांगले, मध्यम, दर्जाचे)
ii. ………. कडकडाटाने मी भानावर आलो. (वाक्यांच्या, टाळ्यांच्या, आवाजाच्या, किंचाळीच्या)
उत्तर :
i. उत्कृष्ट
ii. टाळ्यांच्या

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
  2. शेवटी त्यांनी मला काही तरी वादय शिकण्यासाठी उद्युक्त केले.
  3. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  4. नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.

उत्तर :

  1. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  2. नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.
  3. डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
  4. शेवटी त्यांनी मला काही तरी वादव शिकण्यासाठी उद्युक्त केले.

प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने लेखकाला काय पाठवली?
उत्तर :
शिरीषने लेखकाला फी व चिठ्ठी पाठवली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. शिरीष कार्यक्रमात कोणते वाक्य वाजवत होता.
उत्तर :
शिरीष कार्यक्रमात व्हायोलिन हे वाक्य वाजवत होता.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व
(अ) चिठ्ठी पाठवली.
(ब) संदेश पाठवला.
(क) वही पाठवली.
(ड) पेन पाठवला.
उत्तर :
(अ) चिठ्ठी पाठवली.

ii. डोळे पुशीत शिरीष म्हणाला.
(अ) सर, काय हे भलतच सांगताय!
(ब) सर, काय हे भलतच म्हणताय!
(क) सर, काय ही भलतीच शंका!
(ड) सर, काय ही भलतीच निंदा!
उत्तर :
(क) सर, काय ही भलतीच शंका!

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 40

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. लेखकाने परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  2. माझे नाना उत्कृष्ट खेळाडू होते.
  3. नानांनी शिरीषला वाक्य शिकण्यासाठी उद्युक्त केले.

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 41

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ओठांच्या हालचालिंवरून त्यांना काहि काही शब्द समजत.
ii. ज्या दिवशी मि तुमच्याकडे फी व चीट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
उत्तर :
i. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत,
ii. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मी
  2. मला
  3. त्याने
  4. तू
  5. त्यांना
  6. ते
  7. माझे

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. शिरीष
  2. पाय
  3. फी
  4. चिट्ठी
  5. व्हायोलिन
  6. गवई
  7. हात

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. लोक – [ ]
  2. पाय – [ ]
  3. शंका – [ ]
  4. डोळे – [ ]
  5. हात – [ ]
  6. अंतरली – [ ]
  7. वारंवार – [ ]
  8. कौशल्य – [ ]

उत्तर :

  1. जनता
  2. पद
  3. संशय
  4. नयन
  5. कर
  6. दुरावली
  7. पुन्हापुन्हा
  8. कसब

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शंका × [ ]
  2. दिवस × [ ]
  3. सोई × [ ]
  4. अंतरली × [ ]

उत्तर :

  1. कुशंका
  2. रात्र
  3. गैरसोई
  4. मिळाली

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
पायांवरपायां
माझ्याकडेमाझ्या
वादकाप्रमाणेवादका
टाळ्यांच्याटाळयां

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. विदयार्थी
  2. लोक
  3. टाळया
  4. डोळे

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. परवानगी देणे
  2. भानावर येणे
  3. उदयुक्त करणे

उत्तर :

  1. होकार देणे / अनुमती देणे
  2. शुद्धीवर येणे
  3. प्रोत्साहन देणे, प्रेरित करणे,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 9.
काळ बदला, (भविष्यकाळ करा)
शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले.
उत्तर :
शिरीष आत येईल व तो माझ्या पायांवर डोके ठेवेल.

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 42

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का ? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असते. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत वा पद्धत, तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ लागत नाही. वा त्याचे आश्चर्य वाटत नाही; पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास घोडा फार वेळ लागतोच.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 43

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीषला खेद वाटायचा – [ ]
ii. लोकांच्या निदेकडे लक्ष न देता शिरीष – [ ]
उत्तर :
i. नानांना ऐकायला येत नव्हतं.
ii. व्हायोलिन वाजवू लागला.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
  2. ‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
  3. शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.
  4. नाना रोज शिरीषबरोबर येत होते.

उत्तर :

  1. नाना रोज शिरीषबरोबर येत होते.
  2. शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
  3. बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
  4. शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीष किती तास सराव करत होता?
उत्तर :
शिरीष 24 तास सराव करत होता.

ii. ताना व सूर कोण सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.
उत्तर :
ताना व सूर नाना सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.

iii. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले?
उत्तर :
‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे!’ असे नाना म्हणाले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. डोळ्यांसमोर …………. नव्हते, ………….. नव्हते, कोणी नव्हते. (प्रेक्षक/थिएटर, लोक/प्रेक्षक, जनता/ प्रेक्षक, थिएटर/प्रेक्षक)
ii. …………… गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. (शिरीष, नाना, लेखक, रमेश)
उत्तर :
i. प्रेक्षक/थिएटर
ii. शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. चोवीस तास एकच उदयोग, ……………..
(अ) एकच चिंता!
(ब) एकच ध्यास!
(क) एकच विचार!
(ड) एकच शिक्षा!
उत्तर :
(ब) एकच ध्यास!

ii. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की ………
(अ) संगीत बंद !
(ब) वाक्ष्य बंद !
(क) व्हायोलिन बंद !
(ड) पेटी बंद !
उत्तर :
(अ) संगीत बंद !

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 44

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून, शिरीष गडबडून गेला होता.
ii. बारा तास एकच उदयोग, एकच ध्यास!
उत्तर :
i. सत्य
ii. असत्य

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 45

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
या वीचारासरशी, लोकांच्या नींदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
उत्तर :
या विचारासरशी, लोकांच्या निदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. संगीत
  2. नाना
  3. व्हायोलिन
  4. प्रेक्षक
  5. थिएटर
  6. बेटा
  7. आवाज

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. त्यांना
  2. ते
  3. मला
  4. मी

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पुष्कळ – [ ]
  2. सुधारणा – [ ]
  3. सराव – [ ]
  4. दुःख – [ ]

उत्तर :

  1. अमाप
  2. प्रगती
  3. रियाज
  4. खेद

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
विरूद्धार्थी शब्द लिहा.

  1. शेवट – [ ]
  2. आनंद – [ ]
  3. अधोगती – [ ]

उत्तर :

  1. सुरुवात
  2. खेद
  3. प्रगती

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. विदयार्थी
  2. लोक
  3. टाळया
  4. डोळे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
विचारासरशीविचारा
शास्त्रासाठीशास्त्रा
निंदेकडेनिंदे
तारांवरूनतारां

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. धडपड करणे
  2. खेद करणे
  3. निंदा करणे

उत्तर :

  1. खूप मेहनत करणे
  2. दु:ख करणे
  3. वाईट बोलणे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 46

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
संगीतशास्त्राची प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य मुखासमाधानात न्हाऊन निघते, या कश्चनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
संगीतशास्त्र ही जीवनोपयोगी कला आहे. सूर ताल व लय यांचा मिलाप त्यात आहे. संगीतशास्त्र शिकणे हे कोणाचेही काम नाही. ही शिकण्याची संधी व भाग्य त्यालाच मिळते, ज्यास दैवी ईश्वरीय शक्तीचे वरदान लाभलेले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शान, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी संगीतशास्त्रात नाव कमावलेले आहे. त्यांनादेखील संगीतशास्त्राची प्रेरणा त्यांच्या गुरूपासून लाभलेली आहे. त्यांच्या गुरूंची त्यांच्यावर असलेली कृपा हीच त्यांना मिळालेली प्रेरणा होय. त्यामुळेच त्यांचे आयुष्य सुखासमाधानात न्हाऊन निघालेले आहे.

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : वसंत पुरुषोत्तम काळे
कालावधी : 1932-2001
कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रम्हदेवाचा काळ’, ‘गुलमोहर’, ‘कर्मचारी’, ‘का रे भुललासी’, ‘ऐक सखे’, ‘वन फॉर द रोड’, ‘मायाबाजार’, ‘स्वर, ‘संवादिनी’, ‘वलय’ इत्यादी कथासंग्रहः ‘ही वाट एकटीची’, ‘पार्टनर’ इत्यादी कादंबरीलेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यांमुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रस्तावना :

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ ही कथा लेखक व.पु.काळे यांनी लिहिली आहे. या कथेत संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन लेखकांनी केले आहे.

‘Beta, mi aikto ahe!’ This story is written by writer V. P. Kale. In this story, we can witness a father who loves music more than his life and a son who struggles for happiness of father who has lost music because of an accident.

शब्दार्थ :

  1. अपघात – दुर्घटना, (an accident)
  2. सौख्य – संतोष, सुखासमाधानाची स्थिती (happiness)
  3. कोलाहल. – गोंगाट, गोंधळ (an uproar, noise)
  4. स्थिर – स्तब्ध, शांत (stable, steady)
  5. खात्री – भरवसा (trust, certainty)
  6. वादन – वाक्य वाजवण्याची कृती सादर – एखाक्यासमोर ठेवणे (to render)
  7. आस्वाद – (येथे अर्थ) आनंद (relish)
  8. धीटपणा – साहस (boldness, daring, courage)
  9. नवखा – नवीन (new)
  10. प्रतिबिंब – पडछाया (reflection)
  11. मुसाफिर – प्रवासी (traveller)
  12. अवसान – हिंमत, धमक (guts, courage)
  13. श्रोतृवृंद – ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांचा समूह (audience)
  14. झरझर – घाईघाईने (quickly)
  15. झगझगीत – चकाकणारे (glittering, sparkling)
  16. सबंध – संपूर्ण (entire, whole)
  17. चलबिचल – अस्वस्थता (hesitation)
  18. तंबोरा – एक तंतुवादय (astring instrument)
  19. धीरगंभीर – शांतपणे (serious)
  20. ध्यान – चिंतन, मनन (meditation, attention)
  21. षड्ज – संगीतातील सप्तस्वरांपैकी पहिला स्वर (सा) (the Ist note of the gamut)
  22. धीमेपणाने – हळुवारपणे (slowly)
  23. पंचेद्रिये – ज्ञानप्राप्तीची पाच इंद्रिये (the five sense organs)
  24. दगा . विश्वासघात (betrayal)
  25. सुहास्य – चांगले हास्य (a beautiful smile)
  26. मुख – चेहरा (face)
  27. वयस्कर – प्रौढ (elderly)
  28. ग्रह – समजूत, कल्पना (a prejudice)
  29. प्राथमिक – सुरुवातीचा, प्रारंभिक (elementary, primary)
  30. प्रथा – रूडी, (general practice, custom)
  31. नेटाने – जोर लावून, कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक (with tremendous efforts)
  32. आळीपाळीने – आलटून-पालटून, क्रमबदलून (alternately, by turns)
  33. आगाऊ – उद्धट (rude)
  34. आकलन शक्ती – बोधशक्ती (grasping power)
  35. अत्यानंद – परमानंद, अतिशय आनंद (rapture, great joy and delight)
  36. सांत्वन – दिलासा (consolation)
  37. सौम्य – हळूवार, शांत (gentle, soft)
  38. इभ्रत – पत, लौकिक (prestige)
  39. आगतिक – असहाय्य, निराधार (helpless)
  40. भानावर – शुद्धीवर (conscious)
  41. गवई – गायक, गाणारा (asinger)
  42. जबर – मोठे (huge)
  43. बहिरे – ज्याला ऐकू येत नाही असा (deaf)
  44. गैरसोय – अडचण (inconvenience)
  45. अंतरणे – गमावणे, मुकणे (to lose)
  46. उयुक्त – प्रेरित, तयार, सज्ज, प्रोत्साहित (ready)
  47. धडपड – खटपट,खटाटोप, (struggle)
  48. अमाप – खूप, पुष्कळ (a lot of, immeasurable)
  49. वारंवार – पुन्हा पुन्हा, सतत (again, repeatedly)
  50. खेद – दुःख, शोक (regret, remorse)
  51. कौशल्य – कुशलता, कसब (skill)
  52. मोकळेपणा – विनासंकोच वागणूक (freely, without any hesitation)
  53. ध्यास उत्कट इच्छा, (yearning. longing)
  54. भास – समज, कल्पना, ग्रह, भ्रम (illusion, impression)
  55. तान – सूर (tune)
  56. ठेका – एक मंद गतीचा ताल (rhythm)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

टिपा :

1. फिड्लवादय – एक प्रकारचे तंतुवादच जे व्हायोलिन या नावानेही ओळखले जाते.
2. फूटलाईट – रंगमंच आणि कलाकारांना प्रकाशित करणारा, रंगभूमीच्या पुढे असलेला प्रकाश.

वाक्प्रचार :

  1. कोलाहल बंद पडणे – शांतता पसरणे
  2. आस्वाद घेणे _ – आनंद घेणे
  3. कौतुक करणे – प्रशंसा करणे
  4. नाव खराब करणे – वाईट कृत्य करणे
  5. प्रतिबिंबित होणे – स्पष्ट दिसणे, पडछाया उमटणे
  6. अवसान न राहणे – हिम्मत हारणे
  7. धीर सुटणे – हार मानणे
  8. खूण करणे – इशारा करणे
  9. चलबिचल होणे – अस्वस्थ होणे
  10. कानावर विश्वास न बसणे – एखादी गोष्ट सत्य न वाटणे
  11. शंका चाटून जाणे – संशय निर्माण करणे
  12. प्रथा असणे – रीत असणे
  13. जिवाचे कान करणे – एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे
  14. दम भरणे – रागावणे
  15. आश्चर्यचकित होणे – नवल वाटणे
  16. भानावर येणे – शुद्धीवर येणे
  17. उदयुक्त करणे – प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे, एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे.
  18. सराव करणे – अभ्यास करणे
  19. ध्यास लागणे – इच्छा होणे, व्यसन लागणे
  20. भास होणे – प्रतीत होणे, जाणवणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 9 उजाड उघडे माळरानही Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 9 उजाड उघडे माळरानही Textbook Questions and Answers

1. कारणे लिहा.

प्रश्न (अ)
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………………..
उत्तरः
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न (आ)
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण ………………………..
उत्तरः
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली.

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 1
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 2

(इ) पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 3
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 4

2. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 5
उत्तरः

घटकत्यांचे सजणे
1. लिंबोणीगर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे.
2. नागफणीजर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.
3. घाणेरीदुरंगी चुनरीत सजली आहे.
4. पळसफुलेमातीच्या अंकावरती बहरून आली आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
उत्तरः

  1. भेटवस्तू – [नजराणा]
  2. सजली – [नटुनी]
  3. अरुंद रस्ता – [पाणंद]
  4. अंक – [चिन्ह]

4. भावार्थाधारित.

प्रश्न 1.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’ या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तरः
वरील काव्यपंक्ती ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ‘ललिता गादगे’ आहेत. यांनी या ठिकाणी वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

प्रश्न 2.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी, पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न (अ)
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
‘कृती: 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (3) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न (आ)
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
‘कृती : 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (4) चे उत्तर पहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही Additional Important Questions and Answers

पुढील पदयाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 6
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 7

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(अ) सृष्टी
2. बेरड कोरड(ब) लिंबोणी
3. गर्द पोपटी(क) कर्णफुले
4. जर्द तांबडी(ड) दिशा-दिशांन

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड(अ) सृष्टी
3. गर्द पोपटी(ब) लिंबोणी
4. जर्द तांबडी(क) कर्णफुले

प्रश्न 2.

‘अ’ गट‘ब’ गट
1. लुसलुस पाने अंगोपांगी(अ) पिंपळ पाने
2. दुरंगी चुनरीत उभी(ब) सांबर वृक्ष
3. मऊ मुलायम मोरपिसारी(क) घाणेरी
4. लाल कळ्यांनी लखडून उभे(ड) वड वृक्ष

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड(क) कर्णफुले
3. गर्द पोपटी(अ) सृष्टी
4. जर्द तांबडी(ब) लिंबोणी

3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
दिशा-दिशांना रंग का उधळले आहेत?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 2.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी कोण नजराणा घेऊन आली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी बेरड, कोरड सृष्टी नजराणा घेऊन आली आहे.

प्रश्न 3.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी लिंबोणी कशी आली आहे?
उत्तर:
गर्द पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून, मुरडत लिंबोणी आली आहे.

प्रश्न 4.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी नागफणी कशी सजली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.

प्रश्न 5.
लुसलुस पाने अंगावरती घेऊन कोण झुलत आहे?
उत्तर:
लुसलुस पाने अंगावरती घेऊन वड झुलत आहे.

प्रश्न 6.
दुरंगी चुनरीत कोण नटुन थटुन आली आहे?
उत्तरः
दुरंगी चुनरीत घाणेरी नटुन थटुन आली आहे.

प्रश्न 7.
पिंपळाची पाने कशी आहेत?
उत्तरः
पिंपळाची पाने मऊ मुलायम मोरपिसासारखी आहेत.

प्रश्न 8.
पाणंदीवर कोण उभा आहे?
उत्तर:
सांबर वृक्ष पाणंदीवर उभा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 9.
लाल कळ्यांनी लखडून कोण आहे?
उत्तर:
लाल कळ्यांनी लखडून सांबर वृक्ष आहे.

प्रश्न 10.
मातीच्या अंकावरती कोण बहरून आले आहेत?
उत्तरः
मातीच्या अंकावरती पळसफुले बहरून आली आहेत.

प्रश्न 11.
पळसफुलांना पाहून कोण झुरत आहेत?
उत्तरः
पळसफुलांना पाहून जगातील सारी कुसुमे झुरत आहेत.

प्रश्न 12.
आंब्याच्या मोहरातून काय आली आहे?
उत्तरः
आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान आली आहे.

प्रश्न 13.
उजाड उघडे माळरान काय करत आहे?
उत्तरः
उजाड उघडे माळरान वसंतगान गाऊ लागले आहे.

प्रश्न 14.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. बेरड कोरड इथली …………….. घेऊन आली ती नजराणा. (दृष्टी, सृष्टी, कष्टी, मस्ती)
  2. गर्द ……………. लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. (पिवळी, लाल, तांबडी, पोपटी)
  3. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली ……………….. (नागफणी, लिंबोणी, घाणेरी, पिंपळ)
  4. स्वागत करण्या …………… ऋतूचे रंग उधळले दिशादिशांना. (शिशिर, श्रावण, वसंत, ग्रीष्म)
  5. ………….. पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी. (मळमळ, झळझळ, लुसलुस, मुरडत)
  6. दुरंगी …………. उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. (कळ्यांनी, मोरपिसारी, मुलायम, चुनरीत)
  7. सळसळ झळझळ …………….. पाने मऊ मुलायम मोरपिसापरी. (वड, पिंपळ, आंबा, पळस)
  8. सांबर …………….. कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. (पोपटी, तांबडा, लाल, हिरवी)
  9. आंब्याच्या मोहरातून आली ………….. सुरेल तान. (पोपटाची, चिमणीची, कोकिळेची, कावळ्याची)
  10. ……….. सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. (सुरेल, स्वागता, सजली, कुसुमे)

उत्तर:

  1. सृष्टी
  2. पोपटी
  3. नागफणी
  4. वसंत
  5. लुसलुस
  6. चुनरीत
  7. पिंपळ
  8. लाल
  9. कोकिळेची
  10. कुसुमे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध शोधा.

  1. गर्द : पोपटी : : जर्द : ………….
  2. लुसलुस : पाने : : दुरंगी : ………………
  3. आंबा : मोहर : : कोकिळा : …………….

उत्तर:

  1. तांबडी
  2. चुनरी
  3. तान

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

  1. वसंतात रंगाची उधळण झालेली असते.
  2. वसंतात लिंबोणी नटल्याप्रमाणे भासते.
  3. वडाचे झाड वसंतऋतूत आनंदाने डुलत आहे.
  4. सांबर वृक्ष लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.
  5. पळसाची फुले पाहून इतर फुले झुरतात.
  6. माळरानही वसंतऋतूचे गीत गात आहे.

उत्तर:

  1. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना.
  2. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी.
  3. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी.
  4. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी
  5. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती.
  6. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान.

3. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
सळसळ झळझळ पिंपळ पाने ……………………
(अ) दुरंगी चुनरीत उभी ही
(ब) उभे स्वागता पाणंदीवरीत
(क) मऊ मुलायम मोरपिसापरी
(ड) लुसलुस पाने अंगोपांगी
उत्तर:
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 2.
सांबर लाल कळयांनी लखडून
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) झुले वड हा दंग होऊनी
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी
उत्तर:
सांबर लाल कळयांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी.

4. काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

प्रश्न 1.
(अ) बेरड कोरड इथली सृष्टी
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) स्वागत करण्या वसंत ऋतूचे
(ड) घेऊन आली ती नजराणा
उत्तरः
(अ) स्वागत करण्या वसंत ऋतूचे.
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) बेरड कोरड इथली सृष्टी
(ड) घेऊन आली ती नजराणा

प्रश्न 2.
(अ) घालून सजली नागफणी
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) गर्द पोपटी लेऊन वसने
उत्तरः
(अ) गर्द पोपटी लेऊन वसने
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) घालून सजली नागफणी

प्रश्न 3.
(अ) झुले वड हा दंग होऊनी,
(ब) घाणेरी ही नटुनी थटुनी
(क) लुसलुस पाने अंगोपांगी
(ड) दुरंगी चुनरीत उभी ही
उत्तरः
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी,
(ब) झुले वड हा दंग होऊनी,
(क) दुरंगी चुनरीत उभी ही
(ड) घाणेरी ही नटुनी थटुनी

प्रश्न 4.
(अ) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) उभे स्वागता पाणंदीवरी
(ड) सांबर लाल कळयांनी लखडून
उत्तरः
(अ) सळसळ झळझळ पिंपळ पाने,
(ब) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(क) सांबर लाल कळयांनी लखडून
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 5.
(अ) कुसुमे सारी या जगातली
(ब) पळसफुले ही बहरून आली
(क) पाहून त्यांना मनात झुरती
(ड) या मातीच्या अंकावरती
उत्तर:
(अ) पळसफुले ही बहरून आली,
(ब) या मातीच्या अंकावरती,
(क) कुसुमे सारी या जगातली
(ड) पाहून त्यांना मनात झुरती

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 8
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 9

प्रश्न 7.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. नजराणा, बेरड, वसंत, उधळले
  2. तांबडी, लिंबोणी, नागफणी, पोपटी
  3. घाणेरी, वड, दुरंगी, पाने
  4. सांबर, पिंपळ, मोरपिसापरी, पाणंदीवरी
  5. कुसुमे, झुरती, मातीच्या, पळसफुले
  6. माळरानही, वसंतगान, मोहरातून, कोकिळेची

उत्तर:

  1. वसंत, उधळले, बेरड, नजराणा
  2. पोपटी, लिंबोणी, तांबडी, नागफणी
  3. पाने, वड, दुरंगी, घाणेरी
  4. पिंपळ, मोरपिसापरी, सांबर, पाणंदीवरी
  5. पळसफुले, मातीच्या, कुसुमे, झुरती
  6. मोहरातून, कोकिळेची, माळरानही, वसंतगान

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 8.
चूक की बरोबर लिहा.

  1. जर्द तांबडी कर्णफुले घालून लिंबोणी सजली आहे.
  2. गर्द पोपटी वसने घालून सृष्टी आली आहे.
  3. नागफणी बेरड कोरडी झाली आहे.
  4. लुसलुस पाने अंगोपांगी घेऊन वड दंग झाले आहे.
  5. सांबर दुरंगी चुनरीत पाणंदीवर उभे आहे.

उत्तर:

  1. चूक
  2. चूक
  3. चूक
  4. बरोबर
  5. चूक

कृती 3: काव्यसौंदर्य

1. खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगानी पाने, फुले, निसर्ग सारी सृष्टी सजलेली आहे. विविध रंगाच्या फुलांनी निसर्ग बहरलेला आहे. यामुळे आजूबाजूचे पशु-पक्षी सुद्धा आनंदित झाले आहेत. जणू काही वसंतऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी
उत्तरः
वसंतऋतूत सर्व परिसर नटलेला सजलेला आहे. नानाविध रंगांनी निसर्गाचे रूप मनमोहक झालेले आहे. या वसंतऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

2. पुढील ओळींचा अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा-दिशांना.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. रंग उधळल्यामुळे दिशा उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी.
उत्तरः
गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे वसंतऋतूच्या स्वागतासाठी सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

प्रश्न 3.
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी
उत्तरः
घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसारी,
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
उत्तरः
पळसाच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात.

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान.
उत्तरः
वसंतऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो.अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते.

प्रश्न 7.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
वसंतऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ‘ऋतुराज’ देखील म्हणतात. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने फुले बहरतात. लिंबोणी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. वसंतऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात.

वसंतऋतूचे स्वागत पक्षीही करतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. जणू ती वसंतऋतू आल्याची ग्वाही देते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पहायला मिळतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 8.
मानवी जीवनात वसंतऋतूला एक आगळेवेगळे स्थान दिले गेलेले आहे. या विधानावर चर्चा करा.
उत्तरः
वसंतऋतू सृष्टीच्या बहराचा ऋतू आहे. या ऋतूत सृष्टी नटते म्हणून मानवप्राणी वसंतपंचमी साजरी करतो. या ऋतूच्या निमित्ताने नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या विविध राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राजस्थानी लोक या उत्सवाच्या निमित्ताने सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढतात. भारताच्या काही राज्यात लोक रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून विविध रंग व गुलाल उडवून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

प्रश्न 9.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशु-पाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहेत. या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन, वनसंवर्धनसाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. ‘झाडे । लावा व झाडे जगवा’ या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन.

प्रश्न 2. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1.
कवी / कवयित्रीचे नाव –
उत्तरः
ललिता गादगे.

प्रश्न 2.
संदर्भ –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे.

प्रश्न 3.
प्रस्तावना –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 4.
वाङमयप्रकार –
उत्तरः
निसर्ग कविता

प्रश्न 5.
कवितेचा विषय
उत्तरः
निसर्गातील बदलांचे मनमोहक वर्णन करणारी ‘उजाड उघडे माळरानही’ ही एक निसर्ग कविता आहे.

प्रश्न 6.
कवितेतील आवडलेली ओळ –
उत्तरः
पळसफुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती

प्रश्न 7.
मध्यवर्ती कल्पना –
उत्तरः
वसंतऋतू हिवाळ्यानंतर सुरू होतो. या ऋतूत निसर्ग हिरवागार दिसतो. कारण वसंतऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. सारा आसमंत विविध रंगात आणि विविध गंधातही न्हाऊन जातो. सर्व झाडेवेली हिरवीगार व टवटवीत दिसू लागतात. नवचैतन्याने सळसळू लागतात. सारी सृष्टी आनंदित होते. कवयित्रीने अशा सुंदर बदलांचे वर्णन ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेत केलेले दिसून येते.

प्रश्न 8.
कवितेतून मिळणारा संदेश-
उत्तरः
हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, खळाळणाऱ्या सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते. माणूस मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व मनमोहक निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला पाहिजे. निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करा. असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून मिळतो.

प्रश्न 9.
कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता मला खूप आवडली आहे. उजाड झालेले, मोकळे असलेले माळरान वसंतऋतूच्या आगमनाबरोबर चैतन्याने भरून येते. झाडांना नवीन पालवी फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेऊन, हिरव्या वाटा सजून जातात. कोकीळेचा सुमधूर आवाज सारे वातावरण बेधुंद करणारे असते. या साऱ्या सौंदर्यांचे सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळते, म्हणून ही कविता मनापासून आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 10.
भाषिक वैशिष्ट्ये
‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे.

प्रश्न 3. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा।।
उत्तरेः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमानाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत असते. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघालेल्या असतात. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे असे वाटते.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 3.
लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी वडाच्या झाडाखाली फुटते. अशी ही लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे असे वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी पिंपळाच्या झाडालाही फुटते. असे वाटते जणू वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळाचे झाड मोरपिसाप्रमाणे असणारी मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभे आहे. तसेच सांबर नावाचा वृक्षदेखील रानातल्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती,
कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात. पळसाला आलेली व मातीवर पसरलेली ती फुले व त्यांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुले मनातल्या मनात झुरतात.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूत सृष्टीत अनेक आनंददायी बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले असते. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे असेच वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

उजाड उघडे माळरानही Summary in Marathi

कवयित्रीचा परिचय:

नाव: ललिता गादगे जन्म
जन्म: 1954
प्रसिद्ध कवयित्री, ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्निजळ’, ‘संवेदन’ इत्यादी कवितासंग्रह; ‘आयुष्याच्या काठाकाठाने’, ‘दुःख आणि अश्रू’, ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ हे कथासंग्रह; ‘नाळबंधाची कहाणी’, ‘खिडकीतलं आभाळ’ हे ललित गदय प्रसिद्ध.

प्रस्तावना:

‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे होणाऱ्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

Poetess Lalita Gadge has written a poem named ‘Ujad Ughade Malranhi’. An appealing colourful description of change in nature due to the beginning of spring season has been depicted by the poetess in this poem in a vibrant picturesque manner.

भावार्थ:

स्वागत करण्या ……….. ती नजराणा ।।1।।
वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे.

गर्द पोपटी ……… सजली नागफणी ।।2।।
वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

लुसलुस पाने ……… नटुनी थटुनी ।।3।।
वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते अशीच ही मऊ, कोवळी, लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

सळसळ झळझळ ……. स्वागता पाणंदीवरी ।।4।।
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे. तसेच सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.

पळसफुले ही ……….. त्यांना मनात झुरती ।।5।।
पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला

आंब्याच्या मोहरातून ……… लागले वसंतगान ।।6।।
वसंत ऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले आहे. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

शब्दार्थ:

  1. स्वागत – आतिथ्य (welcome)
  2. बेरड – निगरगट्ट (hardened)
  3. कोरड – कोरडी, शुष्क (dry)
  4. उधळणे – पसरवणे (to spread)
  5. दिशा – बाजू (a side)
  6. सृष्टी – निसर्ग (a nature)
  7. नजराणा – वरिष्ठाला यायची भेटवस्तू (a respectful gift)
  8. गर्द – दाट (dense)
  9. वसन – वस्त्र (a cloth)
  10. मुरडणे – नटणे (to adorn)
  11. जर्द – दाट, गहिरा (dark or deep)
  12. तांबडा – लाल, आरक्त (red)
  13. कर्णफुले – कानातील दागिना (an ear-ring)
  14. सजणे – नटणे, शृंगारणे (to get dressed up)
  15. लुसलुस – टवटवीत (fresh and healthy)
  16. अंगोपांगी – अंगावर
  17. दंग – तल्लीन, गुंग (deeply engaged)
  18. दरंगी – दोन रंगात काढलेले (in two colours)
  19. चुनरी – दोन्ही खांदयांवरून घेण्याचे स्त्रियांचे एक वस्त्र (a light garment)
  20. सळसळ – ‘सळसळ’ असा आवाज (rustle)
  21. झळझळ – चकाकी (glitter)
  22. पान – पर्ण (a leaf)
  23. मऊ – सौम्य, नरम (soft, mild)
  24. पाणंद – अरुंद पायवाट (a narrow lane)
  25. बहरणे – मोहरणे (to blossom)
  26. कुसुम – फूल (flower)
  27. झुरणे – खंत वाटणे (to pine and waste away)
  28. सुरेल – कर्णमधुर, मंजुळ (sweet sounding)
  29. तान – लकेर, गाण्यातील आलाप (a tune)
  30. माळरान – नापीक मैदान (barren land)
  31. वसंतगान – वसंतऋतूचा आनंद व्यक्त करणारे गीत

टिपा:

  1. लिंबोणी – कडुलिंब (neem tree)
  2. नागफणी – कॅक्टस (cactus) कुळातील काटेरी फूलझाड
  3. वड – वटवृक्ष (a banyan tree)
  4. घाणेरी – उग्र दर्प येणारे रंगीबेरंगी लहान फुलांचे झुडूप
  5. पिंपळ – एक वृक्ष
  6. सांबर – उष्णकटिबंधीय वनांतील एक वृक्ष
  7. पळस – एक वृक्ष
  8. वसंतऋतू – चैत्र व वैशाख या दोन महिन्यांमध्ये येणारा ऋतू (the spring season)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

वाक्प्रचार:

1. दंग होणे – गुंग /मग्न होणे

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Balbharti Maharashtra State Board Class 9 English Solutions My English Coursebook Chapter 3.1 Coromandel Fishers Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

My English Coursebook Std 9 Guide Chapter 3.1 Coromandel Fishers Textbook Questions and Answers

Warming up:
Chit-chat

  1. What time do you get up in the morning?
  2. What time do you go to bed?
  3. Where do you spend your holidays?
  4. What adventures do you like boating, trekking, scuba diving, mountaineering or something else?
  5. After you finish your education, would you like to work close to nature?
  6. What would you like to do?

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Expanding Horizons

Question (a)
Write as many words as you can, related to the following. You should have at least twenty words each. You may refer to your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words/items for the ones you have written.
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 1
Answer:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 2

Question (b)
Prepare a bilingual glossary for each of these topics:

Question (c)
Arrange the glossary in two ways:
1. According to the alphabetical order of letters in your mother tongue.
2. According to the alphabetical order ‘a-z’
[Students may attempt (b) & (c) above on ther own.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

English Workshop:

Answer the following questions.

Question (a)
How many stanzas are there in the poem?
Answer:
There are three stanzas in the poem.

Question (b)
How many lines are there in the poem?
Answer:
There are twelve lines in the poem.

Question (c)
List the rhyming words in each stanza:
Answer:

  1. First stanza: light – night, free – sea
  2. Second stanza: call – all, drives – lives
  3. Third stanza: grove – love, glee – sea

2. You know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as ‘a’, ‘b’, ‘c’, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is aabb. Verify.

Question 1.
You know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as ‘a’, ‘b’, ‘c’, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is aabb. Verify.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

3. What do the following expressions refer to? Write in a word or phrase:

Question 1.
What do the following expressions refer to? Write in a word or phrase:

  1. leaping wealth of the tide: …………
  2. kings of sea: …………..
  3. at the fall of the sun: …………
  4. the edge of the verge: ………..

Answer:

  1. leaping wealth of the tide: fish
  2. kings of sea : fishermen
  3. at the fall of the sun : at the sunset
  4. the edge of the verge : horizon

4. Match the following:

Question 1.
Match the following:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 3
Answer:
(a) the wind – child
(b) dawn – mother holding her child
(c) sea – mother
(d) cloud – brother
(e) waves – comrades

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

5. Find and write the lines in the poem that refer to:

Question 1.
Find and write the lines in the poem that refer to:
(a) early morning
(b) evening
(c) full moon night
Answer:
(a) early morning: Rise, brother, rise; the wakening skies pray to the morning light.
(b) evening: What though we toss at the fall of the sun where the hand of the sea-god drives?
(b) full moon light: And sweet are the sands at the full o’ the moon with the sound of the voices we love

6. Write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or of drowning.

Question 1.
Write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or of drowning.
Answer:
He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives.

7. In the last stanza, two lines refer to a landscape, and two lines refer to a ‘seascape’. Which are they? Copy them from the poem correctly:

Question 1.
In the last stanza, two lines refer to a landscape, and two lines refer to a ‘seascape’. < Which are they? Copy them from the poem correctly:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 4
Answer:

LandscapeSeascape
Sweet is the shade of the coconut glade, and the scent of the mango grove,

And sweet are the sands at the full o’ the moon with the sound of the voices we love.

But sweeter, brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam’s glee;

Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky mates with the sea.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

8. Using the internet, find photographs /pictures of landscapes /seascapes to illustrate the images used in the poem.

Question 1.
Using the internet, find photographs /pictures of landscapes /seascapes to illustrate the images used in the poem.

9. Select a few lines from your favourite nature poem in your mother tongue and translate them into English.

Question 1.
Select a few lines from your favourite nature poem in your mother tongue and translate them into English.
Answer:
1. Title: Coromandel Fishers
2. Poet/Poetess: This poem is written by Sarojini Naidu.

3. Theme/Central Idea: The theme of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously.

4. Rhyme Scheme: The rhyme scheme of the poem is ‘aabb’.

5. Figure of Speech: Simile, Metaphor

6. Special Feature: This is a didactic poem. A didactic poem is an instructive one. It is aimed at imparting certain advice or some moral principles. “When we come together for a common purpose and put our faith in God, we can accomplish great things” – This is the moral principle of this poem.

7. Favourite Lines: My favourite lines from the poem are :

  • “He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives”.
  • But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam’s glee.

8. Why I like the poem: I like this poem because it imparts a very positive message. It says that if we trust in God and do our work promptly, success is ours.

My English Coursebook 9th Class Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers Additional Important Questions and Answers

Simple Factual Activities:

Question 1.
Who holds the storm by the hair?
Answer:
God holds the storm by the hair.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Question 2.
What type of boat do the fishermen use?
Answer:
The fishermen use catamaran boats.

Complex Factual Activities :

Question 1.
As the sea-gull flies away calling it appears as though, he is showing the way-What does the way lead to?
Answer:
The way leads the fishermen to the sea where plenty of fish can be caught.

Paragraph format:

The title of the poem is ‘Coromandel Fishers.’ The poem is written by Sarojini Naidu. The theme of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. The fishermen in the poem prove this fact.

The rhyme scheme of the poem is ‘aabb’. The figures of speech in the poem are simile and Metaphor. The special feature of this poem is that it a didactic poem. It is an instructive poem which is aimed at imparting certain advice or some moral principles. “ When we come together for a common purpose and put our faith in God, we can accomplish great things. ” This is the moral principle of this poem.

My favourite lines from the poem are:

1. “He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives.” This line shows the fishermen put their full faith in the sea-god.
2. “But sweeter, O brothers, the kiss of spray and the dance of the wild foam’s glee.” I like the poem because it gives a very positive message. It says that if we trust in God and do our work promptly, success is ours.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. ताक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
ताक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 1
उत्तर:

वाट बघणाराकोणाची वाट बघतोवाट बघण्याचे कारण
चकोरपूर्णिमेचा चंद्रमाचंद्रकिरण हेच त्याचे जीवन
लेंकीमाहेरचे बोलावणे येणेदिवाळीचा सण
भुकेलेले बाळमाउलीचीभूक
संत तुकारामपांडुरंगाचीभेटीची आस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

2. योग्य अर्थ शोधा.

प्रश्न 2.
योग्य अर्थ शोधा.
अ. आस लागणे म्हणजे ………….
1. ध्यास लागणे
2. उत्कंठा वाढणे
3. घाई होणे
4. तहान लागणे
उत्तर:
1. ध्यास लागणे

आ. बाटुली म्हणजे ………….
1. धाटुली
2. वाट
3. वळण
4. वाट पहाणे
उत्तर:
2. वाट

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

3. भावार्थाधारित. 

प्रश्न अ.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तरः
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.

प्रश्न आ.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, हे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

उपक्रम :

1. संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
2. संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.

भाषाभ्यास :

अलंकार

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो. तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते, त्यातील एक घटक म्हणजे ‘अलंकार’. अलंकार भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात, हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पहायचे आहे.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 2

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 3

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. जीवाला कोणती आस लागली आहे?
उत्तरः
जीवाला विठ्ठल भेटीची आस लागली आहे.

ii. विठ्ठलाची वाट कोण पाहत आहे?
उत्तर:
संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

iii. अति शोक कोण करत आहे ?
उत्तर :
भुकेलिवा बाळ अति शोक करत आहे.

iv. संत तुकारामांना कशाची भूक लागली आहे?
उत्तरः
संत तुकारामांना श्रीमुख दर्शनाची भूक लागली आहे.

v. संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला श्रीमुख दर्शनाची विनंती करत आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. तैसें माझें …………………. वाट पाहे । (जीवा, उरि, मन, श्रीमुख)
  2. दिवाळीच्या मुळा ………… आसावली । (मुली, बाया, लेंकी, स्त्रिया)
  3. पाहातसे वाटुली …………. । (आळंदीची, पंढरीची, पंढरपुराची, विठ्ठलाची)
  4. भुकेलिवा बाळ अति ………… करी । (गडबड, मस्ती, दुःख, शोक)
  5. वाट पाहे ……………….. माउलीची । (उरि, दारी, आई, विठाई)
  6. धावूनि ……………………. दांवी देवा। (दर्शन, श्रीमुख, प्रदर्शन, मुखदर्शन)

उत्तर:

  1. मन
  2. लेंकी
  3. पंढरीची
  4. शोक
  5. उरि
  6. श्रीमुख

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा(अ) वाट तुझी
2. तैसें माझें मन(ब) चकोराजीवन
3. पाहे रात्रंदिवस(क) वाट पाहे
4. पूर्णिमेचा चंद्रमा(ड) लागलीसे आस

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा(ड) लागलीसे आस
2. तैसें माझें मन(क) वाट पाहे
3. पाहे रात्रंदिवस(अ) वाट तुझी
4. पूर्णिमेचा चंद्रमा(ब) चकोराजीवन

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध लिहा.
i. जीवा : आस :: वाट : ………….
ii. लेंकी : आसावली :: उरि : ………….
उत्तरः
i. रात्रंदिवस
ii. माउलीची

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) पूर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्ष्याचे जीवन असते.
(ब) मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.
(क) तसेच माझे मन तुझी वाट पाहत आहे.
उत्तर:
(अ) पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
(ब) पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
(क) तैसें माझें मन वाट पाहे ।।

ii. (अ) हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
(ब) हे विठ्ठला, पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायाला येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
उत्तर :
(अ) धांवूनि श्रीमुख दांवी देवा।।
(ब) पाहातसे वाटुली पंढरीची।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. पाहे, मन, चंद्रमा, जीवा
  2. पंढरीची, श्रीमुख, माउलीची, आसावली
  3. तुका, मुळा, बाळ, शोक

उत्तर :

  1. जीवा, चंद्रमा, मन, पाहे
  2. आसावली, पंढरीची, माउलीची, श्रीमुख
  3. मुळा, बाळ, शोक, तुका

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा(अ) अति शोक करी
2. भुकेलिवा वाळ(ब) दांवी देवा
3. तुका म्हणे(क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख(ड) लेकी आसावली

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा(ड) लेकी आसावली
2. भुकेलिवा वाळ(अ) अति शोक करी
3. तुका म्हणे(क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख(ब) दांवी देवा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

  1. धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
  2. पाहातसे वाटुली पंढरीची।।
  3. वाट पाहे उरि माउलीची।।
  4. भुकेलिवा बाळ अति शोक करी।

उत्तर:

  1. पाहातसे वाटुली पंढरीची ।।
  2. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
  3. वाट पाहे उरि माउलीची ।।
  4. धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तरः
शोक करणारा – भुकेलिवा बाळ |

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 7.
प्रश्न तयार करा.
i. तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
ii. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
उत्तर:
i. भूक कोणाला लागली आहे?
ii. बाळ अति शोक का करत आहे?

कृती 3 : काव्यसौंदर्य

खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे।।
उत्तरः
संत तुकारामांना लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात. ज्याप्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. त्यामुळे संत तुकारामांचे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठलदर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
उत्तरः
संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे अचूक वर्णन केले आहे. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 3.
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
विठ्ठलभेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात, की हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, है
विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस
तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 2.
भुकेलिबा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ।।
उत्तरः
विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतं म्हणजे रडतं, तळमळत असतं व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भक्त व विठ्ठल आणि चकोर व चंद्र यांतील साधर्म्य तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
भक्त श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. त्याचे संपूर्ण जीवन हे विठ्ठलमय झालेले असते. विठ्ठलदर्शनाशिवाय त्याला अन्न-पाणी गोड लागत नाही. विठ्ठलदर्शन हेच त्याच्या जीवनाचे साध्य असते. त्याचप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांसाठी आतुर झालेला असतो. कविकल्पना आहे की, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसला की, चकोर पक्ष्याला आनंद होतो. तो फक्त चंद्राचे कोवळे किरणच प्राशन करतो. चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. अशाप्रकारे भक्त व चकोर हे अनुक्रमे विठ्ठल व चंद्र यांच्या भेटीसाठी तळमळत असतात.

प्रश्न 4.
विठ्ठलदर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. या विधानातील समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
विठ्ठलाचे दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. विठ्ठलाचे दर्शन होताच भक्तांची तहान-भूक हरवून जाते. त्यांचे नयन दिपून जातात व त्यांचे हृदय सुखद आनंदाने भरून जाते. विठ्ठलदर्शन ही भक्ताच्या आत्म्याला लागलेली अध्यात्मिक भूक असते. म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरला जातात. एकदा का विठ्ठलदर्शन झाले की
मानवाचे सर्व प्रकारचे पाप-ताप आणि वेदना संपुष्टात येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/ कवयित्रीचे नाव – संत तुकाराम (तुकाराम बोलोबा अंबिले – मोरे)
2. संदर्भ – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग ‘संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. या अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ योग्य उदाहरणातून व्यक्त केली आहे.

4. वाङ्मयप्रकार’ – भेटीलागी जीवा’ ही कविता नसून एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – विठ्ठलभेटीची अनावर ओढ विविध उदाहरणांद्वारे व्यक्त करणारा संत तुकारामांचा ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।

7. मध्यवर्ती कल्पना – संत तुकारामांनी तन, मन, धन अर्पून विठ्ठलाची भक्ती केली. अगदी मनापासून त्याचे नामस्मरण केले. अशा या आपल्या भगवंताच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीची अनावर ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी अतिशय समर्पक उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून ती ओढ व्यक्त केली आहे.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
संत तुकाराम यांना विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी अतिशय योग्य उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग लिहिला आहे. या उदाहरणांचा अभ्यास केला असता संत तुकारामांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची किती अनावर ओढ आहे हे लक्षात येते. अशीच आपणही परमेश्वराची भक्ती केली तर आपणासही परमेश्वराची प्राप्ती होईल असाच संदेश ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘भेटीलागी जीवा’ हा संत तुकारामाचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण म्हणजे विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातील, संसारातील अगदी चपखल उदाहरणांचा वापर केलेला आहे. रोजच्या व्यवारातील उदाहरणे वापरून अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवझर आणि अध्यात्म यांची
सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे ।।
उत्तरः
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात.

ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
भुकेलिया बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेराहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडते, तळमळते. आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सागड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेनं शोक करते म्हणजे रडते, तळमळते आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं, त्याप्रमाणे मीदेखील तुझी वाट पाहत आहे.

मलादेखील लहान बाळाप्रमाणे विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा तुझे श्रीमुख मला दिसावे म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पाठाखालील स्वाध्याय :

प्रश्न 1.
‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर:
“दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची”
जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी वरील दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो, कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात. दिवाळीच्या सणात कोणीतरी मुन्हाळी माहेरहून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.

संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Summary in Marathi

कवीचा परिचय :

नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
कालावधी : 1608-1650 व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संतकवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात.

प्रस्तावना :

‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. या अभंगात संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक उदाहरणांद्वारे व्यक्त केली आहे.

“Bhetilagi Jiva’, this Abhang is written by Saint Tukaram Saint Tukaram explains his affinity of meeting with Lord Vitthala with felicitous examples in this ‘Abhanga

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

भावार्थ :

भेटीलागी जीवा ……………. रात्रंदिवस वाट तुझी ।
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

पूर्णिमेचा चंद्रमा ……………. मन वाट पाहे ।
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

दिवाळीच्या मुळा ……………. वाटुली पंढरीची ।
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहन कोणीतरी मुजाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

भुकेलिवा बाळ अति …………….. उरि माउलीची ।
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे.

तुका म्हणे ……………. श्रीमुख दांवी देवा ।
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

शब्दार्थ :

  1. भेट – गाठ (meeting)
  2. जीवा (जीव) – आत्म्याला (to the soul)
  3. आस – इच्छा, अपेक्षा, आशा (desire, an expectation)
  4. पूर्णिमा – पौर्णिमा (The full moon day)
  5. चंद्रमा – चंद्र (the moon)
  6. जीवन – आयुष्य (life)
  7. तैसें – तसे (in that way)
  8. मन – चित्त (mind)
  9. मुळा – मुबळी (लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती)
  10. लेंकी – मुलगी (a daughter)
  11. आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे
  12. वाटुली – वाट, मार्ग, रस्ता (a way, a path)
  13. भुकेलिवा – भुकेलेले (hungry)
  14. शोक – दुःख, खेद (sorrow, grief)
  15. उरी – (येथे अर्थ) हृदयापासून (from the bott heart)
  16. तुका – संत तुकाराम
  17. मज – मला, माझे (to me, to mine)
  18. भूक – क्षुधा, खाण्याची इच्छा (hunger, desire)
  19. मुख – चेहरा (the face)
  20. दावी – दाखव (please show)

टीप :

चकोर पक्षी – एक पक्षी (हा पक्षी चंद्रकिरणांवर जगतो असा कविसंकेत आहे.) (a kind of bird) (It is said that this bird feeds itself on the moonlight)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

वाक्प्रचार :

  1. आस लागणे – उत्कंठा लागणे, इच्छा होणे
  2. वाट पाहणे – प्रतीक्षा करणे
  3. शोक करणे – दुःख करणे, आकांत करणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
1. भारतात सर्वांत पहिली रेल्वे …………… येथून सुटली. (ठाणे, मुंबई, कर्जत, पुणे)
2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी …………….. ठेवले. (तिकीट, बक्षीस, इनाम, प्रलोभन)
उत्तर :
1. मुंबई
2. इनाम

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

2. आकृतिबंध पूर्ण करा. 

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 1
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 2

3. आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 3
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 4

4. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 5
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 6

5. कारणे लिहा.

प्रश्न अ.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव खूप जास्त होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर :
रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. शेवटी दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे.

त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.

6. स्वमत

प्रश्न अ.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला,’ तुमचे मत लिहा.
उत्तर :
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही होय. याच मुंबईहून पहिली रेल्वे 18 एप्रिल, 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी धावली होती. या रेल्वेमुळेच ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई -पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली.

व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला.कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक या रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळेच संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय जनमानसांवर अंधश्रद्धांचा फार मोठा पगडा होता. कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता.जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या रेल्वेला, भारतीयांनी सुरुवातीला इंग्रजांनी सुरू केलेली वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे. असे म्हटले. लोकांना ठाणे-मुंबई रेल्वे प्रवासाची सवय व्हावी, गोडी लागावी म्हणून मोफत प्रवास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता.

त्यावेळी मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असा विचार केला जात होता. याचाच अर्थ नवी इमारत किंवा नवा पूल बांधायचा असला तर त्याच्या मजबुतीसाठी त्याच्या पायामध्ये माणसांना जिवंत गाडावे लागते किंवा त्यांचा बळी दयावा लागतो, अशी विचित्र अंधश्रद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न इ.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर :
(उतारा 4 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.)

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 7
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 8

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

  1. आगीनगाडी निघणार त्या मुहूर्ताचा दिवस – [ ]
  2. कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले – [ ]
  3. एकेरी रस्ता – [ ]

उत्तर :

  1. दिनांक 18 एप्रिल सन 1853 (सोमवार)
  2. लोक
  3. मुंबई ते ठाणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.
  2. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  3. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  4. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.

उत्तर :

  1. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  2. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  3. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.
  4. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम कोणी केला?
उत्तर :
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला.

ii. लोकांना कोणती कल्पना अचंब्याची वाटली?
उत्तर :
लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पना लोकांना अचंब्याची वाटली. –

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

iii. किती वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली?
उत्तर :
सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. ……….. मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे-पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. (सन-1835, सन – 1853, सन-1930, सन – 1630)
  2. दहा डब्यांची ………….. खुशाल चालली आहे. (माळका, माळ, मालिका, शृंखला)
  3. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक ………….. कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली. (गाडीचा कर्णा, शिटीचा कर्णा, इंजिनाचा कर्णा, डन्याचा कर्णा)

उत्तर :

  1. सन – 1853
  2. माळका
  3. शिटीचा कर्णा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 6.
शब्दजाल पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 9.1

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच…………..
(अ) लोकांना धक्कादायक होती.
(ब) लोकांना मोठी अचंब्याची होती.
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.
(ड) लेखकाला मोठी अचंब्याची होती.
उत्तर :
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.

ii. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
(ब) विंग्रेजांनी पाण्यालाच गाडी ओढायला लावले!
(क) विंग्रजांनी हवेलाच गाडी ओढायला लावले!
(ड) विंग्रजांनी बाप्पाला गाडी ओढायला लावले!
उत्तर :
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. 19 एप्रिल सन 1953, सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
  2. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे
  3. मुंबई ते पुणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
  4. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

उत्तर :

  1. चूक
  2. बरोबर
  3. चूक
  4. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. हि कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याचि वाटली.
ii. कमल आहे बूवा या विंग्रेजांची!
उत्तर :
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. कमाल आहे बुवा या विग्रेजांची!

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. पेनिनशुला, पेनीनशुला, पेनिनशूला, पेनिशूला
  2. झुकझूक, झुकझूख, झुकझुक, झूकझूक
  3. मुहुर्ताचा, मुहुरताचा, मुहुतार्चा, मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी, ईग्रजी, वीग्रजी, विग्रेजि

उत्तर :

  1. पेनिनशुला
  2. झुकझुक
  3. मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. डबा – [ ]
  2. निशाण – [ ]
  3. रेडे – [ ]
  4. तोरण – [ ]

उत्तर :

  1. डबे
  2. निशाणे
  3. रेडा
  4. तोरणे

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. युक्ती – [ ]
  2. सुमन – [ ]
  3. पताका – [ ]
  4. जल – [ ]
  5. आग – [ ]

उत्तर :

  1. कल्पना
  2. फूल
  3. निशाण
  4. पाणी
  5. विस्तव

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. मोठा(अ) बरोबर
2. शेवट(ब) छोटा
3. चूक(क) सुरुवात

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. मोठा(ब) छोटा
2. शेवट(क) सुरुवात
3. चूक(अ) बरोबर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. निशाणे
  2. डबे
  3. खुर्ध्या
  4. लोक
  5. तोरणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दमूळ शब्दसामान्यरूप
मुहूर्ताचामुहूर्तमुहूर्ता
दिवसानेदिवसदिवसा
लाखांवरलाखलाखां
कलियुगातलाकलियुगकलियुगा

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
i. आ वासून उभे असणे
ii. पाठबळ असणे
उत्तर :
i. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : जादूचे प्रयोग पाहायला लोक आ वासून उभे होते.

ii. अर्थ : पाठिंबा असणे.
वाक्य : सह्याद्रीचे पाठबळ होते म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज उभारले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 10

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
उत्तर :
रेल्वेचा शोध हे 19 व्या शतकातले फार मोठे आश्चर्य होय. रेल्वेचा शोध लागल्यामुळे विस्तव व पाणी यांच्या समन्वयातून तयार होणाऱ्या वाफेवर रेल्वे गाडी चालू लागली. कमीत कमी वेळात ती लांब लांबचा प्रवास करू लागली. त्यामुळे लोकांचा वेळ वाचु लागला. व्यापारी वर्ग व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. अवजड यंत्रे, निरनिराळ्या वस्तू यांची रेल्वेने वाहतूक होऊ लागली.

त्यामुळे त्यांची व्यापारात भरभराट होऊ लागली. दळणवळण सुलभ व प्रगत झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावला जाऊ लागला. देशाची आर्थिक प्रगती होऊ लागली. म्हणून रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 11 Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 12

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
लोकात कशाचे पीक पिकले होते?
उत्तर :
लोकात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दबंडी पिटण्यात आली.
  2. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  3. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेडीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.
  4. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.

उत्तर :

  1. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  2. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.
  3. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  4. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. दुसऱ्या दिवसापासून कोणती दवंडी पिटण्यात आली?
उत्तर :
दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.

ii. विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे?
उत्तर :
वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती ……………. आहे. (भुताटकी, राक्षस, यंत्र, मशीन)
  2. तेवढ्यानेही कोणाचे …………… होईना. (समाधान, कौतुक, दुःख, नवल)
  3. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन …………… सुखरूप परत आली. (पुण्याला, मुंबईला, रत्नागिरीला, कोल्हापुरला)
  4. मुंबईला नव्या इमारती नि ………… बांधताहेत. (बांध, धरण, पूल, रस्ते)

उत्तर :

  1. भुताटकी
  2. समाधान
  3. मुंबईला
  4. पूल

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कचेरीतले कारकून :: व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे : ……………….
उत्तर :
गुमास्ते

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.

  1. सरकारी कचेरीतले – [ ]
  2. व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे – [ ]
  3. विंग्रेजांची विलायती भुताटकी – [ ]
  4. खूप आटापीटा करणारे – [ ]

उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. बाफेची गाडी
  4. रेल्वेचे कारभारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 13

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. आगगाडीत बसणे धोक्याचे आहे.
  2. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  3. वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर झाला.

उत्तर :

  1. असत्य
  2. सत्य
  3. असत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. लोकांत भलत्याच कंड्या नी अफवांचे पिक पिकले होते,
ii. तेवढ्यानेही कोणाचे समधान होइना.
उत्तर :
i. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
ii. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. साळसूद, साळसुद, साळखुद, साळखूद
  2. मुहूरतावर, मुहूर्तावर, मुहुर्तावर, मुहर्तावर
  3. सुखरूप, सूखरूप, सुरुप, सुकरुप

उत्तर :

  1. साळसूद
  2. मुहूर्तावर
  3. सुखरूप

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. विलायती(अ) धोका
2. फुकट(ब) विदेशी
3. संकट(क) कंड्या
4. अफवा(ड) मोफत

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. विलायती(ब) विदेशी
2. फुकट(ड) मोफत
3. संकट(अ) धोका
4. अफवा(क) कंड्या

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

  1. दुःखाचा × [ ]
  2. उशीरा × [ ]
  3. जुन्या × [ ]
  4. मृत × [ ]
  5. मूर्ख × [ ]
  6. असमाधान × [ ]

उत्तर :

  1. सुखाचा
  2. लवकर
  3. नव्या
  4. जिंवत
  5. शहाणे
  6. समाधान

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. इमारती
  4. पूल

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
दिवसापासूनदिवसा
धोक्याचेधोक्या
कारभाऱ्यांनीकारभाऱ्या
लोकांतलोकां
सुखाचासुखा
वाफेच्यावाफे
व्यापाऱ्यांच्याव्यापाऱ्यां

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. दवंडी पिटणे
  2. फूस लावणे
  3. समाधान होणे

उत्तर :

  1. जाहीर घोषणा करणे
  2. गुप्तपणे/फसवून उत्तेजन देणे
  3. तृप्त होणे

प्रश्न 8.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
उत्तर :
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 14

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत देशात अंधश्रद्धेचे साम्राज्य होते. अंधश्रद्धेने समाजाला पोखरून काढलेले होते. सती जाणे, मांजर आडवे जाणे, केशवपन करणे, विधवेचे दर्शन होणे अशा कितीतरी प्रकारच्या अंधश्रद्धा देशात आ वासून उभ्या होत्या. भारतीय लोक निरक्षर असल्यामुळे ते या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडत होते. अर्धश्रद्धेचा लोकांवर इतका पगडा होता की त्यांची मानसिकताच जणू मृतप्राय झालेली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर या अंधश्रदधेने अनेक भारतीयांचे बळी घेतलेले होते. तरी देखील तत्कालीन लोक डॉक्टरकडे न जाता ढोंगी, साधू व मांत्रिकांवरच विश्वास ठेवत असत. खरोखरच देश स्वतंत्र होण्याअगोदर अंधश्रद्धा हा भारतीय समाजाला लागलेला एक फार मोठा कलंक होता आणि त्याचा प्रभाव कमी करण्याकरीता अनेक समाजसुधारकांना आपल्या जिवाचे रान करावे लागले होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 23
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 24

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलणारी
ii. समजूत काढता काढता टेकीला यायचे –
उत्तर :
i. घरची माणसे
ii. रेल्वेचे अधिकारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  2. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
  3. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला,
  4. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.

उत्तर :

  1. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला.
  2. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  3. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
  4. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. इनामे बंद का झाली?
उत्तर :
रेल्वे प्रवास करताना लोकांचा धीर चेपला म्हणून इनामे बंद झाली.

ii. ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास किती दिवस खायचा?
उत्तर :
ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास तब्बल एक दिवस खायचा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.
मग मात्र लोकांची …………… लागली. (झुंबड, तुंबड, चंगळ, मौज)
उत्तर :
झुंबड

प्रश्न 6.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
i. प्रवास करणारी व्यक्ती –
उत्तर :
प्रवासी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वेb

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. समजूत काढता काढता रेल्वेचे ……………
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.
(व) पदाधिकारी अगदी टेकीला यायचे.
(क) अधिकारी अगदी आनंदी असायचे.
(ड) अधिकारी दु:खी व्हायचे.
उत्तर :
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.

ii. अवध्या सव्वा तासात ठाण्याचा असामी …………..
(अ) पुण्याला येऊ जाऊ लागला.
(व) कोल्हापूरला येऊ जाऊ लागला.
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.
(ड) ठाण्याला येऊ जाऊ लागला.
उत्तर :
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 17

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
ठाण्याचा आसामी मुंबईला किती तासात येऊ जाऊ लागला?
उत्तर :
ठाण्याचा असामी मुंबईला अवघ्या सव्वा तासात येऊ जाऊ लागला.

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. अखेर दर माणशी दोन रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
ii. घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची.
उत्तर :
i. असत्य
ii. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळिवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
उत्तर :
पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मोफत
  2. दर
  3. एक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. खटारगाडीचा, कटारगाडीचा, खटारगाडिचा, खटारडीचा
ii. आजूबाजुला, आजुबाजुला, आजूबाजूला, आजुबाजूला.
उत्तर :
i. खटारगाडीचा
ii. आजूबाजूला

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बक्षीस – [ ]
  2. तपास – [ ]
  3. धिटाई – [ ]
  4. दिन – [ ]

उत्तर :

  1. इनाम
  2. चौकशी
  3. धीर
  4. दिवस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुरुवात × [ ]
  2. विकत × [ ]
  3. रात्र × [ ]
  4. मागे × [ ]

उत्तर :

  1. अखेर
  2. मोफत
  3. दिवस
  4. पुढे

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. माणसे
  3. इनामे
  4. अधिकारी
  5. घोळके
  6. तिकिटे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दप्रत्ययविभक्ती
प्रवासाचाचाषष्ठी
पैशाच्याच्याषष्ठी
मुंबईलालाचतुर्थी
लोकांचीचीषष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
प्रवासाचाप्रवासा
ठाण्याचाठाण्या
पैशाच्यापैशा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा,
i. धाय मोकलून रडणे
ii. झुंबड उडणे
उत्तर :
i. अर्थ : मोठमोठ्याने रडणे.
वाक्य : आपल्या आवडत्या कुत्र्याचा अपघात झालेला पाहून रजनी धाय मोकलून रडू लागली.

ii. अर्थ : गर्दी करणे.
वाक्य : माकडाचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती.

प्रश्न 10.
काळ बदला. (भविष्यकाळ करा)

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतात.
  2. लोकांची झुंबड लागली होती.
  3. नंतर चार आणे झाले.

उत्तर :

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतील.
  2. लोकांची झुंबड लागेल.
  3. नंतर चार आणे होतील.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 18

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असतो. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत, पद्धत वा तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास लोकांना फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ वा आश्चर्य वाटत नाही पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास थोडाफार वेळ लागतोच,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 19
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 20

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास तासांत व्हायचा – [ ]
ii. घाट – उतरणीला किती तास लागायचे – [ ]
उत्तर :
i. अठरा
ii. चार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता(अ) दोन स्टेशने
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान(ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
3. कंत्राट घेणारा(क) अठरा तासांचा
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास(ड) करशेटजी जमशेटजी

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता(ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान(अ) दोन स्टेशने
3. कंत्राट घेणारा(ड) करशेटजी जमशेटजी
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास(क) अठरा तासांचा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे
  4. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

उत्तर :

  1. मोठ्या थाटामाटाने ‘ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.
  4. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.

प्रश्न 5.
खालील प्रश्नाचे उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. कोणत्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला?
उत्तर :
खंडाळ्याहून पुण्यापर्यंतच्या सपाटीच्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

ii. घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट कोणी घेतले होते?
उत्तर :
घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी यांनी घेतले होते.

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. ……… काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला. (मेळघाटाचे, कशेडी घाटाचे, फोंडाघाटाचे, बोरघाटाचे)
  2. खंडाळ्याहून पुण्यापर्यंचा सपाटीचा रेल्वे-रस्ता सन …………. च्या फेब्रुवारीत पुरा झाला. (1858, 1850, 1860, 1958)
  3. सगळा काफिल्ला ………… आला. (देवगिरीला, खोपवलीला, सोनखडीला, राजगीरीला)

उत्तर :

  1. बोरघाटाचे
  2. 1858
  3. खोपवलीला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी ………………
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.
(ब) दोन उपाहारगृहे ठेवण्यात आली.
(क) दोन माणसे ठेवण्यात आली.
(ङ) दोन ठिकाणे ठेवण्यात आली.
उत्तर :
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.

ii. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास
(अ) अवघ्या वीस तासांत व्हायचा.
(ब) अवघ्या दहा तासांत व्हायचा.
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
(ड) अवघ्या तीस तासांत व्हायचा.
उत्तर :
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. बोरघाट पोखरण्याची योजना करणारे – [ ]
ii. प्रवाशांची घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे – [ ]
उत्तर :
i. इंजिनीयर (इजनेर) लोक
ii. करशेटजी जमशेटजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 21

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
  2. रस्ता दुहेरीच होता.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. त्याचाहि मोठ्या थाटामाटाने ‘ओपणींग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पूण्याचा रेल्वेप्रवास जारीने चालू झाला,
उत्तर :
i. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. खंड्याळाहून, खंडाळ्याहून, खंडाळायाहून, खंड्याळहुन
ii. उतरणीची, उतरणिची, उतरणिचि, उतरणिच
उत्तर :
i. खंडाळ्याहून
i. उतरणीची

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. कर्म – [ ]
  2. आश्चर्य – [ ]
  3. गंमत – [ ]
  4. बेत – [ ]

उत्तर :

  1. काम
  2. नवल
  3. मौज
  4. योजना

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. बंद × [ ]
ii. दुहेरी × [ ]
उत्तर :
i. चालू
ii. एकेरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. पालख्या
  3. डोल्या
  4. खुर्ध्या
  5. स्टेशने

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
पोखरण्याचीपुण्याच्या
पोखरण्यापुण्या
खंडाळयालाखंडाळ्या
व्यापाऱ्यानेव्यापाऱ्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. रवाना होणे
  2. नवल वाटणे
  3. योजना आखणे

उत्तर :

  1. निघून जाणे
  2. आश्चर्य वाटणे
  3. बेत आखणे

प्रश्न 8.
वाक्यांतील काळ ओळखा.
i. रस्ता एकेरीच होता.
ii. ज्याला त्याला मोठे नवलच वाटायचे,
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 22

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर सांगा.
उत्तर :
रेल्वेमुळे प्रवास लवकर आणि सुखाचा होतो. बाकी गाड्यांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित असतो. हा प्रवास स्वस्त आणि कमी खर्चिक असतो. एकाच वेळी अनेक शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. शिवाय हलक्या तसेच वजनाने जड अशा वस्तू प्रवासात सुरक्षितपणे नेता येतात. रेल्वे फक्त शहराशहरांशी जोडलेली असल्याने गाव-खेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाही. लांबच्या प्रवासासाठी तिकिट आधीच आरक्षित करावे लागते. अचानक प्रवास करायचा झाल्यास आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादित गाड्या असतात. दुर्घटना झाल्यास एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

जी. आय. पी. रेल्वे Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : केशव सीताराम ठाकरे
कालावधी : 1885 – 1973 इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते. ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे वैचारिक ग्रंथ; ‘खरा ब्राम्हण’, ‘टाकलेले पोर’, ही नाटके; ‘ग्रामण्यांचा सावंत इतिहास’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘कोंदडाचा टणत्कार’ इत्यादी इतिहासविषयक पुस्तके; ‘संत रामदास’, पंडिता रमाबाई, ‘संत गाडगेमहाराज’ इत्यादी चरित्रात्मक लेखन; ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रस्तावना :

सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास, याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकांनी प्रस्तुत पाठात केले आहे.

In the year 1853, british started single railway track between Mumbai to Thane. Marvel of people watching running railway with help of steam, rumours about railway and finally after many hazards starting journey of railway, have beautifully narrated by writer in very easy and subtle language

शब्दार्थ:

  1. रूळ – लोहमार्ग (a railway line)
  2. मार्मिक – सूक्ष्म, भेदक (pointed)
  3. ओघवते – प्रवाही (flowing)
  4. शैली – पद्धत, रीत (style, mode)
  5. प्रांत – प्रदेश, विभाग (territory)
  6. उठाव – बंड (an outbreak)
  7. नामांकित – प्रख्यात (famous, reputed)
  8. पाठबळ – भक्कम पाठिंबा (strength of backing. good support)
  9. फाटा – भाग (part)
  10. आगीनगाडी – रेल्वे, वाफेवर चालणारी रेल्वे (railway train)
  11. अचंबा – आश्चर्य, विस्मय (surprise, wonder)
  12. मुहूर्त – मंगलदायक, शुभ असा क्षण (an auspicious moment)
  13. शृंगार – शोभा, थाट (decoration, adornment)
  14. जामानिमा – पोशाख (dress)
  15. दुतर्फा – दोन्ही बाजूस (to both sides)
  16. – चार युगांपैकी चौथे युग (the forth age)
  17. विंग्रजी – इंग्रजी (British)
  18. विस्तव – (येथे अर्थ) आग (fire)
  19. सांगड – एकत्र जुळणी, जोडणी (Joining together)
  20. धीर – धैर्य, संयम (patience, daring)
  21. दवंडी – जाहीर घोषणा (a public announcement)
  22. सुखाचा – आनंदाचा (happy)
  23. कारभारी – (येथे अर्थ) व्यवस्थापक (a manager)
  24. आटापीटा – कष्ट, मेहनत, परिश्रम (efforts, hardwork)
  25. कंड्या . अफवा, गप्पा (rumours.gossip)
  26. भुताटकी – भुतांची किंवा पिशाच्चांची करामत
  27. फूस – गुप्तपणे दिलेले उत्तेजन (secret instigation)
  28. साळसूद . साधा, प्रामाणिक (honest, simple, innocent)
  29. कचेरी – कार्यालय (an office)
  30. पेढी – जेथे पैशाच्या देवघेवीचे व्यवहार होतात ते ठिकाण (a place wherer money transactions take place)
  31. कारकून – लेखनकाम हिशेब इ. करणारा सेवक (aderk)
  32. गुमास्ते – मुनीम (agent)
  33. डंका – गाजावाजा, प्रसिद्धी (publicity)
  34. लालूच – लोभीपणा (greediness)
  35. घोळके – समुदाय, जमाव (groups)
  36. आठ आणे – पन्नास पैसे
  37. सर्रास – कित्येकवेळा, वारंवार (very frequently)
  38. असामी – व्यक्ती (person)
  39. झुंबड – आतोनात गर्दी (great crowd, rush)
  40. इंजनेर – इंजिनीयर पोखरणे – खणणे, उकरणे (to dig)
  41. योजना – बेत (a plan, a programme)
  42. सपाट – समतल, उंचसखल नसलेला (flat, smooth)
  43. ओपणिंग शिरोमणि – उद्घाटन सोहळा (Opening ceremony)
  44. काफिल्ला – प्रवाशांचा तांडा (a group of travellers)
  45. सरबराई – पाहुणचार, आदरातिथ्य (hospitality)
  46. कंत्राट – मक्ता , ठेका (contract)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

टिपा :

  1. सर जमशेटजी जिजीभाई – हे प्रसिद्ध पारशी भारतीय व्यापारी होते. ते परोपकारी होते. चीनसोबत व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्यात ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेत.
  2. जगन्नाथ नाना शंकरशेट – (10 ऑक्टोबर, 1800 – 31 जुलै, 1865). हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
  3. मोरारजी गोकुळदास – हे मुंबईतील कापड उद्योगाचे एक संस्थापक होते. मुंबईत त्यांच्या नावाची एक गिरणी होती.
  4. आदमजी पीरभाई – सर आदमजी पीरभाई हे भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी होते.
  5. डेविड ससून – डेविड ससून 1817 ते 1892 दरम्यान बगदादचे खजिनदार होते. मुंबईला स्थलांतरित झाल्यावर ते यहुदी समाजाचा नेता बनले. त्यांच्या नावाचे मुंबईला एक बंदर आहे. (Sassoon dock)
  6. बोरघाट – सहयाद्री पर्वतामधला एक घाटरस्ता. हा रस्ता रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला व पुणे जिल्हयातील लोणावळा गावाला जोडतो. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

वाक्प्रचार :

  1. पाठबळ असणे – पाठिंबा असणे
  2. अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे
  3. जाहीर करणे – घोषित करणे, प्रसिद्ध करणे
  4. जामानिमा करणे – नटणे, सर्व पोशाख घालून तयार होणे.
  5. आ वासणे – आश्चर्यचकित होणे
  6. सांगड घालणे – एकत्र जुळणी करणे
  7. दवंडी पिटणे – प्रचार/ प्रसार करणे
  8. फूस लावणे – गुप्तपणे/ फसवून उत्तेजन देणे
  9. डंका वाजवणे – प्रसिद्धी/ प्रसार करणे
  10. धाय मोकलून रडणे – जोरजोरात रडणे
  11. टेकीला येणे – शौण होणे, अतिशय थकवा येणे
  12. धीर चेपणे – भीती नाहीशी होणे
  13. झुंबड होणे – अतोनात गर्दी होणे
  14. रवाना होणे – मार्गस्थ होणे
  15. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 1.1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 2

2. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

‘प्रश्न 1.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 3
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 4

3. भावार्थाधारित. 

प्रश्न 1.
‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला.

प्रश्न 2.
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

उपक्रम :

‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या हे. वि. इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.

भाषाभ्यास :

अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे असतात.

  1. उपमेय – ज्याची तुलना करायची ते उपमेय.
    उदा., आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे.
  2. उपमान – ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान.
    उदा., इथे साखर हे उपमान.
  3. समान धर्म – दोन वस्तूंत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म.
    उदा., गोडपणा.
  4. साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. उदा., सारखा.

खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
(अ) आईचे प्रेम सागरासारखे असते.
(आ) आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
(इ) राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 5

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 6

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायावर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा किंकर संत नामदेव यांना म्हटले आहे.

iii. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला काय दिले?
उत्तर:
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदायरूपी खांब दिला.

iv. संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य कोणते?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा ध्वज सतत फडकत ठेवणे, हे संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य आहे.

v. संत बहिणाबाईंनी भजन कसे करण्यास सांगितले आहे?
उत्तर:
संत बहिणाबाईनी भजन सावकाश करण्यास सांगितले आहे.

vi. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग कोणता?
उत्तर:
संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग निरूपणाचा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. संतकृपा झाली । इमारत …………….. आली ।। (मुळा, कळा, फळा, माळा)
  2. रचिला पाया । उभारिलें देवालया ।। (जनार्दनें, नामा, ज्ञानदेवें, एकनाथ)
  3. नामा तयाचा ………….”। तेणें रचिलें तें आवार ।। (दास, किंकर, सेवक, खांब)
  4. तुका झालासे ………… भजन करा सावकाश ।। (शिखर, माथा, कळस, गाभा)
  5. बहिणी म्हणे फडकती …………. निरूपणा केलें बोजा। (पताका, ध्वजा, झेंडा, निशाण)

उत्तर:

  1. फळा
  2. ज्ञानदेवेंवें
  3. किंकर
  4. कळस
  5. ध्वजा

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला.
(ब) संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली.
उत्तर:
(अ) नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।
(ब) संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) संत तुकाराम भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा कळस झाले.
(ब) संतांनी वारकरी संप्रदायाला भागवत धर्माची जोड दिली.
उत्तर:
(अ) तुका झालासे कळस ।
(ब) जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत।।

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

i.

‘अ’ गट‘ब’ गट
1. संतकृपा(अ) आवार
2. ज्ञानदेवें(ब) किंकर
3. नामा(क) पाया
4. रचिलें(ड) इमारत फळा

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. संतकृपा(ड) इमारत फळा
2. ज्ञानदेवें(क) पाया
3. नामा(ब) किंकर
4. रचिलें(अ) आवार

ii.

‘अ’ गट‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ(अ) फडकती ध्वजा
2. तुका झालासे(ब) खांब
(क) कळस

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ(ब) खांब
2. तुका झालासे(क) कळस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 3.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
i. (अ) तेणें रचिलें तें आवार।।
(ब) इमारत फळा आली।।
(क) उभारिलें देवालया।।
(ड) नामा तयाचा किंकर।।
उत्तर:
(अ) इमारत फळा आली।।
(ब) उभारिलें देवालया।।
(क) नामा तयाचा किंकर।।
(ड) तेणें रचिलें तें आवार।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) तुका झालासे कळस।
(ब) निरूपणा केलें बोजा।
(क) खांब दिधला भागवत।
(ड) भजन करा सावकाश।
उत्तर:
(अ) खांब दिधला भागवत।
(ब) तुका झालासे कळस ।
(क)भजन करा सावकाश।
(ड) निरूपणा केलें बोजा।

प्रश्न 4.
काव्यपंक्तींवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
i. (अ) पाया, इमारत, फळा, आवार
(ब) नामा, संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया
उत्तर:
(अ) इमारत, फळा, पाया, आवार
(ब) संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया, नामा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) बोजा, खांब, भजन, सावकाश
(ब) तुकाराम, एकनाथ, बहिणी, जनार्दन
उत्तर:
(अ) खांब, भजन, सावकाश, बोजा
(ब) जनार्दन, एकनाथ, तुकाराम, बहिणी

प्रश्न 5.
कोण ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 7

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
i. सावकाश : भजन :: फडकती :
ii. एकनाथ : खांब :: तुकाराम :
उत्तर:
i. ध्वजा
ii. कळस

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
i. जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत ।।
उत्तरः
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही
संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महाराज होय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वांना सांगितला.

iii. बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा ।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची
ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून मी ही जबाबदारी पार पाडत आहे.

प्रश्न 2.
खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा,
i. संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली,

ii. ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
उत्तरः
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी’ या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले, वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

प्रश्न 3.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यावर तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अशा अनेक संतांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. सर्व संतांनी जरी पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केलेली असली, तरीही समाजसेवेचे अनमोल कार्य करून त्यांनी लोकांना दया, क्षमा, प्रेम, भक्ती, शांती इत्यादी मूल्यांची ओळख करून दिलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभंग रचना करून मराठी भाषेचा गोडवा वाढविलेला आहे. वारीला जाताना आजही लोक ज्ञानबा तुकाराम’ यांच्या नावाचा जयघोष करतात.

प्रश्न 4.
संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संत प्रकाशस्तंभाप्रमाणे असतात. ते भक्ताला अंधारातून बाहेर काढून ज्ञानज्योतीच्या दिव्य प्रकाशात नेत असतात. संत आपल्या आचरणातून इतरांना शिकवण देतात, म्हटलेच आहे की ‘आधी केले मग सांगितले’. संत ज्ञानेश्वरांनी स्वत:च्या आचरणातून लोकांना दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसा अशा अनेक मूल्यांचे महत्त्व पटवून दिलेले आहे. नम्रपणा हा व्यक्तीचा सर्वात मोठा अलंकार आहे. हे पटवून देताना त्यांनी चांगदेवाचे केलेले गर्वहरण आपण कसे विसरू बरे.

समाजाचे भले करताना कितीही यातना झाल्या तरी त्या सोसाव्यात असे तुकोबा सांगतात, म्हणूनच संत जनाबाई म्हणतात, ‘संत जेणे व्हावे तेणे जगबोलणे सोसावे.’ अशाप्रकारे संतांचे कार्य हे आपणास नेहमी प्रेरणा देणारे असते. जीवनात येत असलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती संतांच्या कार्यातूनच आपल्याला मिळते. म्हणून संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

1. कवी/कवयित्रीचे नाव – संत बहिणाबाई
2. संदर्भ- ‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: संत बहिणाबाईचे अभंग’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘संतकृपा झाली’ हा अभंग ‘संत बहिणाबाई’ यांनी लिहिला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे सुंदर वर्णन या अभंगामध्ये ‘संत बहिणाबाई यांनी केले आहे.
4. वाङ्मयप्रकार – ‘संतकृपा झाली’ ही कविता एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे हे, दर्शविणारा संत बहिणाबाईंचा ‘संतकृपा झाली’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ –
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया।।

7. मध्यवर्ती कल्पना – महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली आहे. या भूमीत अनेक संत जन्माला आले. या सगळ्या संतांनी तन, मन, धन अर्पण करून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याच्या भक्तीत सदैव दंग असलेल्या वारकरी संप्रदायाची उभारणी या संतांनी केली. त्यामध्ये संतांनी केलेल्या सहकार्याचे वर्णन ‘संतकृपा झाली’ या अभंगामध्ये केलेले आढळते.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आहे. या साऱ्या संतांनी सर्वस्व अर्पण करून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याचे नामस्मरण केले. शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्गाकडे वळवले. त्यासाठी वारकरी संप्रदायाची उभारणी या महाराष्ट्रात केली. त्या संतांच्या कार्याचे महत्त्व अभ्यासून, आपणसुद्धा भक्तिमार्गाचा स्वीकार करावा, हाच संदेश ‘संतकृपा झाली’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘संतकृपा झाली’ ह्य संत बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केली आहे. त्यांचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. इमारतीचा पाया, त्याचा किंकर, खांब, कळस, फडकणारी ध्वजा या प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाईंनी केलेला दिसतो.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. शिवाय त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
संतकृपा झाली। इमारत फळा आली।।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

माराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला.

‘ज्ञान’ व ‘भक्ती’ यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीची पायाभरणी केली. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 2.
नामा तयाचा किंकर । तेणे रचिलें तें आवार।।
जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे. संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला.

वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. त्याला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला.

त्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 3.
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

ज्ञानेश्वरांनी निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली, तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वाना सांगितला.

संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.

संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातिभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले. त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतले. म्हणजे नुसता उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील पटवून दिले.

संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Summary in Marathi

कवयित्रीचा :

परिचय नाव : संत बहिणाबाई
कालावधी : 1668 – 1700
वारकरी संप्रदायातील संतकवयित्री. संत तुकाराम यांच्या शिष्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष.

प्रस्तावना :

‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केलेले आहे.

Poetess Saint Bahinabai has written the Abhanga called “Santkrupa zali’. Maharashtra’s creed of Varkari’ and their establishment of religious doctrine has been taken care by saints who play important role in this establishment.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

भावार्थ :

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली.

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपले ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।4।।
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।5।।
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ।।6।।
संत बहिणबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एकप्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

शब्दार्थ :

  1. संत – सत्पुरुष, सज्जन (a saint)
  2. कृपा – दया, करुणा (mercy, kindness)
  3. वारकरी – यात्रेकरू (विशेषत: पंढरीला जाणारा) (a pilgrim)
  4. संप्रदाय – मार्ग, पंथ (a system of religious doctrine, religious community)
  5. शिष्या – विक्ष्यार्थिनी (adisciple, a pupil)
  6. मोलाचा : महत्वाचा (valuable, precious)
  7. वाटा – भाग, हिस्सा (a share, a portion)
  8. इमारत – (येथे अर्थ) वारकरी संप्रदायातील विचार, तत्त्व ज्ञान (religious doctrine)
  9. ज्ञानदेवें – संत ज्ञानेश्वर रचिला – रचला (arranged, constructed)
  10. पाया – तळ बांधताना केलेले भक्कम काम (foundation, base)
  11. उभारिले – उभारले (raised)
  12. देवालय – मंदिर, देऊळ (a temple)
  13. नामा – संत नामदेव तयाचा – त्याचा (his)
  14. किंकर – सेवक (a servant)
  15. आवार – अंगण, प्रांगण (a courtyard)
  16. एकनाथ – संत एकनाथ खांब – स्तंभ (a pillar, a column)
  17. दिधला – दिला (gave)
  18. भागवत – विष्णभक्तांचा पंथ (a sect of worshipers of Lord Vishnu)
  19. तुका – संत तुकाराम कळस – शिखर, घुमट (the apex, top)
  20. भजन – देवाचे स्तुति गीत (devotional song)
  21. सावकाश – संथपणे, हळूहळू (slowly, gently)
  22. बहिणी – (येथे अर्थ) बहिणाबाई
  23. फडकती – वाऱ्यावर फडफड असा आवाज येतो (flutters)
  24. ध्वज – झेंडा, निशाण (a flag)
  25. निरूपण – विवेचन, व्याख्यान (explanation)
  26. बोजा – जबाबदारी (a burden, a load)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

टिपा :

  1. संत ज्ञानेश्वर – (जन्म : इ.स. 1275 – समाधी : इ.स.1296) 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी, भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना.
  2. संत नामदेव – (इ.स. 1270 – इ.स. 1350). हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. शिखांच्या गुरुग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे हे आक्ष्य प्रचारक होते.
  3. संत जनार्दन – हे संत एकनाथ यांचे गुरु होते. ते दौलताबादच्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. हे दौलताबाद (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते व महान दत्तोपासक होते.
  4. संत एकनाथ – वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत. यांनी भारूड, जोगवा, गवळणी यांच्या साहाय्याने जनजागृती केली. ‘एकनाथी भागवत’ ह्य लोकप्रिय ग्रंथ रचला.
  5. संत तुकाराम – (इ.स. 1608 – इ.स. 1650), यांचा जन्मपुण्यानजीक असलेल्यादेहूगावात झाला. अभंग हे तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य होते.

वाक्प्रचार :

  1. फळा येणे – बहरणे, वाढ होणे
  2. पाया रचणे – आरंभ करणे, बैठक तयार करणे
  3. कळस होणे – उच्चस्थान प्राप्त करणे, परिपूर्णता आणणे
  4. निरूपण करणे – भाष्य करणे, वर्णन करणे, विवेचन करणे

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

Balbharti Maharashtra State Board Class 9 Hindi Solutions Hindi Lokvani Chapter 5 उम्मीद Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

Hindi Lokvani 9th Std Digest Chapter 5 उम्मीद Textbook Questions and Answers

भाषा बिंदु:

प्रश्न 1.
अर्थ की दृष्टि से वाक्य परिवर्तित करके लिखिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 1

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

संभाषणीय:

प्रश्न 1.
विद्यालय के काव्य पाठ में सहभागी होकर अपनी पसंद की कोई कविता प्रस्तुत कीजिए ।
उत्तर:
अरे! आ गई है भूली-सी
यह मधु ऋतु दो दिन को,
छोटी सी कुटिया मैं रच दूँ,
नयी व्यथा-साथिन को!
वसुधा नीचे ऊपर नभ हो,
नीड़ अलग सबसे हो,
झारखण्ड के चिर पतझड़ में
भागो सूखे तिनको!
आशा से अंकुर झूलेंगे
पल्लव पुलकित होंगे,
मेरे किसलय का लघु भव यह,
आह, खलेगा किन को?
सिहर भरी कपती आवेंगी
मलयानिल की लहरें,
चुम्बन लेकर और जागकर
मानस नयन नलिन को।
जवा-कुसुम-सी उषा खिलेगी
मेरी लघु प्राची में,
हँसी भरे उस अरुण अधर का
राग रंगेगा दिन को।
अंधकार का जलधि लांघकर
आवेंगी शशि-किरणें।
अंतरिक्ष छिरकेगा कन-कन
निशि में मधुर तुहिन को।
एक एकांत सृजन में कोई
कुछ बाधा मत डालों,
जो कुछ अपने सुंदर से हैं
दे देने दो इनको। लेखनीय

लेखनीय:

प्रश्न 1.
आठ से दस पंक्तियों के पठित गद्यांश का अनुवाद एवं लिप्यंतरण कीजिए।
उत्तर:
Writer Rameshwar Singh Kashyap was very fat. They say that One day, I was going to market on a rikshaw. I saw that an old man, keeping a weighing machine before him, was attracting the attention of people. Having stopped the rikshaw, no sooner did I keep my one feet on the weighing machine than the needle of the machine having made the complete round, began to produe rashing sound, as if it was insulting.

Being terrified, the old man stood with folded hands and then said, please do not keep the other feet! because my whole family depends for its, livelihood on this only machine. The surrounding passers by laughed at this. I thurst back my feet.

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

आसपास:

प्रश्न 1.
किसी काव्य संग्रह से कोई कविता पढ़कर उसका आशय निम्न मुद्दों के आधार पर स्पष्ट कीजिए।
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 2
उत्तर:
जाती-पाँती से बड़ा धर्म है
धर्म-ध्यान से बड़ा कर्म है
कर्मकांड से बड़ा मर्म है
मगर सभी से बड़ा यहाँ यह छोटा सा इंसान है,
और अगर वह प्यार करे तो धरती स्वर्ग समान है।
जितनी देखी, दुनिया सबकी, देखी दुल्हन ताले में,
कोई कैद पड़ा मस्जिद में, कोई बंद शिवाले में
किसको अपना हाथ थमा , किसको अपना मन दे दूँ
कोई लुटे अंधियारे में, कोई ठगे उजाले में

कवि का नाम – गोपालदास सक्सेना ‘नीरज’
कविता का विषय – प्रस्तुत कविता ‘धरती स्वर्ग समान है’ में कवि सांप्रदायिक सद्भावना की आवश्यकता प्रतिपादित करते हैं।
कविता का केंद्रीय भाव – ‘धरती स्वर्ग समान है’ कविता के कवि ‘नीरज’ ने मानवतावाद को विश्व का प्रमुख और सत्य धर्म बताया है। कवि कहते है कि आज यदि विश्व में शांति और सद्भावना का साम्राज्य लाना है, तो आवश्यक है कि हम आपस में सौहार्द की भावना का विकास करें; परंतु आज परिस्थितियाँ अत्यंत विषम हैं। इसके लिए मानव-मानव के मध्य की भेदभाव की दीवारें तोड़नी होंगी। धर्मों और संप्रदायों के मध्य उत्पन्न घृणा और द्वेष को समाप्त करना होगा। प्रेम भरे आँसुओं की गंगा में स्नान करके आज हम अपने मन का मैल दूर कर सकते हैं। इस प्रकार प्रस्तुत कविता में कवि ने जाति, धर्म, संप्रदाय आदि के भेदभाव मिटाकर प्रेम एंव एकता से रहने का संदेश दिया है।

कल्पना पल्लवन:

प्रश्न 1.
“मैं चिड़िया बोल रही हूँ’ विषय पर स्वयंस्फूर्त लेखन कीजिए।
उत्तर:
मैं एक छोटी-सी नन्हीं चिड़िया बोल रही हूँ। मैं खुले आसमान में ऊँची-ऊँची उड़ान भरती हूँ। जब मैं बिल्कुल छोटी थी तब मेरी माँ ने मुझे बड़े यत्न से पाला। उस समय वो मुझे घोंसले से बाहर नहीं जाने देती थी। जब मुझे भूख लगती थी; तब वो मुझे अपने चोंच से दाना खिलाती थी। धीरे-धीरे मैं बड़ी होने लगी फिर एक दिन माँ ने मुझे उड़ना सिखाया और धीरे-धीरे मैं इस विशाल गगन में विचरण करने लगी। अब मैं अपना दाना खुद ही चुग लेती हूँ।

कभी-कभी कोई दयालु मनुष्य भी हमें खाने के लिए दाने देता है; तो मैं बहुत प्रसन्न हो जाती हूँ। लेकिन इसके साथ ही साथ कुछ मनुष्य ऐसे भी हैं; जो हमें पिंजरे में कैद करके रखते हैं और हमें मनोरंजन का साधन समझते हैं। यहाँ तक कि हमें बाजार में ऊँचे दामों पर बेचा भी जाता है। इन सब बातों से मेरा हृदय दुखी हो उठता है। अभी कुछ दिनों पहले मेरे साथ एक घटना घटित हो गई जो आप सबको सुनाना चाहती हूँ। ठंडी की एक सुबह मैं पगडंडियों पर फुदक रही थी और नम घास की गुदगुदाती छुअन का आनंद ले रही थी कि तभी एक आवारा कुत्ते ने मुझे अपने जबड़ो में जकड़ लिया।

मैं छटपटा रही थी लेकिन असहाय थी; तभी एक साधारण-सी दिखने वाली लड़की अपनी किताबें फेंककर मेरी तरफ दौड़ी और उस कुत्ते के जबड़े से मेरे प्राण बचाए। मैं बुरी तरह से घायल हो चुकी थी, मेरे पैर भी टूट चूके थे जिसके कारण मैं फूदक नहीं पा रही थी, तभी उसके कोमल हाथों ने मुझे उठा लिया और तब तक मेरी सेवा की जब तक मैं उड़ने के काबिल न हुई। कौन कहता है कि ईश्वर आसमान में होता है; जबकि वो तो नीचे है हम सबके साथ।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

पाठ के आँगन में:

प्रश्न 1.
उत्तर लिखिए।
उत्तर:
कविता से मिलने वाली प्रेरणा:
(क) अपनी मंजिल की तरफ पूरे हौसले से बढ़ना चाहिए।
(ख) लक्ष्य प्राप्त करने के लिए खुद पर भरोसा कर, सच्चाई पर डटे रहना चाहिए।

प्रश्न 2.
‘किताबों में बहुत अच्छा लिखा है, लिखे को कोई पढ़ता क्यों नहीं’ इन पंक्तियों द्वारा कवि संदेश देना चाहते हैं….
उत्तर:
कवि कहना चाहते हैं कि प्राचीन काल से लेकर अब तक विभिन्न विद्वानों के द्वारा अनेक किताबें लिखी गई हैं। इन किताबों में हमारे कर्म, धर्म, संघर्ष, जीवन, देश, काल आदि से संबंधित अच्छी-अच्छी जानकारियाँ विस्तार से दी गई हैं। हमें इन ज्ञानवर्धक तथा प्रेरक बातों को पढ़ना चाहिए तथा अपने जीवन में उतारना चाहिए।

प्रश्न 3.
कविता में आए अर्थ पूर्ण शब्द अक्षर सारणी से खोजकर तैयार कीजिए।
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 4

  1. महफूज
  2. मुश्किल
  3. तालीम
  4. खुद
  5. मोहताज
  6. बुलंदी
  7. मंजिल

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

पाठ से आगे:

प्रश्न 1.
भाषा के हिंदी गजलकारों के नाम तथा उनकी प्रसिद्ध गजलों की सूची बनाइए।
उत्तर:

गजलकारों के नामप्रसिद्ध गजलें
1. फ़िराक़ गोरखपुरीअगर बदल न दिया / इश्क तो दुनिया का राजा है / आँखों में जो बात
2. बशीर बद्रअगर यकीं नहीं आता तो आजमाए मुझे / भूल शायद बहुत बड़ी कर ली / गुलाबों की तरह दिल अपना
3. राही मासूम रज़ाअजनबी शहर के अजनबी रास्ते / दिल में उजले कागज पर / क्या वो दिन भी दिन है
4. साहिर लुधियानवीअक़ायद वहम है मज़हब खयाल-ए-खाम है साक़ी / मैं जिंदा हूँ ये मुश्तहर कीजिए / उदास न हो
5. इक़बालअजब वाइज़ की दींदारी है या रब / सारे जहाँ से अच्छा / असर करे ना करे सुन तो लो मेरी फरियाद
6. जाँ निसार अख़्तरअशूआर मिरे यूँ तो ज़माने के लिए हैं / हमसे भागा न करो दूर / सौ चाँद भी चमकेंगे
7. मजरूह सुल्तानपुरीआ निकल के मैदां में दोरुखी के खाने से / मुझे सहल हो गई मंजिलें / कब तक मलूँ जबीं से
8. मीर तक़ी ‘मीर’अश्क आँखों में कब नहीं आता / अपने तड़पने की / बेखुदी ले गई
9. अमीर खुसरोजिहाल-ए मिस्की मकुन तगाफुल / छाप तिलक सब छीनी से / बहुत दिन बीते पिया को देखे
10. मिर्ज़ा ग़लिबआ कि मरी जान को क़रार नहीं है / आईना क्यों न दूँ / कभी नेकी भी उसके जी में

Hindi Lokvani 9th Std Textbook Solutions Chapter 5 उम्मीद Additional Important Questions and Answers

(क) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 5

प्रश्न 2.
समझकर लिखिए।
1. मंजिल तब मुश्किल नहीं है –
2. थकानों की बात करते हैं –
उत्तर:
1. जब दिल में हौसला हो।
2. कमजोर दिलवाले।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

कृति (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
उपर्युक्त दी गई पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
कवि कहते हैं कि पक्षियों को कभी उड़ने की शिक्षा नहीं दी जाती है। वे खुद ही आसमान की ऊँचाई को जान जाते हैं, अर्थात उड़ते-उड़ते आसमान की बुलंदियों तक जा पहुँचते हैं। इसी प्रकार कर्मठ और परिश्रमी व्यक्ति को किसी सहारे की जरूरत नहीं पड़ती, वे स्वयं ही हर ऊँचाई को प्राप्त कर लेते हैं। कवि कहते हैं यदि दिल में साहस है तो किसी भी लक्ष्य को हासिल करना कठिन नहीं है। थक जाने की बात तो कमजोर दिल वाले किया करते हैं। अर्थात जिनके अंदर साहस है उनके लिए हर कार्य आसान है।

(ख) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
चौखट पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 6

प्रश्न 2.
उत्तर लिखिए।
1. इनकी कमी नहीं है –
2. ये हमें तूफान से सुरक्षित रखती हैं –
उत्तर:
1. जीने के बहानों की!
2. मजबूत उम्मीदें

कृति (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
उपर्युक्त प्रथम चार पंक्तियों के सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
कवि कहते हैं, जो जीना ही नहीं चाहते। जिन्हें सिर्फ मरना ही है, वे नि:संदेह आत्महत्या कर लें। वरना यहाँ जीने के बहानों की कोई कमी नहीं है अर्थात जीने की बहुत सारी वजह हैं। कवि कहते हैं, खुशबू का काम तो केवल महकना और चारों तरफ फैल कर लोगों को अपने सुगंध से भर देना है। खुशबू कभी भी प्रशंसकों की प्रशंसा से वंचित नहीं होती है। इसी प्रकार मनुष्य को भी खुशबू की तरह गुणी और परोपकारी होकर नि:स्वार्थ भाव से लोगों का कल्याण करते रहना चाहिए, तो वे भी कभी प्रशंसा के मोहताज नहीं होंगे।

कवि कहते हैं कि मनुष्य को पूरी उम्मीद (आशा) के साथ आगे बढ़ना चाहिए। जीवन में आने वाली मुसीबतों और परेशानियों के तूफान से ये उम्मीद ही उन्हें सुरक्षित रखती हैं इसलिए मनुष्य को कभी निराश नहीं होना चाहिए, क्योंकि उम्मीद की छतें बड़ी मजबूत होती हैं।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

(ग) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद 7

कृति (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
कवि मनुष्य से कहते हैं जीवन में कुछ करने के लिए या लक्ष्य प्राप्त करने के लिए तुम्हारे अंदर पक्का इरादा क्यों नहीं है? तुम्हें अपने आप पर भरोसा क्यों नहीं है? अर्थात मनुष्य में आत्मविश्वास का होना बहुत जरूरी है। कवि मनुष्य से कहते हैं तुम्हें चलने के लिए दो पैर बने हैं अर्थात ईश्वर ने तुम्हें दो पैर दिए हैं, तो तुम उन पैरों पर चलते क्यूँ नहीं हो? यहाँ कवि का तात्पर्य यह है कि तुम अपने पैरों का उपयोग करके अपने लक्ष्य को क्यों नहीं प्राप्त करते हो? अर्थात मनुष्य को आत्मनिर्भर होना चाहिए।

(घ) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
उत्तर लिखिए।
कवि द्वारा दी गई सीख –
उत्तर:
(क) खुदकुशी नहीं करनी चाहिए।
(ख) अपने देश की चिंता करनी चाहिए।
(ग) किताबें पढ़नी चाहिए।

प्रश्न 2.
सत्य या असत्य पहचानकर लिखिए।
1. खुदकुशी से स्वर्ग मिलता है।
2. किताबों में बहुत अच्छी बातें लिखी हैं।
उत्तर:
1. असत्य
2. सत्य

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

कृति (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
कवि मनुष्य से कहते हैं इस संसार में आत्महत्या करने से किसको स्वर्ग मिला है। तू इतनी छोटी-सी बात क्यों नहीं समझता है? अर्थात आत्महत्या करना मूर्खता है।

कवि कहते हैं यह देश सबका अपना देश है। इसके उन्नति की चिंता सबको करनी चाहिए। आखिर सबको इसकी चिंता क्यों नहीं है? अर्थात प्रत्येक देश वासियों को अपने देश के उन्नति की चिंता करनी चाहिए।

उम्मीद Summary in Hindi

कवि-परिचय:

जीवन-परिचय: कमलेश भट्ट का जन्म उत्तर प्रदेश के जफरपुर में हुआ। वे गजल, कहानी, हायकू, साक्षात्कार, निबंध, समीक्षा आदि
विधाओं में रचना करते हैं। इन्हें पर्यावरण के प्रति गहरा लगाव है। नदी, पानी आदि इनकी रचनाओं के विषय हैं।

प्रमुख कृतियाँ: कहानी संग्रह – ‘नखलिस्तान’, ‘मंगल टीका’, गजल संग्रह – ‘मैं नदी की सोचता हूँ’, ‘शंख’, ‘सीप’, ‘रेत’, ‘पानी’,
हायकू संकलन – ‘अमलतास’, बाल कविताएँ – ‘अजब-गजब’, बाल उपन्यास – ‘तुईम’।

पद्य-परिचय:

गजल: उर्दू, हिंदी या फारसी में की गई रचना जिसमें एक ही बहर और वजन के अनुसार लिखे गए शेरों का समूह होता है। गजल
के पहले शेर को ‘मतला’ और अंतिम शेर को ‘मकता’ कहते हैं। प्रत्येक शेर एक-दूसरे से स्वतंत्र होते हैं।
प्रस्तावना: प्रस्तुत गजल ‘उम्मीद’ के गजलकार ने इस रचना के माध्यम से हमें अपने लक्ष्य की तरफ बुलंदी से बढ़ने, जीने की चाह
बनाए रखने, खुद पर भरोसा करने, सच्चाई पर डटे रहने आदि के लिए प्रेरित किया है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

सारांश:

कवि पंक्षियों का उदाहरण देते हुए कहते हैं कि दिल में हौसला हो तो मंजिल प्राप्त करना कठिन नहीं है। जिन्हें आत्महत्या ही करनी है बेशक कर लें वरना यहाँ जीने के बहाने बहुत हैं। गुणी और अच्छे लोगों के प्रशंसकों की यहाँ कोई कमी नहीं है। पक्की उम्मीद हर मुसीबतों से हमारी रक्षा करती है। हमें सत्य का साथ देना चाहिए और अपने हाथ-पैर का उपयोग करके अर्थात आत्मनिर्भर होकर देश की उन्नति के लिए कुछ करना चाहिए। आत्महत्या करने से स्वर्ग नहीं मिलता। आत्महत्या करना निपट मूर्खता है।

सरल अर्थ:

वो खुद ही ………………….. उड़ानों की
कवि कहते हैं कि पक्षियों को कभी उड़ने की शिक्षा नहीं दी जाती है। वे खुद ही आसमान की ऊँचाई को जान जाते हैं, अर्थात उड़ते-उड़ते आसमान की बुलंदियों तक जा पहुँचते हैं। इसी प्रकार कर्मठ और परिश्रमी व्यक्ति को किसी सहारे की जरूरत नहीं पड़ती, वे स्वयं ही हर ऊँचाई को प्राप्त कर लेते हैं।

जो दिल में …………………… थकानों की
कवि कहते हैं यदि दिल में साहस है तो किसी भी लक्ष्य को हासिल करना कठिन नहीं है। थक जाने की बात तो कमजोर दिल वाले किया करते हैं। अर्थात जिनके अंदर साहस है उनके लिए हर कार्य आसान है।

जिन्हें है सिर्फ …………….. बहानों की
कवि कहते हैं, जो जीना ही नहीं चाहते। जिन्हें सिर्फ मरना ही है, वे नि:संदेह आत्महत्या कर लें। वरना यहाँ जीने के बहानों की कोई कमी नहीं है अर्थात जीने की बहुत सारी वजह हैं।

महकना …………….. कद्रदानों की
कवि कहते हैं, खुशबू का काम तो केवल महकना और चारों तरफ फैल कर लोगों को अपने सुगंध से भर देना है। खुशबू कभी भी प्रशंसकों की प्रशंसा से वंचित नहीं होती है। इसी प्रकार मनुष्य को भी खुशबू की तरह गुणी और परोपकारी होकर नि:स्वार्थ भाव से लोगों का कल्याण करते रहना चाहिए, तो वे भी कभी प्रशंसा के मोहताज नहीं होंगे।

हमें हर हाल …………….. मकानों की
कवि कहते हैं कि मनुष्य को पूरी उम्मीद (आशा) के साथ आगे बढ़ना चाहिए। जीवन में आने वाली मुसीबतों और परेशानियों के तूफान से ये उम्मीद ही उन्हें सुरक्षित रखती हैं इसलिए मनुष्य को कभी निराश नहीं होना चाहिए, क्योंकि उम्मीद की छतें बड़ी मजबूत होती हैं।

कोई पक्का ………………. क्यों नहीं है?
कवि मनुष्य से कहते हैं जीवन में कुछ करने के लिए या लक्ष्य प्राप्त करने के लिए तुम्हारे अंदर पक्का इरादा क्यों नहीं है? तुम्हें अपने आप पर भरोसा क्यों नहीं है? अर्थात मनुष्य में आत्मविश्वास का होना बहुत जरूरी है।

बने हैं पाँव ………………. क्यों नहीं है?

कवि मनुष्य से कहते हैं तुम्हें चलने के लिए दो पैर बने हैं अर्थात ईश्वर ने तुम्हें दो पैर दिए हैं, तो तुम उन पैरों पर चलते क्यूँ नहीं हो? यहाँ कवि का तात्पर्य यह है कि तुम अपने पैरों का उपयोग करके अपने लक्ष्य को क्यों नहीं प्राप्त करते हो? अर्थात मनुष्य को आत्मनिर्भर होना चाहिए।

बहुत संतुष्ट …………….. क्यों नहीं है?
कवि मनुष्य से कहते हैं कि तुम अपनी परिस्थितियों से बहुत संतुष्ट क्यों हो? तुम्हारे भीतर भी कुछ कर गुजरने का अर्थात उन्नति करने का गुस्सा (आक्रोश) क्यों नहीं है? यहाँ कवि का तात्पर्य है कि मनुष्य को परिस्थितियों का दास नहीं होना चाहिए बल्कि उनसे संघर्ष करते हुए आगे बढ़ना चाहिए।

तू झूठों की ……………… क्यों नहीं है?
कवि मनुष्य से कहते हैं कि तुम झूठे लोगों की तरफदारी करने में सम्मिलित हो गए हो। तुम्हें तो सच्चा होना था। सत्य का साथ देना था। तुम सच्चे क्यों नहीं हो? यहाँ कवि का तात्पर्य है कि मनुष्य को हमेशा सच्चाई के रास्ते पर चलना चाहिए।

मिली है खुदकुशी ………………. क्यों नहीं है?
कवि मनुष्य से कहते हैं इस संसार में आत्महत्या करने से किसको स्वर्ग मिला है। तू इतनी छोटी-सी बात क्यों नहीं समझता है? अर्थात आत्महत्या करना मूर्खता है।

सभी का अपना ……………. क्यों नहीं है?
कवि कहते हैं यह देश सबका अपना देश है। इसके उन्नति की चिंता सबको करनी चाहिए। आखिर सबको इसकी चिंता क्यों नहीं है? अर्थात प्रत्येक देश वासियों को अपने देश के उन्नति की चिंता करनी चाहिए।

किताबों में बहुत ……………. क्यों नहीं है?
कवि कहते हैं कि किताबों में ऐसी बहुत सारी अच्छी-अच्छी बातें लिखी हैं। इन लिखी हुई बातों को कोई पढ़ता क्यों नहीं है? अर्थात मनुष्य को किताबों की अच्छी बातों को पढ़कर उन्हें अपने व्यवहार में लाना चाहिए।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 5 उम्मीद

शब्दार्थ:

  1. बुलंदी – ऊँचाई, शिखर
  2. परिंदा – पंछी
  3. तालीम – शिक्षा
  4. हौसला – साहस
  5. मुश्किल – कठिन
  6. बेशक – नि:संदेह
  7. खुदकुशी – आत्महत्या
  8. मोहताज – वंचित
  9. कद्रदानों – प्रशंसकों, गुणग्राहकों
  10. महफूज – सुरक्षित
  11. उम्मीद – आशा, भरोसा
  12. इरादा – विचार, फैसला
  13. हालात – परिस्थिति
  14. तरफदारी – पक्ष लेना
  15. जन्नत – स्वर्ग
  16. मुल्क – देश, वतन

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 ‘इत्यादि’ की आत्मकहानी

Balbharti Maharashtra State Board Class 9 Hindi Solutions Hindi Lokvani Chapter 6 ‘इत्यादि’ की आत्मकहानी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 ‘इत्यादि’ की आत्मकहानी (पठनार्थ)

Hindi Lokvani 9th Std Digest Chapter 6 ‘इत्यादि’ की आत्मकहानी Textbook Questions and Answers

1. रचनात्मकता की ओर मौलिक सृजन

प्रश्न 1.
‘धन्यवाद’ शब्द की आत्मकथा अपने शब्दों में लिखिए।
उत्तर :
मनुष्य से मेरा संबंध बहुत नजदीक का है। मैं उसके जीवन के हर क्षण में उसका साथ देता हूँ। मन की कृतज्ञता प्रकट करने के लिए धन्यवाद’ यानी मैं बेहद उपयोगी शब्द हूँ परंतु अब हमें औपचारिकता माना जाता है इसलिए जिनको हम ‘अपना’ कहते हैं उनके लिए मेरा प्रयोग कम किया जाता है। मनुष्य मेरा प्रयोग करके व्यंग्य भी करता है। आज के युग में मनुष्य मेरा गलत इस्तेमाल कर रहा है, मैं सिर्फ एक औपचारिकता बनकर रह गया हूँ।

कभी-कभी मुझे गर्व भी महसूस होता है जब किसी को गले लगाकर, पाँव छूकर या हाथ मिलाकर अपनों को धन्यवाद कहते हैं, तब इसके बहुत फायदे होते हैं। जब कभी कोई मेरा प्रयोग करता है तो उसके मन की भावनाएँ व्यक्त हो जाती हैं और किसी दूसरे को खुशी भी प्राप्त हो जाती है। मुझे तब बहुत प्रसन्नता होती है जब मेरे प्रयोग से आपके रिश्तों को मजबूती मिलती है। मेरे कारण तनाव कम करने, रोग प्रतिरोधी क्षमता बढ़ाने और कृतज्ञता जाहिर करने में भी लोगों के लिए बहुत महत्त्वपूर्ण है।

किसी के व्यक्तित्व या कृति के प्रति आपके प्रशंसात्मक व्यवहार की झलक भी मेरे द्वारा ही दिखती है। वैसे भी हमने जो किया, उसका असर क्या हुआ, यह कौन नहीं जानना चाहेगा। मेरा प्रयोग करके आप अनजान व्यक्ति के हृदय में भी एक पहचान अंकित कर देते हैं। आज लोग मेरा प्रयोग खरे में, खोटे में, असली में, नकली में सभी जगह कर रहे हैं। आखिर, जो भी कुछ हो, मुझे सुनकर सभी के चेहरों पर प्रसन्नता छा जाती है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

2. संभाषणीय :

प्रश्न 1.
अपने विद्यालय में मनाई गई खेल प्रतियोगिताओं में से किसी एक खेल का आँखों देखा वर्णन कीजिए।
उत्तर:
हमारे विद्यालय में खेलकूद प्रतियोगिता का आयोजन किया गया। जिसमें अनेक विद्यालयों की टीमों ने भाग लिया। जिसमें किक्रेट मैच का आयोजन भी किया गया था, उसमें मेरे विद्यालय की टीम ने भी भाग लिया। मार्च का सुहावना दिन था। नौ बजे दोनों टीमों के कप्तान और अंपायर मैदान के मध्य में आ गए। टॉस हुआ, जिसमें हमारे कप्तान ने बाजी मारी। हमारे कप्तान ने पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। पंद्रह मिनट के अंतराल पर हमारी टीम की सलामी जोड़ी मैदान पर उतरी।

विपक्षी टीम के कप्तान ने फील्डिंग सजाई। दोनों निर्णायक अपने-अपने स्थान पर खड़े हो गए। गेंदबाज ने पहले ओवर में बहुत सटीक गेंदबाजी की। तेज गेंदबाज को विकेट की नमी का फायदा मिल रहा था। तीसरे ओवर से हमारे बल्लेबाजों ने जम कर प्रहार करना आरंभ कर दिया। कुछ शानदार चौके और तीन छक्के लगे। दस ओवर की समाप्ति पर हमारी टीम ने एक विकेट खोकर साठ रन बना लिए थे। पारी को ठोस शुरूआत मिल चुकी थी। मध्यक्रम में बल्लेबाजों ने भी संभलकर खेलना आरंभ किया।

जब उनकी आँखें जम गई तो उन्होंने चौकों और छक्के की झड़ी लगा दी। पारी समाप्त होने तक हमारी टीम ने आठ विकेट पर दो सौ पचहत्तर रनों का विशाल स्कोर खड़ा कर दिया। तीस मिनट के अंतराल के बाद खेल पुन: आरंभ हुआ। अब हमारी टीम क्षेत्ररक्षण करने उतरी। गेंदबाजी आरंभ हुई। विपक्ष के सलामी बल्लेबाजों ने अपनी टीम को ठोस शुरूआत दी। उन्होंने बिना विकेट खोए पचास रन बना लिए। अगले ओवर में विपक्षी टीम को झटका लगा।

अब तो हमारे गेंदबाज विपक्षी बल्लेबाजों पर हावी हो गए। रनों की गति पर अंकुश लग गया। हमारे कप्तान ने गेंदबाजी में लगातार परिवर्तन करते हुए विपक्षी टीम को दबाव में डाले रखा। अभी वे दो सौ रन का आँकड़ा भी पार नहीं कर पाए थे उनका पहले पाँचवाँ, फिर छठा विकेट गिर गया। हमारे खिलाड़ियों में जोश की लहर दौड़ गई। अब मैच पर हमारी टीम की पकड़ मजबूत दिखाई देने लगी। चालीस ओवर की समाप्ति पर विपक्षी टीम ने सात विकेट खोकर एक सौ अस्सी रन बनाए थे।

उनके विकेटों का पतन तेज गति से हो रहा था और रन धीमी गति से बन रहे थे। अंततः पूरी विपक्षी टीम उन्चासवें ओवर में दो सौ छत्तीस रन बना कर आउट हो गई। हमारी टीम के खिलाड़ी ओर समर्थक खुशी से उछल पड़े। दूसरी ओर विपक्षी टीम के खिलाड़ी उदास दिखाई दे रहे थे। मैच की समाप्ति पर पुरस्कार वितरण समारोह हुआ। जिले के शिक्षा अधिकारी ने विजेता टीम को ट्रॉफी प्रदान की।

हमारी टीम के उस गेंदबाज को ‘मैन ऑफ द मैच’ का पुरस्कार दिया गया जिसने मात्र छत्तीस रन देकर चार विकेट लिए थे। समारोह की समाप्ति पर खिलाड़ी और दर्शक अपने-अपने निवास स्थान की ओर लौटने लगे। इस रोमांचक मैच की यादें हमारे मन में आज भी अंकित हैं।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

Hindi Lokvani 9th Std Textbook Solutions Chapter 6 ‘इत्यादि’ की आत्मकहानी Additional Important Questions and Answers

(क) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (1) : आकलन कृति

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 1

प्रश्न 2.
समझकर लिखिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 2

प्रश्न 3.
निम्नलिखित विधान सत्य है या असत्य लिखिए।
i. सभी ने इत्यादि के जीवन की कहनी कही।
ii. ‘शब्द-समाज’ में इत्यादि का सम्मान कुछ कम नहीं है।
उत्तर:
i. असत्य
ii. सत्य

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

कृति क (2) : शब्द संपदा

प्रश्न 1.
निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए।
i. अपमान …………….
ii. असाधारण ……………
उत्तर :
i. सम्मान
ii. साधारण

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय लगाकर नए शब्द बनाइए।
i. सम्मान
ii. गुण
उत्तर :
i. सम्मानित – ‘इत’ प्रत्यय
i. गुणी – ‘ई’ प्रत्यय
वाक्य : रोहन हर बात में अपने मुँह मियाँ मिठू बनता है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

प्रश्न 3.
निम्नलिखित के वचन बदलिए।
i. लेखक
ii. कहानी
उत्तर :
i. लेखकगण
ii. कहानियाँ

कृति क (3) : स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘इत्यादि’ शब्द के महत्त्व के बारे में अपने विचार व्यक्त कीजिए।
उत्तर :
समाज में ‘इत्यादि’ शब्द का बहुत सम्मान है। वक्ता और लेखक को इस शब्द का प्रयोग करना ही पड़ता है। दिनभर में इस शब्द का प्रयोग कई बार किया जाता है। शब्द-समाज में यदि इत्यादि’ न रहता तो लेखकों और वक्ताओं की न जाने कैसी दशा ोती? इस शब्द का प्रयोग कहीं पर भी किया जा सकता है। शब्द समाज में ऐसे कई शब्द हैं जिनका अपना अलग महत्त्व है। इस शब्द का उपयोग भी होता है और कई बार दुरुपयोग भी होता है। इस शब्द के माध्यम से लेखक और वक्ता नमक मिर्च लगाकर खूब वाह-वाही हासिल कर लेते हैं।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

(ख) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (1) : आकलन कृति

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए।
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 3

प्रश्न 2.
रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए।
i. मेरी माता का नाम ………. और पिता का नाम ………….. है।
ii. वे ………….. से विचरते हैं।
उत्तर :
i. ‘इति’, ‘आदि’
ii. स्वाधीनता

कृति ख (2) : शब्द संपदा

प्रश्न 1.
निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए।
i. स्वाधीन
ii. कृपा
उत्तर:
i. स्वतंत्र
ii. दया

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के वचन परिवर्तन कीजिए।
i. लड़का
ii. भारत
उत्तर:
i. लड़के
ii. भारत

कृति ख (3) : स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
हिंदी व्याकरण में ‘उपसर्ग और प्रत्यय का महत्त्व’, इस पर अपने विचार स्पष्ट कीजिए।
उत्तर:
‘उपसर्ग’ वे शब्दांश होते हैं जो किसी शब्द के पूर्व में लगकर उस शब्द का अर्थ बदल देते हैं, या उसमें नई विशेषता उत्पन्न कर देते हैं। ‘प्रत्यय’ उन शब्दों को कहते हैं जो किसी अन्य शब्द के अंत में लगाए जाते हैं। इनके प्रयोग से शब्दों के अर्थ में भिन्नता या वैशिष्ट्य आ जाता है। उपसर्ग और प्रत्यय के प्रयोग से शब्दों का अर्थ बदल जाता है और वह विशेष अर्थ प्रकट करने लगते हैं। हिंदी व्याकरण में इनका विशेष महत्त्व हैं।

(ग) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ग (1) : आकलन कृति

प्रश्न 1.
समझकर लिखिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 4

प्रश्न 2.
सही विकल्प चुनकर पूर्ण वाक्य फिर से लिखिए ।
i. परोपकार और दूसरे का मान रखना तो मानो मेरा …………….
(क) कर्तव्य है
(ख) धर्म है।
(ग) स्वभाव हैं।
उत्तर:
(क) कर्तव्य है

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

ii. उनका मन फिर ज्यों का त्यों ………..
(क) आनंदित हो उठा।
(ख) हरा-भरा हो उठा।
(ग) दुःखी हो उठा।
उत्तर:
(ख) हरा-भरा हो उठा।

कृति ग (2) : शब्द संपदा

प्रश्न 1.
प्रत्यय अलग करके लिखिए। –
i. दरिद्रता
ii. निर्धनता
उत्तर :
i. दरिद्र + ता (प्रत्यय)
ii. निर्धन + ता (प्रत्यय)

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

प्रश्न 2.
विलोम शब्द लिखिए।
i. राजा …
ii. पंडित ……….
उत्तर:
i. रंक
ii. मूर्ख

कृति ग (3) : स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘परोपकार एक मानवीय गुण है’ इस पर अपने विचार लिखिए।
उत्तर :
मनुष्य के कर्म की सुंदरता जिन गुणों में प्रकट होती है- उनमें परोपकार सर्वोपरि है। दान, त्याग, सहिष्णुता, धैर्य और ईश्वरीय सृष्टि का सम्मान करना आदि अनेक गुण परोपकार में आते हैं। प्रकृति ही हमें परोपकार का पाठ सिखाती है। सूर्य, वायु, वन, पर्वत, पेड़-पौधे, नदियाँ, वनस्पतियाँ सभी हमें सरस फल प्रदान करते हैं। मनुष्यता की कसौटी परोपकार है। जगत-कल्याण के लिए शिव ने विषपान किया; देवताओं की रक्षा के लिए दधिची ने अपनी हड्डियों का दान किया। अत: स्पष्ट है कि आदिकाल से ही परोपकार एक मानवीय गुण है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

(घ) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति घ (1) : आकलन कृति

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 5

प्रश्न 2.
निम्नलिखित विधान सत्य है या असत्य लिखिए।
i. समालोचक महाशय का किसी ग्रंथकार के साथ मनमुटाव चल रहा था।
ii. समालोचक की पुस्तक ग्रंथकार के सामने आई।
उत्तर:
i. सत्य
ii. असत्य

कृति घ (2) : शब्द संपदा

प्रश्न 1.
विलोम शब्द लिखिए।
i. अतृप्ति
ii. योग्यता
उत्तर :
i. तृप्ति
ii. अयोग्यता

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के वचन परिवर्तन कीजिए।
i. पुस्तक
ii. पाठक
उत्तर :
i. पुस्तकें
ii. पाठकगण

कृति घ (3) : स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘धन्यवाद शब्द के हो रहे अत्यधिक प्रयोग’ पर अपने विचार व्यक्त कीजिए।
उत्तर :
आजकल धन्यवाद शब्द का बहुत प्रयोग किया जा रहा है। कभी कभी हम कार्य नहीं करते फिर भी दूसरे हमें ‘धन्यवाद’ देते हैं। इस प्रसंग पर कहे गए धन्यवाद शब्द में हमारे प्रति कृतज्ञता का भाव नहीं होता है बल्कि व्यंग्य होता है। व्यंग्य इसलिए क्योंकि हमने वह कार्य किया ही नहीं फिर भी धन्यवाद कहा जाता है। जब हम दूसरों के लिए कुछ भी नहीं कर पाते है तब हमें ‘धन्यवाद’ शब्द निरर्थक महसूस होता है। उस शब्द में छिपा व्यंग्य हमारे मन को आघात पहुँचाता है और हम परेशान हो जाते हैं।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

(ङ) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति छ (1) : आकलन कृति

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 6

प्रश्न 2.
सही उत्तर लिखिए।
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 7

प्रश्न 3.
निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक शब्द में लिखिए।

  1. ‘इत्यादि’ किसे विद्वान बनाता है ?
  2. किसके पहुँचते ही अधूरा विषय भी पूरा हो जाता है
  3. संसार का नियम क्या है?

उत्तर:

  1. मूर्ख को
  2. इत्यादि के
  3. परिवर्तन

कृति छ (2) : शब्द संपदा

प्रश्न 1.
वचन बदलिए।
i. समालोचना ………..
ii. आँख ……….
उत्तर :
i. समालोचनाएँ
ii. आँखें

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

प्रश्न 2.
विलोम शब्द लिखिए।
i. आदि …….
ii. परिवर्तित ………….
उत्तर:
i. अंत
ii. अपरिवर्तित

कृति ङ (3) : स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘परिवर्तन संसार का नियम है।’ इस पर अपने विचार व्यक्त कीजिए।
उत्तर:
इस संसार में कुछ भी अपरिवर्तनशील नहीं है। सब कुछ नश्वर और क्षण भंगूर है। जो परिवर्तन और अनित्यता को समझता है वही ज्ञानी है, इंसान दु:ख के सिवाय हर चीज को सदा एक जैसा बनाए रखने की कोशिश करता है। इसमें वह कोई परिवर्तन नहीं चाहता है। परंतु यह कैसे संभव है कि संसार में परिवर्तन ही न हो। जिसका जन्म हुआ है उसकी मृत्यु निश्चित है, जो युवा होगा वह वृद्ध अवश्य होगा, उसके जीवन में दुख है तो सुख भी आएगा यह मानव के अस्तित्व व विकास के लिए आवश्यक है। जिस प्रकार प्रकृति में परिवर्तन होता है वैसे ही संसार में भी परिवर्तन होता है। यदि संसार में परिवर्तन नहीं होता तो आज का युग इतना प्रगतिशील नहीं होता। आज मनुष्य इतनी उड़ाने नहीं भरता। यह सब परिवर्तन की ही देन है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

भाषाई कौशल पर आधारित पाठ्यगत कृतियाँ

प्रश्न 1.
भाषा बिंदु :
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी 8

‘इत्यादि’ की आत्मकहानी Summary in Hindi

लेखक-परिचय :

जीवन-परिचय : अखौरी जी आधुनिक हिंदी के प्रमुख साहित्यकार हैं। ये ‘भारत मित्र’, ‘शिक्षा’, ‘विद्या विनोद’, पत्र-पत्रिकाओं के संपादक रह चुके हैं। इनके वर्णनात्मक निबंध विशेष रूप से पठनीय हैं।

गद्य-परिचय :

वर्णनाताक कहानी : इसके अंतर्गत सजीव, निर्जीव, वस्तु, प्राणी, मनुष्य, स्थान, शब्द-विशेष, प्राकृतिक या अन्य दृश्यों, यात्रा आदि का वर्णन किया जाता है।
प्रस्तावना : प्रस्तुत पाठ ‘इत्यादि’ की आत्मकहानी के माध्यम से लेखक यशोदानंद अखौरी जी ने इत्यादि शब्द के उपयोग, सदुपयोग-दुरुपयोग से संबंधित जानकारी अपने लेख के रूप में प्रदान की है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

सारांश :

‘इत्यादि’ की आत्मकहानी के माध्यम से लेखक बताते हैं कि ‘इत्यादि’ न रहता तो लेखकों और वक्ताओं की बहुत दुर्दशा होती। इत्यादि के प्रयोग से ही वे सम्मान पाते हैं, पर उसके लिए एक वाक्य भी किसी की लेखनी ने आज तक नहीं लिखी। इसलिए वह आज स्वयं ही अपनी कहानी कहने और गुणगान करने बैठा है।

आजकल चारों ओर इत्यादि ही इत्यादि है। जहाँ देखिए वहीं वह परोपकार के लिए उपस्थित है। चाहे राजा हो, या रंक, चाहे पंडित हो या मूर्ख, किसी के घर आने-जाने में संकोच नहीं करता। अपनी मानहानि नहीं समझता। इसीलिए वह सबका प्यारा है। वह छोटे-छोटे वक्ताओं और लेखकों की दरिद्रता तुरंत दूर कर देता है। अल्पज्ञानी भी इत्यादि का सहयोग पाकर बड़े-बड़े मंचों पर ‘इत्यादि-इत्यादि’ का प्रयोग कर अपने को महापंडित सिद्ध कर देता है।

इत्यादि मूर्ख को विद्वान बनाता है, ऐसे लोगों को युक्ति सुझाता है। लेखक को यदि भाव व्यक्त करने की भाषा नहीं आती, तो भाषा जुटाता है। कवि को उपमा नहीं मिलती तो उपमा बताता है। अब तो उसका प्रयोग आदि के रूप में होने लगा है।

शब्दार्थ :

  1. वक्ता – बोलनेवाला
  2. सतर – पंक्ति
  3. अवलंब – सहारा
  4. गुणावली – गुणगान
  5. मिती – महिने की तिथी
  6. विचरना – घूमना-फिरना, चलना
  7. विख्यात – प्रसिदध
  8. कदाचित – शायद
  9. सर्वत्र – चारों ओर
  10. ठौर – जगह
  11. रंक – दरिद्र
  12. दृष्टांत – उदाहरण
  13. वक्तृत्व – व्याख्यान
  14. ग्लानि – खिन्नता, दुःख
  15. निबाह – गुजारा, पालन
  16. एक बारगी – अचानक, एक बार में
  17. समालोचक – समीक्षक, आलोचक
  18. मनमुटाव – वैमनस्य

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 6 'इत्यादि' की आत्मकहानी

मुहावरे :

  • नमक-मिर्च लगाना – बढ़ा-चढ़ाकर बातें कहना।
  • कलई खुलना – भेद खुलना, रहस्योद्घाटन होना।
  • अपने मुँह मियाँ मिठू बनाना – अपनी प्रशंसा स्वयं करना।
  • जी में जी आना – धीरज बंधाना
  • धीरज बँधना – धीरज बढ़ाना।
  • पौ-बारह झेना – अच्छा फायदा होना।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

Balbharti Maharashtra State Board Class 9 Hindi Solutions Hindi Lokvani Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

Hindi Lokvani 9th Std Digest Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी Textbook Questions and Answers

1. शब्द – संपदा:

प्रश्न 1.
लिंग परिवर्तन कीजिए।
1. लेखक
2. विद्वान
उत्तर:
1. लेखिका
2. विदुषी

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

प्रश्न 2.
निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए।
1. अवसाद
2. बेलाग
उत्तर:
1. दुख
2. बिना आधार का

प्रश्न 3.
निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए।
1. दस्तावेज
2. उत्कृष्ट
उत्तर:
1. प्रलेख
2. सर्वोत्तम

2. उत्तर लिखिए:

प्रश्न 1.
1. ‘क्रोनोलॉजिकल आर्डर’ इसे कहा जाता है –
2. महात्मा गांधी द्वारा अपने अनुयायियों एवं कार्यकर्ताओं को दिया गया सुझाव –
उत्तर:
1. डायरी की दैनिक कालानुक्रम योजना को।
2. नियमित दैनंदिन लिखने का सुझाव।

भाषा बिंदु:

प्रश्न 1.
निम्न वाक्यों में से कारक पहचानकर तालिका में लिखिए।
उत्तर:

    1. किसी ने आज तक तेरे जीवन की कहानी नहीं लिखी।
    2. मेरी माता का नाम इति और पिता का नाम आदि है।
    3. वे सदा स्वाधीनता से विचरते आए हैं।
    4. अवसर हाथ से निकल जाता है।
    5. अरे भाई! मैं जाने के लिए तैयार हूँ।
    6. अपने समाज में यह सबका प्यारा बनेगा।
    7. उन्होंने पुस्तक को ध्यान से देखा।
    8. वक्ता महाशय वक्तृत्व देने को उठ खड़े हुए।
चिहननाम
नेकर्ता कारक
कासंबंध कारक
सेकरण कारक
सेअपादान कारक
अरे !संबोधन कारक
मेंअधिकरण कारक
कोकर्म कारक
कोसंप्रदान कारक

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

लेखनीय:

प्रश्न 1.
किसी पठित गद्य/पद्य के आशय को स्पष्ट करने के लिए पी.पी.टी. (P. P. T) के मुद्दे बनाइए।
उत्तर:
कविता का नाम – नदी की पुकार
कवि का नाम – सुरेशचंद्र मिश्र

जीवन परिचय – सुरेशचंद्र मिश्र जी का जन्म उत्तर प्रदेश में प्रतापगढ़ जिले के धनऊपुर गाँव में हुआ था। आप आधुनिक हिंदी कविता क्षेत्र के जाने-माने गीतकार हैं।

नदी के कार्य – नदी हमेशा सभी प्राणियों को अपने जल द्वारा जीवन देती है। वह खेतों को हरियाली प्रदान करती है। सूखा पड़ जाने पर अपने थोड़े जल से भी लोगों की प्यास बुझाती है। कल-कल करती धारा के साथ वो हमें निरंतर गीत सुनाती है और खुशियाँ प्रदान करती है।

नदी का महत्त्व – नदी हमें अमृतधारा के समान पानी देती है। जिससे हमारी प्यास बुझती है। किसानों को फसलों की सिंचाई में मदद करती है; जिससे अन्न का उत्पादन होता है और हमारी भूख मिटती है। नदी नाविकों तथा मछुआरों को रोजगार भी देती है। अगर नदी नहीं रहेगी, तो सागर भी मुरझा जाएगा।

परोपकारी स्वभाव – नदी का स्वभाव परोपकारी है। वह सभी को निःशुल्क जल देती है। जो भी उसे पुकारता है वह उसकी प्यास बुझाती है और सभी प्राणियों को अपना बनाती है। वह किसी के साथ भेदभाव की भावना नहीं रखती है।

नदी का जीवन – नदी सभी मुश्किलों से लड़कर आगे बढ़ती रहती है। वह झरने से नीचे गिरती है। रास्ते के पत्थरों को तोड़ती हुई, बीहड़ जंगलों को पार करती हुई, ऊँचे-नीचे स्थानों से होती हुई अंत में सागर में जाकर मिल जाती है। नदी जन्म से मृत्यु पर्यंत संघर्ष करती जाती है।

नदी की वर्तमान स्थिति – नदी हमारे लिए सबसे महत्त्वपूर्ण है। अगर नदी नहीं रहेगी, तो संसार में जीवन ही संभव नहीं होगा; लेकिन इसके बावजूद हम नदी की उपेक्षा कर रहे हैं। हम उसके द्वारा किए जाने वाले उपकारों को भूलते जा रहे हैं। हमारे द्वारा लगातार नदियों में कचरा, घातक रासायनिक पदार्थ, गंदगी आदि बहाई जा रही है जिससे प्रदूषण का खतरा बढ़ता जा रहा है। अगर ऐसी स्थिति रही तो नदी का अस्तित्व ही खतरे में पड़ जाएगी।

नदी की पुकार – लगातार बढ़ते प्रदूषण के कारण नदी परेशान हो गई है। वह मनुष्य से अपने को प्रदूषण मुक्त करने के लिए बार-बार निवेदन करती है।

आसपास:

प्रश्न 1.
‘अंतरजाल से कोई अनुदित कहानी ढूँढ़कर रसास्वादन करते हुए वाचन कीजिए।
उत्तर:
बहुत समय पहले की बात है किसी गाँव में एक किसान रहता था। वह बहुत ही अच्छा किसान था और खेतों से ही अपने परिवार का भरण-पोषण करता था। एक दिन की बात है कि तूफान जोर से आया और उसकी सारी फसल को नष्ट कर दिया। वह बहुत ही दुखी हुआ और मन ही मन सोचने लगा कि मेरा और मेरे परिवार का क्या होगा? कुछ दिन मौन रहने के बाद उसको एक उपाय सुझा, उसने मन बनाया कि भगवान को एक पत्र लिखेगा और अपनी फसल की दुर्दशा उसमें लिखेगा। पूरा दिन सोचने के बाद उसने भगवान को एक पत्र लिखा। पत्र लिखने के बाद वह पास ही एक डाकखाने में उस पत्र को पोस्ट करके आ गया।

जब उसका पत्र डाकखाने में पहुँचा तो सब लोग हँसने लगे और बोले पहली बार भगवान के नाम का पत्र आया है, लेकिन कुछ टाइम बाद जब एक क्लर्क ने उस पत्र को पढ़ना आरंभ किया तो उसमें किसान ने अपनी पूरी मनोदशा का वर्णन किया था। पत्र पढ़ने के बाद सभी की आँखो में आँसू आ गए और सब लोग अपने वेतन का कुछ हिस्सा किसान को देने के लिए राजी हो गए। किसान ने भगवान से 3000 रुपया माँगा था, लेकिन सब मिलाकर पोस्ट ऑफिस वालों ने 2000 ही उसको भेजा। सारे पोस्ट ऑफिस वाले बहुत ही खुश थे कि उन लोगों ने उस किसान की मदद की।

कुछ समय बाद किसान को वह पत्र मिला जिसमें 2000 रुपया था। वह बहुत ही खुश हुआ और भगवान को धन्यवाद दिया साथ में यह भी कहा – हे भगवान, अगली बार आप पोस्ट ऑफिस से सीधे पैसा मत देना ये पोस्ट ऑफिस वाले चोर होते हैं। मुझको पता है कि आप ने मुझको पूरा पैसा दिया था, लेकिन ये पोस्ट ऑफिस वालों ने चुरा लिया होगा, क्योंकि ये हैं ही बेईमानों की झुण्ड।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

मौलिक सृजन:

प्रश्न 1.
डायरी लेखन में व्यक्ति का व्यक्तित्व झलकता है।
उत्तरः
डायरी लेखन हिंदी साहित्य की सबसे प्राचीन विधा है। इसमें लिखने वाले व्यक्ति का व्यक्तित्व झलकता है क्योंकि लेखक इसमें अपने मन की बातों का अंकन करता है। डायरी लेखक के मन का केंद्रबिंदु होता है, जिसमें वह खुशी-गम, अच्छे-बुरे का लेखन करता है। किसी भी महान व्यक्ति की डायरी पढ़ने से हमें यह ज्ञात होता है कि उस महान व्यक्ति का व्यक्तित्व कैसा था। इसमें हमें उस व्यक्ति की ताकत तथा कमजोरियों के बारें में पता चलता है।

डायरी डायरीकार का एक सच्चा मित्र होता है। जो गलत करने पर आत्मग्लानि तथा सही काम करने पर आत्म सम्मान रूपी पुरस्कार देता है। डायरी सही मायनों में उस व्यक्ति की आत्मकथा बन जाती है, क्योंकि उस डायरी में उसके जीवन से जुड़ी हर छोटी-बड़ी घटना का उल्लेख होता है और उसे पढ़ने से उस लेखक के अनुभवों का निचोड़ हमारे सामने आता है इन अनुभवों से लाभान्वित होकर हम अपने व्यक्तित्व को उन्नत बना सकते हैं।

पाठ के आँगन में:

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी 1

पाठ से आगे:

प्रश्न 1.
हिंदी में अनुवादित उल्लेखनीय डायरी लेखकों के नामों की सूची तैयार कीजिए।
उत्तरः
डायरी लेखकों का नाम:

  1. मनुबहन गांधी
  2. महादेव देसाई
  3. सीताराम सेकसरिया
  4. सुशीला नैयर
  5. जमनालाल बजाज
  6. घनश्याम बिड़ला
  7. श्रीराम शर्मा
  8. हीरालाल जी शास्त्री

Hindi Lokvani 9th Std Textbook Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी Additional Important Questions and Answers

(क) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी 2

प्रश्न 2.
समझकर लिखिए।
1. डायरी विधा इस अर्थ में नई है –
2. डायरी का मतलब –
उत्तर:
1. डायरी का संबंध मनुष्य के दैनंदिन जीवनक्रम के साथ घनिष्ठता से जुड़ा हुआ है।
2. जिसमें तारीखवार हिसाब-किताब, लेन-देन के ब्यौरे आदि दर्ज किए जाते हैं।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

कृति (2): शब्द-संपदा

प्रश्न 1.
गद्यांश से प्रत्यय युक्त शब्द ढूँढकर लिखिए।
उत्तर:
1. घनिष्ठता
2. मानवीय

कृति (3): स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘डायरी विधा का बढ़ता प्रचलन’ इस पर अपने विचार लिखिए।
उत्तर:
डायरी लेखन अब भारत में भी एक जानी-पहचानी विधा है। इसे घर-घर में लिखा जा रहा है। अब इस पर चर्चा भी होती है। इसे हमारे साहित्य जगत ने भी स्वीकार कर लिया है। व्यक्तिगत और प्रकाशित न होने के कारण इसकी संख्या के बारे में सही अनुमान लगाना संभव नहीं है। इसके बावजूद यह कहा जा सकता है कि अभी भी यह अन्य देशों की तुलना में हमारे देश में कम ही लिखी जाती है और जो थोड़ी-बहुत लिखी भी जाती है उसमें नियमितता व निरंतरता का अभाव देखने को मिलता है।

(ख) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
उत्तर लिखिए।
1. डायरी में मनुष्य इन स्थितियों को अंकित करता है –
2. डायरी विधा की विशेषता –
उत्तरः
1. डायरी में मनुष्य अपने अंतर्जीवन एवं बाह्यजीवन की लगभग सभी स्थितियों को यथास्थिति अंकित करता है।
2. डायरी साहित्य की सबसे अधिक स्वाभाविक सरल एवं आत्मप्रकटीकरण की सादगी से युक्त विधा है।

प्रश्न 2.
सत्य या असत्य पहचानकर लिखिए।
1. डायरी के लिए विषयवस्तु का बंधन होता है।
2. डायरी में जो जीवन है वह सावधानीपूर्वक रचा हुआ जीवन नहीं है।
उत्तर:
1. असत्य
2. सत्य

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

कृति (2):शब्द-संपदा

प्रश्न 1.
गद्यांश से विलोम शब्द ढूँढ़कर लिखिए।
1. अस्वस्थ × ………….
2. कठिन × …………..
उत्तर:
1. स्वस्थ
2. सरल

कृति (3): स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘डायरी लेखन में लेखकीय महत्वाकांक्षा की आवश्यकता नहीं’ इस पर अपने विचार लिखिए।
उत्तर:
डायरी लेखन के लिए लेखक होना जरूरी नहीं होता है। इसमें व्याकरण, वर्तनी और वर्ण विन्यास का शुद्ध और सही होना आवश्यक नहीं होता है। विश्व में उनकी डायरी सर्वाधिक सफल, लोकप्रिय व सशक्त मानी जाती है; जिन्हें भाषा का ज्ञान नहीं था। जब सामान्य आदमी भी अपने विचारों, मतों व भावनाओं को सहज और स्वाभाविक रूप से प्रस्तुत करता है; तो पाठक और समाज को एक नया दृष्टिकोण मिलता है। इस तरह का मौलिक लेखन धरातल से जुड़ा होता है जिसमें खरेपन के साथ सहज संवेदनाएं संचारित होती हैं। डायरी लेखन में लेखकों का विभिन्न कार्यक्षेत्र व पृष्ठभूमि से आना रचना में विविधता व नवीनता पैदा करता है।

(ग) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी 3

कृति (2): शब्द-संपदा

प्रश्न 1.
समानार्थी शब्द बताइए।
1. मात्र
2. अवस्था
उत्तर:
1. केवल
2. स्थिति

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

प्रश्न 2.
निम्न शब्दों के विलोम शब्द लिखिए।
1. अनैतिक × ………….
2. नीरस × ……………
उत्तर:
1. नैतिक
2. सरस

कृति (3): स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘डायरी लेखन के महत्त्वपूर्ण मुद्दे’ पर अपने विचार लिखिए।
उत्तर:
डायरी लिखने की शुरूवात मन की बातों को अभिव्यक्ति देने की जरूरत से जन्म ले सकती है। डायरी लिखना रोज के अनुभवों को लिपिबद्ध करने का एक बहाना भी हो सकता है। डायरी लिखते समय हमें भाषा की गलतियों की परवाह किए बिना सीधेसपाट शब्दों में अपनी बात लिखनी चाहिए। डायरी लिखते समय मन में आने वाले सवालों, उलझनों, भावनाओं, हलचलों को ज्यों-का-त्यों व्यक्त करने की कोशिश करनी चाहिए। डायरी में निजता का भाव होता है। यह हमारे लिए वह स्थान होता है, जहाँ हम खुद का सामना बिना किसी मुखौटे के करते हैं। डायरी लेखन के दौरान हम खद को अपने ज्यादा करीब होने का मौका देते हैं। डायरी लेखन में जहाँ तक संभव हो अपनी मातृभाषा में लिखने की कोशिश करनी चाहिए। बाकी किसी नई भाषा में भी डायरी लिखी जा सकती है।

(घ) गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति (1): आकलन कृति

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी 4

प्रश्न 2.
समझकर लिखिए।
1. इस छवि को रखने में डायरी साहित्य का उत्कृष्ट माध्यम है –
2. डायरी इनका दस्तावेज है –
उत्तर:
1. अपने जीवन की सच्ची, निष्काय, पारदर्शी छवि को रखने में।
2. डायरीकार की निजी भावनाओं, विचारों एवं प्रतिक्रियाओं के द्वारा अंकित उसके अपने जीवन एवं परिवेश का।

कृति (2): शब्द-संपदा

प्रश्न 1.
प्रत्यय लगाकर शब्द बनाइए।
1. अंतरंग
2. ईमानदार
उत्तर:
1. अंतरंग + ता = अंतरंगता
2. ईमानदार + ई = ईमानदारी

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

कृति (3): स्वमत अभिव्यक्ति

प्रश्न 1.
‘डायरी लिखने के फायदे’ इस विषय पर अपने विचार लिखिए।
उत्तर:
डायरी लिखने के भी अनेक फायदे होते हैं। डायरी लिखने से हम अपने लक्ष्यों को पूरा करने में सफल होते हैं क्योंकि जब हम डायरी में अपने लक्ष्यों को लिखते हैं तो हमारे मस्तिष्क में उनका मनोवैज्ञानिक ब्लू प्रिंट बनता है। जिसे सफलतापूर्वक पूरा करने की संभावना बनी रहती है। जब हम अपनी भावनाओं को लिखते हैं तो अन्य बुरे विचारों के उलझन से भी मुक्त हो जाते हैं। डायरी लिखने से नए विचार और भावनाएँ बाहर आती हैं। सोच का दायरा बढ़ाने में मदद मिलती है। डायरी लिखने का महत्त्वपूर्ण फायदा यह भी है कि हम अपनी चीजों के बारे में इससे जानकारी ले सकते हैं क्योंकि सब कुछ याद रखना दिमाग के लिए आसान काम नहीं होता है।

साहित्य की निष्कपट विधा है-डायरी Summary in Hindi

लेखक-परिचय:

जीवन-परिचय: कुबेर कुमावत आधुनिक साहित्यकारों में अति परिचित नाम है। विशेषतः इनके विचारात्मक तथा वर्णनात्मक निबंध बहुत लोकप्रिय हैं। पत्र-पत्रिकाओं में आपकी कहानियाँ नियमित रूप से प्रकाशित होती हैं।

प्रमुख कृतियाँ: पत्र-पत्रिकाओं में आपकी कहानियाँ नियमित रूप से प्रकाशित होती है।

गद्य-परिचय:

डायरी: किसी भी व्यक्ति द्वारा अपने अनुभवों, सोच और भावनाओं को लिखित रूप में अंकित कर बनाया गया संग्रह डायरी लेखन कहलाता है। यह रोज लिखा जाने वाला लेखन है। इसमें प्रतिदिन अनुभव की गई भावनाओं तथा घटने वाली घटनाओं को समय, दिन एवं स्थान आदि विवरण के साथ लिखा जाता है।

प्रस्तावना: प्रस्तुत पाठ ‘साहित्य की निष्कपट विधा है-डायरी’ में लेखक कुबेर कुमावत जी ने ‘डायरी’ विधा के लेखन की प्रक्रिया,
उसके महत्त्व आदि को स्पष्ट किया है।

सारांश:

प्रस्तुत पाठ में लेखक ने बताया है कि डायरी गद्य साहित्य की सबसे प्राचीन विधा है। जिसमें तारीखवार हिसाब-किताब, लेन-देन के ब्यौरे आदि दर्ज किए जाते हैं। डायरी में मनुष्य अपने अंतर्जीवन एवं बाह्य जीवन के बारे में लिख सकता है। विरोधाभासों के बीच अपने को स्वस्थ एवं प्रसन्न रखने का माध्यम है डायरी। गुजराती में लिखी बहुत-सी डायरियाँ हिंदी में अनुवादित हैं जिसमें महादेव देसाई, मनु बहन गाँधी की डायरी मुख्य है। आधुनिक समय में भी बहुत-सी डायरियाँ प्रकाशित हैं, जिनमें शिवपूजन, सहाय, गणेश शंकर विद्यार्थी, रामधारी सिंह ‘दिनकर’ आदि की डायरियाँ प्रमुख हैं।

अपने जीवन की सच्ची निष्काय पारदर्शी छवि को याद रखने में डायरी साहित्य का उत्कृष्ट माध्यम है। डायरी जीवन का अंतरदर्शन है। एक अच्छी, सच्ची एवं सादगीयुक्त डायरी के लिए लेखक का साहसी और ईमानदार होना आवश्यक है। दैनंदिन जीवन के अनेक प्रसंग भाव, भावनाएँ, विचार आदि डायरीकार अपनी डायरी में लिखता है, परंतु इसके पीछे लेखक की निष्कपट स्वीकारोक्तियों का स्थान सर्वाधिक है। हिंदी में अनेक डायरियाँ ऐसी हैं जो प्रायः यथावत अवस्था में प्रकाशित हुई हैं। डायरी को बेलाग आत्मप्रकाशन की विधा बनाने में महात्मा गाँधी का योगदान सर्वोपरि है। उन्होंने अपने अनुयायियों को दैनंदिन लिखने का सुझाव दिया। डायरी अपनी रचना द्वारा मनुष्य के जीवन में जहाँ आतंरिक अनुशासन बनाए रखती है; वही मनोवैज्ञानिक संतुलन का कार्य भी करती है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 4 साहित्य की निष्कपट विधा है-डायरी

शब्दार्थ:

  1. विधा – प्रकार
  2. दैनंदिनी – दैनिकी
  3. मनोवैज्ञानिक – मन में उठनेवाले विचारों का विवेचन करने वाला
  4. अतुल्य – अनुपम, अद्वितीय
  5. श्लाघ्यनीय – प्रशंसनीय
  6. संतुलन – दो पक्षों का बल बराबर रखना
  7. कायरता – भीरुता, डरपोकपन
  8. गरिमा – गौरव, प्रशंसनीय
  9. वर्जना – रोक लगाना
  10. मंशा – इच्छा
  11. बेलाग – बिना आधार का
  12. फर्जी – नकली
  13. कसाव – भाव, कसा हुआ
  14. विवेच्य – जिसकी विवेचना की जाती है
  15. सर्वोपरि – सबसे ऊपर
  16. अंतद्वंद्व – किसी बात पर मन के अंदर चलने वाला विरोधाभास
  17. अवसाद – दुख
  18. निष्कपट – छलरहित, सीधा

मुहावरे:

1. दूर-दूर तक संबंध न होना – कुछ भी संबंध न होना।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

Balbharti Maharashtra State Board Class 9 Hindi Solutions Hindi Lokvani Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा (पठनार्थ)

Hindi Lokvani 9th Std Digest Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा Textbook Questions and Answers

1. संजाल पूर्ण कीजिए।

प्रश्न 1.
संजाल पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा 1.1

2. निम्नलिखित पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।

प्रश्न 1.
निम्नलिखित पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
हम कितने सुख सपने लेकर, इसको (ठहराते, फहराते, लहराते) हैं।
इस झंडे पर मर मिटने की, कसम सभी खाते हैं।
हिंद देश का है ये झंडा, घर-घर में लहरेगा।
झंडा ऊँचा सदा रहेगा।।
उत्तर:
कवि कहते हैं, हम कितने सुख तथा सपने लेकर इस झंडे को गाड़ते, फहराते और लहराते हैं। हम सब इस झंडे पर मर मिटने की सौगंध खाते हैं। यह हिंदुस्तान का झंडा है, यह घर-घर में लहराएगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

भाषा बिंदु:

प्रश्न 1.
नीचे दिए गए चिह्नों के सामने उनके नाम लिखिए तथा वाक्यों में उचित विरामचिह्न लगाइए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा 2.1

संभाषणीय:

प्रश्न 1.
क्रांतिकारियों के जीवन से संबंधित कोई प्रेरणादायी प्रसंग / घटना पर आधारित संवाद बनाकर प्रस्तुत कीजिए।
उत्तर:
(चौरीचौरा कांड के विषय में भगत सिंह, सुखदेव और राजगुरु का संवाद प्रस्तुत करते हुए तीन छात्र)

  • भगत सिंह: मित्रों, आज समय आ गया है कि हम अंग्रेज सरकार का पुरज़ोर तरीके से विरोध करें क्योंकि उनके अत्याचार से हमारी भारत माँ आहत हैं, दुखी हैं।
  • सुखदेव: भारत माँ के लिए तो हम अपनी जान भी दे सकते हैं बताओ मित्र हमें क्या करना है?
  • राजगुरु: हमने तो अपने सर पर कफन बाँध लिया है बताओ दोस्त हमें किस घटना को अंजाम देना है?
  • भगत सिंह: मित्रों, आने वाली 4 फरवरी को हमें चौरीचौरा कस्बे के पुलिस चौकी पर हमला करना है तथा उस चौकी को नष्ट करना है क्योंकि यही वह चौकी है, जो गोरखपुर शहर जाने के मार्ग पर स्थित है बिना इसे नष्ट किए हमारे साथी क्रांतिकारी शहर में प्रवेश नहीं कर पा रहे हैं।
  • सुखदेव: मित्र, हम अंग्रेज सरकार की ईंट से ईंट बजा देगें तथा ऐसा हमला करेगें कि उनके पास बचने के कोई उपाय नहीं होंगे।
  • राजगुरु: वह सब तो ठीक है दोस्तों लेकिन हमें गुप्त रूप से अपनी योजना की जानकारी दूसरे क्रांतिकारी मित्रों तक पहुँचानी होगी। इस काम में हमारी मदद करेगें बाबू रामप्रसाद बिस्मिल। योजना के अनुसार 3 फरवरी से ही हमारे क्रांतिकारी मित्र चौरीचौरा कस्बे में जमा होना शुरू हो जाएँगे और ठीक 4 तारीख को आधी रात के समय चौकी पर हमला किया जाएगा।
  • भगत सिंह: दोस्तों, यही जालियावाला बाग कांड के शहीदों के प्रति हमारी सच्ची श्रद्धांजलि होगी। मित्रों एक बार साथ में बोलो-भारत माता की जय!
  • सुखदेव: भारत माता की जय!
  • राजगुरु: मातृभूमि की जय!
  • सब साथ में: भारत माता की जय ! मातृभूमि की जय!

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

लेखनीय:

प्रश्न 1.
राष्ट्र का गौरव बनाए रखने के लिए पूर्व प्रधानमंत्रियों द्वारा किए सराहनीय कार्यों की सूची बनाइए।
उत्तर:

प्रधानमंत्री का नामराष्ट्र गौरव के कार्य
1. पं. जवाहर लाल नेहरू1. गुट निरपेक्ष आंदोलन की रचना
2. इंदिरा गांधी1. परमाणु कार्यक्रम की शुरूआत
2. बैंकों का राष्ट्रीकरण करना
3. राजीव गाँधी1. गुट निरपेक्ष आंदोलन का नेतृत्व।
2. भारत को कम्प्यूटर से जोड़ना।
4. पी. वी. नरसिम्हा राव1. अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष नीति का प्रारंभ।
2. परमाणु कार्यक्रमों की शुरूआत करना।
5. इन्द्र कुमार गुजराल1. श्रीलंका में शांति सेना भेजना।
6. अटल बिहारी वाजपेयी1. कारगिल युद्ध में विजय
2. पोखरण में परमाणु परीक्षण।
3. संयुक्त राष्ट्र संघ में हिंदी में भाषण।
7. डा. मनमोहन सिंह1. भारतीय अर्थ व्यवस्था को विश्व अर्थ व्यवस्था के साथ जोड़ देना।

आसपास:

प्रश्न 1.
अपने जिले में सामाजिक कार्य करने वाली किसी संस्था का परिचय निम्न मुददों के आधार पर प्राप्त करके टिप्पणी बनाइए।
उत्तर:
मेरे अमरावती जिले में एक गैर सरकारी संस्था (हुद) कार्य कर रही है। ये संस्था बिना किसी सरकारी भागीदारी के समाज में अपना कार्य करती है। जिले में गैर सरकारी संगठन का कार्य अच्छे से चल रहा है। ये संस्था लोगों की सहायता के साथ-साथ स्वशिक्षा, शिक्षा के लिए अनुदान की व्यवस्था, गरीब लोगों को आर्थिक मदद की जरूरत भी पूरी करती है। जिले में इस संस्था के द्वारा गरीबों के भोजन व स्वच्छ पेय जल का पता लगाने एवं जरूरतमंद की मदद करने का कार्य अच्छी तरह से किया जा रहा है। उत्पीड़न के शिकार लोगों की मदद करना इस संस्था का मुख्य कार्य है। ये समुदाय धर्म विशेष पर ध्यान नहीं देती। ये तो सभी धर्मों का समान सम्मान करती है। मेरे जिले में इस संगठन का कार्य बहुत ही सराहनीय है। इस संगठन में ‘द चिल्ड्रेस लीगल सेंटर’ के द्वारा बच्चों के अधिकारों का पूर्ण रूप से ध्यान दिया जाता है।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

कल्पना पल्लवन:

प्रश्न 1.
‘मेरे सपनों का भारत’ इस कल्पना का विस्तार अपने शब्दों में कीजिए।
उत्तर:
‘मेरे सपनों का भारत कैसा हो?’ इस पर मेरे मन में कई तरह के विचार उत्पन्न होते हैं। लेकिन मैं चाहता हूँ कि मेरे सपनों का भारत सुखी और संपन्न हो, सभी देशवासी शिक्षित हों, बेरोजगारी की समस्या दूर हो और भारत एक कर्मनिष्ठ तथा आत्मनिर्भर देश बनें। मेरे सपनों का भारत ऐसा हो जहाँ लोग मर्यादाओं का पालन करें तथा सभी देशवासियों में विश्व बंधुत्व की भावना हो। लोग सभी धर्मों का आदर करें तथा जातिगत का बंधन न हो। समाज मुक्त हो, सभी को एक जैसा अधिकार मिले। समाज में शोषण और अत्याचार न रहे। ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा’ यह प्रेरणादायी पंक्तियाँ एक हकीकत बने और जब यह संभव होगा तभी हम देश पर गर्व कर पाएँगे। विश्व की प्राचीनतम सभ्यता इसी पावन धरती पर फली थी।

न जाने कितने ही महापुरुषों ने इस पवित्र धरती पर जन्म लिया है। इसी देश ने विश्व को वेद-पुराणों तथा गीता का संदेश सुनाया था। इसी भारतवर्ष ने संसार को ‘वसुधैव कुटुंबकम’ का पाठ पढ़ाया था। मैं चाहता हूँ कि मेरे सपनों का भारत एक परिवार के समान हो। जहाँ कोई भेदभाव न हो। लोगों में परोपकार की भावना हो। भारतवर्ष एक कृषि प्रधान देश है; इसलिए किसान हमारे लिए देवता के समान हैं। जो हमारे लिए अन्न का उत्पादन करते हैं। इसलिए गाँव में सिंचाई की सुविधा होनी चाहिए ताकि किसान वर्षा की अनिश्चिता से मुक्त हो सके। हमारा देश जो गाँवों में बसता है; वहाँ हर प्रकार की बुनियादी सुविधा हो जिससे गाँव के लोगों को शहर की तरफ जाने की जरूरत न पड़े।

किसी भी देश के विकास के लिए आवश्यक है शिक्षा और चिकित्सा। इसलिए गाँवों में स्कूल तथा स्वास्थ्य सेवा का ऐसा प्रावधान होना चाहिए जिससे लोगों को अपने बच्चों की शिक्षा तथा सबके स्वास्थ्य को लेकर निश्चिंतता हो। हमारे देश में व्यवसायी वर्ग उपेक्षित है। किसान और मजदूर अपने खून को पसीना बनाने में नहीं हिचकते लेकिन लोग उन्हें आदर की दृष्टि से नहीं देखते हैं। मेरे सपनों के भारत में व्यापारी वर्ग, किसान व मजदूर खुशहाल होने चाहिए। इस प्रकार ‘मेरे सपनों का भारत’ ऐसा होना चाहिए कि हम सारे विश्व के सामने एक उदाहरण प्रस्तुत करें।

Hindi Lokvani 9th Std Textbook Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा Additional Important Questions and Answers

(क) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
प्रथम छह पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
कवि देश के तिरंगे झंडे का गौरव-गान करते हुए कहते हैं कि यह सर्वदा ऊँचा रहेगा, सदा ऊँचा रहेगा। भारत देश का प्यारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा। कवि कहते हैं हमारे देश का झंडा तूफानों और बादलों से भी नहीं झुकेगा, अर्थात बड़े से बड़े शत्रुओं के आक्रमण से भी नहीं झुकेगा। कभी नहीं झुकेगा यह झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

(ख) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (1): आकलन कृति

प्रश्न 1.
आकृति पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा 3

कृति ख (2): सरल अर्थ

प्रश्न 1.
निम्नलिखित पंक्तियों का सरल अर्थ लिखिए।
उत्तर:
शान हमारी ये झंडा है, ये अरमान हमारा,
ये बल पौरुष है सदियों का, ये बलिदान हमारा।
जीवन-दीप बनेगा, ये अंधियारा दूर करेगा।
झंडा ऊँचा सदा रहेगा।।
उत्तर:
कवि कहते हैं, ये तिरंगा झंडा हमारी शान और हमारा अरमान है। यह झंडा सदियों के शक्ति-पराक्रम और हमारे बलिदान की निशानी है। यह तिरंगा हमारे जीवन का दीपक बनेगा तथा अंधकार को दूर करेगा, अर्थात कठिनाइयों और बुराइयों को दूर करेगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

(ग) पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (1): आकलन कृति

प्रश्न 1.
कृति पूर्ण कीजिए।
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा 4

प्रश्न 2.
उत्तर लिखिए।
1. हम यह कसम खाते हैं –
2. झंडा यहाँ लहरेगा –
उत्तर:
1. झंडे पर मर मिटने की।
2. घर-घर में।

झंडा ऊँचा सदा रहेगा Summary in Hindi

कवि-परिचय:

जीवन-परिचय: रामदयाल पांडेय जी का जन्म बिहार में हुआ था। वे स्वतंत्रता संग्राम सेनानी और राष्ट्रभाव के महान कवि थे। साहित्य को जीने वाले, अपने धुन के पक्के, आदर्श कवि और विद्वान संपादक के रूप में प्रसिद्ध रहे तथा उनके संस्थाओं से जुड़े रहे।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

पद्य-परिचय:

प्रेरणा गीत: प्रेरणागीत हिंदी साहित्य की एक महत्त्वपूर्ण विधा है। यह हमारे दिलों में उतर कर हमारी जिंदगी को संघर्ष करने की शक्ति और आगे बढ़ने की प्रेरणा देती हैं।

प्रस्तावना: प्रस्तुत कविता ‘झंडा ऊँचा रहेगा’ में कवि पांडेय जी ने अपने देश के झंडे का गौरवगान विभिन्न स्वरूपों में किया है।

सारांश:

कवि कहते हैं, हमारे देश का झंडा हमेशा ऊँचा रहेगा। यह विकट से विकट परिस्थिति में भी नहीं झुकेगा। इस झंडे में तीन रंग की पट्टियाँ हैं और बीच में एक चक्र है। केसरिया रंग शक्ति का प्रतीक है। यह हमारे अंदर शक्ति भरने वाला है, सफेद रंग सच्चाई का प्रतीक है, हरा रंग हमारी धरती की हरियाली का प्रतीक है और चक्र गतिशीलता का प्रतीक है। यह झंडा हमारी शान, अरमान, बल पौरुष तथा बलिदान है। यह झंडा हर घर में लहराएगा। यह झंडा दुनिया के कोने-कोने में अपना संदेश सुनाएगा। हम इस झंडे पर मर मिटने की कसम खाते हैं।

सरल अर्थ:

ऊँचा सदा ………………… ऊँचा सदा रहेगा।।
कवि देश के तिरंगे झंडे का गौरव-गान करते हुए कहते हैं कि यह सर्वदा ऊँचा रहेगा, सदा ऊँचा रहेगा। भारत देश का प्यारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

टूफानों से ……………….. ऊँचा सदा रहेगा।।
कवि कहते हैं हमारे देश का झंडा तूफानों और बादलों से भी नहीं झुकेगा, अर्थात बड़े से बड़े शत्रुओं के आक्रमण से भी नहीं झुकेगा। कभी नहीं झुकेगा यह झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

केसरिया बल ……………. ऊँचा रहेगा।।
कवि कहते हैं, तिरंगे झंडे का केसरिया रंग देश की शक्ति का प्रतीक है, यह हमारे अंदर शक्ति भरता है, सफेद रंग शांति और सत्य का प्रतीक है, यह हमें सच्चाई का मार्ग दिखाता है, हरा रंग भूमि की पवित्रता, उर्वरता और वृद्धि को दर्शाता है और चक्र यह हमें उन्नति के मार्ग पर हमेशा कदम बढ़ाते रहने का संदेश देता है। हमारा यह झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

शान हमारी ……………………… ऊँचा सदा रहेगा।।
कवि कहते हैं, ये तिरंगा झंडा हमारी शान और हमारा अरमान है। यह झंडा सदियों के शक्ति-पराक्रम और हमारे बलिदान की निशानी है। यह तिरंगा हमारे जीवन का दीपक बनेगा तथा अंधकार को दूर करेगा, अर्थात कठिनाइयों और बुराइयों को दूर करेगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

आसमान में …………………….. ऊँचा सदा रहेगा।।
कवि कहते हैं, तिरंगा झंडा आसमान और बादल में हमेशा लहराता रहे। यह झंडा जहाँ-जहाँ जाए अपनी बात, अपना संदेश और अपना संवाद लोगों को सुनाए, अर्थात लोगों को सत्य-अहिंसा और भाईचारे का संदेश दे। आज हिंदुस्तान ही ऐसा देश है जो पूरे संसार को भेद-भाव और हिंसा जैसी बुराइयों से आजाद करेगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

नहीं चाहते …………………. ऊँचा सदा रहेगा।।
कवि कहते हैं, हम दुनिया को अपना दास नहीं बनाना चाहते, दूसरों की बात और फटकार नहीं सुनना चाहते तथा हम दूसरों के मुँह का निवाला भी छीन कर नहीं खाना चाहते। हमारा खून हमेशा सत्य और न्याय के लिए बहेगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

हम कितने ………………………. ऊँचा सदा रहेगा।।
कवि कहते हैं, हम कितने सुख तथा सपने लेकर इस झंडे को गाड़ते, फहराते और लहराते हैं। हम सब इस झंडे पर मर मिटने की सौगंध खाते हैं। यह हिंदुस्तान का झंडा है, यह घर-घर में लहराएगा। हमारा झंडा हमेशा ऊँचा रहेगा।

Maharashtra Board Class 9 Hindi Lokvani Solutions Chapter 8 झंडा ऊँचा सदा रहेगा

शब्दार्थ:

  1. सदा – हमेशा
  2. बल – शक्ति
  3. शान – गरिमा, मर्यादा
  4. अरमान – इच्छा
  5. पौरुष – पुरुषार्थ, पराक्रम, साहस
  6. दास – सेवक, गुलाम
  7. फटकार – डाँट
  8. लहू – खून, रक्त
  9. लहराना – फहराना
  10. कसम – सौगंध