Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 7 दुपार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 7 दुपार Textbook Questions and Answers

1. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 1
उत्तर:

कष्टकऱ्यांची दुपारलेखनिकांची दुपार
1. कष्टकरी उन्हातान्हात काम करतात.कार्यालयात खुर्चीत बसून काम  करतात.
2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात.सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात.
3. शारीरिक कष्ट अमाप.शारीरिक कष्ट कमी.
4. साधने कष्टाची असतात.संगणकासारखे आधुनिक उपकरण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

2. कोण ते लिहा:

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
(आ) दुपारला आनंद देणारा घटक – [ ]
(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी – [ ]
(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक – [ ]
(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार – [ ]
(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ – [ ]
उत्तर:
(अ) शेतकरी
(आ) मधल्या सुट्टीत खेळणारी मुले.
(इ) कार्यालयांतील लेखनिक व हिशोबतपासनीस.
(ई) दुपार
(उ) तारुण्य.
(ऊ) दुपार

3. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 3

4. डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.

प्रश्न 1.
डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.
उत्तर:
हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
स्पष्टीकरण: खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूंवर) मानवी भावनांचे आरोपण केले अहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

5. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:
उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती

  1. रस्ता – बाट, मार्ग, पादचारी, पथ
  2. पर्वत – नग, गिरी, शैल, डोगर
  3. ज्ञानी – मुश, सुकर, डोळस, जाणकार
  4. डौल – जोम, ऐट, दिमाख, स्वाब
  5. काळजी – चिंता, स्याबदारी, विवंचना, फिकीर.

उत्तर:

  1. पादचारी
  2. नग
  3. सुकर
  4. जोम
  5. जबाबदारी

6. स्वमत

प्रश्न (अ)
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
उत्तर:
आठवीनंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यांत आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठाच आधार असतो. क्वचित केव्हातरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले.

क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी! पिझ्झा पार्टी, आइस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हांला खूप आवडते. त्या वेळी आम्ही आमचे राजे असतो. त्या वेळी “पुरे झाले, आता चला घरी,’ असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन-तीन वेळा तरी मे महिना यायला हवा!

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न (आ)
‘दुपार’ या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
‘दुपार’ या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला तो. तो वाचताक्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झर्रकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिटसुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डबा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. सातवीपर्यंत मी शाळेत डबा नेत असे. आठवी-नववीत मात्र डबा बंद केला. शाळेच्या कँटीनमधला वडापाव आम्हां सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय.

तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनीसुद्धा हसतहसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता! या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दांत लिहिला आहे. पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दांत उभी राहते. म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे.

7. अभिव्यक्ती

प्रश्न (अ)
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवालेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

प्रश्न (आ)
पाठात आलेल्या ‘दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

भाषाभ्यास:

रसविचार

मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव समतेवर अवलंबून असते. ही अनुभवक्षमता शालेय वयापासून वृदपिंगत व्हावी, या दृष्टीने ‘रसास्वाद’ ही संकल्पना आपण समजून घेऊया. मानवाच्या अंत:करणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना ‘स्थाविभाव’ असे म्हणतात. उदा., राग, दुःख, आनंद इ. कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यांतून रसनिपती होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 4
साहित्यामध्ये गय-पदय घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गदा-पदय घटकांतून चपखलपणे व्यक्त होणारा आशय, दोन ओळींमधील गर्भितार्थ, रूपकात्मक भाषा, पदय घटकांतील अलंकार, सूचकता, प्रसाद, मापुर्व हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात शाली, की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषासमूदधीसाठी ‘रसास्वाद’ या घटकाकडे आवर्जून लश देऊया.

मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. मनातल्या दुःखाचा निचरा, विरेचन होऊन (कथार्सिसच्या सिद्धांतानुसार) कारण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो. आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दाखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदात्तीकरण होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा या पलिकडे जाऊन व्यक्तींच्या व समाजाच्या भावनांचा आदर कण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्तीव्यक्तींमधील भावसंबंधाचे दृढीकरण होते.

कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाफूती दिलगे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टणे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाष, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे याविषयी दोन ओळींमधील दडलेला मथितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णाशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठयपुस्तकातील प्रत्येक पात्र, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 7 दुपार Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 6

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा:
1. सूर्याची धमकी – [ ]
2. सूर्याचे प्रखर तेज – [ ]
उत्तर:
1. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस, तर डोळे जाकून टाकीन.
2. सर्व पृथ्वीला टिपवून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी – [ ]
उत्तर:
1. शेतकऱ्याची पत्नी

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य ही सूर्याची वेगवेगळी रूपे आहेत. या वेगवेगळ्या रूपांमुळेच सकाळ व दुपार या कालावधींना वेगवेगळी नावे मिळाली आहेत. सकाळ प्रसन्न असते. तिच्यात उल्हास ठासून भरलेला असतो; तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते. डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमतही होणार नाही. अशी ही तप्त, रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते. सकाळपासून केलेल्या कष्टाचा शीण घालवण्यासाठी तो वडा-पिंपळाच्या झाडाखाली विसावतो. पत्नीने आणलेला भाकरतुकडा तो समाधानाने खातो. त्याची पत्नी त्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहते. या दृश्याने दुपारला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकामी जागा भरा:
कष्टकऱ्यांच्या दुपारचे वर्णन: ………………………………………
उत्तर:
खेडोपाडी गावे सुस्तावतात. घरकाम सांभाळणाऱ्या स्त्रिया घरकामे आटपून घटकाभरासाठी डोळे मिटून विसावतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
पक्ष्यांची विश्रांती:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: …………………………………….
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: ……………………..
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: ……………………………………..
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: ………………………………………..

उत्तर:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: किलबिलाट थांबवून सावलीत छानशी डुलकी घेत विश्रांती घेतात.
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेतात.
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: कुठे कुठे विश्रांती घेण्याच्या प्रयत्नात असतात.
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: गुटगू थांबवून कुठे तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 8

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 10

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा:
…………………….. हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.
उत्तर:
पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी सर्वांना काही क्षण विश्रांती मिळावी, हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा.
उत्तर:
आमच्याकडे दुपार तशी शांत शांतच असते. मी शाळेतून येतो. बाबा शेतावरून येतात. हातपाय धुवून जेवायला बसतात. आम्ही सगळेच जण एकत्र जेवायला बसतो. जेवल्यानंतर बऱ्याच वेळा बाबा शेतीतल्या कामांसंबंधी बोलतात. बोलता बोलता आईबाबा काही निर्णय घेतात. आई स्वयंपाकघराची आवराआवर करते. आम्हीपण कधी कधी तिला मदत करतो. बाबा अंगणातल्या बाकड्यावर पहडतात. क्षणातच झोपी जातात. आई चटई पसरून पहुडते. आमचा कुत्रा बाबांच्या बाकड्याखाली मुटकुळे करून पहुडतो. तो झोपण्यासाठी डोळे मिटतो खरा, पण प्रत्यक्षात जागाच असतो.

मधून केव्हातरी चटकन कान टवकारून पाहतो आणि पुन्हा शांत होतो. आवारातल्या आम्हा मुलांची मात्र त्या वेळी मजा होते. सगळे विश्रांती घेत असतात, म्हणून टीव्ही बंद ठेवावा लागतो. आम्ही मित्रमंडळी घराच्या मागच्या बाजूला पडवीत जमतो. कधी पत्त्यांचा खेळ, कधी गोट्यांचा खेळ रंगतो. हे सर्व अर्थातच शांतपणे. पण केव्हातरी आवाज वाढतो. मग मोठी माणसे कुठून तरी ओरडून दम देतात. मग सगळे शांत. केव्हातरी मी नववीत असल्याची आठवण कोणीतरी करून देतोच. मग थोडा वेळ पुस्तक घेऊन बसावे लागते. अशी ही मजेची दुपार असते.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन.
2. सायकलरिक्षावाल्याची दुपार.
3. कारखान्यातील कामगारांची दुपार.
उत्तर:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन: हातगाडीवाला म्हणजे हातगाडीवरून लोकांचे सामान वाहून नेणारा हमाल. यात अमाप कष्ट असतात. दुपारपर्यंत बऱ्यापैकी कमाई झाली. उरलेल्या अवधीत चांगली कमाई होईल का, अशी चिंता करीत तो विश्रांती घेण्याच्या बेतात असतो. तेवढ्यात त्याला वर्दी मिळते. विश्रांतीची गरज असतानाही तो आळस झटकून गाडी ओढायला सिद्ध होतो.

2. सायकलरिक्षावाल्याची दुपार: सायकलरिक्षा तळपत्या उन्हात चालवून चालवून रिक्षावाला एखादी डुलकी घेण्याच्या विचारात असतो. पण तेवढ्यात त्याला लांबची वर्दी मिळते. म्हणजे जास्त पैसे मिळणार. म्हणून दमलेल्या शरीराची पर्वा न करता तो सायकलरिक्षा दामटतो. या रिक्षावाल्याची दुपार ही अशी असते.

3. कारखान्यातील कामगारांची दुपार: कारखान्यात पहिल्या पाळीचे कामगार कामावर हजर होण्यासाठी पहाटेच उठतात. दिवसभर यंत्राशी झगडत काम करतात. त्यामुळे दुपारी विश्रांतीची गरज असते. कामावरून सुटल्यावर डोळ्यांवरील झापड दूर सारत सारत धडपडत घरी पोहोचतात. त्याच वेळी त्यांचे दुसरे सहकारी विश्रांती हवी असताना कामावर हजर होण्यासाठी येतात. हे सुद्धा पोटासाठीच धावतपळत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
उत्तर:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [कष्टकरी]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते.
2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते.
3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते.
उत्तर:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते : हातगाडीवाला हा काबाडकष्ट करणारा असतो. त्याच्या कामाला काळवेळेची मर्यादा नसते. किती वजन ओढायचे यालाही मर्यादा नसते. पैसे बहुधा त्या मानाने कमीच मिळतात. त्यामुळे दुपारची विश्रांती पुरेशी झालेली नसतानाही तो कष्ट करायला सिद्ध होतो. जीवन चालू ठेवायला सिद्ध होतो. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते: सायकलरिक्षा जिथे आजही चालू आहे, तो परिसर प्रचंड उकाड्याचा आहे. तळपत्या उन्हात सायकलरिक्षा चालवणे हे कोणालाही थकवणारे असते. त्याला दुपारी विश्रांतीची नितांत गरज असते. तरीही वर्दी मिळताच पोटाची खळगी भरण्याकरिता तो भर दुपारी सायकल मारत निघतो. त्याची ही जीवनावरची निष्ठाच असते. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते: कारखान्यातील काम तीन पाळ्यांमध्ये चालते. सकाळीच कामावर हजर झालेला कामगार दुपारी घराकडे निघतो. त्याच्या डोळ्यांवर झोपेची झापड असते. विश्रांतीसाठी तो अधीर झालेला असतो. त्याच्यानंतर दुसरे कामगार येतात. त्यांनाही खरे तर दुपारची विश्रांती हवी असते. पण सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून दुपारला त्यांचे कौतुक वाटते.

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले कष्टकऱ्यांचे मोठेपण सांगा.
उत्तर:
हातगाडीवाले व सायकलरिक्षावाले हे कष्टकरी आहेत. किती ओझे वाहून न्यावे लागेल, किती अंतर जावे लागेल व त्यासाठी किती कष्ट पडतील, हे त्यांना ठाऊक नसते. पैसे बहुतेक वेळा कमीच मिळतात. तरी ते विश्रांतीची पर्वा करीत नाहीत. पोटाची खळगी भरण्याकरिता धावत असतात. एक प्रकारे ते जीवनचक्र चालू ठेवण्यासाठीच धडपडत असतात.

हेच कारखान्यातील कामगारांबाबतही घडते. त्यांचेही काम कष्टाचेच असते. मात्र या कामगारांच्या वेळा ठरलेल्या असतात. तरीही वेळा पाळण्यासाठी स्वत:च्या आरामाचा, स्वास्थ्याचा त्याग करतात. ही त्यांची स्वत:च्या कामावरची निष्ठा असते. कष्टकऱ्यांच्या त कामगारांच्या निष्ठेमुळेच हे जीवनाचे चक्र चालू असते. माझ्या मते, समाजाने त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

मुलांची कृतीदिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड
2. पटापट डबा खातात व हात धुतात.

उत्तर:

मुलांची कृतीदिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरडउल्हास
2. पटापट डबा खातात व हात धुतात.खेळाची ओढ

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. ……………………………………………………………………..
2. ……………………………………………………………………..
3. ……………………………………………………………………..

उत्तर:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. आरडाओरड करीत वर्गातून धूम ठोकतात.
2. पटापट डबा खाऊन हात धुतात.
3. राहिलेल्या थोड्या वेळात खेळ व मस्ती करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. समोर काम येऊ नये, असे वाटते ती वेळ:
उत्तर:
1. दुपार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
का ते लिहा:

  1. शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशोबतपासनिसांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते.
  2. समोर नवीन काम येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.
  3. जिवाभावाच्या गप्पा मारतात.
  4. एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात.

उत्तर:

  1. भूक लागलेली असते व डबा खायचा असतो म्हणून.
  2. निवांतपणे जेवता यावे म्हणून.
  3. ताजेतवाने होण्यासाठी.
  4. एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून आणि विविध चवींचा आस्वाद मिळावा म्हणून.

उतारा क्र. 4

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 12

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 14

प्रश्न 2.
गाळलेल्या जागा भरा:
वृद्ध माणसांचे चिंतन:
1. ………………………..
2. ……………………….
उत्तर:
1. आतापर्यंतच्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, याचा विचार करतात.
2. स्वत:च्या भविष्याची चिंता करीत बसतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हाला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
उत्तर:
निसर्गात ऋतूंचे चक्र असते, पाण्याचे चक्र असते. प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड वायू यांची चक्रे असतात. तसेच मानवी जीवनाचेही चक्र दिसून येते. बालपण व विदयार्थिदशा ही पहिली अवस्था आहे. तारुण्याची दुसरी अवस्था आणि वृद्धत्वाची तिसरी अवस्था असते. या अवस्था एकेका पिढीनुसार बदलत राहतात. आता बाल्यावस्थेत असलेली मुले पुढच्या पिढीत तरुण बनतात. त्याच व्यक्ती नंतरच्या पिढीत वृद्ध होतात. यांतील मधली पिढी ही तारुण्याची होय. या पिढीतील माणसे कर्ती-धर्ती असतात.

त्यांच्या कर्तबगारीवरच कुटुंबाचा व समाजाचाही गाडा चालू असतो. या टप्प्यात माणसे कामात गुंतलेली असतात, अपार कष्ट करतात. म्हणून संसाराचे रूप बदलते. दुपार हीसुद्धा दिवसाची मधली म्हणजे तारुण्यावस्था असते. म्हणूनच समाजाच्या विकासाची, पालनपोषणाची सर्व कार्ये या अवधीतच चालू असतात. दुपार ही तारुण्याचे प्रतीकच आहे.

उतारा क्र. 6

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. तेजाने न्हाऊन निघणारी – [ ]
2. दुपारच्या रौद्र रूपाने अचंबित होणारी – [ ]
उत्तर:
1. बर्फाच्छादित गिरिशिखरे
2. बर्फाच्छादित गिरिशिखरे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
उत्तर लिहा:
अचंबित करणारे दुपारचे कार्य – ………………………..
उत्तर:
समुद्राच्या पाण्याची वाफ करणे आणि डोंगरावरच्या बर्फाचे पाणी करणे, हे दुपारचे अचंबित करणारे कार्य आहे.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पाण्याचे चक्र काढा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 15

प्रश्न 2.
दुपारचे मोठेपण सांगणारे उताऱ्यातील शब्द लिहा.
उत्तर:
दुपारचे मोठेपण सांगणारे लेखकांचे शब्द : कर्तृत्ववान, कामाची प्रेरणा देणारी, सृष्टीला कार्यरत करणारी, कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी, हितकर्ती, रक्षणकर्ती, हवेतले कीटक व जंतू यांचा नाश करणारी, उदास नसून उल्हास आहे. अचेतन नसून सचेतन आहे. दीर्घकर्तृत्ववाहिनी, कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
लेखकांनी दुपारला उद्देशून केलेल्या दुपारच्या स्तुतीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
लेखकांनी दुपारला उद्देशून लिहिलेला मजकूर म्हणजे दुपारचे स्तोत्रच आहे. ते अत्यंत योग्य आहे. एरवी लोकांच्या मनात दुपार म्हणजे कंटाळवाणा, त्रासदायक, नकोसा काळ असतो. पण लेखकांनी दुपारचे खरे रूपच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे दुपारबद्दलचे आपले मत बदलण्यास मदत होते. दुपारचा लखलखीत सूर्य म्हणजे दुपारचे तेज होय. या काळात माणसाच्या हिताची सर्व कार्ये चालू असतात. कंटाळा आला, थकवा आला, तरी लोक ही कार्ये चालू ठेवतात.

त्यामुळे मानवी समाजाची भरभराट होते. म्हणूनच लेखकांनी दुपारला मानवाची हितकर्ती, दीर्घ कर्तृत्ववाहिनी, कार्यप्रवण करणारी, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळातच कर्तबगारीला बहर येतो. म्हणून दुपार ही अचेतन नसून चेतना आहे, हे लेखकांचे विधान यथोचित आहे. एकंदरीत लेखकांनी दुपारला उद्देशून म्हटलेले सर्व काही मला पूर्णपणे पटते.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा:

2. समास:

प्रश्न 1.
सामासिक शब्दांवरून समास ओळखा:

  1. चौकोन →
  2. भारतमाता →
  3. बापलेक →
  4. धावपळ →
  5. खरेखोटे

उत्तर:

  1. विगू समास
  2. कर्मधारय समास
  3. इसमेतर वंद्व समास
  4. समाहार वंद्व समास
  5. वैकल्पिक वंदन समास.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘आळू’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. दयाळू
  2. ममतालू
  3. कृपाळू
  4. मायाळू.

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. कृतकृत्य होगे
2. ताव मारणे
3. धूम ठोकणे.
उत्तर:
1. कृतकृत्य होगे – अर्थ : धन्य होगे.
वाक्य: वंदा पास छान पडल्यामुळे शेतकरी कृतकृत्य झाले.
2. ताव मारणे – अर्थ : भरपूर जेबगे.
वाक्य: लानातील जेवणात जिलेबीवर बापूने ताव मारला.
3. धूम ठोकणे – अर्थ : पळून जाणे.
वाक्य: बापाची चाहूल लागताच हरणांनी धूम ठोकली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा:

  1. धरती
  2. पाणी
  3. समुद्र
  4. पक्षी.

उत्तर:

  1. धरती = (1) धरणी (2) भूमी
  2. पाणी = (1) जल (2) नीर
  3. समुद्र = (1) सागर (2) रत्नाकर
  4. पक्षी = (1) खग (2) विहग.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आनंद
  2. दिवस
  3. काळोख
  4. पुष्कळ.

उत्तर:

  1. आनंद × दुःख
  2. दिवस × रात्र
  3. काळोख × उजेड
  4. पुष्कळ × कमी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 3.
वचन बदला:

  1. चिमणी
  2. सागर
  3. पक्षी
  4. खेडी.

उत्तर:

  1. चिमणी – चिमण्या
  2. सागर – सागर
  3. पक्षी – पक्षी
  4. खेडी – खेडे.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. आशिर्वाद, आर्शीवाद, आर्शिवाद, आशीर्वाद.
  2. अवाढव्य, अवढव्य, अवाडव्य, अव्हाढव्य.
  3. विवचंना, वीवंचना, विवंचना, विहिवंचना.
  4. गिरीशिखरे, गिरिशिखरे, गीरिशीखरे, गीरीशीखरे.
  5. भूमीका, भूमिका, भुमिका, भुमीका.
  6. प्रतीनीधी, प्रतिनीधी, प्रतिनिधि, प्रतिनिधी.

उत्तर:

  1. आशीर्वाद
  2. अवाढव्य
  3. विवंचना
  4. गिरिशिखरे
  5. भूमिका
  6. प्रतिनिधी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशू पक्षी झाडे वेली
2. दुपार म्हणते उठा आराम बास
उत्तर:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली.
2. दुपार म्हणते, ‘उठा-आराम बास.’

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Calligraphy
  2. Secretary
  3. Action
  4. Comedy

उत्तर:

  1. सुलेखन
  2. सचिव
  3. कार्यवाही
  4. सुखात्मिका.

दुपार Summary in Marathi

पाठाचा परिचय:

राजीव बर्वे हे प्रसिद्ध लेखक आहेत. तसेच, त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांचाही त्यांना चांगलाच परिचय आहे. लोकांना साधारणपणे सकाळचा व संध्याकाळचा अवधी खूप आवडतो. त्यांची वर्णनेही खूप केली जातात. सकाळ-संध्याकाळवर कविताही लिहिल्या जातात. कथा-कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये सकाळ-संध्याकाळची वर्णने, प्रसंग खूप येतात. मात्र दुपारबद्दल अशी वर्णने जवळजवळ नसतात.

दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते. प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे. जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्मी दुपारमध्येच दिसते. जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य दुपार पार पाडते. दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात. म्हणून या पाठात दुपारचे लोभस वर्णन आले आहे. शहरात, गावात, जंगलात दुपार कशी वेगवेगळ्या | रूपांत अवतरते, त्यांचे सुंदर वर्णन या पाठात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

शब्दार्थ:

  1. उल्हास – आनंदाने भरलेला उत्साह.
  2. मध्यान्ह – दुपारची वेळ, दिवसाचा मध्य.
  3. रौद्र – प्रचंड क्रोध, संताप यांनी भरलेले अत्यंत भयंकर व भीतिदायक असे रूप.
  4. शिणवटा – थकवा.
  5. घरची लक्ष्मी – पत्नी.
  6. कृतकृत्य – धन्य.
  7. रपेट – फेरफटका.
  8. सांदीत – खाचेत, दोन बाजूंमधील अत्यंत चिंचोळ्या जागेत.
  9. सैलावलेली – सुस्तावलेली.
  10. घासाघीस – जास्तीत जास्त नफा मिळवू पाहणारा विक्रेता व कमीत कमी किमतीत वस्तू मिळवू पाहणारा ग्राहक यांच्यात
  11. किमतीवरून होणारी खेचाखेच.
  12. कार्यरत – कामात मग्न, कामात गुंतलेला.
  13. अव्याहत – सतत, न थांबता.
  14. अथांग – ज्याचा थांग (पत्ता) लागत नाही असा.
  15. मैलोगणती – कित्येक मैल.
  16. काहिलीने – प्रचंड उष्ण्याने.
  17. अचंबित – आश्चर्यचकित.

टीप:

मध्यान्ह:

मध्य+अन्ह, अहन् म्हणजे दिवस, ‘अन्ह:’ हे अहन्चे षष्ठीचे रूप, म्हणून अन्हः=दिवसाचा. ‘अन्हः’ हा शब्द मराठीत येताना त्यातील विसर्ग लोप पावला आहे. यावरून मध्यान्ह दिवसाचा मध्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. घाम गाळणे – खूप कष्ट करणे.
  2. कृतकृत्य होणे – धन्य होणे, धन्य धन्य वाटणे.
  3. चार पैसे गाठीला बांधणे – पैशांची बचत करणे.
  4. बेगमी करणे – भविष्यासाठी तरतूद करणे.
  5. भ्रांत असणे – विवंचना असणे.
  6. ताव मारणे – भरपूर खाणे, पोटभर खाणे.
  7. धूम ठोकणे – पळून जाणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Textbook Questions and Answers

1. समर्पक उदाहरण लिहा:

प्रश्न (अ)
विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम.
उत्तर:
विश्वेश्वरय्या यांनी स्वत:चे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले.

प्रश्न (आ)
समर्पक उदाहरण लिहा: माणुसकीचे दर्शन.
उत्तर:
1907 साली विश्वेश्वरय्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्कालीन मुंबई सरकारने सेवेचा गौरव म्हणून त्यांना पेन्शन दिली. त्या पेन्शनमधे स्वत:च्या गरजेपुरते पैसे ठेवून त्यांनी उरलेली रक्कम गरीब विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शिक्षणसंस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी, म्हणून त्यांनी ही देणगी दिली, ही त्यांची, त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

2. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा:

प्रश्न 1.
खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा:

  1. आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली. [ ]
  2. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे. [ ]
  3. शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले. [ ]
  4. अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले. [ ]
  5. वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते. [ ]
  6. सारी पेन्शन गरीब विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. [ ]

उत्तर:

  1. अचूक ज्ञान
  2. सुखासीनता, विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती.
  3. कष्टाळूपणा, जिद्द
  4. बुद्धिमान
  5. कार्यतत्परता
  6. सहानुभूती

3. माहिती लिहा

प्रश्न 1.
माहिती लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

4. खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा:

प्रश्न 1.
खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा:
(अ) आव्हान – आवाहन
(आ) कृतज्ञ – कृतघ्न
(इ) आभार – अभिनंदन
(ई) विनंती – तक्रार.
उत्तर:
(अ) आव्हान – प्रतिस्पर्ध्याला लढाईला किंवा वादाला बोलावणे.
आवाहन – एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
वाक्ये:
आव्हान – भैरू पहिलवानाने कुस्तीसाठी केरू पहिलवानाला आव्हान दिले.
आवाहन – पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले.

(आ) कृतज्ञ – उपकाराची जाणीव असणारा.
कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा.
वाक्ये:
कृतज्ञ – सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे.
कृतघ्न – आपल्याला मदत करणाऱ्यांशी आपण कृतघ्न होऊ नये.

(इ) आभार – धन्यवाद (देणे).
अभिनंदन – शाबासकी (देणे), कौतुक (करणे).
वाक्ये:
आभार – स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्यांनी आभार मानले.
अभिनंदन – पोहण्याच्या स्पर्धेत मिताली प्रथम आली; म्हणून मॅडमनी तिचे अभिनंदन केले.

(ई) विनंती – विनवणी (करणे).
तक्रार – गा-हाणे (मांडणे).
वाक्ये: विनंती – कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना स्थानापन्न होण्याची विनंती केली.
तक्रार – सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

5. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा:

प्रश्न 1.
खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा:
He is an engineer of integrity, character and broad outlook.
उत्तर:
ते (विश्वेश्वरय्या) निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

6. स्वमत.

प्रश्न (अ)
विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
उत्तर:
सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल.

सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे. त्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते. त्याची अजिबात पर्वा करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये. मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते. संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे. अनेक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते. वासना-विकारांनी प्रभावित होते. अशा वेळी संयमाची नितांत गरज असते. अशा रितीने जगत असताना आपल्या निष्ठा ठाम हव्यात. आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीच होणार, अशी खात्री बाळगली पाहिजे. हा आशावाद आपल्याला तारून नेतो. विश्वेश्वरय्यांच्या पंचसूत्रीचा हा बोध ध्यानी बाळगल्यास आपले जीवन सुखी, संपन्न होईल.

प्रश्न (आ)
‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत पाणी आले,’ या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
सक्कर या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाने उचलून ते जलाशयात साठवले जाऊ लागले. तिथून पाईपांनी सक्करवासीयांना पाणी पुरवले जाऊ लागले. पण घरात पोहोचलेले पाणी वाळूमिश्रित, गढूळ व घाणेरडे होते. जलाशयात जमा होणारे पाणी संपूर्णपणे गाळून शुद्ध करणे आवश्यक होते. मात्र, त्या प्रक्रियेला येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला झेपणारा नव्हता. म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते.

तेवढ्यात विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा तळ यांना जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रितीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले. विहिरीतले हे पाणी लोकांना मिळू लागले. हे अमृतासारखे स्वच्छ, शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्यांमुळे शक्य झाली, ही कृतज्ञताही त्या अश्रूमध्ये होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न (इ)
विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
विश्वेश्वरय्या हे जगद्विख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आकषून घेतो. समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असत. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग भिन्न होता, योजलेले उपाय भिन्न होते. प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नावीन्यपूर्ण होते. त्यात त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसते. सगळी बुद्धी पणाला लावून ते काम करीत. या त्यांच्या गुणामुळेच त्यांच्याकडून अलौकिक कार्ये पार पडली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे, मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील. जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल.

प्रश्न (ई)
‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका,’ या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
उत्तर:
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘निष्ठावान अभियंता’ हे उद्गार विश्वेश्वरय्यांना उद्देशून काढले, ते अक्षरशः सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती. कार्यावर निष्ठा होती. म्हणूनच ते म्हणतात, ‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका.’ याचा अर्थ स्वत:च्या कार्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आराम करण्याची, कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती. आपण आपले जे कार्यक्षेत्र निवडले आहे, त्यात झोकून दिले पाहिजे. आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. मग उत्तुंग यश मिळणारच. सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही. बुद्धी गंजली की माणूस संपलाच. बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे, हेच विश्वेश्वरय्यांना सांगायचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

भाषाभ्यास:

रस म्हणजे चव किंवा रुची. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे सहा प्रकारचे रस अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. त्यातील भावनांमुळे साधारणपणे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात.

करुणशोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना.
शृंगारस्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन.
वीररसपराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती.
हास्यविसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा-मस्करी.
रौद्रक्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप.
भयानकभयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या.
बीभत्सकिळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना.
अद्भुतअद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना.
शांतभक्तिभाव व शात स्वरूपातील निसर्गाचे वर्णन.

रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे. ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात. याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो. तसेच कधी कधी या नऊ रसांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात. कवितेतील रस हा विशिष्ट शब्दांत नसतो. उदाहरणार्थ, कवितेत ‘वीर’ हा शब्द आला म्हणजे त्या कवितेत वीररस असेलच असे नाही. तसेच ‘हुंदका’ शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोठे ते लिहा:

  1. वृंदावन उदयान – [ ]
  2. विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव – [ ]
  3. विश्वेश्वरय्यांचे जन्मगाव – [ ]
  4. विश्वेश्वरय्यांचे अभियांत्रिकी शिक्षण – [ ]

उत्तर:

  1. म्हैसूर
  2. मोक्षगुडम
  3. मदनहळ्ली
  4. पुणे

प्रश्न 2.
विश्वेश्वरय्यांची पंचसूत्री लिहा.
उत्तर:

  1. सुनियंत्रित आचरण
  2. कठोर परिश्रम
  3. प्रसन्नता
  4. संयम व
  5. प्रचंड आशावाद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न 3.
कारण लिहा:
विश्वेश्वरय्यांचे बालपण व विदयार्थिजीवन कष्टांत गेले.
उत्तर:
विश्वेश्वरय्यांचे बालपण व विदयार्थिजीवन कष्टांत गेले, कारण शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचे वडील वारले.

प्रश्न 4.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 4

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतून विश्वेश्वरय्यांचा प्रकट होणारा गुण:
1. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. [ ]
उत्तर:
1. कल्पकता

प्रश्न 2.
माहिती लिहा:
सहायक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्यांची कामगिरी –
1. …………………………………..
2. …………………………………..
उत्तर:
1. सहायक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्यांची कामगिरी –
2. खानदेशातील एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले.
3. सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी यशस्वी रितीने पार पाडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या.
2. सक्करच्या समस्येवर विश्वेश्वरय्यांनी केलेली उपाययोजना.
उत्तर:
1. सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्यावरील डोंगरावर एक जलाशय बांधला. नदीचे पाणी पंपाने उचलून जलाशयात साठवले जाई. तेथून ते सर्व नागरिकांना पुरवले जाई, मात्र, जलाशयात जमा होणारे पाणी वाळूमिश्रित व गढूळ होते. ते तसेच पुरवले जाई. पाणी गाळून स्वच्छ करण्याच्या योजनेकरिता नगरपालिकेकडे पैसा नव्हता. नागरिक जबरदस्त हैराण झाले होते.
2. विश्वेश्वरय्यांनी नदीच्या पात्रातच काठाजवळ एक गोल विहीर खोदली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनेच स्वच्छ व शुद्ध पाणी विहिरीत साठू लागले. असे स्वच्छ पाणी मिळालेले पाहून सक्करच्या नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:

  1. तार
  2. दौरा
  3. मुसा नदीवरील बंधारा.

उत्तर:

  1. तार: पूर्वीच्या काळी (जेव्हा फोनसुविधा नव्हती त्या काळी) दूरवर असलेल्या व्यक्तीला तारायंत्राच्या साहाय्याने पाठवला जाणारा तातडीचा संदेश.
  2. दौरा: विशिष्ट हेतूने किंवा कामासाठी नियोजनपूर्वक केलेला प्रवास.
  3. मुसा नदीवरील बंधारा: हैदराबादच्या मुसा नदीला एकदा महापूर आला होता. सारे शहरच पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

अशा संकटकाळात विश्वेश्वरय्या धावून आले. मुसा नदीचे खवळलेले पाणी कायमचे आटोक्यात राहील आणि हैदराबाद शहराला कधीही धोका निर्माण होणार नाही, असा पक्का बंदोबस्त विश्वेश्वरय्यांनी त्या काळात केला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

प्रसंगलोकभावना
1. हैदराबादच्या निजामाची तार : ‘तातडीने या’
2. विश्वेश्वरय्यांची विविध संस्थांच्या अध्यक्षपदांवर नेमणूक

उत्तर:

प्रसंगलोकभावना
1. हैदराबादच्या निजामाची तार : ‘तातडीने या’1 संकटात विश्वेश्वरय्यांचा आधार वाटतो.
2. विश्वेश्वरय्यांची विविध संस्थांच्या अध्यक्षपदांवर नेमणूक2. विश्वेश्वरय्यांच्या मोठ्या कर्तबगारीवर विश्वास

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 6

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
विश्वेश्वरय्यांनी बांधलेल्या कावेरी नदीवरील ‘कृष्णसागर’ या धरणाचा अजस्रपणा स्पष्ट करा.
उत्तर:
म्हैसूर संस्थानच्या महाराजांनी विश्वविश्वेश्वरय्यांचे गुण विश्वरय्यांना आपल्या संस्थानात मुख्य अभियंता या पदावर नेमले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘कृष्णसागर’ हे अजस्र धरण बांधले. या अजस्र धरणामुळे जगभर त्यांचे कौतुक झाले.

हे धरण होतेच मुळी तसे. 8600 फूट लांब, 101 फूट रुंद व 104 फूट उंच! धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा मोटर रस्ता. धरणातील पाणी सोडण्यासाठी तब्बल 179 दरवाजे होते! आपोआप उघडझाप करणारे. धरणाच्या बाजूला 60 मैल लांबीचा कालवा काढलेला आहे. तो कालवा ‘विश्वेश्वरय्या कालवा’ या नावाने गौरवला जातो. या कालव्यासाठी 3960 फूट लांबीचा बोगदा तयार केलेला आहे. या धरणातून ठरावीक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडतात आणि त्याआधारे एक वीजनिर्मिती केंद्र चालवले जाते. या विजेच्या बळावर म्हैसूरचा राजवाडा व वृंदावन उदयान रोषणाईने झळझळतात. विश्वेश्वरय्यांच्या अभियांत्रिकी करामतीची ही स्मारकेच होत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतून विश्वेश्वरय्यांचा प्रकट होणारा गुण:
1. झिजलात तरी चालेल, पण गंजू नका.
उत्तर:
1. बुद्धीवरील निष्ठा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 8

प्रश्न 2.
माहिती लिहा:
विश्वेश्वरय्यांची उभारलेली स्मारके:
उत्तर:
1. त्यांच्या जन्मगावी एका भव्य उदयानात त्यांचा पुतळा उभारला गेला आहे.
2. त्यांनी स्वतः बांधलेले त्यांचे सुंदर घर ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जाहीर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहांवरून समास ओळखा:

  1. पाप किंवा पुण्य → ………………..
  2. खाणे, पिणे वगैरे → ……………….
  3. महान असे राष्ट्र → ………………..
  4. नवरा आणि बायको → ……………
  5. तीन खंडांचा समूह → …………….

उत्तर:

  1. वैकल्पिक द्वंद्व समास
  2. समाहार वंद्व समास
  3. कर्मधारय समास
  4. इतरेतर द्वंद्व समास
  5. द्विगू समास.

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘अति’ उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. अतिमंद
  2. अत्यानंद (अति + आनंद)
  3. अतिविचारी
  4. अतिहुशार.

3. वाक्प्रचार/म्हणी:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. चकित होणे
2. मार्गदर्शन करणे.
उत्तर:
1. चकित होणे – अर्थ : आश्चर्य वाटणे.
वाक्य : तीन वर्षांच्या बाळूने सुरेख चित्र काढलेले पाहिल्यावर सगळे चकित झाले.
2. मार्गदर्शन करणे – अर्थ : योग्य दिशा दाखवणे.
वाक्य : शालान्त परीक्षेत माझ्या दादाने मला मार्गदर्शन केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न 2.
म्हणी पूर्ण करा:
1. ……………………. काकडीला राजी. (कोल्हा/ लांडगा)
2. …………………… गुळाची चव काय? (गाढवाला/घोड्याला)
उत्तर:
1. कोल्हा काकडीला राजी.
2. गाढवाला गुळाची चव काय?

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 9
उत्तर:

  1. पूर्वज × वंशज
  2. निवृत्ती × प्रवृत्ती
  3. सफल × विफल
  4. उंच × सखोल

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. सूसंस्कृत, सुंसस्कृत, सुसंस्कृत, सुसंक्सृत.
  2. फलश्रूती, फलश्रुती, फळधृति, फलश्रुति.
  3. कुतूहल, कुतुहल, कुतुहल, कूतूहल.
  4. नीयूक्त, नियूक्त, नियुत्क, नियुक्त.
  5. प्रोत्साहन, प्रोत्साहण, प्रोस्ताहण, प्रोत्सहन.
  6. कामगीरी, कामगिरी, कामगिरि, कामगीरि.

उत्तर:

  1. सुसंस्कृत
  2. फलश्रुती
  3. कुतूहल
  4. नियुक्त
  5. प्रोत्साहन
  6. कामगिरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा:
1. विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो.
2. परिस्थिती बेताची होती; पण आई मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती.
उत्तर:
1. एकेरी अवतरणचिन्ह व पूर्णविराम.
2. अर्धविराम, स्वल्पविराम व पूर्णविराम.

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Exhibition
  2. Receptionist
  3. Handbill
  4. Goodwill

उत्तर:

  1. प्रदर्शन
  2. स्वागतिका
  3. हस्तपत्रक
  4. सदिच्छा.

अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Summary in Marathi

प्रस्तावना:

डॉ. यशवंत पाटणे हे प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. माणसाने स्वत:च्या सुखाकडे पाहावे, हे ठीक आहे. पण त्याबरोबरच स्वत:पलीकडे, समाजाकडे पाहिले पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ते माणसाचे कर्तव्य आहे, असा लेखकांचा दृष्टिकोन आहे. म्हणूनच त्यांना विश्वेश्वरय्यांसारखे निष्ठावान कर्मयोगी भावतात. त्यांच्या कार्याने ते स्वतः प्रभावित होतात. प्रस्तुत पाठात लेखकांनी विश्वेश्वरय्यांचे कार्यकर्तृत्व वर्णन केले आहे.

विश्वेश्वरय्यांनी त्यांच्या काळात समोर उभ्या ठाकलेल्या जटिल समस्या सोडवल्या. त्यांचे प्रयत्न म्हणजे केवळ स्वत:ची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी केलेली कृती नव्हती. त्यांच्यासमोर लोकांच्या समस्या सोडवण्याचे आव्हान होते. आपले ज्ञान, आपली कर्तबगारी समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. या पाठात वर्णन केलेली त्यांची कार्ये ही त्यांच्या भूमिकेचाच परिपाक होती. त्यांनी आपले दीर्घायुष्य या त-हेने माणसाच्या कल्याणासाठी वापरले, हेच या पाठातून लेखकांनी दाखवून दिले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

शब्दार्थ:

  1. नियंता – नियंत्रक.
  2. विश्वात्मकता – विश्वाला व्यापून टाकण्याची वृत्ती.
  3. क्लिष्ट – गुंतागुंतीची.
  4. कारकीर्द – केलेल्या कार्याचा काळ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. आव्हान स्वीकारणे – एखादे कार्य पार पाडण्यास सिद्ध होणे.
2. रौद्ररूप धारण करणे – भीतिदायक स्थिती निर्माण होणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 4 नात्यांची घट्ट वीणNotes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 4 नात्यांची घट्ट वीण Textbook Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 1
उत्तर:
(अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 2
(आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

2. ‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.

प्रश्न 1.
‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
उत्तर:
नाते म्हटले की अमूक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. आई-बाबांपासून ते इमारती, डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात. रात्रभर आपला तान्हुला उपाशी रडत राहील, म्हणून जिवाची पर्वा न करता रायगड किल्ल्याच्या बुरुजावरून उड्या घेत घेत बाळाजवळ धाव घेणारी हिरकणी आठवते.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 4
एखादया परीक्षेत/स्पर्धेत मुलाला अपयश आले, तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात. मी काही चांगले केले की, ताई-दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात. नातेवाइकांनाही कौतुक वाटते. कधी कंटाळा आला, तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते. एखादया दिवशी गाठभेट घडली नाही, तर मित्रमैत्रिणी व्याकूळ होतात. .

आपल्या आवडत्या खेळाडू-कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो. आवडते प्राणी, झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळावे असे वाटते. आवडती ठिकाणे, इमारती तर मनात घरच करून टाकतात, अशी ही नाती म्हणजे दुधावरची सायच!

3. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा:

प्रश्न 1.
खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा:
(अ) ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.
(आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.
उत्तर:
(अ) असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.
(आ) मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.

4. वर्गीकरण करा:

प्रश्न 1.
जन्माने प्राप्त नाती व सान्निध्याने प्राप्त नाती.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 5
उत्तर:

जन्माने प्राप्त नातीसान्निध्याने प्राप्त नाती
1. आई1. गुरू
2. वडील2. मित्र
3. बहीण3. मैत्रीण
4. भाऊ4. शेजारी
5. आजी5. हितचिंतक

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

5. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 6
उत्तर:

तारुण्यातील नात्याचा प्रवासवार्धक्यातील नात्याचा प्रवास
तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते.विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते.

6. स्वमत:

प्रश्न (अ)
माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
लहानपणी बाळाला स्वत:चे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आई-बाबा व आजी-आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्ये पार पाडावी लागतात.

त्या काळात मित्र, शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची गरज असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील, तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही.

प्रश्न (आ)
तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे / मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.
उत्तर:
मिथिला ही माझी सर्वांत जास्त आवडती मैत्रीण. ती दिवसातून एकदा जरी भेटली नाही, तरी माझा दिवस सुना सुना जातो. मिथिला आणि मी शिशुवर्गापासून एकत्र आहोत. एकाच वर्गात आहोत. एकाच बाकावर बसतो. मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो. दररोज शाळेत भेटतो. तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पांत रंगून जातो. माझी आई नेहमी मला विचारते, “काय ग, इतका वेळ कशाकशाबद्दल बोलता? विषय संपत नाहीत का?” मग मला खूप हसू येते.

मिथिलेला एखादे गणित सुटले नाही की मीच ते सोडवून देते. मला एखादा निबंध जमला नाही की, मी तिच्याकडे धावते. मिथिलेला चिंच खूप आवडते. मी अधूनमधून आठवणीने तिच्यासाठी चिंच घेऊन जाते. गेल्या वर्षी संपूर्ण फेब्रुवारी महिना ती टायफॉइडने आजारी होती. मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेले सर्व पाठ तिला वाचून दाखवीत असे. तिचा सगळा अभ्यास मी करून घेतला. त्या काळात वर्गातली खडान्खडा माहिती मी तिला सांगत असे. अशी आमची मैत्री कधी कधीही संपू शकत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

भाषा सौंदर्य:

पाठातील वाक्यांत परस्पर विरोधी शब्द वापरून केलेली रचना हे लेखिकेच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ही रचना म्हणजे समृद्ध भाषेचे उत्तम उदाहरण आहे.
उदा.,
1. कधी आई आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते.
2. शेजारधर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि धागा तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो.
3. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी.

अशा उदाहरणांतून तुम्ही तुमचे लेखन कौशल्य वाढवू शकता, भाषा समृद्ध करू शकता. त्यांतून तुमचे भाषिक कौशल्य विकसित होणार आहे. याप्रमाणे इतर वाक्यांचा शोध घ्या. या प्रकारची वाक्ये स्वत: तयार करा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 4 नात्यांची घट्ट वीण Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

1. वर्गीकरण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 8

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
नात्यांची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
आपला जन्म होतो, त्याच क्षणी आपल्याला काही नाती मिळतात. आई-वडील, मुलगा-मुलगी, बहीण-भाऊ, नात-नातू, आजी-आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात. ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. ही नाती आपोआप मिळतात. सुरुवातीच्या काळात तर हीच नाती, म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली, स्वकीय व अगदी जवळची असतात. शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात. हळूहळू विविध प्रसंगांतून किंवा एकमेकांशी होणाऱ्या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे, त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो, हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदुमुलायम बनते. नात्यांना असे विविध रंग असतात, विविध आकार असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकाम्या चौकटी भरा:
1. [ ]
2. [ ]
3. [ ]
उत्तर:
1. [उबदार शाल]
2. [कणखर ढाल]
3. [सुंदर चाल]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 10

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

पाठ्यपुस्तकातील शब्दअर्थ
1. बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं.
2. त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते.

उत्तर:

पाठ्यपुस्तकातील शब्दअर्थ
1. बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं.मूल मोठं होता होता स्वतंत्र बनतं.
2. त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते.मोठ्या कालावधीसाठी ताटातूट होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर:
आईचे मुलावर अपार प्रेम असते. ती त्याला हळुवारपणे आंजारते, गोंजारते. पण प्रसंगी अत्यंत कठोरपणेही वागते. मुलाचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून आईवडील जणू काही वल्हे बनतात. मुलाला मार्ग तयार करून देतात. येथे मुलगा अजून कमकुवत आहे व वडील अत्यंत सक्षम आहेत, असे चित्र दिसते. पण त्याच वेळी त्या दोघांमध्ये संवाद नामक सेतू बांधला जातो, म्हणजे त्यांच्यात मैत्रीचे, बरोबरीचे नाते निर्माण होते. आई-वडील मुलाला अत्यंत मायेने, आत्मीयतेने वाढवतात. पण थोड्याच अवधीत मुलगा पंख पसरून स्वतंत्रपणे उड्डाण करू लागतो. म्हणजे तो हळूहळू दूर जाऊ लागतो आणि तो सातासमुद्रापलीकडे जातो, तेव्हा तर फार मोठ्या काळासाठी ताटातूट होते. मुलाला वाढवताना आईवडील आनंदी असतात. पण काही काळातच तो दूर गेल्यामुळे दुःखी होतात. अशा प्रकारे आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.

प्रश्न 2.
‘असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करून सांगा.
उत्तर:
प्रत्येक आईला आपले बाळ सद्गुणी, कर्तबगार व्हावे, असे वाटत असते. म्हणून ती त्याच्यावर सतत चांगल्या गुणांचा संस्कार करीत राहते. मूर्तिकार, शिल्पकार जशी सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतात, तशी आई बाळाला सुंदर माणूस घडवण्याचा प्रयत्न करते. शिल्पकार ओबडधोबड दगडावर छिन्नीचे घाव घालतो. अशा वेळी त्या दगडाला किती वेदना होत असतील! आपल्याच देहाचे अनेक तुकडे आपल्यापासून विलग होऊन पडतात, हे पाहताना त्याला दुःख होतच असणार; पण तो हे सगळे सहन करतो. आईचे आपल्या बाळावर अतोनात प्रेम असते, पण प्रसंगी ती कठोरपणे शिक्षा देते. शिक्षा देताना तिला दुःख होतेच, तसे त्या बाळालाही दुःख होते. दोघेही ते दु:ख गिळतात, सहन करतात. त्यामुळे त्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार मिळतो. तो सद्गुणी माणूस बनतो. हे सर्व लेखिकांना त्या विधानातून व्यक्त करायचे आहे.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
1. ………………
2. ………………
उत्तर:
1. मैत्री
2. शेजारधर्म.

प्रश्न 2.
पुढील वाक्याचा एका वाक्यात सुबोध अर्थ लिहा:
ते नातं ‘अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं’ होतं.
उत्तर:
हजारो वर्षांपासून माणसामाणसांत चालत आलेल्या मैत्रीच्या नात्याची नवनवीन रूपे निर्माण होतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा :
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 12

प्रश्न 2.
सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा :
शिष्य : गुरुदक्षिणा : : गुरू : [ ]
उत्तर:
शिष्य : गुरुदक्षिणा : : गुरू : कानमंत्र

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा :
कानमंत्र म्हणजे ………………
उत्तर:
कानमंत्र म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुरूने शिष्याच्या कानात सांगितलेला मंत्र.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 2.
‘मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
आई-वडील, बहीण-भाऊ ही नाती जन्मत:च मिळतात. ती स्वीकारावी लागतात. त्यांत निवड करता येत नाही. काही नाती सान्निध्याने निर्माण होतात. ती लादलेली नसतात. मैत्री हे एक असे सान्निध्याने, सहवासाने निर्माण होणारे नाते आहे. मैत्रीचे नाते अत्यंत तरल व सूक्ष्म असते. दोन व्यक्तींमध्ये मैत्रीचे नाते का निर्माण होते, याची कारणे, स्पष्टीकरणे देता येत नाहीत. काही कारणे देता येतात, हे खरे. पण सर्व कारणे किंवा पूर्ण स्पष्टीकरण कधीच देता येत नाही. मित्राशिवाय किंवा मैत्रिणीशिवाय जीवन निरस बनते. मित्राचे असणे जाणवते, पण दाखवता येत नाही. मित्र दिसतो. दाखवता येतो. त्याच्याकडे बोट करता येते. पण मैत्री या भावनेचे स्वरूप सांगता येणे अशक्य असते. ते दिसत नसले, तरी आहे हे मान्य करावे लागते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 14

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

निर्माण होणारी मन:स्थितीआजीचे रूप
(य) आनंदी
(र)वृद्धाश्रमात राहणारी

उत्तर:

निर्माण होणारी मनःस्थितीआजीचे रूप
(य) आनंदीझोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी
(र) दुःखीवृद्धाश्रमात राहणारी

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:

  1. पिकले पान गळणे म्हणजे …………………….
  2. (या पाठात ) उंबरठा ओलांडणे याचा अर्थ …………………
  3. नवी पालवी फुटणे म्हणजे …………………..

उत्तर:

  1. पिकले पान गळणे म्हणजे मृत्यू येणे.
  2. उंबरठा ओलांडणे याचा अर्थ मृत्यू पावणे हा आहे.
  3. नवी पालवी फुटणे म्हणजे नवीन जीव जन्माला येणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

प्रश्न 2.
उताऱ्यात सांगितलेला निसर्गाचा नियम लिहा.
उत्तर:
पिकलेले पान गळून पडल्यावर नवीन पालवी फुटतेच; म्हणजे काही माणसे मरण पावत असली, तरी नवीन जीव जन्माला येतात, हा निसर्गाचा नियम आहे.

प्रश्न 3.
लेखिकांनी अभिप्रेत अभिन्न नाते स्पष्ट करा.
उत्तर:
जन्मापासून सुरू झालेल्या प्रवासात आपले वेगवेगळ्या व्यक्तींशी नाते निर्माण होते. पण वृद्धत्वात गेल्यावर, आपण या संपूर्ण निसर्गचक्राचे भाग आहोत, ही जाणीव होते. आपण वेगळे, सुटे नाही. संपूर्ण निसर्गाला घट्ट चिकटलेलाच भाग आहोत. यालाच लेखिकांनी अभिन्न नाते म्हटले आहे.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो.’ या विधानाचा भावार्थ समजावून सांगा.
उत्तर:
बालपण, तारुण्य, प्रौढपण असे टप्पे पार करीत करीत माणूस वार्धक्याच्या टप्प्यात प्रवेश करतो. या अखेरच्या टप्प्यात आल्यावर आपल्या पूर्वीच्या आयुष्याकडे तो वळून पाहतो, त्या वेळी त्याची दृष्टीच पार बदललेली असते. आधीच्या टप्प्यांमध्ये माणूस अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या भावभावनांमध्ये पूर्ण बुडालेला असतो. त्याचे मान-अपमान तीव्र असतात. अनेकदा स्वत:चे मानअपमान जपता जपता तो इतरांचा अपमान करतो, त्याला वेदना देतो. ते सर्व वार्धक्याच्या टप्प्यात आठवते. आपल्या चुका कळतात, साहजिकच, तो या भावविकारांना बाजूला सारतो. त्याचे मन निर्मळ बनते, सगळ्या माणसांकडे, सगळ्या जगाकडे तो निर्मळपणाने पाहू लागतो. जग आता त्याला नव्या रूपात दिसू लागते. नवा आनंददायी प्रवास सुरू होतो.

भाषाभ्यास:

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा :
उत्तर:

  1. भूमी हीच माता → मातृभूमी
  2. तीन कोनांचा समूह → त्रिकोण
  3. आई आणि वडील → आईवडील
  4. सुख किंवा दुःख → सुखदुःख

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द उपसर्गघटित की प्रत्ययघटित ते ओळखा:

  1. कौटुंबिक-प्रत्ययघटित
  2. जबाबदारी-प्रत्ययघटित
  3. अपमान-उपसर्गघटित
  4. अपूर्ण-उपसर्गघटित.

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. मात करणे
2. पाठीशी उभे राहणे.
उत्तर:
1. मात करणे – अर्थ: विजयी होणे.
वाक्य: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर मात केली.

2. पाठीशी उभे राहणे – अर्थ : आधार होणे.
वाक्य : कोणत्याही कामामध्ये गावचे सरपंच गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात.

आ (भाषिक घटकांवर आधारित कृती):

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांत लपलेले चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. भवसागरात
2. कणखर.
उत्तर:
1. (1) साव (2) साग (3) सात (4) रात.
2. (1) कण (2) कर (3) खण (4) रण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

प्रश्न 2.
वचन बदला:

  1. मंत्र
  2. बहिणी
  3. मुलगी
  4. स्त्रिया.

उत्तर:

  1. मंत्र – मंत्र
  2. बहिणी – बहीण
  3. मुलगी – मुली
  4. स्त्रिया – स्त्री.

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 15
उत्तर:

  1. स्वकीय × परकीय
  2. नाजूक × भक्कम
  3. ठळक × पुसट
  4. तारुण्य × वार्धक्य

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. निर्वीवाद, निर्विवाद, नीवीर्वाद, नीर्विवाद.
  2. हितचीतक, हीतचीतक, हीतचिंतक, हितचिंतक.
  3. मार्गदर्शक, मागदर्शक, मार्गदशक, मार्गद्रशक.
  4. गुरुदक्षिणा, गुरूदक्षिणा, गुरुदक्षिणा, गुरुदक्षीणा.

उत्तर:

  1. निर्विवाद
  2. हितचिंतक
  3. मार्गदर्शक
  4. गुरुदक्षिणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
चिन्हे लिहा:
उत्तर:
1. उद्गारचिन्ह → [!]
2. प्रश्नचिन्ह → [?]

नात्यांची घट्ट वीण Summary in Marathi

प्रस्तावना:

मीरा शिंदे या नव्या पिढीच्या लेखिका असून, अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकांनी माणसामाणसांमधील नात्यांचे वर्णन केले आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो इतर माणसांच्या सोबत व त्यांच्या आधारानेच जगत असतो. साहजिकच, या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नाते होय. या नात्यांमधील काही नाती ही जन्मामुळे प्राप्त होतात, तर काही नाती सहवास वा वातावरण यांमुळे निर्माण होतात. प्रस्तुत लेखात लेखिकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.

शब्दार्थ:

  1. वीण – कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची रचना.
  2. जवळीक – आपुलकी.
  3. भवसागर – (भव आपल्याला दिसणारे, जाणवणारे आपल्या अवतीभवतीचे विश्व) भवरूपी सागर.
  4. उलघाल – उलथापालथ, धांदल, गोंधळ, कालवाकालव, तगमग, तळमळ.
  5. सृजन – निर्मिती.
  6. कानमंत्र – गुप्त सल्ला, गुप्त मंत्र.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. जवळीक साधणे – सलगी प्राप्त करणे, मैत्री मिळवणे.
  2. तारेवरची कसरत करणे –
    1. कोणताही निर्णय घेताना प्रचंड गोंधळ होणे.
    2. घेतलेल्या निर्णयाला धरून राहताना प्रचंड तारांबळ उडणे.
  3. जिवाची उलघाल होणे – मनाची तगमग, तळमळ होणे ; मनात कालवाकालव होणे; जीव घाबराघुबरा होणे.
  4. कानमंत्र देणे –
    1. अत्यंत मोक्याच्या क्षणी कसे वागायचे याबाबत सल्ला देणे.
    2. गुप्त सल्ला देणे.
  5. कात टाकणे – जुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे.
  6. उंबरठा ओलांडणे –
    1. मर्यादा ओलांडणे
    2. मर्यादित कक्षेतून अधिक व्यापक कक्षेत प्रवेश करणे.
    3. (या पाठानुसार अर्थ) मृत्यू पावणे.
  7. पिकलं पान गळणं –
    1. मृत्यू पावणे.
    2. शेवट होणे.
  8. नवी पालवी फुटणे –
    1. नवे स्वरूप मिळणे.
    2. नवा जन्म मिळणे.

टिपा:

1. नाळ: बाळ आईच्या पोटात वाढते. त्या वेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते. ती नलिका आई व बाळ यांना जोडते. या नलिकेला नाळ म्हणतात. या नाळेतून आईकडून बाळाला सर्व जीवनरस मिळतो आणि त्याचे पोषण होते.

2. कानमंत्र : मुलगा साधारणपणे आठ वर्षांचा झाला की, त्याला गुरूकडे शिक्षणासाठी पाठवले जाई. शिक्षणासाठी त्याला गुरूकडेच राहावे लागे. त्याची एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होई. गुरुगृही जाण्यापूर्वी त्या मुलाची मुंज केली जाई. या मुंजीत एक महत्त्वाचा विधी असे. पुढील आयुष्यात उपयोगी पडेल अशी महत्त्वाची गोष्ट वा महत्त्वाचा सल्ला मुलाच्या कानात वडील सांगत असत.

यालाच कानमंत्र असे म्हणतात. हा कानमंत्र मुलाच्या कानातच आणि इतर कोणालाही ऐकू जाणार नाही, अशा रितीने सांगितला जाई. यावरून गुपचूप दिलेल्या सल्ल्याला कानमंत्र म्हटले जाऊ लागले. ‘मननात त्रायते इति मन्त्रः।’ ही मंत्राची व्याख्या आहे. ज्याचे सतत मनन केल्याने आपले रक्षण होते, त्याला ‘मंत्र’ म्हणतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुल (स्थूलवाचन)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Textbook Questions and Answers

1. खालील फरक लिहा:

प्रश्न 1.
खालील फरक लिहा:

व्यंगचित्रहास्यचित्र

उत्तर:

व्यंगचित्रहास्यचित्र
हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो.केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:

  1. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
  2. केवळ हसवणे हा हेतू नसतो.
  3. आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
  4. गमतीदार विचार मांडलेला असतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे.

या चित्रांतून-(1) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते; ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे व (2) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांची रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत.

भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सर्जनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मलाही वाटते.

उपक्रम:

प्रश्न 1.
5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.

प्रश्न 2.
खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा. सांगा:

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर… कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:
1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.

2. योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे; पाण्याचा गैरवापर करणे ; पाणी प्रदूषित करणे; उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली.

3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.

4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:

  1. पाण्याची बचत करणे.
  2. पाण्याचा गैरवापर टाळणे.
  3. पाण्याचा योग्य साठा करणे.
  4. जलप्रदूषण टाळणे.
  5. पाणी वाया न दवडणे.
  6. पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
  7. पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.

5. घोषवाक्ये:

  1. पाण्याचा गैरवापर करू नका
  2. जलप्रदूषण थांबवा
  3. पाणी साठवा, पाणी वाचवा
  4. पाणी वाया दवडू नका
  5. पाणी आहे, तर जीवन आहे पाणी नाही, तर मरण आहे
  6. पाण्याची बचत म्हणजे
  7. जीवनाची बचत
  8. जल-अभियान सुरू करा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

भाषाभ्यास:

1. चेतनगुणोक्ती अलंकार:

1. खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., “नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
…. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।” (कृ. ब. निकुम्ब)

1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या ? [ ] [ ]
2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? [ ] [ ]
3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? [ ] [ ]

चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये –

1. अचेतन वस्तूंना सचेतन मानले जाते.
2. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.

2. अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.

3. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट – [ ]
2. अचेतन गोष्टीने केलेली कृती – [ ]
3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? – [ ]

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लहान मुलांसाठी/मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे दिली आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र यांत फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो.
2. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद , करणे सोपे असते पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे.

काही हास्यचित्रांचे विश्लेषण:

1. शि. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे.

2. पहिल्या चित्रात उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. दुसऱ्या चित्रात एक बालक देवाला ‘बॅडमिंटनचे शटल’ (फूल) वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सदयः परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केले आहे. चित्र व हास्यचित्र यांत मूलभूत फरक – चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार है हुबेहूब नक्कल असते.

3. डेव्हिड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही दोन हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा ‘लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा’ फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव – बिचकणे, घाबरणे, कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शिताफी – हे सर्व पाहून हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा अहे. काहीतरी मिळावे म्हणून एरव्ही लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली ‘सेफ्टी पिन’ टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते.

4. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसवून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव, यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते.

5. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू, ‘नदीचे पाणी कुठे जाते?’ असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे. ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात ‘नदीत चावी पडली, म्हणून विचारतोय.’ या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे.

6. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते – हा विचार किती खुबीने सांगितला आहे!

7. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला देह (शरीर) हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे सिद्ध होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

अशा प्रकारे, लहान मुलांचे चित्र काढताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात:

  1. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते.
  2. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात.
  3. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात.
  4. लहान मुलांना दाढी-मिशी नसते.
  5. व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5 एक होती समई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 5 एक होती समई Textbook Questions and Answers

1. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – [ ]
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – [ ]
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे – [ ]
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे – [ ]
उत्तर:
(अ)अनुताई वाघ
(आ) बाल ग्रामशिक्षण केंद्र
(इ) प्राथमिक शिक्षण
(ई) आदिवासी बालक

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

2. खालील घटनांचे परिणाम लिहा:

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 1
उत्तर:

घटनापरिणाम
(अ) अनुताईंचे निधन.कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले.
(आ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले.डोंगराएवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या.
(इ) ताराबाईंचे निधन.अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या.

3. कार्यक्षेत्र लिहा:

प्रश्न 1.
कार्यक्षेत्र लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 2.1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 3

4. का ते लिहा:

प्रश्न (अ)
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
उत्तर:
शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच, केवळ चाकोरीबद्ध रितीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न (आ)
अनुताईंच्या कार्याचा तुम्हांला जाणवलेला विशेष सांगा.
उत्तर:
आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असा समज घट्ट बसला आहे. खरे तर शिक्षण जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे. समाजात पूरक वातावरण तयार असले पाहिजे.

अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. कुटुंबकल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता व आरोग्य यांबाबत समाजात जागृती हवी. तसेच, लहान मुले, मूकबधिर व महिला या घटकांना सक्षम केले पाहिजे. इतके व्यापक भान अनुताईंना होते. म्हणून त्यांनी शालेय , शिक्षणाबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रांकडे लक्ष दिले आणि तेथेही भरीव । काम केले. अनुताईंच्या कार्याचा हा फार मोठा विशेष आहे.

5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:
1. भातुकलीचा खेळ
2. ज्ञानयज्ञ
3. ज्ञानगंगा.
4. पाऊलखुणा.
उत्तर:
1. भातुकलीचा खेळ: लहान मुलांचा, विशेषतः मुलींचा खेळ. यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात, त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बाहुला-बाहुलीचे लग्नही लावले जाते. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा, आभासमय असा संसार.

2. ज्ञानयज्ञ: विधिपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वत:च्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.

3. ज्ञानगंगा: गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दु:ख, दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे.

4. पाऊलखुणा: या शब्दाचा शब्दश: अर्थ, चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून, कोण चालत गेले, हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे, त्यांच्या ‘पाऊलखुणा’ आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

6. खालील ‌शब्दसमूहांसाठी‌ ‌एक‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌:‌

प्रश्न 1.‌ ‌
खालील ‌शब्दसमूहांसाठी‌ ‌एक‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌:‌
‌(अ) व्रताने‌ ‌स्वत:ला‌ ‌बांधणाऱ्या‌ ‌- [ ]
‌(आ) नेमाने‌ ‌स्वत:ला‌ ‌बांधणारा‌ ‌- [ ]
‌(इ) गावातील‌ ‌रहिवासी‌ ‌- [ ]
(ई) तिहाइताच्या‌ ‌भूमिकेतून‌ ‌बघणारा‌ ‌-‌ ‌[ ]
उत्तर:
(अ) व्रतस्थ‌ ‌
(आ) नेमस्त‌ ‌
(इ) ग्रामस्थ‌ ‌
(ई) भतटस्थ‌ ‌

7. खाली ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌

प्रश्न 1.‌ ‌
खाली ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌
उदा.,‌ 1.‌ ‌सापेक्ष‌ ‌×‌ ‌निरपेक्ष‌, ‌2.‌ ‌अनावृष्टी‌ ‌× ‌अतिवृष्टी.‌

  1. अनाथ‌ ‌
  2. दुश्चिन्ह‌ ‌
  3. सुपीक‌ ‌
  4. एकमत‌ ‌
  5. पुरोगामी‌ ‌
  6. स्वदेशी‌ ‌
  7. विजातीय‌ ‌

उत्तर:

  1. अनाथ × सनाथ
  2. दुश्चिन्ह × सुचिन्ह
  3. सुपीक × नापीक
  4. एकमत × दुमत
  5. पुरोगामी × प्रतिगामी
  6. स्वदेशी × परदेशी
  7. विजातीय × सजातीय

8. स्वमत:

प्रश्न (अ)
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे.

प्रश्न (आ)
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
समई देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा, म्हणून अन्य दिवे वापरतात; समई नव्हे. देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्येच सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्षा बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवीत नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे, ही तिची वृत्तीच जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च, उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

उपक्रम:

प्रश्न 1.‌ ‌
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.

भाषाभ्यास:

उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा आपण अभ्यास केला. आता इतर काही अलंकार पाहूया.

1. दृष्टान्त अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

1. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]

2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
चंदन सर्वांगाने सुगंधित-त्रिकालाबाधित सत्य
सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले आहे.

3. दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये –
1. एखादी गोष्ट पटवून देणे.
2. ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.

4. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 1.
खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात – [ ]
  2. रत्नासारख्या थोर ऐरावताला सहन करावा लागतो – [ ]
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते – [ ]
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात – [ ]
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात – [ ]

उत्तर:

  1. [लहानपण दे]
  2. [अंकुशाचा मार]
  3. [साखरेचा रवा]
  4. [नम्रपणा असावा]
  5. [थोर ऐरावताला अंकुशाचा मार]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 5 एक होती समई Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:

  1. बालपणीच वैधव्य आलेल्या – [ ]
  2. अनुताईंचे अश्रू पुसणाऱ्या – [ ]
  3. प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या – [ ]
  4. ताराबाईंनी स्थापन केलेली संस्था – [ ]

उत्तर:

  1. अनुताई वाघ
  2. ताराबाई मोडक
  3. अनुताई वाघ
  4. बाल ग्रामशिक्षण केंद्र

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:

  1. वादळ झेलतात – ………………………………..
  2. वादळ पचवतात – ………………………………….
  3. ज्ञानयज्ञ तेवत ठेवला – …………………………………..
  4. कोसबाडची टेकडी हळहळली – …………………………..

उत्तर:

  1. मोठ्या संकटांना सामोरे जातात.
  2. संकटांचे निवारण करतात.
  3. ज्ञानप्रसाराचे कार्य दीर्घकाळ चालू ठेवले.
  4. कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासी हळहळले, ते व्यथित झाले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 5

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
हा उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
अनुताई वाघांचा काळ म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळाला धरून अनुताईंचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे इयत्ता आठवीत असण्याच्या वयात झाले. शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर शिकण्याचे व खेळण्याबागडण्याचे हे वय. पण त्यांना हा नैसर्गिक उत्सव सोडून लग्न करावे लागले. पण लग्न, संसार म्हणजे काय, हे कळण्याच्या आतच, म्हणजे सहा महिन्यांतच, त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या विधवा झाल्या. त्या काळात विधवांचे जीवन खूप कष्टाचे, हलाखीचे व अपमानाचे होते. पण त्या वयातही त्या मनाने खंबीर राहिल्या. स्वत:ला खचू दिले नाही.

संकटांना तोंड देण्यासाठी स्वतः शक्तिमान असणे आवश्यक असते, हे त्यांनी ओळखले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक बलशाली करण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी संपादन केली. त्या स्वत:चे दुःख कुरवाळत बसल्या नाहीत किंवा संकटांना शरणही गेल्या नाहीत. दुःखाला सामोरे जाण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. त्या ताराबाई मोडकांच्या कार्यात सामील झाल्या. त्यांनी आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे ठरवले. त्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले. यावरून त्यांच्या मनातील उच्च, उदात्त मूल्यांचे दर्शन घडते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 7

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
1. कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली – [ ]
2. प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या – [ ]
उत्तर:
1. आदिवासी बालके
2. अनुताई वाघ

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 8
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 9

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा:

आदिवासींची स्थितीअनुताईंचे कर्तृत्व

उत्तर:

आदिवासींची स्थितीअनुताईंचे कर्तृत्व
पराकोटीचे दारिद्र्यमायेची ऊब दिली व ज्ञानाची ज्योत पेटवली

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 10
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 11

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेले उपाय लिहा.
उत्तर:
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना प्रथम गरज असते ती मायेची. मायेच्या आधाराने त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केली __ पाहिजे. अशा स्थितीत नेहमीचे चाकोरीबद्ध शिक्षक उपयोगाचे नाहीत. त्यांना शिकवण्याबरोबर मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच, सतत नवनवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांकडे दूरदृष्टी असली पाहिजे. प्रथम प्राथमिक शिक्षण भक्कम केले पाहिजे. या शिक्षकांनी प्रसिद्धीपासून दूर राहिले पाहिजे. या सर्व बाबी पाळल्या तर दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना चांगले शिक्षण देता येईल.

उतारा क्र. 3:

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे काम केले आहे.
उत्तर:
आपल्या शाळांमधून दिले जाणारे औपचारिक शिक्षण एकांगी आहे. या शिक्षणाने एक चांगला नागरिक घडवता येणे अशक्य आहे. म्हणून शिक्षणाशी संबंधित क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे कार्य केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कल्पना स्पष्ट करा:
1. अंधश्रद्धा निर्मूलन
2. महिला विकास.
उत्तर:
1. अंधश्रद्धा निर्मूलन : अंधश्रद्धेमुळे माणसे चुकीच्या मार्गांनी जातात. स्वत:ची विचारशक्ती, विवेकबुद्धी गमावून बसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत. यांमुळे माणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत नुकसान, अपयश मिळत राहिल्याने ती हतबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धांच्या मागे लागतात. या परिस्थितीचा लबाड लोक गैरफायदा घेतात. ते दुबळ्या माणसांना लुबाडतात, म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी चळवळ, म्हणजे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ होय.

2. महिला विकास : शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची नितांत गरज असते. त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजेत. महिला कमावत्या असतील, तर त्यांना आत्मविश्वास येतो. त्या शिक्षित असतील, तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते. दृष्टी व्यापक बनते. मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार होते. महिलांना उपजीविकेची साधने मिळवून देणे, शिकू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे, स्त्रीपुरुष समानतेचा दृष्टिकोन रुजवणे या गोष्टी प्राधान्याने महिला विकासात येतात.

प्रश्न 2.
आशय स्पष्ट करा:
अनेक मानसन्मान अनुताईंच्या शोधात भटकत राहिले.
उत्तर:
वेगवेगळ्या कर्तबगारी गाजवलेल्यांना शासन व समाज सन्मान देऊन त्यांचा गौरव करतात. कित्येकजण हे सन्मान मिळावेत म्हणून गैरमार्गाने प्रयत्न करतात. अनुताईंना मात्र कार्य करण्यातच रस होता, त्यांचे कार्यच एवढे उत्तुंग होते की, त्यांचा सन्मान करावा, असे सर्वांनाच वाटत होते. म्हणून अनुताईंनी न मागता अनेक सन्मान त्यांना मिळत गेले.

उतारा क्र. 4:

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
उत्तर:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल, अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील बाबींची घातकता सांगा:
1. रूढी
2. परंपरा
3. अंधश्रद्धा
4. स्थितिशीलता.
उत्तर:
1. रूढी: रूढींमुळे माणसे विचार करीत नाहीत, चिकित्सा करीत नाहीत. घातक प्रथा तशाच राहतात.
2. परंपरा: पूर्वापार चालत आलेली जगण्याची रीत म्हणजे परंपरा. परंपराप्रिय माणसे नवीन गोष्टींना, सुधारणांना विरोध करतात.
3. अंधश्रद्धा: भूताखेतांच्या, देवधर्माच्या खूप जुन्या कल्पनांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंधश्रद्धा’. अंधश्रद्धाळू माणसे विज्ञाननिष्ठेकडे पाठ फिरवतात. अंधश्रद्धेतून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे खूप नुकसान होते. कधी कधी माणसांचे प्राणही जातात. अंधश्रद्धेमुळे प्रगतीच्या मार्गात अडचणी निर्माण होतात.
4. स्थितिशीलता: आहे त्याच स्थितीला चिकटून राहणे आणि त्याच स्थितीत राहण्यात आनंद मानणे, म्हणजे ‘स्थितिशीलता’. या वृत्तीमुळे प्रगती, विकास होत नाही. किंबहुना प्रगतीला विरोध केला जातो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
1. ज्ञानाचा दिवा जपणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे.
उत्तर:
1. ज्ञानाचा दिवा जपणे: दिव्यामुळे प्रकाश पडतो. अंधार दूर होतो. आपल्याला स्पष्टपणे सर्व दिसते. ज्ञानामुळेही सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व घटना, प्रसंग, माणसे, माणसांचे वागणे आपल्याला कळते. म्हणून ज्ञानाला दिवा म्हणतात. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे ज्ञान वाढवत राहणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे: मनात अज्ञानामुळे अंधार निर्माण होतो. कधी कधी अंधश्रद्धेने सत्य काय व असत्य काय हे कळत नाही. रूढींमुळेही हा गोंधळ उडतोच. भूताखेतांवर विश्वास ठेवल्यामुळेही मनात भीती निर्माण होते. हे सर्व अंधाराचेच प्रकार होत. या अंधारामुळे माणूस योग्य दिशेने प्रगती करू शकत नाही. ज्ञानामुळे हे सर्व अंधार नष्ट होतात. माणूस प्रगती करू शकतो.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
अनुताईंच्या मार्गातील खडतरपणा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आदिवासींमध्ये कमालीचे दारिद्र्य असल्यामुळे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्ग घेण्यासाठी साधी जागा मिळत नसे. बसण्याच्या सोयी, खडू-फळा या गोष्टीही मिळत नसत. अनुताईंनी या स्थितीलाही खंबीरपणे तोंड दिले. जेथे मिळेल तेथे वर्ग घेतले. प्रसंगी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी झोपडीत, तर कधी उघड्याबोडक्या माळावर वर्ग घेतले.

सर्व भौतिक सोयींची वानवा होतीच. पण आदिवासींची मानसिकताही शिक्षणाला पूरक नव्हती. पोट भरण्यासाठी भटकावे लागत असल्याने मुलांना शिक्षणासाठी मोकळे ठेवणे त्यांना परवडत नसे. शिवाय, अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी-परंपरा यांच्या प्रभावामुळेही आदिवासी लोक शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत. त्यांना पुन:पुन्हा समजावून सांगून शिक्षणाकडे आणावे लागे. यात अनुताईंची बरीचशी शक्ती खर्च होई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा:
1. चंदनाचे हात। पायही चंदन।
तुका म्हणे तैसा। सज्जनापासून।
पाहता अवगुण। मिळेचिना।। (संत तुकाराम)
2. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]

2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
उत्तर:
1. [सज्जन] आणि [चंदन]
2. (अ) [सुगंधित]
(आ) [त्यांच्यात अवगुण नसतो]

2. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा: (उत्तरे अधोरेखित केली आहेत.)
उत्तर:

सामासिक शब्दविग्रह
1. भेदाभेदभेद किंवा अभेद
2. गप्पागोष्टीगप्पा, गोष्टी वगैरे
3. मीठभाकरमीठ, भाकर वगैरे
4. केरकचराकेर, कचरा वगैरे

‌3. ‌शब्दसिद्धी‌:‌ ‌

प्रश्न 1.
‌उपसर्गघटित‌ ‌व‌ ‌प्रत्ययघटित‌ ‌यांत‌ ‌वर्गीकरण‌ ‌करा‌‌:‌
‌(नि:स्वार्थी,‌ ‌दिशाहीन,‌ ‌व्यावहारिक,‌ ‌प्रयत्न)‌ ‌
उत्तर‌:‌ ‌
उपसर्गघटित‌ ‌प्रत्ययघटित‌ ‌नि:स्वार्थी‌ ‌
दिशाहीन‌ ‌व्यावहारिक‌ ‌ प्रयत्न‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

4.‌ ‌वाक्प्रचार‌‌:

प्रश्न 1.
‌पुढील‌ ‌वाक्प्रचारांचा‌ ‌अर्थ‌ ‌सांगून‌ ‌वाक्यांत‌ ‌उपयोग‌ ‌करा‌‌:
‌1. ‌आयुष्य‌ ‌गमावणे‌ ‌
2. कोलमडून‌ ‌पडणे.‌
‌उत्तर‌:‌
‌1.‌ ‌आयुष्य‌ ‌गमावणे -‌ ‌अर्थ‌ ‌:‌ ‌जीवन‌ ‌संपवणे.‌ ‌
वाक्य‌:‌ ‌स्वातंत्र्यलढ्यामध्ये‌ ‌अनेक‌ ‌क्रांतिवीरांनी‌ ‌देशासाठी‌ ‌आपले‌ ‌आयुष्य‌ ‌गमावले.‌ ‌

2.‌ ‌कोलमडून‌ ‌पडणे‌ ‌-‌ ‌अर्थ‌ ‌:‌ ‌मनाने‌ ‌ढासळणे.‌ ‌
वाक्य‌:‌ ‌अतिवृष्टीने‌ ‌पिकांचा‌ ‌नाश‌ ‌झाल्यामुळे‌ ‌अनेक‌ ‌शेतकरी‌ ‌कोलमडून‌ ‌पडले.‌ ‌

(आ‌) भाषिक‌ ‌घटकांवर‌ ‌आधारित‌ ‌कृती‌ :

1.‌ ‌शब्दसंपत्ती‌:‌

प्रश्न 1.‌ ‌
पुढे‌ ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌
उदा.,‌ 1.‌ ‌सापेक्ष‌ ‌×‌ ‌निरपेक्ष‌, ‌2.‌ ‌अनावृष्टी‌ ‌× ‌अतिवृष्टी.‌
1. आरोह‌ ‌
2.‌ ‌दीर्घायुषी.‌ ‌
उत्तर:
1. आरोह × अवरोह
2. दीर्घायुषी × अल्पायुषी.

प्रश्न 2.‌ ‌
तक्ता पूर्ण करा:

एकवचनटेकडीवर्ग
अनेकवचनक्षेत्रेज्योती

उत्तर:

एकवचनटेकडीक्षेत्रवर्गज्योत
अनेकवचनटेकड्याक्षेत्रेवर्गज्योती

प्रश्न 3.‌ ‌
पुढील शब्दांतील अक्षरांपासून प्रत्येकी चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. जाणीवपूर्वक
2. शिफारस.
उत्तर:
1. (1) जाणीव (2) पूर्व (3) जावक (4) कणी.
2. (1) फार (2) फास (3) रस (4) सर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

2. लेखननियम:

प्रश्न 1.‌ ‌
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमांनुसार शुद्ध लिहा:

  1. दुरदृष्टि
  2. ओपचारिक
  3. स्थीतीशिल
  4. नीमुर्लन
  5. भातूकलि
  6. आदराजलि.

उत्तर:

  1. दूरदृष्टी
  2. औपचारिक
  3. स्थितिशील
  4. निर्मूलन
  5. भातुकली
  6. आदरांजली.

३. विरामचिन्हे:

प्रश्न 1.‌ ‌
नावे लिहा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिली आहेत.)
1. [,] स्वल्पविराम
2. [;] अर्धविराम

एक होती समई Summary in Marathi

प्रस्तावना:

उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार. त्यांना साहित्यनिर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळाले आहे. दीनवाणे, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे.

अनुताई वाघ (17 मार्च 1910-17 सप्टेंबर 1992) यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठात करून देण्यात आला आहे.

शब्दार्थ:

1. व्रतस्थ – कठोरपणे एखादया व्रताचे आचरण करणारे.
2. निरपेक्ष – कार्य केल्याच्या बदल्यात काहीतरी मिळण्याची अपेक्षा न ठेवता.
3. स्थितिशील – कोणताही बदल होऊ न देता, आहे त्याच स्थितीत राहण्याची वृत्ती असलेले.
4. औपचारिक शिक्षण – पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे शाळांमध्ये क्रमाने दिले जाणारे रूढ शिक्षण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. कपाळावरील कुंकू पुसले जाणे – पतीला मृत्यू येणे, विधवा होणे.
2. डोळ्यांतले अश्रू पुसणे – दुःख दूर करणे, दुःख दूर करण्यास मदत करणे.
3. भविष्याचा वेध घेणे – भावी काळात काय काय होऊ शकेल याचा अंदाज बांधणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 6 या झोपडीत माझ्या Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 6 या झोपडीत माझ्या Textbook Questions and Answers

1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

प्रश्न 1.
कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

झोपडीतील सुखेमहालातील सुखे
1.1.
2.2.

उत्तर:

झोपडीतील सुखेमहालातील सुखे
1. ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे.1. झोपण्यासाठी मऊ बिछाने.
2. देवाचे नाव नित्य गावे.2. कंदील व शामदाने यांची रोषणाई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

2. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 2

3. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 2.1
उत्तर:
1. निजावयास जमीन
2. रात्री गगनातले तारे

4. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

प्रश्न 1.
‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरे
धनदौलत संग्रहित ठेवण्याचे (साठवण्याचे) साधन कोणते?

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

5. काव्यसौदर्य:

प्रश्न (अ)
‘पाहुनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या’. या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात. सुखसमाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे, अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात – माझ्या झोपडीत सुखसमाधान आणि शांतीचे है साम्राज्य आहे. झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्रालासुद्धा माझ्या सखाचा हेवा वाटतो. माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार या ओळीतून व्यक्त होतो.

प्रश्न (आ)
‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडीकुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये; म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. कवी म्हणतात – माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपाने बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे.

1. झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 3
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

2. उजळणी- तक्ता पूर्ण करा.

उपमेय – आईचे प्रेम                         उपमान – सागरउपमेय – आंचा   उपमान – साखर
उपमाआईचे प्रेम सागरासारखे असते.
उत्पेक्षाआईचे प्रेम म्हणजे जण सागरच.
रूपकवात्सल्यसिप आई.

3. महण म्हणजे काय?

‘मह’ शाविषय मनोरंजक आहे. आपण व्यवहारात वापरल्या जाणान्या म्हणी – उदा. -‘आये तसे भरा किया ‘गामाता गुळाची चा काय’ यांसारख्या म्हणींचा अभ्यास केला तर, ‘म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन.’ या ज्ञानाचा आपल्याला बोलताना, लिहिताना अनेक प्रसंगी उपयोग करता येतो आणि आपले बोलणे, लिहिणे अधिक प्रभावशाली करता येते. भाषेला सौंदर्य प्राप्त होते. किंबहुना त्या भाषेची ती भूषणे आहेत. शब्द म्हणजे वाहूनही कटीन असतात आणि फुलातूनही कोमल असतात, असे म्हटले जाते ते शब्दांच्या अर्वासाठी.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 4

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 6 या झोपडीत माझ्या Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 6

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 7
उत्तर:
1. मज्जाव
2. पहारे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. झोपडीतले सौख्य पाहून ………………. लाजतो. (देवेंद्र/सुरेंद्र/वीरेंद्र/राजेंद्र)
2. झोपडीत नित्य ……… विराजते. (भ्रांती/खंती/शांती/भक्ती)
उत्तर:
1. झोपडीतले सौख्य पाहून देवेंद्र लाजतो.
2. झोपडीत नित्य शांती विराजते.

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
उत्तर:
झोपडीत राहण्याचे सुख वर्णन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात -एखादया राजालाही राजमहालात जे सुखसमाधान मिळाले असेल, ती सर्व सुखे मला माझ्या झोपडीत मिळतात.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – या झोपडीत माझ्या.
उत्तर:
या झोपडीत माझ्या
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.
2. कवितेचा विषय → अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते, याचे निवेदन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. सौख्य = सुख
  2. भूमी = जमीन
  3. नाम = नाव
  4. मज्जाव = मनाई
  5. भीती = भय
  6. मऊ = नरम
  7. बोजा = वजन, भार
  8. सदा = सतत.

4. कवितेतून मिळणारा संदेश → श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये, जे प्राप्त परिस्थितीत मिळते, ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते, ही शिकवण मिळते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – ‘या झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली, तर मानसिक सुख लाभते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
→ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे माहात्म्य सांगताना म्हणतात-झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → राजालाही जी सुखे मिळत नाहीत, ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना, मानाने, सुखासमाधानाने जगावे, हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’
उत्तर:
आशयसौंदर्य: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘या झोपडीत माझ्या’ या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.

काव्यसौंदर्य: प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवींना म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय । झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच ‘या’ देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज , हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट-‘या है अंगाने अर्थवाही झाला आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित प्रत्येकी दोन शब्द लिहा.
उत्तर:

उपसर्गघटितप्रत्ययघटित
अविचारबालपण
सुविचारम्हातारपण

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मऊ
  2. महाल
  3. नित्य
  4. शांती.

उत्तर:

  1. मऊ × टणक
  2. महाल × झोपडी
  3. नित्य × अनित्य
  4. शांती × अशांती.

प्रश्न 2.
तक्ता भरा:

एकवचनताराझोपडी
अनेकवचनतिजोऱ्याबिछाने

उत्तर:

एकवचनतारातिजोरीझोपडीबिछाना
अनेकवचनतारेतिजोऱ्याझोपड्याबिछाने

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. माजाव, मज्जाव, मज्जव, माज्जाव.
  2. प्रभुनाम, परभुनाम, प्रभूनाम, प्रभुनमा.
  3. भिती, भिति, भीति, भीती.
  4. तिजोरि, तीजोरी, तिजोरी, तीजोरि.

उत्तर:

  1. मज्जाव
  2. प्रभुनाम
  3. भीती
  4. तिजोरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
(अ) [ . ] [ ; ] [ ‘ ‘ ] [ – ]
(आ)

  1. एकेरी अवतरणचिन्ह
  2. पूर्णविराम
  3. संयोगचिन्ह
  4. अपूर्णविराम

उत्तर:
[.] पूर्णविराम
[;] अपूर्णविराम
[‘ ‘] एकेरी अवतरणचिन्ह
[ _ ] संयोगचिन्ह

या झोपडीत माझ्या Summary in Marathi

कवितेचा आशय:

लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो. महालातली सुखे झोपडीतही प्राप्त होतात. अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय साध्या शब्दांत या कवितेत केले आहे.

शब्दार्थ:

  1. महाल – राजवाडा, प्रशस्त घर.
  2. सौख्ये – सुखे, वैभव.
  3. प्राप्त झाली – मिळाली, लाभली.
  4. भूमी – जमीन.
  5. प्रभुनाम – देवाचे नाव, भजन.
  6. नित्य – नेहमी, सतत.
  7. पहारा – रखवाली, नजरकैद.
  8. तिजोरी – खजिनापेटी.
  9. तया – त्या.
  10. मज्जाव – अटकाव, निबंध.
  11. शामदाने – काचेचा दिवा, झुंबर.
  12. माने – सन्मान.
  13. सुखे – आरामात, सुखाने.
  14. बोजा – वजन, (इथे अर्थ) दडपण, धाक.
  15. माते – माझे.
  16. देवेंद्र – इंद्र, देवांचा राजा.
  17. लाजे – शरमतो.
  18. सदा – नेहमी.
  19. विराजे – शोभते, नांदते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

कवितेचा भावार्थ:

एखादया राजाला राजमहालात जी सुखे मिळाली असतील, ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभली आहेत. अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे नि रात्री आकाशातील चांदण्यांकडे, ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते. देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो.

महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेले असते; त्यावर सक्त पहारे ठेवले जातात. तरी सुद्धा तेथे चोऱ्या होतात. माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहेत. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही; चोरण्याइतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाहीत.

राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. ‘अटकाव’ हा शब्द तिथे असतो. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात नि कंदील, झुंबरांची रोषणाई केलेली असते. माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हाच सन्मान आहे. धरतीचाच बिछाना आहे.

माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या नि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये-जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Textbook Questions and Answers

1. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:

प्रश्न 1.
कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:
उत्तर:

  1. वानरेया – [ ]
  2. सर्वज्ञ – [ ]
  3. गोसावी – [ ]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 1

3. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

प्रश्न 1.
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उतारा:
डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करू लागलेः नाथोबाए म्हणीतलें: “नागदेयाः तू कैसा काही हीवसी ना?” तवं भटी म्हणीतलें: “आम्ही वैरागी: काइसीया हीवुः” यावरी सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि की गाः” यावरि भटी म्हणीतलें: “जी जी: निर्वीकार तो कवणः”

सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससिः” “हो कां जी:’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: “कव्हणी ऐकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असाः’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

4. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

प्रश्न 1.
पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 2

5. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच, नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.

6. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.
उत्तर:
आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विदयार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विदयार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण विदयार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वत:ची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

1. व्यतिरेक अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय – [ ] उपमान- [ ]

व्यतिरेक अलंकाराचे वैशिष्ट्य- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे मानले आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक’ अलंकार होतो.

प्रश्न 1.
पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा:
तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतल ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 3
उत्तर:

उपमेयउपमानसमानगुण
तू (परमेश्वर/गुरू)माउलीमायाळूपणा
चंद्रशीतलता
पाणीपातळपणा

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Additional Important Questions and Answers

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 4

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 5

प्रश्न 3.
योग्य पर्याय ओळखून विधान पूर्ण करा :
………………………, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.
उत्तर:
(य) व्यापार चांगला व्हावा
(र) लोकांचे मनोरंजन व्हावे
(ल) नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा
(व) कामातले कष्ट कमी व्हावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:
1. डोमग्रामी सकाळी सकाळी पुढील काम चालू होते: (भोगस्थानाची शुश्रूषा / जीवाचे वैराग्य /मातीचा व्यापार/मातीकाम)
2. श्रीचक्रधरस्वामी यांनी ज्यांना दृष्टान्त सांगितला, तेः (गोसावी / कठीया / नागदेवाचार्य / पुजारी)

उत्तर:

1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 6

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 7

3. नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.

4. मातीकाम

  1. नागदेवाचार्य.

5. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश: आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली, तर त्याचासुद्धा अहंकार बाळगता कामा नये. हा अहंकार म्हणजे विकारच होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले, तर तो खरा वैरागी होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:

  1. महानुभाव पंथाचे संस्थापक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू)
  2. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ – (गोविंदप्रभुचरित्र, श्रीकृष्णचरित्र, लीळाचरित्र, दत्तात्रयप्रभुचरित्र)
  3. लीळाचरित्राचे लेखक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
  4. श्रीचक्रधरस्वामींचे गुरू – (भटोबास, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
  5. ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ हा दृष्टान्त कथन करणारे – (नाथोबास, नागदेव, म्हाइंभट, श्रीचक्रधरस्वामी)

उत्तर:

1. [नागदेवाचार्य]

  1. [श्रीचक्रधरस्वामी]
  2. [श्रीचक्रधरस्वामी]

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 8

3. श्रीचक्रधरस्वामी

  1. लीळाचरित्र
  2. म्हाइंभट
  3. श्रीगोविंदप्रभू
  4. श्रीचक्रधरस्वामी

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

समास:

  • कमीत कमी दोन शब्द एकत्र येण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात.
  • दोन शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
  • सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.

उदा.,

दोन शब्दसामासिक शब्दविग्रह
1. भाऊ/बहीणभाऊबहीणभाऊ आणि बहीण
2. नील/कमलनीलकमलनील असे कमल
3. तीन/कोनत्रिकोणतीन कोनांचा समूह

समासाचे प्रकार:

  1. समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
  2. समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
    पहिला शब्द → पहिले पद दुसरा शब्द → दुसरे पद
  3. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद ( – )

समासांचे मुख्य चार प्रकार होतात:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 9

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

लक्षात ठेवा:

  1. अव्ययीभाव समास → पहिले पद प्रधान (उदा., दररोज).
  2. तत्पुरुष समास → दुसरे पद प्रधान (उदा., विदयालय, क्रीडांगण).
  3. वंद्व समास → दोन्ही पदे प्रधान (उदा., भाऊबहीण).
  4. बहुव्रीही समास → दोन्ही पदे गौण (उदा., नीळकंठ).

या इयत्तेत आपल्याला:

1. कर्मधारय
2. द्विगू
3. वंद्व (इतरेतर/वैकल्पिक/समाहार)
हे समास शिकायचे आहेत.

1. कर्मधारय समास:

  • कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
  • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 10
म्हणून ‘नीलकमल, मातृभूमी’ हे कर्मधारय समास आहेत.

2. द्विगू समास

  • द्विगू समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
  • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या तत्पुरुष समासाला द्विगू समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 11
म्हणून ‘त्रिकोण, नवरात्र’ हे द्विगू समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. द्ववंद्ववं समास:

ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्याला वंद्व समास म्हणतात.

द्ववंद्ववं समासाचे उपप्रकार:

द्वंद्व समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे

  1. इतरेतर द्वंद्व
  2. वैकल्पिक द्वंद्व व
  3. समाहार वंद्व असे तीन उपप्रकार पडतात.

1. इतरेतर द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष
2. आईवडील → आई व वडील

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘आणि’, ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात, तेव्हा त्यास इतरेतर वंद्व समास म्हणतात.
म्हणून ‘स्त्रीपुरुष, आईवडील’ हे इतरेतर द्वंद्व समास आहेत.

2. वैकल्पिक द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:
1. सुखदुःख → सुख किंवा दुःख
2. भेदाभेद → भेद किंवा अभेद

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘किंवा’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला. जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘किंवा, अथवा, वा’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात व दोन्ही पदे परस्परविरोधी असतात, तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘सुखदुःख, भेदाभेद’ हे वैकल्पिक द्वंद्व समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. समाहार वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. गप्पागोष्टी → गप्पा, गोष्टी वगैरे
2. मीठभाकर → मीठ, भाकर वगैरे

वरील दोन्ही सामासिक शब्दांत अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणून त्यांचा विग्रह करताना आपण ‘वगैरे’ या शब्दाचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांत इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्यांचा विग्रह करताना ‘वगैरे, इतर, इत्यादी’ अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘गप्पागोष्टी, मीठभाकर’ हे समाहार वंद्व समास आहेत.

4. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:

  1. त्रिगुण
  2. भाऊबहीण
  3. नीलकमल
  4. स्त्रीपुरुष.

उत्तर:

  1. त्रिगुण → तीन गुणांचा समूह
  2. भाऊबहीण → भाऊ आणि बहीण
  3. नीलकमल → निळे असे कमल
  4. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

5. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द वाचून उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा: (नम्रता, उपवास, विरोधक, ममत्व)
उत्तर:

उपसर्गघटितप्रत्ययघटित
उपवासनम्रता
विरोधकममत्व

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
1. बरवे = ……………….
2. दृष्टान्त = ……………..
उत्तर:
1. बरवे = चांगले
2. दृष्टान्त = दाखला.

प्रश्न 2.
प्रचलित मराठीतील समानार्थी शब्द लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 12
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 13

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
1. सुरुवात × ……………
2. प्राचीन × ……………
उत्तर:
1. सुरुवात – शेवट
2. प्राचीन × अर्वाचीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
पुढील शब्दापासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा : वीकारावेगळा : ……………………
उत्तर:

  1.  काळा
  2. राग
  3. वेग
  4. वेळा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. निर्वीकार, निविर्कार, निर्विकार, नीर्विकार.
2. दृश्टांत, दुष्ट्रान्त, दृष्टान्त, दृष्टांत.
उत्तर:
1. निर्विकार
2. दृष्टान्त.

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Summary in Marathi

प्रस्तावना:

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. इ. स. 1283 च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला आहे. महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य म्हाइंभट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ते बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी होते.

‘लीळाचरित्र’ म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे चरित्र होय. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर म्हाइंभटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामींच्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणी म्हणजे ‘लीळाचरित्र’ होय. यांतील एकेक आठवण म्हणजे एकेक लीळा होय. येथे कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे.

प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार-वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हासुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. तीच या पाठात सांगितली आहे.

हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

पाठाचा सरळ अर्थ:

एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्रीचक्रधरस्वामींकडे मातीकाम चालू होते. त्या वेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र भटोबास (नागदेवाचार्य) यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना , विचारले, “नागदेवा, तुला कशी थंडी वाजत नाही?” तेव्हा नागदेव म्हणाले, “आम्ही वैरागी. आम्हां वैराग्यांना कसली आली थंडी!’

त्यावर स्वामी म्हणाले, “राजे हो, (हे नरश्रेष्ठा,) प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हासुद्धा एक विकारच आहे.” मग नागदेवांनी विचारले, “हो; तर मग निर्विकार कोण?”

स्वामी उत्तरले, “जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय?” नागदेव म्हणाले, “बरं, बरं.’ त्यावर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितला. तो दृष्टान्त असा: कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची (नैवेदयाच्या जागेची) देखभाल करीत असे. साफसफाई करीत असे. सडासंमार्जन करीत असे. (जमीन सारवून रांगोळी काढीत असे.) ते पाहून गावकरी म्हणू लागले, “गुरवांनो, तुम्ही खूप नेटके करीत आहात. छानच करीत आहात.” ते ऐकून तो पुजारी (स्तुतीने खूश झाला आणि) रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले. अन्य काही नाही.

शब्दार्थ:

  1. सी बाजत होते – थंडी वाजत होती.
  2. व्यापार – काम.
  3. होववे ना – होईना, करता येईना.
  4. हीवसी ना – गारठला नाहीस, थंडी वाजली नाही.
  5. काइसीया – कशी काय, का, कशाला, कोणत्या कारणाने.
  6. हीवु – थंडी, गारठा.
  7. कवण – कोण.
  8. केव्हेळाही – कधीही.
  9. जालाचि – झालाच.
  10. कठीया – गुरव, पुजारी.
  11. भोगस्थान – देवाला नैवेदय दाखवण्याची जागा.
  12. सडासंमार्जन – सकाळी झाडलोट करून, जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढणे.
  13. गावीचे – गावातले लोक, गावकरी.
  14. नीके – स्वच्छ, शुद्ध, नीटनेटके.
  15. बरवे – छान, चांगले.
  16. आइकौनी – ऐकून.
  17. दीसवडी – दररोज, प्रतिदिनी.
  18. नेदी – देत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

टिपा:

1. डोमग्राम – डोंबेग्राम (गावाचे नाव), सध्याचे नाव ‘कमालपूर’, ता. नेवासे, जिल्हा अहमदनगर.

2. पाठात उल्लेखलेल्या व्यक्ती:

  1. गोसावी – श्रीचक्रधरस्वामी.
  2. भक्तीजन – श्रीचक्रधरस्वामींचे भक्त.
  3. भट – नागदेवाचार्य, ज्येष्ठ भक्त. यांनाच भट, भटोबास, नागदेव या नावांनीही संबोधले जाई. ते सतत चपळतेने वावरत. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी आपले भक्त नागदेव यांना प्रेमाने ‘वानरा’, ‘वानरेश’ असे संबोधित असत. ‘वानर’ किंवा ‘वानरेश’ यांमधील ‘वा’ हा प्रशंसावाचक शब्द असून, ‘नर’ किंवा ‘नरेश’ म्हणजे नरश्रेष्ठ राजा हा अर्थ पंथीय परंपरेनुसार रूढ झालेला आहे. ‘वानरा/वानरेश’ म्हणजे ‘वा राजे’ किंवा ‘वा नरश्रेष्ठा’ असा पंथीय परंपरेतील रूढ अर्थ आहे.
  4. सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी.
  5. कठीया – गुरव, पुजारी, मंदिरातील पूजाअर्चा, मूर्त्यांची देखभाल, गाभाऱ्याची देखभाल वगैरे कार्ये ज्याच्यावर सोपवलेली असतात ती व्यक्ती.
  6. गावीचे – गावचे, गावातील लोक, गावकरी, ग्रामस्थ.

3. दृष्टान्त – एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते, त्या वेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला ‘दृष्टान्त’ किंवा ‘दृष्टान्तकथा’ म्हणतात. इसापनीतीमधील सर्व कथा या दृष्टान्तकथाच होत.

4. महानुभाव पंथ: हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे. इसवी सनाच्या १३व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. , रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन पुढे दोन-तीन शतके या पंथाचा खूप प्रसार झाला. विशेषतः महाराष्ट्र, त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते मध्य भारत, पंजाब व काश्मीर एवढ्या भूभागांत या पंथाची वाढ है अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या झाली.

हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता. कर्मकांडांतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातिनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे आहेत.

5. श्रीचक्रधरस्वामी: हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत. रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र, ते कोमल अंत:करणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे, तर प्राणिमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Textbook Questions and Answers

1. खालील फरक लिहा.

प्रश्न 1.
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र व हास्यचित्र
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:
व्यंगचित्र :- हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात मांडलेला एखादा गमतीदार विचार आपल्या सहज लक्षात येतो.

हास्यचित्र :- ‘सफाईदार, रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय.’ हास्यचित्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिले की आपल्याला छान हसू येते. या गमतीदार चित्रांमध्ये एक जोक, एक विनोद मांडलेला असतो. त्या चित्रांमधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला
दिसून येत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्रे
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:

  1. हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
  2. व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्यांचा हेतू नसतो.
  3. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं.
  4. आपण जर अशा व्यंगचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवते. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हसवण्याशिवाय ते व्यंगचित्र आपल्याला अजून काहीतरी सांगू पाहत असते. आपण त्या चित्रापाशी थोडे थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो. सफाईदार रेषांनी काढलेल्या अशा गमतीदार चित्रातील दाखवलेल्या हावभावांतून व्यक्तीचे गुणदोष चटकन आपल्या लक्षात येतात.

संवेदनशील व्यक्ती असे चित्र पाहून आपल्या वागण्याबोलण्यात बदल करू शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या पाठात दिलेले हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे व्यंगचित्र पाहा. लहान मुलगा आणि मोठा माणूस दोघेही व्हायोलिन वाजवत आहेत. पण केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की, दोघेही एकच आहेत. पण लहानपणी मोठे व्हायोलिन तर मोठे झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे.

याचाच अर्थ असा की, लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते. म्हणजेच आपली आवड किंवा आपला एखादा छंद त्यांच्यासाठी सर्वस्व असते. त्या वयात ती आवड खूप मोठी असते. परंतु, वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद लहान होत जातो. बाह्य आकाराचे आकर्षण कमी झालेले असते, हे त्या चित्रकाराला सांगायचे आहे. याचाच अर्थ असा की, लहानपणी जपलेला छंद, मोठ्या आवडीने आपण मोठेपणीसुद्धा जपला तर जीवनातल्या ताण-तणावांवर, दु:खांवर आपण सहज मात करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर लहानपणीचा जपलेला छंद हा त्याचा गुण, तर मोठेपणी या छंदाकडे केलेले दुर्लक्ष हा त्याचा दोष चित्रातून प्रभावीपणे मांडलेला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘हास्यचित्रांतली मुलं’ या पाठातील ‘चिंटूच्या चित्रमालिका’ हे एक व्यंगचित्र दिलेले आहे. ते मला खूप आवडले आहे. त्यातील ‘पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो?’ हा चिंटूचा साधा प्रश्न मला पटकन कळलाच नाही. त्याने असे का विचारले असेल? याचा उलगडा मला लगेच झाला नाही. पण तिसऱ्या चित्रात बाबांनी विचारलेल्या ‘का रे?’ या प्रश्नाला चिंटूने दिलेल्या “तुमच्या स्कुटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय,” या अगदी निरागस, सहज उत्तराने मला त्याच्या प्रश्नाचा अर्थ कळला. उत्तर देताना चिंटूने फिरवलेला चेहरा, त्याचे बाबांकडे न पाहणे, डोळ्यातले निरागस भाव चटकन आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
व्यंगचित्र रेखाटण्यासाठी अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपली चित्रकलेवर हुकूमत असली पाहिजे. चित्रातल्या रेषा अत्यंत सफाईदारपणे काढता आल्या पाहिजेत. शिवाय बारीक निरीक्षणशक्ती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. आजूबाजूच्या माणसांच्या, जनावरांच्या, पशु-पक्षांच्या सवयी, त्यांच्या लकबी या सर्वांचे निरीक्षण व्यंगचित्रकाराला करता आले पाहिजेत.

त्याचबरोबर चित्रामधून एखादा विनोद, मांडता आला पाहिजे. असे चित्र पाहताना समोरच्या व्यक्तीला हसू आले पाहिजे. शिवाय त्याला विचार करायला भाग पाडले पाहिजे. म्हणजेच व्यंगचित्रकाराने अशा चित्रातून गमतीदार विचार मांडणे आवश्यक असते. त्यासाठी व्यंगचित्रकाराकडे विनोदबुद्धी असणे गरजेचे असते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
लहान मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे, केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं. फार कमी जणांना अशी लहान मुले चित्रित करणे जमते. लहान मुलाचं चित्र काढताना, त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हाता-पायांची बोटं लहान काढली की आपोआप नखं लहान होतात.

नाकाचा, ओठांचा आकार लहान काढल्यावर त्यांच्या डोळ्यांवरच्या भुवया तशाच लहान किंवा एकाच रेषेच्या होतात. शिवाय लहान मुलांना दाढी-मिश्या नसतात त्यामुळे त्या दाखविण्याची गरज पडत नाही. म्हणूनच लहान मुलांची हास्यचित्रे काढताना मोठ्या माणसांकडे आणि लहान मुलांकडे बारकाईने पाहणे, त्यांचे नीट निरीक्षण करणे आवश्यक ठरते.

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: मधुकर धर्मापुरीकर
कालावधी : 1954
परिचय: कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक-अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘अनकॉमन मॅन आर. के. लक्ष्मण’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी अॅण्ड फ्रेंडज’ या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. ‘अप्रपू’, ‘रूप’, ‘विश्वनाथ’, ‘चिनकूल’ हे कथासंग्रह, ‘रेषालेखक वसंत सरवटे’, ‘हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे’ ही पुस्तके प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

प्रस्तावना:

‘हास्यचित्रांतली मुलं’ हा पाठ लेखक ‘मधुकर धर्मापुरीकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेद दाखवत हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? ती कशी वाचायला पाहिजेत? हे अगदी रंजक पद्धतीने सांगितले आहे.

Writer ‘Madhukar Dharmapurikar has written this write-up named ‘Hasyachitrantali Mula’. He teaches us in an entertaining way how to enjoy the art of cartoons and caricatures and how to distinguish between the two.

शब्दार्थ:

  1. हास्यचित्र – हसू येण्यासारखे चित्र
  2. व्यंगचित्र – विनोदी चित्र (caricature, cartoon)
  3. भेदाभेद – भेदभाव (discrimination)
  4. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  5. बारकाईने – लक्षपूर्वक (with full attention)
  6. कौशल्य – कुशलता, कसब (skill)
  7. हेतू – उद्देश, उद्दिष्ट, कारण (intention, reason)
  8. विनोद – थट्टा, उपहास (jokes, humour, jesting)
  9. रोपटे – लहान कोवळे झाड (a plant)
  10. लवचीक – न मोडता वाकणारा (flexible)
  11. रांगणे – सरपटत जाणे (to creep, to crawl)
  12. नक्कल – अनुकरण (copy, imitation)
  13. हुबेहूब – अगदी सारखे (exactly the same)
  14. चतुर – धूर्त (shrewd)
  15. भाव – भावना (emotion)
  16. खेडे – लहान गाव (village)
  17. उत्साह – जोश, जोम, उमेद (enthusiasm, energy)
  18. उत्तम – चांगले, उत्कृष्ट (best, excellent)
  19. आकर्षण – मोहकता (attraction)
  20. भुवया – भिवई (eyebrow)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

टिपा:

1. चिंटू – सकाळ वृत्तपत्रातील एक विनोदी चित्रमालिका. याचे लेखन प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांनी केले आहे. चिंटू हे पात्र मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे. यात विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातल्या घटना दिल्या जातात.

2. शि. द. फडणीस – शिवराम दत्तात्रेय फडणीस (29 जुलै, 1925) भारतातील प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार.

3. डेव्हिड लँग्डन – (24 फेब्रुवारी, 1914 – नोव्हेंबर, 2011) त्याचे पहिले व्यंगचित्र 1935 मध्ये एलसीसी कर्मचारी जर्नल, लंडन टाउनमध्ये प्रसिद्ध झाले.

4. आर. के. लक्ष्मण – राशीपुरम कृष्णास्वामी अय्यर (24 ऑक्टोबर, 1921-26 जानेवारी, 2015) भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक. ते त्यांच्या ‘कॉमन मॅन’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ मधील ‘यू सेड इट’ या चित्रमालिकेसाठी प्रसिद्ध आहेत.

5. नॉर्मन थेलवेल – (23 मे, 1923 – 7 फेब्रुवारी, 2004), ब्रिटिश व्यंगचित्रकार. घोड्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध होते.

वाक्प्रचार:

  1. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  2. विचार मांडणे – कल्पना, मत मांडणे
  3. भोकाड पसरणे – जोरजोरात रडणे
  4. हुकूमत गाजवणे- वर्चस्व, अधिकार गाजवणे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Textbook Questions and Answers

1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 1

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

2. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 2

3. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:

प्रश्न 1.
पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष
2. सुख
3. सम

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

प्रश्न (आ)
‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.

उपक्रम:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे….’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

भाषा सौंदर्य:

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा बाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार.

अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, आता उपमेय आणि उपमानातील साधावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया.

1. रूपक अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखा :
1. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 3
2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5

2. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये-

1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य.
2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे.
3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इ. साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर.

उपमेय व उपमान (कमल व नयन) यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे ‘रूपक’ अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत (उपमा) किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे (उत्प्रेक्षा) असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

3. जेव्हा वाक्यांत उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक’ अलंकार होतो.

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
उपमेय – [ ]
उपमान – [ ]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.

वृक्षसंत
मान-अपमान जाणत नाहीत.निंदा-स्तुती समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5.1

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. सज्जनांची भेट होणे म्हणजे ……..”ची गाठ पडणे होय. (भक्ती-मुक्ती/जिवा-शिवा/सुख-दु:ख/निंदा-स्तुती)
2. कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला ——— नका असे म्हणत नाहीत. (मोडू/सोडू/तोडू/छेडू)
उत्तर:
1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
2. सज्जनांची भेट होणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे होय.
कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला तोडू नका असे म्हणत नाहीत.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 6
उत्तर:
[पूर्ण धैर्यवंत] [संत]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कृती 4 : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.

लक्षात ठेवा:

1. इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (आ) हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न 2 (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 7

2. वरील 8 कृतींपैकी कृतिपत्रिकेत 1-1 गुणाच्या पहिल्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती विचारली जाईल.
उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

3. ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा:

1. कवींचे/कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.
2. कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
3. कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.

महत्त्वाची नोंद: परीक्षेत आठपैकी कोणत्याही 3 कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृतींचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व 8 कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत. आशयावर आधारलेल्या प्रत्येकी 2 गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विदयार्थी स्वत:च्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिह शकतात.

उत्तर: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
  2. कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
  3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)
  4. वृक्ष = झाड
  5. चित्त = मन
  6. निंदा = नालस्ती
  7. सम = समान
  8. धैर्य = धीर
  9. जीव = प्राण.

4. कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

रसग्रहण:

इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

1. पठित पदयांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
2. काव्यसौंदर्य: यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
3. भाषिक वैशिष्ट्ये: यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: ‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:
नोंद : सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. निंदा करणे
2. स्तुती करणे.
उत्तर:
1. निंदा करणे – अर्थ : नालस्ती करणे.
वाक्य: कुणीही कुणाची कधीही निंदा करू नये.
2. स्तुती करणे – अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य: गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मोहितची सरांनी वर्गात स्तुती केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

  1. वृक्ष
  2. सुख
  3. सम.

उत्तर:

  1. वृक्ष = झाड, तरू
  2. सुख = आनंद, समाधान
  3. सम = समान, सारखेपणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मान
  2. निंदा
  3. सुख
  4. पूर्ण.

उत्तर:

  1. मान × अपमान
  2. निंदा × स्तुती
  3. सुख × दुःख
  4. पूर्ण × अपूर्ण.

प्रश्न 3.
पुढे दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा:
नोंद: सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद (रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे)
उत्तर:

  1. रेखणे – रेखीव – रेखीव आकृती
  2. कोरणे – कोरीव – कोरीव काम
  3. ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्ट
  4. घोटणे – घोटीव – घोटीव शिल्प
  5. राखणे – राखीव – राखीव जागा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. सतजन, सज्जन, सजन्न, साज्जन.
2. स्तुती, स्तूती, स्तुति, स्तूति.
उत्तर:
1. सज्जन
2. स्तुती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

उपक्रम:

प्रश्न 1.
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Summary in Marathi

कवितेचा आशय:

या अभंगात संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ:

  1. जैसा – जसा.
  2. वृक्ष – झाड.
  3. नेणे – जाणत नाही.
  4. मान – सन्मान, गौरव.
  5. अपमान – अवमान.
  6. तैसे – तसे.
  7. सज्जन – संत.
  8. वर्तताती – वागतात, वर्तन करतात.
  9. चित्ती – मनात.
  10. तया – त्यांना.
  11. अथवा – किंवा. छेदू
  12. नका – तोडू नका.
  13. निंदा – नालस्ती, अपमानकारक बोलणे.
  14. स्तुती – प्रशंसा.
  15. सम – समान, सारखे.
  16. धैर्यवंत – हिंमतवान, गंभीर, निश्चल.
  17. भेटी – गाठभेट.
  18. जीव – प्राण.
  19. शिव – परब्रह्म, परतत्त्व.
  20. गांठी – एकत्र येणे.
  21. जाय – होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात – ज्याप्रमाणे वृक्षाला (झाडाला) मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत; त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे (सज्जनांचे) वर्तन असते. ।।1।।

कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली, तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. ।।2।।
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना ‘तोडू नका’ असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।3।।

तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।4।।

संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।5।।

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Textbook Questions and Answers

1. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 1

2. जोड्या लावा:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
उत्तर:

                   ‘अ’ गट‘ब’ गट
1. विठ्ठलाला धरले(अ) शब्दरचनेच्या जुळणीने
2. विठ्ठल काकुलती आला(आ) भक्तीच्या दोराने
3. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी(इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.

प्रश्न (आ)
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *

प्रश्न (इ)
प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्रीविठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा.
उत्तर:
श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, असे संत जनाबाई यांना वाटते आहे. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्याच्यावर सोहं शब्दाचा मारा केला. इतकेच नव्हे; तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

4. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल, तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे.

उपक्रम:
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 2

उत्तर:

  1. पंढरीचा चोर
  2. बंदिखाना
  3. हृदयाचा
    1. शब्दांची
    2. सोहं शब्दाचा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा:
1. पंढरीचा चोर म्हणजे (श्रीकृष्ण/श्रीविष्णू /महादेव/श्रीविठ्ठल) .
2. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण
(अ) त्याच्या पायात बेडी घातली.
(आ) त्याला हृदयात कोंडला होता.
(इ) त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.
(ई) त्याच्या गळ्यात दोर बांधला.

उत्तर:

  1. विठ्ठलाला धरले – भक्तीच्या दोराने
    1. विठ्ठल काकुलती आला – ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
    2. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी – शब्दरचनेच्या जुळणीने.
  2. पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल.
    1. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर.
उत्तर: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर

1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत जनाबाई.
2. कवितेचा विषय → विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. बेडी = साखळी
  2. जीव = प्राण
  3. पाय = पद
  4. हृदय = जिव्हार.

4. कवितेतून मिळणारा संदेश → भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:

‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।
→ संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला।।’
उत्तर:
आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

भाषाभ्यास:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आत
  2. चोर
  3. सोडणे.

उत्तर:

  1. आत × बाहेर
  2. चोर × साव
  3. सोडणे × धरणे.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. जुड्या
  2. दोर
  3. हृदय
  4. बंदिखाने.

उत्तर:

  1. अनेकवचन
  2. एकवचन
  3. एकवचन
  4. अनेकवचन.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बंदीखाना, बंदिखाना, बंधिखाना, बंदिकाना.
2. पंन्ढरी, पंढरी, पंढरि, पंडरी.
उत्तर:
1. बंदिखाना
2. पंढरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

उपक्रम:

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील स्त्री-संत कवयित्रींची माहिती मिळवा.

संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Summary in Marathi

कवितेचा आशय:

पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा; म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे. त्यासाठी चोर-शिपायाचे रूपक कवितेत वापरले आहे.

शब्दार्थ:

  1. गळां – गळ्यामध्ये.
  2. बंदिखाना – तुरुंग, कैदखाना.
  3. कोंडिला – डांबून ठेवला.
  4. शब्दें – शब्दांनी.
  5. जवाजुडी – कड्यांची साखळी.
  6. पायीं – पायात.
  7. बेडी – जखडून ठेवण्याची साखळी, साखळदंड.
  8. सोहं – अहंकार, मीपणा, व्यर्थ अभिमान.
  9. काकुलती – विनवणी करणे.
  10. बा – अरे.
  11. जीवें न सोडी – जिवंत सोडणार नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

श्रीविठ्ठलाबरोबर सुखसंवादरूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतात:

गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला (श्रीविठ्ठलाला) पकडले आहे. ।।1।।
माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे. ।।2।।
या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आहे. (भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.) ।।3।।
विठ्ठलावर मी (अहंकारी) अहंपणाचा भडिमार केला. ‘तू म्हणजे मीच’ असे सांगितले. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला. विनवणी करू लागला. ।।4।।
संत जनाबाई म्हणतात – अरे, विठ्ठला, मी तुला जिवंत सोडणार नाही. (माझ्या मनात कायम तुझा वास राहील, अशी तजवीज करणार आहे.) ।।5।।